महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर ; आशिष शेलार यांचा दावा

0
29
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. हाच मुद्दा उपस्थित करून आता महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर असल्याचा दावा भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी सोनिया गांधी यांच्या पत्रावरून राज्य सरकारला घेरले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वंचितांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. केंद्र सरकारच्या या योजनांचा फायदा राज्य सरकार जनतेला देत नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार गॅसवर आलं असून सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:चा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावाही शेलार यांनी केला.

लेटरबॉम्ब नसून हा तर संवाद – बाळासाहेब थोरात

दरम्यान, राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद आहे. हा लेटरबाँब नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आधारीत आहे. सामान्य माणूस हा आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. गरीब, मागासवर्गावर सरकारने अधिक लक्ष द्यावं ही आमची भूमिका आहे. त्यामुळे सरकारवर नाराजीचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here