राजकारण्यांना मिठी मारून, बिर्याणी खाऊन संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे राजकारण्यांना मिठी मारून, किंवा आमंत्रण न देता बिर्याणी खायला गेल्याने संबंध सुधरत नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे. मनमोहन सिंह यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत भाजप सरकारवर टीका केली आहे

मनमोहन सिंग यांनी भाजपचा राष्ट्रवाद हा नकली आहे तेवढाच धोकादायक देखील आहे असे म्हंटल आहे. यांचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या तोडा फोडा आणि राज्य करा या धोरणावर चालणारा आहे. हे सरकार परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, चीन आमच्या सीमेवर बसला आहे आणि त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.असंही सिंह म्हणाले.

मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब लोक अधिक गरीब होत आहेत असा खेद मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. कोरोना काळात केंद्राच्या वाईट धोरणांमुळं लोक आर्थिक समस्या, बेरोजगारी, वाढत्या महागाईनं त्रस्त आहे असेही त्यांनी म्हंटल

 

 

Leave a Comment