Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2974

‘हे आई-बाबांना कळालं तर…’;पालकांच्या भीतीने 10 वीच्या विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

sucide

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील झुंझुनूंमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 10 वीच्या वर्गातील विद्यार्थ्याने पालकांच्या भीतीने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून क्लास बंक करीत होता आणि याबाबत घरातील सदस्यांना कळाले. यामुळे पालकांच्या भीतीने त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.

मृत भूपेंद्र हा हा टागोर पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता. पोलिसांना कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र बऱ्याच दिवसांपासून शाळेत जात नव्हता. याबाबत पालकांना कळालं तेव्हा त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलण्याचं ठरवलं. यानंतर भूपेंद्र पुरता घाबरला आणि त्याने आत्महत्या केली. भूपेंद्रचा मोठा भाऊ रिक्षा चालवित होता. त्या दिवशी गावावरुन भूपेंद्र रिक्षातून भावासोबतच आला होता. मध्य रस्त्यात मित्राकडे जायचं सांगून तो रिक्षातून खाली उतरला. सकाळी शाळेत जाणार असल्याचे त्याने आपल्या भावाला सांगितले.

यानंतर भूपेंद्रने आत्महत्या केली. शाळेच्या विद्यार्थ्यानी सर्वात आधीत भूपेंद्रला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. हे विद्यार्थी कॅन्टीनच्या दिशेने जात होते तेव्हा त्यांना एका झाडावर भूपेंद्र लटकलेल्या अवस्थेत दिसला. विद्यार्थ्यांनी तातडीने शाळेच्या व्यवस्थापनेला याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पुढील तपास सुरु केला.

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स मेगा लिलावात ‘या’ 5 खेळाडूंना करू शकते लक्ष्य

नवी दिल्ली । आयपीएल 2020 चेन्नई सुपर किंग्जसाठी खराब सीजन ठरला होता, मात्र त्यानंतर 2021 मध्ये CSK ने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी 14 पैकी 9 सामने जिंकले आणि पॉईंट टेबल मध्ये लीगच्या टप्प्यात दुसरे स्थान पटकावले. CSK ने नॉकआउट्समध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आणि अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चौथे आयपीएल विजेतेपद पटकावले. CSK ने IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांच्याशिवाय इतर सर्व खेळाडू लिलावात गेले. यावर्षी संघाला पुन्हा नवीन संघ तयार करायचा आहे, ज्यासाठी CSK या 5 खेळाडूंना आपले लक्ष्य बनवू शकते.

शार्दुल ठाकूर : शार्दुल ठाकूरच्या उपस्थितीमुळे संघाला संतुलन मिळते. तो सहाव्या गोलंदाजाचा पर्याय ठरतो आणि फलंदाजी युनिटमध्ये खोली देखील जोडतो. CSK ने मधल्या षटकांमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्येही त्याचा हुशारीने वापर केला. जेव्हा-जेव्हा CSK संकटात सापडला आहे, तेव्हा ठाकूर त्यांच्यासाठी सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्व 16 सामने खेळले आणि 25.09 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या. हा त्याचा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम होता.शार्दुल ठाकूरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 61 सामन्यांत 27.86 च्या सरासरीने 67 विकेट्स घेतल्या आहेत.

सॅम करन: यावेळी संघांना फक्त चारच खेळाडू ठेवण्याची परवानगी होती. दुर्दैवाने, चेन्नई सुपर किंग्जला पुढील सीजनसाठी सॅम करनला सोडावे लागले. एमएस धोनीने आयपीएल 2020 मध्ये या इंग्लंडच्या सीमरचा चांगला वापर केला. टूर्नामेंटच्या भारतीय लीगमध्येही सॅम करनने चेंडूद्वारे खूप प्रभावी कामगिरी केली. त्याने 9 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या, मात्र त्याला बॉलिंगच्या जोरावर फारशी संधी मिळाली नाही. सॅम करन हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात चांगल्या खेळाडूंपैकी एक आहे आणि CSK त्याला संघात परत आणू इच्छितो.

इशान किशन: चेन्नई सुपर किंग्जच्या अविभाज्य भागांपैकी एक असलेला फाफ डू प्लेसिस आता या फ्रँचायझीचा भाग नाही. गेल्या वर्षी तो फलंदाजीत उत्कृष्ट होता, मात्र CSK ने त्याला लिलावात सोडण्याचा निर्णय घेतला. वाढत्या वयामुळे, कदाचित बरेच संघ त्याच्यात रस घेणार नाहीत. अशा स्थितीत तो सहज CSK मध्ये सामील होऊ शकतो, मात्र संघ दुसऱ्या सलामीवीराचाही शोध घेईल. ऋतुराज गायकवाड सोबत सलामीची जोडी तयार करणारा इशान किशन हा खेळाडू असू शकतो. त्यांचे उजव्या-डाव्या हाताचे संयोजन संघाला सुस्थितीत ठेवेल.

राहुल चहर : चेन्नई सुपर किंग्जला फिरकी विभागात रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांच्यावर अवलंबून राहावे लागले आहे. दोघेही चेंडूद्वारे प्रभावी आहेत, मात्र सीएसकेने त्यांच्या फिरकी आक्रमणातील विविधता गमावली. फिरकी आक्रमण मजबूत करण्यासाठी ते राहुल चहरच्या रूपात लेगस्पिनर आणू शकतात. मुंबई इंडियन्सने राहुलला सोडले असून तो लिलाव पूलचा भाग आहे. चहर स्पर्धेदरम्यान मुंबईसाठी नेहमीच प्रभावी ठरला आहे. त्याच्या अपवादात्मक कामगिरीमुळे त्याला 2021 च्या T20 विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान मिळण्यास मदत झाली. लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या नजरा त्याच्यावर असतील.

ट्रेंट बोल्ट: CSK ला वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या गोलंदाजाची उणीव आहे. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यांनी लुंगी एनगिडीसह प्रयत्न केला होता मात्र तो फारसा चांगला खेळ करू शकला नाही. ट्रेंट बोल्टने या स्पर्धेच्या मागील दोन सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी चांगली गोलंदाजी केली आहे. बोल्ट सध्या जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि CSK न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजासाठी मोठी रक्कम खर्च करेल.

जमिनीच्या वादातून नाशिकमधील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

nashik matter

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – माणसाकडे पैसे आले कि तो आपली सगळी रक्ताची नाती विसरतो आणि त्यांच्या जीवावर उठतो. याच घटनेचा प्रत्यय नाशिकमध्ये आला. यामध्ये पैसा आणि जमिनीचा तुकड्यासाठी रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. या घटनेत महिला आणि वृद्धांना बेदम मारहाण करण्यात आली. हि सर्व घटना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात ही हाणामारीची घटना घडली आहे. या ठिकाणी जमिनीच्या तुकड्यावरून दोन गटामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. आज या वादातून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या हाणामारीत काही तरुणांनी महिला आणि वृद्धांना हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

https://www.instagram.com/tv/CYmTsJOBHMN/?utm_medium=copy_link

महिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आले. तर एका तरुणाने हॉकी स्टिकने वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. यावेळी जखमी झालेल्या महिला मारहाण करणाऱ्यांकडे दया याचना करत होत्या. पण या तरुणांनी मारहाण सुरूच ठेवली. घरात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्नही या तरुणांनी केला. ही संपूर्ण घटना याच घरातील मुलाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे. या मारहाणीत वयोवृद्ध व्यक्तीला व महिलांना जबर मार लागला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘या’ 6 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल; तज्ञांच्या विशेष सूचना

SIP

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात पुन्हा एकदा समतोल साधून अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे जागतिक समस्याही समोर आहेत. अशा परिस्थितीत,1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक अर्थसंकल्प सादर करणे हे अर्थ मंत्रालयापुढे मोठं आव्हान असेल. भारताचे आर्थिक स्वप्न साकार करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पात 6 क्षेत्रांवर किंवा उद्योगांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या क्षेत्रे किंवा उद्योगांबाबत अर्थसंकल्पाकडून आपल्या पुढील अपेक्षा आहेत

1. घर खरेदीदारांना प्रोत्साहन

रोजगार निर्मितीबरोबरच, रिअल्टी क्षेत्र अनेक लघु आणि मध्यम उद्योगांना देखील आधार देते. निवासी घरे किंवा व्यावसायिक मालमत्तांच्या मागणीत वाढ झाल्याने अप्रत्यक्षपणे त्याच्याशी जोडलेल्या सर्व क्षेत्रांना फायदा होईल. गृहकर्जाचे दर सध्या खूपच कमी आहेत, त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ आहे. गृहकर्जावरील व्याज किंवा मुद्दलाची परतफेड यावरील टॅक्स बेनेफिटची सध्याची लिमिट अनुक्रमे 50,000 रुपयांनी 2 लाख आणि 1.5 लाख रुपयांनी वाढवली पाहिजे.

2. घरगुती बचतीचे आर्थिक मालमत्तेत रूपांतर करण्यावर भर द्या

विकासाला चालना देण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेला गुंतवणुकीची गरज आहे. गुंतवणूक एकतर FDI मधून किंवा मुख्य प्रवाहातील अर्थव्यवस्थेशी घरगुती बचत जोडून येऊ शकते. आर्थिक मालमत्तेमध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी केली पाहिजे, जेणेकरून एखादी व्यक्ती सहजपणे गुंतवणूक करू शकेल. तसेच, सर्व आर्थिक मालमत्तेसाठी एक सेंट्रलाइज्ड KYC प्रक्रिया असावी. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडाची मर्यादा 1.5 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवणे हे देखील या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरेल.

3. आर्थिक साक्षरता आणि पर्सनल फायनान्स यावर भर

जगातील सुमारे 17 टक्के लोकसंख्या भारतात राहते, त्यापैकी 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. पण तरीही येथील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ 24 टक्के आहे. शाळेतील पर्सनल फायनान्स हा असा विषय असावा जो नागरिकांसाठी पाया तयार करू शकेल जे त्यांच्या बचतीचे गुंतवणुकीत बदल करू शकतात आणि स्वतःसाठी तसेच अर्थव्यवस्थेसाठी संपत्ती निर्माण करू शकतात. आगामी अर्थसंकल्पात या दिशेने धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे हे स्वागतार्ह पाऊल ठरेल.

4. बँकेच्या आवाक्याबाहेर असलेल्या लोकसंख्येला जोडणाऱ्या फिनटेक कंपन्यांना प्रोत्साहन देणे

या देशातील मोठी लोकसंख्या अजूनही बँकिंग सेवांच्या आवाक्याबाहेर आहे. अनेक फिनटेक कंपन्या या लोकसंख्येपर्यंत तंत्रज्ञान आणि इतर साधनांच्या सहाय्याने मायक्रोक्रेडिट आणि कर्ज देणे यासारख्या औपचारिक सेवा पुरवत आहेत. आर्थिक समावेशासाठी हे उत्तम काम करत आहे. या क्षेत्रासाठी कर सवलती, फंडस् चा सुलभ प्रवेश यासारखी पावले स्वागतार्ह असतील.

5. सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (SGB) साठी लॉक-इन कालावधी कमी करा

फिजिकल गोल्डच्या खरेदीची मागणी कमी करणे आणि घरगुती बचतीचे आर्थिक बचतीमध्ये हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने SGB लाँच करण्यात आले. लॉक-इन कालावधी पाच वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत कमी केल्याने आणि तीन वर्षांनंतर बाहेर पडताना LTCG चा लाभ घेतल्यास घरातील आणि व्यक्तींच्या हातात पैसे परत येतील. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचे संचालन वाढण्यास मदत होईल ज्यामुळे जास्त वापर आणि गुंतवणूक होईल.

6. कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (CTT)

कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (CTT) लागू झाल्यानंतर, एक्सचेंजेसवरील व्हॉल्यूममध्ये मोठी घट झाली आहे आणि अनेक व्यापाऱ्यांनी त्यांचे तळ दुबईसारख्या इतर ठिकाणी हलवले आहेत. आपलयाकडे आता बुलियन इंडेक्स, ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स, डिलिव्हरी सेंटर्स आणि वेअरहाऊसिंग सुविधा आणि अलीकडेच घोषित आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंज यासह आर्थिक साधनांची विस्तृत श्रेणी आहे. अशा परिस्थितीत, CTT माफ केल्याने भारतीय बाजारपेठांमध्ये लक्षणीय सहभाग आणि व्हॉल्यूम येईल आणि निर्माण होणारा टॅक्स हा CTT लागू केल्यानंतर कमावलेल्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त असेल.

जर ‘या’ बँकांमध्ये खाते असेल तर आता काही सेवांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Banking Rules

नवी दिल्ली । बँक ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे की, काही बँकांनी त्यांच्या काही सेवांचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँकेने त्यांच्या काही सेवा शुल्कात वाढ केली आहे. बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज, लॉकर चार्ज आणि खाते बंद करण्याचे चार्ज वाढवले ​​आहे.

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक सेवांसाठीचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. आता महानगर मधील ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान 10 हजार रुपये बॅलन्स ठेवावा लागणार आहे. अन्यथा, त्यांना वेगळी फी भरावी लागेल. हा नवीन नियम 15 जानेवारीपासून लागू होणार आहेत. मिनिमम बॅलन्स लिमिट ग्रामीण शाखेत 1000 रुपये, शहरांमध्ये 2000 रुपये, शहरी शाखेत 5000 रुपये आणि मेट्रो शहरांमध्ये 10,000 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी मेट्रो शहरांच्या शाखेत ही लिमिट 5000 रुपये होती.

बँकेने सांगितले की, जर मिनिमम बॅलन्स राखला नाही तर आता ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना प्रति तिमाही 400 रुपये शुल्क द्यावे लागेल. आधी ते 200 रुपये प्रति तिमाही होते. त्याचप्रमाणे, शहरी आणि मेट्रो भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात पुरेशा बॅलन्स न ठेवल्याबद्दल 600 रुपये तिमाही शुल्क भरावे लागेल. यापूर्वी हे शुल्क प्रति तिमाही 300 रुपये होते.

Punjab National Bank

लॉकर चार्जही वाढले
पंजाब नॅशनल बँकेने लॉकरच्या चार्जमध्येही वाढ केली आहे. आता बँकेचे ग्राहक वर्षातून 12 वेळा त्यांच्या लॉकरला फ्री व्हिझिट देऊ शकतात. यानंतर, त्यांच्याकडून प्रत्येक व्हिझिटसाठी 100 रुपये आकारले जातील. पूर्वीच्या ग्राहकांना वर्षभरात 15 फ्री व्हिझिट मिळत असत. बँकेने लॉकर चार्जही 250 रुपयांवरून 500 रुपये केला आहे.

करंट अकाउंटवर जास्त चार्ज
PNB मध्ये, जर तुम्हाला करंट अकाउंट उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत ते बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी 800 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी हे शुल्क 600 रुपये होते.

एचडीएफसी बँकेनेही वाढवला ​​आहे चार्ज
पंजाब नॅशनल बँकेच्या धर्तीवर, खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपल्या अनेक सेवांसाठीचे शुल्क वाढवले ​​आहे. बँकेने ट्रान्सझॅक्शन संबंधित मेसेज चार्ज प्रति मेसेज 20 पैसे वाढवला ​​आहे. 20 पैशांवर जीएसटीही वेगळा भरावा लागेल. पूर्वी हा चार्ज दर तिमाहीला तीन रुपये होते.

‘भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जपानला मागे टाकेल’

नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत आहेत. IHS मार्किटने शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, भारत 2030 पर्यंत आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी जपानला मागे टाकू शकतो. तोपर्यंत भारताच्या GDP चे आकारमान जर्मनी आणि ब्रिटनपेक्षा जास्त होऊन जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे.

भारत सध्या जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे
IHS मार्किटने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये हे दशक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगले राहण्याची अपेक्षा आहे. भारत सध्या अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटननंतर जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

भारत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल
या रिपोर्टनुसार, बाजार मूल्यावर भारताचा GDP 2021 मध्ये $2,700 अब्ज वरून 2030 पर्यंत $8,400 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या जलद वाढीसह, भारतीय GDP चा आकार 2030 पर्यंत जपानला मागे टाकेल, ज्यामुळे भारत चीन नंतर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

यासह भारताच्या GDP ने तोपर्यंत आकाराच्या बाबतीत जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनला मागे सोडलेले असेल. एकूणच, भारत पुढील दशकात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.

मध्यमवर्गीय देत आहेत बळकटी
या उच्च विकास दराला दीर्घकालीन दृष्टीकोनातील अनेक प्रमुख घटकांद्वारे सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. झपाट्याने वाढणारा मध्यमवर्गीय ग्राहक खर्चाला चालना देत आहे, ज्यामुळे 2030 पर्यंत देशाच्या ग्राहक खर्चा मध्ये दुप्पट वाढ होऊन ती $3 अब्जपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, भारताचा वास्तविक जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 8.2 टक्के असण्याचा अंदाज आहे.

खळबळजनक ! पाथरी आगारातील 130 कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री व राज्यपालांकडे इच्छामरणाची मागणी

परभणी प्रतिनिधी |  महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने एसटी महामंडळाकडून मिळणार्‍या तुटपुंज्या वेतनावर होणाऱ्या मानसिक त्रासामुळे परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या सारखे विचार येत असल्याचे म्हणत इच्छामरणाची परवानगी द्यावी अशा मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाथरी चे तहसीलदार यांच्यामार्फत 7 जानेवारी रोजी दिले आहे .यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .

शुक्रवार 7 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पाथरी आगारातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत दुपारी चारच्या सुमारास तहसीलदार सुमन मोरे यांची भेट घेत त्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इच्छामरणाचे पत्र पाठवले आहे .यामध्ये म्हटले आहे की, एस . टी . महामंडळातील सध्यस्थिती व कर्मचारी यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही .आम्ही सतत तणावपूर्वक स्थितीत काम करत आहोत . महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एस . टी . कर्मचारी यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे . एस . टी . महामंडळातील आम्हाला मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आमच्या काही एस . टी . कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत . आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करु शकत नाही. असे म्हणत निवेदनात पुढे म्हटले आहे की , वारंवार निवेदने देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहोत .

सदरील स्वेच्छा मरणाची मागणी आम्ही स्वतः कोणत्याही दबावात न घेता करीत आहे . असे नमूद करत आम्ही आता या मानसिक सरकार कडून होणाऱ्या आर्थिक वागणूकीला वैतागलो आहोत असे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एस . टी . महामंडळाला राज्य शासनात विलीन करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येवून आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व एस . टी . कर्मचाऱ्यांना जीवनदान द्या अथवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशी टोकाची भूमिका घेत मागणी केली आहे .

दिलेले स्वेच्छामरण निवेदनावर एकशे तीस कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत .पाथरी बस आगारांमध्ये एकूण 318 एसटी कर्मचारी काम करतात .यामध्ये 123 चालक असून 120 वाहक आहेत  तर यांत्रिक कर्मचारी 43 व प्रशासकीय 32 कर्मचारी यांचा समावेश आहे .यातील 13 कर्मचारी यांना बडतर्फ केले असून 45 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, यापैकी 130 कर्मचारी यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे स्वेच्छामरणाची मागणी केली आहे .

अन् ट्रक चालक मृत रिक्षा चालकाला रंक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेला; पहा CCTV व्हिडिओ

pune accsident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एक भरधाव रिक्षा एका दुधाच्या ट्रकवर आदळून मोठा अपघात झाला. मात्र या रिक्षाचालकाची मदत करण्याऐवजी ट्रकचालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाला. इतकेच नाहीतर रस्त्यावर येणारी जाणारी वाहनेदेखील या रिक्षाचालकाच्या मदतीसाठी थांबले नाहीत. यामुळे या रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. हि घटना पुणे जिल्ह्यातल्या येरवडा येथील विश्रांतवाडी या ठिकाणी घडली आहे. बाबा दादाराव सकट असे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या रिक्षाचालकाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

कशाप्रकारे घडला अपघात ?
बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास या रिक्षाचा आळंदी रस्त्यावरील म्हस्केवस्ती या ठिकाणी अपघात झाला. हि भरधाव रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुधाच्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता कि भरधाव रिक्षा जेव्हा ट्रकवर आदळली तेव्हा ट्रक पुढे ढकलला गेला. तर रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

रिक्षाची धडक झाल्यानंतर ट्रकमधील दोघेजण खाली उतरले आणि त्यांनी मागे जाऊन पहिले. यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला पाहून लगेच घटनास्थळावरून पळ काढला. एवढेच नाहीतर हा अपघात घडला तेव्हा त्या ठिकाणाहून 2-3 दुचाकी सुद्धा गेल्यात पण कुणीही त्या रिक्षाचालकाच्या मदतीला आले नाही. यानंतर या अपघाताची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या रिक्षाचालकाला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा अपघात नेमका कसा झाले हे अजून समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

5 राज्यांतील निवडणूकीच्या तारखा जाहीर; पहा कधी होणार निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील ५ राज्याच्या निवडणुकीबाबत घोषणा केली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब , मणिपूर , गोवा आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे . उत्तर प्रदेश आणि मणिपूर निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून पंजाब, उत्तरखंड आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक घेण्यात येईल असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केलं

उत्तरप्रदेश 10 फेब्रुवारी पासून निवडणुकीचा पाहिला टप्पा, 14 फेब्रुवारी पासून दुसरा टप्पा… तर 20 फेब्रुवारी ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल….. 23 फेब्रुवारी,27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च असे 7 टप्प्यात उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक होतील. पंजाब उत्तरखंड आणि गोवा इथे 14 फेब्रुवारी ला मतदान होईल. मणिपूर ला 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च असे 2 टप्प्यात मतदान होईल. 10 मार्चला पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार

५ राज्यांमध्ये ६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड येथील खर्चाची मर्यादा ४० लाख असेल तर गोवा आणि मणिपूर येथील खर्चाची मर्यादा २८ लाख असेल

कोरोनामुळे उमेदवार ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरतील. मतदार केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात येईल. २ डोस झालेले कर्मचारीच मतदान केंद्रावर असतील तसेच कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येईल अशी माहिती सुशील चंद्रा यांनी दिली तसेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोविड19 रुग्ण पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात असे सीईसी सुशील चंद्रा यांनी सांगितले

आपले आधार कार्ड खरे आहे की बनावट? घरबसल्या ‘अशा’ प्रकारे करा चेक

Aadhar Card

नवी दिल्ली । आजच्या काळात आधार कार्ड हे एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हे ओळखपत्र आणि वास्तव्याचा पुरावा म्हणून उपयुक्त आहे, तसेच कोणत्याही सरकारी आर्थिक योजनेचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. आधार हा एक युनिक आयडेंटिटी नंबर आहे, जो जानेवारी 2009 मध्ये लाँच करण्यात आला होता. आधारसाठीचा डेटा UIDAI द्वारे गोळा केला जातो, जो भारत सरकारने स्थापन केलेला वैधानिक प्राधिकरण आहे. UIDAI केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अखत्यारीत येते.

सरकारी योजनांतर्गत लाभार्थ्यांना आधार कार्डचा सर्वाधिक लाभ मिळत आहे. आधार कार्डच्या मदतीने रेशनकार्ड युझर्सना लाभ मिळत असून पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जात आहेत. आधार कार्डद्वारे तुम्ही अनेक फायदेही घेऊ शकता.

आधारची उपयुक्तता जसजशी वाढत आहे, तसतशी आधारशी संबंधित फसवणूकही वाढत आहे. देशात आधारशी संबंधित फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर UIDAI इशारा दिला होता कि सर्व 12-अंकी क्रमांक आधार नंबर नसतात.

बनावट आणि खरे आधार कार्ड

बनावट आधारकार्डची वाढती प्रकरणे पाहता आपले आधार कार्डही खरे की बनावट अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे. म्हणूनच तुमचे आधार कार्ड खरे आहे की नाही हे शोधणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. आधार कार्डची सत्यता आता घरबसल्या सहज तपासता येते.

आधार कार्डची सत्यता कशी तपासायची-
सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत पोर्टल http://uidai.gov.in ला भेट द्या.
येथे ‘My Aadhaar’ वर क्लिक करा.
My Aadhaar वर क्लिक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व सर्व्हिसेसची लिस्ट तुमच्यासमोर उघडेल.
या लिस्ट मध्ये, Verify an Aadhaar number वर क्लिक करा.
त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोडचे व्हेरिफिकेशन करा.
आता Proceed to Verify वर क्लिक करा.
तुम्ही एंटर केलेला मोबाइल क्रमांक व्हॅलिड असल्यास, त्यावर एक नवीन पेज पाठवला जाईल.
या मेसेजमध्ये आधार कार्ड क्रमांकासह वय, लिंग आणि राज्य अशी माहिती असेल.
ते आधी जारी झाले होते का ते इथे कळेल.
जर हे कार्ड कधीच दिले गेले नसेल, तर ज्या कार्डचे व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे ते कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट होते.