सेना-राष्ट्रवादीत तणाव? शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले आहेत. मातोश्रीवर येण्यापूर्वी शरद पवार आणि अनिल देशमुख यांची चर्चा झाली होती, त्यानंतर हे दोघे मातोश्रीवर पोहचले आहेत. शरद पवार, अनिल देशमुख यांच्यासह जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, सुभाष देसाईही मातोश्रीवर पोहचले आहेत.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सुप्त तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. याबाबत या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या तात्काळ रद्द करुन राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या सगळ्यामुळे तीन पक्षांच्या सरकारच्या स्थैर्याविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment