Monday, December 15, 2025
Home Blog Page 1668

होय मी उपटसूंभ, पवार किस झाड कि पत्ती?; गोपीचंद पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

Gopichand Padalkar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. “पडळकरच्या टीकेला आणि उपटसूंभ लोकांना उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही”, अशा शब्दात अजित पवार यांनी उत्तर दिले. यावर आता पडलकरांनी पलटवार केला आहे. “होय आहे मी उपटसूंभ, पवार कुटूंब उपटून टाकणार, पुरून उरलोय म्हणून पवार कुटुंबीय माझ्यावर बावचळलं आहे. बारामतीत जाऊन त्यांना उत्तर देणार, अजित पवार किस झाड कि पत्ती, असा इशारा देत घणाघाती टीका पडळकरांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिले. पडळकर म्हणाले की, निवडणुकीत इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला आहे. तर मग अजित पवार किस झाड कि पत्ती आहे. अजित पवारांना बरोबरी ठरवण्याचा अधिकार कुणी दिलेला नाही.

जनतेनी त्यांना जास्तीची मते दिली म्हणून त्या मस्तीमध्ये आणि त्या माजामध्ये जाउ नये. या जनतेने अनेक लोकांना घरी बसवलेलं आहे. इंदिरा गांधी यांच्यासारख्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे अजित पवार हे किस झाड कि पत्ती आहे. त्यांना सुद्धा काही काळामध्ये त्यांचं उत्तर मिळेल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

साऊथची अभिनेत्री महालक्ष्मीनं केलं दुसरं लग्न, 4 महिन्यांनी म्हणतेय की, आयुष्य खूप सुंदर आहे आणि तो…

South actress Mahalakshmi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऊथची अभिनेत्री महालक्ष्मी हि तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. महालक्ष्मीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत दुसरं लग्न केले असून आता त्यांच्या लग्नाला चार महिने झाले आहेत. तिने चार महिन्यानंतर आपलया आयुष्यात झालेल्या बदलाबाबत सांगितलं आहे.

अभिनेत्री महालक्ष्मी कायम पती रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणारी महालक्ष्मी आता दुसऱ्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिनं आता तिच्या इन्ट्राग्रामवरून तिचे घरातील व चंद्रशेखरणसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CnJJKGEyT4u/?utm_source=ig_web_copy_link

 

महालक्ष्मी हि एक अभिनेत्री साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले असून ‘ऑफिस’, ‘थिरु मंगलम’, ‘केलाडी कनमनी’, ‘यामिरुक्का बयामेन’, ‘अरसी’, ‘वाणी रानी’ आणि ‘चेल्लामय’ या मालिकांमध्ये काम केले आहे, तर रविंद्र यांनी देखील अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

https://www.instagram.com/p/Cml-x0hStMd/?utm_source=ig_web_copy_link

महालक्ष्मीने सुरुवातीला आपलं करिअर सुरू करताना अनिल नेरेदिमिल्लीबरोबर लग्न केले. त्यावेळी अनिल याचेही एक लग्न झाके होते. दोघांना एक मुलगा देखील आहे. तिने कालांतराने आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती एकटी पडली. यावेळी तिच्या वाईट काळात निर्माता रविंदर यांनी तिची मदत केली. रविंदरने तिच्याशी लग्न केले. आता ती त्याच्यासोबत चांगले आयुष्य जगत आहे.

कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याने मालकाला नागरिकांनी चोपले

cafe

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अश्लील चाळे करणाऱ्यांना तसेच कॅफे चालकाला नागरिकांनीच चांगलाच चोप दिला. यावेळी उपस्थित नागरिकांनी आक्रमक होत कॅफे बंद केला.

वाई शहरात गेल्या चारच दिवसापूर्वी अल्पवयीन युवतीवर कॅफेत बलात्काराची घटना ताजी आहे. तरीही सातारा शहरात असे प्रकार समोर आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जावू लागला आहे. कारण अवघ्या काही अंतरावर असे प्रकार घडत आहेत. परंतु त्यावर कारवाई होत नसल्यानेच नागरिकांना आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे.

पोलीस प्रशासन स्वतःचे खिसे गरम करत आहे. त्यामुळेच पोलीस प्रशासन कॅफे मालकांकडे दुर्लक्ष करते आहे, असाही आरोप नागरिकांनी यावेळी केला. या प्रकारानंतर कॅफे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख अशा कॅफेवर कारवाई करणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

उर्फीबाबत अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या की, ती जे करतेय त्यात…

Amruta Fadnavis Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत आली आहे. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून उर्फीविरोधात आक्रमक पावित्रा घेतला जात आहे. मात्र, याउलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उर्फीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही,” असे फडणवीस यांनी म्हंटल आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, कपडे घालण्याबाबत प्रत्येकाचे विचार असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार आहेत ते त्यांनी प्रकट केले आणि त्या दृष्टीने त्या ॲक्शन घेत आहेत. माझा विचार आहे कि उर्फीने थोडं संस्कृतीच्या हिशोबाने राहिली तर चांगलं आहे. ती पण एक स्त्री आहे. ती सुद्धा स्वतःसाठी काही तरी करत आहे. त्याच मला काही वावगं वाटत नाही.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. या दोघींमधील शाब्दिक युद्ध काही केल्या थांबायचे नावचं घेत नाही. काळ तर दोघींनी एकमेकींवर चांगला निशाणा साधला. मला पूर्ण कपडे घातल्यामुळे ॲलर्जी होते, असे उर्फीने म्हटले. आणि या कारणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आम्ही इलाज करतो, असे म्हटले. यानंतर उर्फीने ‘चित्रा मेरी सासू” हे ट्विट केले. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान चर्चेत राहिले. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी उर्फीच्या बाजूने प्रतिक्रिया दिली असल्याने याला चित्रा वाघ यांच्याकडून नेमकं काय उत्तर दिलं जाणार? हे पहावं लागणार आहे.

आ. बाळासाहेब पाटील यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन

Anganwadi workers

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत, प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. तेव्हा वेतनवाढ करावी अशी, मागणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी केली आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना निवदेन देण्यात आले. यावेळी अध्यक्षा नुरजहा शिकलगार, सचिव सुकेशनी गाडे, उपसचिव संगीता गुरव यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

निवेदनात म्हटले आहे की, सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. कामांचा बोजा मात्र दररोज वाढत चालला आहे. आम्ही वेळोवेळी प्रकल्पापासून विधानसभेपर्यंत मोर्चे काढतो, आश्वासनांपलिकडे सरकार काहीच करत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी असतांना महिला व बालविकास विभागाने पोषण ट्रॅकर नावाचा अॅप इंग्लिशमध्ये अंगणवाडीला सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये अपलोड करायला सांगितला आहे. 2018 ला आम्हांला निकृष्ट दर्जाचे मोबाईल सरकारने दिले होते. त्यापैकी जादातर मोबाईल बिघडले आहेत. काहींवर ते अॅप डाऊनलोड होत नाहीत. आम्हांला इंग्लिश लिहीणे जमत नाही. परंतु स्थानिक अधिकारी मात्र खाजगी मोबाईल वापरा म्हणतात, धमक्या देतात आम्ही मानसेवी असतांना अपमानकारक बोलतात.

15 नोव्हेंबरला मुंबई विधानसभेवर अंगणवाडी कृती समितीने मोर्चा नेला. दिवाळीपूर्वी मानधनवाढ करणार असे सांगणरे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोर्चासमोर येऊन एक महिन्याची मुदत द्या, मी मानधनवाढ देणार सांगितले. पुढे काहीच झाले नाही, म्हणून नागपूर विधानसभेवर 27 डिसेंबरला मोर्चा गेला. तिथे मी सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांना भेटा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.

अंगणवाडी सेविकाच्या मागण्या पुढीलप्रमाणे-
१) अंगणवाडी कर्मचा-यांना वेतनश्रेणी, बोनस, ग्रॅज्युईटी द्या. दरम्यानच्या कालावधीत किमानवेतन सेविकांना व मिनी सेविकांना 18 हजार रुपये, मदतनीसना 15 हजार रुपये दरमहा द्यावेत.
२) सेविकांना नवीन मोबाईल शासनाने द्यावेत.
३) पोषण ट्रॅकर पूर्ण मराठीत द्यावे.
४) कुपोषण रोखण्यासाठी आहाराचे आत्ताचे दर तिप्पट करा.
५) अंगणवाडी कर्मचा-यांची सध्या भरती प्रक्रीया बंद केली आहे, तातडीने रिक्त जागा भरा.

ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट व शिंदे गटात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता हि सुनावणी पुढील महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, घटनापीठाने हि सुनावणी पुढे ढकलली. शिवसेनेत पडलेली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आदींसह महत्वाच्या मुद्यांवर दोन्ही गटाकडून याचिका करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज घटनापीठाने दिलेल्या निर्णयावर सात सदस्यीय घटनापीठाने या मुद्द्यांचा फेरविचार करावा तसेच सुनावणी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. आता 14 फेब्रुवारीला सलग सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निकाल आता पुढील महिन्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर पडला आहे.

निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मित्राने केली मित्राचीच हत्या

Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीवरून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या (killed) केली आहे. निवडणुकीच्या विरोधात काम केल्याच्या रागातून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या दरम्यान तिघांमधील एकाला गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू (killed) झाला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना बीडमधील आष्टी या ठिकाणी घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून दोन भाऊ आणि अन्य एकास घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना बीडच्या आष्टी शहरात घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान काल रात्री मृत्यू (killed) झाला.

तात्या बबन सुरवसे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाना बबन सुरवसे आणि अमोल मुरकुटे हे दोघे या हाणामारीत गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आष्टी पोलिसात नगरसेवकांसह ईतर आरोपी विरोधात गुन्हा (killed) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे अद्याप फरार आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

आनंदराव चव्हाण पंतसंस्थेकडून धनादेश व ठेव पावतीचे वितरण

Anandrao Chavan Pantsanstha

कराड | मंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पाटण शाखेतील कर्जदार सभासद अपघातात मृत्यू पावले. त्याच्या कर्जाला विमा संरक्षण असल्याने कर्ज भरून उर्वरित रक्कम वारसांना देण्यात आली. आनंदराव चव्हाण पंतसंस्थेचचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

पाटण शाखेतील सभासद मुबारक चांद शेख (रा. पाटण) यांचे मुंबई येथे अपघाती निधन झाले. त्यांनी संस्थेतून कर्ज घेतले होते. त्या कर्जास संस्थेने विमा संरक्षण दिले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर संस्थेने त्यांच्या विमा रकमेचा क्लेम करून कर्ज रक्कम भरणा केली. तसेच शिल्लक राहिलेल्या विमा रकमेचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना वितरण करण्यात आला. मुबारक शेख यांचे कर्ज 50 हजार रूपये होते. तर विमा संरक्षण 1 लाख 50 हजार रूपये होते. यावेळी पाटण सल्लागार समितीचे सदस्य महिपती जाधव, तुषार पवार, शाखाप्रमुख नंदकुमार पाटील, कॅशिअर भूषण घाडगे, लिपिक अनिता घाडगे, स्वाती मोळावडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

उंब्रज शाखेत ठेव पावतीचे वितरण
मुंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पंतसंस्थेच्या उंब्रज शाखेच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त साजरा झाला. संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी सभासद सत्यवान मोहिते, शाखा उंब्रज शाखाप्रमुख रोहित सुनील माने, कॅशिअर सुनिल कदम, जयश्री शितोळे, उमेश पालकर यांच्यासह कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

तीनदिवसीय सुरजागड यात्रा महोत्सव संपन्न; सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण, विविध समस्यांवर मंथन

एटापल्ली : तालुक्यातील प्रशिद्ध सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरात आदिवासींचे दैवत ओअदाल पेन, ठाकुर देव यात्रा महोत्सव पाच जानेवारी ते सात जानेवारी अशा तीन दिवसांत यात्रा सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण व विविध सामाजिक समस्यांवर विचार मंथन करून उत्साहात संपन्न झाला आहे.

आदिवासी थोर योद्धा स्वातंत्र्य सेनानी विर बाबूराव सेडमाके यांचे वास्तवाने पावन व आदिवासी समाजाचे दैवत ओअदाल पेन, ठाकुर देवाचे श्रद्धा स्थान, मौलीक व जागतिक दर्जाचे लोहखनीज युक्त सुरजागड पहाड़ी परिसरात गेली शेकडो वर्षापासून यात्रा महोत्सवाचे आयोजन सुरजागड हलका पारंपरिक पट्टीच्या वतीने केले जाते.

सुरजागड लोहखनीज गड हा आदिवासींच्या रूढ़ी, पारंपारिक, कला, सांकृतिक, सामाजिक उद्बोधनाचे केंद्र असून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील तथा लगतचे छत्तीसगड़, तेलंगाना व आंध्रप्रदेश राज्यातील आदिवासी बांधव मोठया संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. तीन दिवस होणाऱ्या यात्रा महोत्सवात रूढ़ीपरंपरागत निसर्ग, देवी दैवतांचे पूजन, सांस्कृतिक कला महोत्सव व इलाका पट्टीच्या नागरिकांचे महाचर्चा सत्र घेण्यात आले.

यावेळी सामाजिक समस्या, नागरिकांच्या भौतिक सोयी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा समस्यांच्या उपाययोजनावर तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व रक्षण अशा विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शनातून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, बिरसा ब्रिगेट संयोजक इंजिनिअर सतीश पेंदाम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ग्रामसभांचे प्रतिनिधी तथा जिल्हा परिषद माजी सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, मंगेश नरोटी, अमोल मारकवार, सैनू हिचामी, व आदी मान्यवरांकडून मत व्यक्त करण्यात आले. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

शिंदे- फडणवीस सरकारचा मृत्यू ठरलेला, पुढचा महिना बघणार नाही : खा. संजय राऊत

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

दिल्ली | या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे. जिवंत सरकार नाही. निकाल वेळेत लागला आणि कोणीही अडथळे आणले नाहीत. तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा हल्लाबोल शिंदे- फडणवीस सरकारवर खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दिल्ली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी श्री. राऊत म्हणाले, एक घटनाबाह्य सरकार राज्य करतय, निर्णय घेतयं आणि भ्रष्टाचार करत आहे. या देशात लोकशाही व न्याय व्यवस्था आहे की नाही ही आजच्या खटल्यावरून सिध्द होईल. सत्यमेव जयते तेजाने तळपत असेल तर आम्हाला न्याय मिळेल. एक पक्ष फोडण्यासाठी पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला. गेल्या चार महिन्यापासून निवडणूक आयोग, न्यायालयात आम्ही समोर जात आहोत. तारखावर तारखा पडत असून निष्क्रीय सरकार हसत आहे. महाशक्ती पाठीशी असल्याने घटनाबाह्य सरकार चालत राहील असे त्यांना वाटत आहे. महाशक्ती असेल किंवा अन्य काही असले तरी आमचा देशाच्या न्यायशक्तीवर आमचा विश्वास आहे.

राहूल गांधीच्या यात्रेचा विरोधकांनी धसका घेतला
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा भूमिका स्पष्ट आहे. काश्मीर आणि पंजाब या दोन्ही राज्यातून शेवटचा टप्पा पार करणार आहेत. हा राजकीय इव्हेंट नाही. राहूल गांधीच्या कपड्यावरून कसला वाद करत आहात. एका तपस्वी व्यक्तीप्रमाणे प्रवास करत असल्याची लोकांची भावना आहे. कपड्यावरून व खाण्यावरून वाद निर्माण करणारे लोक देशात द्वेष पसरवत आहेत. राहूल गांधीची भारत जोडो यात्रा ही विरोधकांनी धसका घ्यावा, अशी असल्याची खा. संजय राऊत म्हणाले.

देशात सर्वात असुरक्षित राज्य महाराष्ट्र
महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या आड शिवसेना येवू शकते. त्यामुळे भाजपाने पहिल्यांदा शिवसेनेचे तुकडे केले. उद्या आमच्यावर देशद्रोहीचे गुन्हे दाखल होवू शकतात. सरकारच्या नेतृत्वात देशात महाराष्ट्र राज्य असुरक्षित आहे. पोलिसांचा वापर भांडोत्री गुंडाप्रमाणे करू नका. महाराष्ट्रातील पोलिसांची प्रतिमा जगात होती. ती मलीन करू नका, असेही खा. संजय राऊत म्हणले.