Friday, December 19, 2025
Home Blog Page 5249

निकोलस पूरनच्या जबरदस्त फिल्डिंगचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

Nicolas Pooran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शारज्याच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने षटकार आणि चौकांराची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ४ गडी राखत पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार मारत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. एक क्षणी पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटतं असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला.

पण यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पंजाबचा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या क्षेत्ररक्षणामुळे. आठव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने दणदणीत शॉट मारला. हा षटकारच होता. मात्र, सीमारेषेवर क्षेत्रक्षण करणाऱ्या निकोलसने हवेत उडी मारत कॅच घेतला, त्याचवेळी पुरनचा तोल गेला, प्रसंगावधान दाखवत त्याने चेंडू सीमारेषेच्या आता फेकला. पूरनने केलेलं क्षेत्ररक्षण पाहून पंजाबचा फिल्डिंग कोच जॉंटी ऱ्हॉड्सने उभे राहत त्याचे कौतुक केलं. तसेच त्याच्या या क्षेत्र रक्षणामुळे समाज माध्यमात धुमाकूळ घातला आहे.

सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रितेश देशमुख यांनी सुद्धा पूरनचे कौतुक केले

निकोलस पूरनची ही फिल्डींग पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही चांगलाच भारावला. आतापर्यंत मी पाहिलेली ही सर्वोत्तम फिल्डींग असल्याचं सचिनने म्हटलं आहे.

तसेच पूरनच्या फिल्डिंगने ग्रेव्हिटी नावाची गोष्टच विसरायला लावली असं सेहवागने म्हटलंय. तर रितेश देशमुखने अशी फिल्डिंग आपण इतिहासात पहिल्यांदाच पाहिल्याचं म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Vodafone Idea यूजर्सचा मोठा फायदा! आता 3G नेटवर्क यूजर्स होणार 4G वर अपग्रेड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्होडाफोन आयडिया लिमिटेड (Vi) आपल्या विद्यमान 3G ग्राहकांना अधिक चांगला डेटा स्पिड आणि सेवा देण्यासाठी 4G नेटवर्कवर आणेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपले 3G नेटवर्क आता 4G वर अपग्रेड केले जाईल. बिर्ला समूहाच्या कंपनीने सांगितले की, व्होडाफोन आयडिया यासाठी Vi GIGAnet Technology वापरत आहे. कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर टाककर म्हणाले की,”आम्ही देशातील एक अब्ज लोकसंख्येमध्ये 4G नेटवर्क पसरविला आहे. Reliance JIO आणि Bharti Airtel ने हे काम यापूर्वीच केले आहे.

2G युझर्सना बेसिक व्हॉइस सेवा मिळणे सुरूच राहील
आयडिया व्होडाफोनने सांगितले की, आता कंपनी आपल्या Vi GIGAnet नेटवर्कवर 3G युझर्सना वेगवान 4G डेटा स्पीड देऊ शकेल. कंपनीच्या 3G-आधारित सेवा वापरणार्‍या एंटरप्राइझ ग्राहकांना 4G आणि 4G बेस्ड IoT ऐप्लिकेशंस आणि सेवांमध्ये अपग्रेड केले जाईल. कंपनी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करेल. तसेच , कंपनीच्या 2G युझर्सना पुरविल्या जाणार्‍या सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे बेसिक व्हॉइस सेवा मिळणे सुरूच राहील.

Vi च्या ग्राहकांच्या संख्येत सतत घट
एकत्र आल्यानंतर, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरने, Vi या ब्रँड नावाने इंटीग्रेटेड 4G नेटवर्क GIGAnet लॉन्च केले. अलीकडे, व्होडाफोन-आयडियाद्वारे असे म्हटले गेले आहे की, कंपनीकडे एकूण 16 की-सर्कल्स आहेत. येथे ऑपरेटर अधिक ग्राहक मिळविण्यावर आणि बाजारातील वाटा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो आहे. उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या संख्येत होणारी घट थांबवता येईल. ट्रायच्या अहवालानुसार जून 2020 मध्ये Vi चे सुमारे 48.2 लाख युझर्स कमी झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

मंत्र्यांनंतर आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय कुमार यांना करोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.

मागील आठवड्यात २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला संजय कुमार हजर होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी संजय कुमार यांना सौम्य लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. ज्यानंतर त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान वाढताना दिसतं आहे. लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. दरम्यान संजय कुमार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंत्रालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे.

जून महिन्यात संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. कोरोना नियंत्रणासाठी ते मागील काही महिन्यांपासून नेटाने प्रयत्न करत होते. तसेच राज्यातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या बॅचचे आहेत. ३६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जत पोलीस ठाण्यातच साँनिटाझर पिऊन संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्‍न

subhash waghmode

सांगली। पवनचक्क्यांच्या भंगार चोरीच्या प्रकरणी चौकशीसाठी जत पोलीस ठाण्यात बोलवणात आलेल्या संशयित आरोपी सुभाष वाघमोडे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच साँनिटाझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जत शहरात खळबळ उडाली असून त्याना पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोळेकर वस्ती जवळ बंद पडलेल्या स्टोन क्रशर येथील भंगाराची चोरी झाली होती.या प्रकरणी दोन संशयित आरोपींना जत पोलिसांनी अटक केली. या दोन आरोपींनी हे भंगार सुभाष वाघमोडे यांच्या दुकानात घातल्याची माहिती पोलिसांना दिली त्या अनुषंगाने जत पोलिसांनी सुभाष वाघमोडे याला नोटीस देऊन चौकशीसाठी जत पोलिस ठाण्यात बोलवले असता पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेले साँनिटाझर पिऊन आत्महत्या प्रयत्न केला प्रयत्न केला.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सदरच्या संशयित आरोपीला पुढील उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सुभाष वाघमोडे याच्यावर या आधी जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून भंगार चोरी प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींनी हे भंगार सुभाष वाघमोडे यांच्या दुकानात घातल्याचे पोलीसांना सांगितले होते. सुभाष वाघमोडे याला नोटीस देऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले असता अटक टाळण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचे जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

RBI च्या पतधोरणाची बैठक तहकूब, लवकरच जाहीर केली जाणार नवीन तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. RBI एमपीसीच्या बैठकीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. यापूर्वी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांची आर्थिक धोरण बैठक 29 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. या आर्थिक धोरण बैठकीत घेतलेले निर्णय 1 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार होते.

व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता नाही

असे मानले जात आहे कि, किरकोळ महागाईच्या दर (Retail Inflation) वाढीमुळे या बैठकीत धोरणांच्या व्याजदरामध्ये (Policy Rates) कोणताही बदल होणार नाही. खरं तर, कोरोना संकटामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे किरकोळ महागाई वाढली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आधीच सांगितले आहे की, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक आर्थिक कारवाई केली जाऊ शकते. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये 6.73 टक्क्यांवरून घसरून 6.69 टक्क्यांवर आला आहे

5 ऑक्टोबर रोजी लोन मोरेटोरियमवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

दुसरीकडे, लोन मोरेटोरियम प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयात C सुनावणी आज तहकूब करण्यात आली आहे. केंद्राच्या मागणीवर कोर्टाने पुढील सुनावणी 5  ऑक्टोबरला ठेवली आहे. अशा परिस्थितीत मोरेटोरियम कालावधीत बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या व्याजावर पुढील 2-3 दिवसांत निर्णय येणे अपेक्षित आहे . स्थगित ईएमआयवरील व्याज आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्णय रेकॉर्डवर आणून संबंधित पक्षांना प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान तलवारबाजी

land

औरंगाबाद। मोंढ्यातील आठ एकर जागेच्या कारणावरून जाफरगेट चौकात दोन गटात वाद झाला. त्यानंतर फिल्मी स्टाईलने तलवारी व लाठ्या-काठ्या घेउन समोरासमोर भिडल्याने आठवडी बाजारात एकच गोंधळ उडाला. मारहाणीत दोन महिलांसह आठ जण जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

मोंढ्यातील जाफर गेटजवळ कादर शहा अवलीया दर्ग्याची जमीन आहे. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मोंढ्यातील चौकाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जमिनीच्या वादावरून मुश्ताक बिल्डर आणि कटकट गेट येथील अलीम खान यांचे टोळके समोरासमोर भिडले. तलवारी आणि लाठ्या-काठ्याने एकमेंकांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला आणि रविवारच्या बाजारात एकच धावपळ सुरु झाली. अचानक हल्ला सुरु झाल्याने मुश्ताक बिल्डर यांच्या समर्थकांनी तेथून पळ काढला. मात्र दुसऱ्या गटाने त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवून हल्ला केला. यात दोन महिलांसह आठजण जखमी झाले. हा हल्ला पूर्वनियोजित असावा, असा संशय आहे.

जागेच्या वादावरून कटकट गेट येथील अलीम खान, सहिर खान, राजु वाघमारे, सिल्लेखाना येथील फिरोज कुरैशी, विनोद खेमजी व त्याच्या दोन मुलांनी पन्नास जणांच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवल्याचा आरोप जखमी सैयद अथर यांने क्रांतीचौक पोलीसांसमोर केला. या प्रकरणी विनोद खेमजी यांनी देखील जिन्सी पोलिस ठाण्यात सय्यद मुमताज सय्यद गफूर, सय्यद मुश्ताक सय्यद गफूर, अथहर, शहेबाज आणि त्यांच्यासोबतच्या सात ते आठ जणांविरोधात तक्रार दिली, याप्ररणी रात्री उशिरा पर्यंत दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही जागा विवादित असल्याचे सर्वश्रुत आहे. या जागेवरून याआधी देखील तणाव निर्माण झालेला आहे. या बैठकीमध्ये विशेष पोलिस अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. मात्र त्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील गुप्तचर यंत्रणेकडे कशी नव्हती, कारण कोरोना काळात अशा प्रकारच्या बैठका घेण्यास मनाई असताना देखील एवढा मोठा जमाव एका हॉटेलमध्ये कसा जमतो यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

ग्रॅच्युइटीसाठीचा नियम ‘या’ नव्या कायद्यानंतर बदलला, आता कुणाला आणि कधी पैसे मिळणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत तीन कामगार संहिता बिले (Labour Code Bills) मंजूर झाली आहेत. यामध्ये ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन बिल- 2020, इंडस्ट्रियल रिलेशन बिल- 2020 आणि सोशल सिक्योरिटी बिल- 2020 यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी बिल, 2020 चा चॅप्टर 5 मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात….

सर्वप्रथम ग्रॅच्युइटी बद्दल माहिती घेऊ – एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना पगार, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त ग्रॅच्युइटीही दिली जाते. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून एखाद्या कर्मचार्‍यास मिळालेले बक्षीस. जर कर्मचार्‍याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर एखाद्या विहित सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युइटीची हमी दिली जाईल. ग्रॅच्युइटीचा छोटा भाग कर्मचार्‍याच्या पगारामधून कट केला जातो, मात्र मोठा भाग कंपनीकडून दिला जातो.

नवीन नियम काय म्हणतो – सरकारने ठराविक मुदतीच्या कर्मचार्‍यांसाठी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणार्‍यांसाठी ही व्यवस्था केली आहे. जरी एखाद्याने एका कंपनीकडे एक वर्षाच्या निश्चित मुदतीच्या कॉन्ट्रॅक्टवर काम केले तरीसुद्धा त्यांना ग्रॅच्युटी मिळते. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणार्‍या कर्मचार्‍याला आता नियमित कर्मचार्‍यांप्रमाणेच सोशल सिक्योरिट अधिकार देण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांव्यतिरिक्त हंगामी संस्थांमध्ये काम करणार्‍यांनाही हा लाभ देण्यात येईल.

याचा फायदा कोणाला मिळू शकेल – इतरांसाठी जुना नियमच कायम राहील. सध्या ग्रॅच्युइटी प्रत्येक वर्षाच्या 15 दिवसाच्या पगाराच्या आधारे पाच वर्षांची नोकरी पूर्ण झाल्यावर निश्चित केली जाते. कंपनीच्या वतीने कर्मचार्‍यांना ग्रॅच्युटी दिली जाते. त्याची कमाल मर्यादा 20 लाख रुपये असते. जर एखादा कर्मचारी एकाच कंपनीत 20 वर्षे काम करत असेल आणि त्याचा शेवटचा पगार 60 हजार रुपये असेल. तर हा पगार 26 ने विभागला जातो, कारण ग्रॅच्युइटीसाठी 26 दिवस मानले जातात. यातून 2,307 रुपये रक्कम मिळेल.

कंत्राटी कामगारांना लाभ मिळेल – निश्चित मुदतीच्या कर्मचार्‍यांसाठी किमान मुदतीची अट नाही – याअंतर्गत आता निश्चित मुदतीच्या कर्मचार्‍यांनाही ग्रॅच्युटी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आता किमान सेवा कालावधीसाठी कोणतीही अट नसेल. पहिल्यांदाच, ठराविक मुदतीसाठी काम करणाऱ्या कर्मचार्‍याला नियमित कर्मचार्‍याप्रमाणेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार दिला आहे. फिक्स्ड टर्म हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना सूचित करते.

आता तुम्हाला ग्रॅच्युइटीचे पैसे कधी मिळतील – चॅप्टर 5 मध्ये असे म्हटले गेले आहे की, नोकरीच्या शेवटी कर्मचार्‍यांना सलग पाच वर्षे सेवा दिल्याबद्दल ग्रॅच्युइटी दिली जाईल. हे सेवानिवृत्ति, रिटायरमेंट किंवा राजीनामा, अपघात किंवा आजाराने मृत्यू किंवा अपंगत्व यावर असेल. मात्र, वर्किंग जर्नलिस्टच्या बाबतीत ते पाच वर्षांच्या ऐवजी तीन वर्षे असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

बागायतदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेत ७.५ अश्वशक्तीचा पर्याय उपलब्ध; अर्ज घेणे सुरू

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

शेतीसाठी विनाव्यत्यय, शाश्वत व भारनियमन मुक्त वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2020 शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत जिल्हानिहाय नियोजन करत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( अश्वशक्ती) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी सौरपंप संच बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरु झालीय. Mukhyamantri Solar Pump Yojana 2020

मुख्यमंत्री सौरपंप योजनेत खुल्या प्रर्वगातील शेतकऱ्यांसाठी १०% तर आरक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ५% लोकवाटा घेत कृषी सौरसंच बसवण्यात येत आहेत. पहिल्या टप्यात एक लक्ष सौर पंप संच बसवण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले होते. शेतकरी वर्गातुन या योजनेस सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुबलक पाणीसाठा व जास्त जमीन धारणा असणाऱ्या बागायती शेतीसाठी जास्त दाबाने पाणी मिळावं अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा होती. ३ व ५ अश्वशक्ती सौरपंपामुळे अपेक्षीत पाणीउपसा मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला होता. अशा शेतकऱ्यांची ७ .५ अश्वशक्तीचा पंप मिळावा अशी मागणी होती. दरम्यान महावितरण कडून आता या योजनेतील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता ७ .५ एचपी सौरपंप संचासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केलीयं. परभणी जिल्ह्यातही हा पर्याय उपलब्ध झालयं. Mukhyamantri Solar Pump Yojana 2020

मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजनेमधून मिळणाऱ्या या पंपसंचा साठी www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जात पारेषण विरहीत विज पुरवठ्यासाठी लाभार्थी अर्ज पर्यायास स्पर्श करीत नवीन अर्ज करता येईल.
शेतक-यांनी सोबत लागणारे कागदपत्रे अपलोड करावीत.

Apply Online – Click Here

१) आधार कार्ड
२) ७ / १२ सातबारा उतारा तलाठी स्वाक्षरीत
३) आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र
४) लाईट बिल ( ग्राहक क्रमांक) शेजारील शेतकरी.
५) बोअरवेल , विहीर अथवा पाणीसाठा स्त्रोताची सातबाऱ्यावर नोंद.
७ .५ अश्वशक्ती कृषीपंपासाठी जमीन कमीतकमी ५ एकर पेक्षा जास्त जमीन धारणा असणे आवश्यक

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

धक्कादायक !! सांगली येथील कोवीड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन

prisoners

सांगली । सांगली शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील कैदेत असणारे आरोपी राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी लठ्ठे एज्युकेशनच्या कोविड केअर सेंटरमधून खिडक्यांचे गज वाकवून पलायन केले. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पळून गेलेले दोघेही आरोपी कोरोना बाधित आहेत. २३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी सातारा जिल्ह्यातील ट्रक चालकाला कोयत्याचा धाक दाखवून 47 हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटला होता.

या प्रकरणात शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दोघांना 17 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तत्पूर्वी त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया कैद्यांना शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे त्याठिकाणी दोघांना दाखल करण्यात आले. याठिकाणी एकूण दहा कैदी आहेत. त्यामध्येच राजू कोळी आणि रोहित जगदाळे हे दोघेही उपचार घेत होते. पण रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ज्यावेळी या कैद्यांच्या शिरगिणती करण्यात येत असतानाच खिडकीचे गज वाकवून या दोघांनी पलायन केले. दोघे पळून जातानाचे सीसीटीची कॅमेरामध्ये चित्रित झाले आहे. कैद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली. दोघा फरार कोरोनाबाधित कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना कारण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’