मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले त्यावेळी सरकारला जाग का आली नाही ? – छत्रपती शाहू महाराज

1
87
Thumbnail 1533186372659
Thumbnail 1533186372659
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कोल्हापूरातून इतिहासकार जयसिंग पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रण होते. शाहू महाराजांनी बैठकीला जाण्या आगोदर दसरा चौकात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना (Maratha Morcha) भेटण्याचे ठरवले. आंदोलकांना भेटल्यावर शाहू महाराजांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. ‘मोठया प्रमाणावर लाखोंच्या संख्येने मराठ्यांनी मूक मोर्चे काढले त्याच वेळी सरकारला जाग का आली नाही..आत्ता आंदोलन भडकल्यावर हे बैठकीचे नाटक कशाला ?’ असे शाहू महाराज म्हणाले.
दरम्यान आज सह्याद्रि अतिथीगृहावर मुख्यमंत्री मराठा समाजातील प्रमुख व्यक्तींनसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकी साठी मराठा समाजातील कलाकार, लेखक, विचारवंत, संशोधक आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here