एकाच घरात दोन-तीन पक्षांची मंडळी असतील तर राजकारणातून बाहेर पडा; नाना पाटेकर यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज नागपुरात राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. आपण एकमेकांना सांभाळणार आहोत. हे कधी कळणार आपल्याला. पुन्हा पुन्हा त्याच चक्रव्युव्हार का जातोय.आपल्यामध्येच राज्यकर्त्यांनी आपल्यामध्ये भींती बांधून टाकल्या आहेत. त्या तोडा. मग, हे सर्व सगळं संपेल. धर्म, जात कधी पाहिली नाही. अभिनेता म्हणून माझा चित्रपट पाहिला जातो. आवडला तर बघतात अन्यथा नाही. एकाच घरात दोन-तीन पक्षांचे लोकं आहेत. असं असेल तर सोडून द्या राजकारणातून बाहेर पडा, असा सल्ला पाटेकर यांनी दिला.

नागपुरात नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकोला चेक देण्याची वेळ येते. यासारखी दुर्दैवी बाब नाही. हा स्वागत समारंभ असू शकत नाही. प्रत्येकानं यामध्ये आपला सहभाग दिला पाहिजे. मला माझ्या वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. याचा प्रयत्न करतो. सरकार त्यांच्या पातळीवर काम करतं. प्रत्येकवेळी सरकारवर अवलंबून असणं योग्य नाही. आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचं आहे.

कोकण, पुण्यात पाऊस आल्यानंतर सगळ्या मोहोर गळून पडतो. कुठलं पीक घेतलं तर शेतकऱ्याला फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे. असा प्रयोग केला होता. शेतकऱ्याला तीन हजारांऐवजी एकरी तीन लाख रुपये मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला हमी देता आली पाहिजे. शासकीय दृष्टीकोनातून विचार करावा. पुढं येऊन काम करणारी माणसं हवीत, असे पाटेकर यांनी म्हंटले.