तुम्ही राजीनामा द्यावा अशीही जनतेची मागणी ; राष्ट्रवादीचा मोदींना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. संपूर्ण देशवासियांचा इच्छा होती म्हणून राजीव गांधी यांचे नाव हटवून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी मोदींना टोला लगावला आहे.

जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलले, हे चांगल आहे पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

आधीच्या सरकारने केलेल्या कामांची नावे फक्त राजकीय द्वेषातून बदलून त्याचे श्रेय लाटण्याची या सरकारची जुनी खोड आहे. तापलेल्या तव्यावर स्वतःची चपाती भाजण्याची सवय भाजपाने आता तरी बदलायला हवी. जनतेच्या आणखीही बऱ्याच मागण्या आहेत त्याकडे देखील प्रधान ‘सेवकांनी’ लक्ष द्यावे, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

Leave a Comment