Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5705

फरार विजय मल्ल्याची लवकरचं ‘घरवापसी’; मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये होणार रवानगी

मुंबई । भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या कधीही भारतात परतू शकतो. त्याच्याविरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे त्याला लंडनहून थेट मुंबईत आणण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते. रात्री मुंबईत पोहोचल्यानंतर काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी न्यायालयात हजर करण्यात येईल.

ब्रिटनमधील कोर्टाने १४ मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार भारत सरकारने त्या तारखेपासून 28 दिवसांच्या आत त्याला ब्रिटनहून भारतात आणलं पाहिजे. प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे मल्ल्याला आता कधीही भारतात आणलं जाणार आहे.

विजय मल्ल्याला मुंबईत आणल्यानंतर वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणी करणार आहे. सीबीआय आणि ईडीचे अधिकारी विजय मल्ल्यासोबत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर थेट कोर्टात घेऊन जाण्यात येणार आहे. तसेच त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अशोक चव्हाण झाले कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी आपल्या नांदेडम मतदारसंघात कोरोनाच्या उपाययोजनांची परिस्थितीची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं.

कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा चव्हाण नांदेडमध्ये होते. त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गेले १० दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, रुग्णालयात असतानाही ते कार्यरत होते. काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांनी आपली मतंही मांडली होती. महाविकास आघाडी सरकारमधील अशोक चव्हाण यांच्याप्रमाणेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून पुन्हा काम सुरू केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

म्हणुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केली आपत्कालीन स्थिती 

वृत्तसंस्था । आर्क्टिक सर्कलमधील नदीत २०,००० टन तेल गळती झाली आहे. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. सायबेरियन शहराजवळील पावर प्लांटमधील इंधनटाकी कोसळल्यामुळे ही गळती झाली होती. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या घटनेची माहिती २ दिवस उशिरा दिल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. नॉरिलस्क निकेलची सहाय्यक कंपनी या प्लांट ची मालक कंपनी आहे. पुतीन यांनी दूरदर्शनवर प्रतिक्रिया देताना या कंपनीच्या प्रमुखांवर टीका केली आहे. आणि याला ते जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.

त्यांनी सरकारला इतक्या उशिरा या घटनेची माहिती का मिळाली? आम्ही सोशल मीडियावरून या घटनेची माहिती घ्यायची का? असे प्रश्न या कंपनीच्या प्रमुखांना विचारले आहेत. पुतीन यांना या क्षेत्रातील राज्यपाल यांना या घटनेची माहिती सोशल मीडियावरून मिळाल्याची माहिती दिली होती. यावर नॉरिलस्क निकेल यांनी आम्ही वेळेत आणि अगदी योग्य पद्धतीने माहिती दिल्याचे सांगितले आहे. पुतीन यांनी यावर कारवाई करण्याचे तसेच या वीज प्रकल्पाच्या प्रमुखाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

हा अपघात या इंधनटाकीला आधार देणारे खांब बुडाल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. वातावरणातील  उबदारतेमुळे पर्माफ्रॉस्टवर बांधलेला हा परिसर वितळत असल्याची माहिती आहे. यामुळे ३५० चौरस किमी परिसर दूषित झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक पर्यावरणीय गटांनी गळती प्रमाण आणि नदीचे भौगोलिक क्षेत्र पाहता ती साफ करणे कठीण असल्याचे म्हंटले आहे. नॉरिलस्क निकेल यांचे याआधीही अशा प्रकरणांमध्ये नाव आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राजभवनात येणाऱ्या ‘चक्रम वादळां’पासून सावध राहा! सामनातून राज्यपालांना खोचक सल्ला

मुंबई । शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील वाद शमेल, ही अपेक्षा आता पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर खोचक टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल आणि शिवसेनेतील शीत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अंतिम  परीक्षा रद्द केल्या. मात्र या निर्णयाला राज्यपाल कोश्यारी यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांनी याप्रकरणात  राज्यपालांनी हस्तक्षेप करावा म्हणून राजभवनावर जाऊन राज्यपालांना याबाबत निवेदन दिले. याच गोष्टीचा धागा पकडून राज्यपालांनी राजभवनाच्या दारावर येणाऱ्या चक्रम वादळांपासून सावध राहावे, असा सल्ला ‘सामना’तील अग्रलेखातून देऊन शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरून जाहीर मतप्रदर्शन सुरु आहे. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्याच पाहिजेत, असा राज्यपालांचा आग्रह आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागच्या सत्रातील गुणांचे मूल्यांकन करुन सरासरी गुणवाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय घेताना सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे राज्यपालांचे म्हणणे आहे. परंतु, सध्याचा काळ कठीण आहे. वेळ आणीबाणीची आहे. ३ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा देश अंधारातच होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री वगैरे प्रमुख मंडळींनाही विश्वासात घेतले नव्हते. आता लॉकडाऊनचा निर्णयही त्याच पद्धतीने घेण्यात आला. मोदी सरकारकडे बहुमत आहे. देशाच्या हितासाठी त्यांनी निर्णय घेतले, असे आम्ही मानतो. पण महाराष्ट्रातही असे निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक निर्णयात विरोधी पक्ष आडवी टांग टाकतो. त्या टांगेस घटनात्मक प्रमुख ‘मम’ म्हणून आशीर्वाद देतात, हे घटनाबाह्य असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

एरवी राज्यपाल अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या आढावा बैठका की काय त्या घेतच असतात व समांतर सत्ताकेंद्र चालवत असतात. मग अंतिम परीक्षांच्या मुद्द्यासंदर्भातही राज्यपालांना संबंधित घटकांची अशी बैठक घेऊन हा विषय समजावून घेता आला असता, असेही शिवसेनेने म्हटले आहे. तरीही आमचा राज्यपालांच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास आहे. पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून येत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. कायदा हा फक्त विद्यापीठ नव्हे तर सर्व क्षेत्रांना लागू आहे. कायद्यानेच कोणी वागायचे म्हटले तर जनता साखरझोपेत असताना महाराष्ट्रावरील राष्ट्रपती राजवट उठवून बेकायदा शपथविधी पार पडलाच नसता, असा सणसणीत टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

युवराज सिंग अडचणीत; चहलबाबत जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल

हिसार । रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅटदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे युवराज सिंग चांगलाच अडचणीत आला आहे. या चॅटमध्ये युवराज सिंगने युझवेंद्र चहलबाबत जातीवाचक वक्तव्य केलं होतं. यावरून आता युवराजविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिसारच्या हांसीमध्ये दलित अधिकार कार्यकर्ते आणि वकिल रजत कलसन यांनी युवराजविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रजत कलसन यांनी युवराज सिंगला अटक करण्याची मागणीही केली आहे. तसंच त्यांनी युवराजच्या वक्तव्याची सीडी आणि कागदपत्रही सोपवली आहेत. याप्रकरणाचा तपास डीएसपी सीटीला सोपवण्यात आल्याची माहिती हांसीचे एसपी लोकेंद्र सिंग यांनी दिली आहे.

युवराज सिंगने माफी मागण्याबाबतचा हॅशटॅग आधीच ट्विटरला ट्रेन्डिंगमध्ये आहे. तक्रारदार रजत कलसन यांनी तक्रार दाखल केल्यानंतर रोहित शर्मावरही निशाणा साधला आहे. युवराजच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्माने त्याला समज द्यायला हवी होती, तसंच त्याचा विरोध केला पाहिजे होता, पण रोहितने हसून युवराजचं समर्थनच केलं. यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या, अशी प्रतिक्रिया कलसन यांनी दिली आहे.

युझवेंद्र चहलने त्याच्या वडिलांसोबत टिकटॉकवर एक व्हिडिओ टाकला. या व्हिडिओवरून रोहित शर्मा आणि युवराज सिंग चहलची मस्करी करत होते. हे सुरू असतानाच युवराजने चहलबाबत जातीवाचक उल्लेख केला. यानंतर युवराज सिंगने माफी मागावी ही मागणी ट्विटरवर जोर धरू लागली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

गावी जाण्याकरिता पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती देणं भोवलं; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुणे । मुंबईतून मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे डिजिटल पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ११ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत राहणाऱ्या या ११ जणांना कोकण, सातारा, सांगलीत जायचे होते. मात्र, मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून प्रवासासाठी डिजिटल पास मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते मूळ गाव या प्रवासासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला. त्यात जोडलेला मोबाइल क्रमांक, आधार कार्ड आणि वैद्यकीय सर्टिफिकेट एकच असल्याचे आढळले.

अधिक चौकशी केली असता, डिजिटल पाससाठी अर्ज केलेले सर्व ११ जण मुंबईचे रहिवासी असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी मंगेश कळसकर, प्रशांत मयेकर, सागर देवरुखकर, तेजस अनंत चेवुलकर, नरेश साबळे, राजू गुजर, स्वप्नील धनावडे, अनंत डिचोलकर, योगेश भोसले, सागर पवार, सिद्धेश सुवरे यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आर्थिक फायद्यासाठी संबंधितांना पास मिळवून देण्यासाठी रितेश लष्करे (रा. पनवेल, मुंबई) याने मदत केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तपास केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

परभणीत पुन्हा दोन कोरोना बाधीत सापडले; पाथरी तालुक्यानेही खाते उघडले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |

परभणी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी उशिरा आलेल्या अहवालामध्ये दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यातील एक रुग्ण आतापर्यंत निरंक असणाऱ्या पाथरी तालुक्यातून असल्यामुळे आता हा तालुका कोरोनाग्रस्तांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. परभणीतील मिलिंद नगर एक व पाथरी तालुक्यातील रामपुरी रत्नेश्वर येथील एक महिला कोरोनाबाधीत रुग्ण असल्याचा अहवाल आला असुन दोन्ही ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. दरम्यान पात्री येथील महिला हिचा पहिला तपासणी अहवाल निर्णयाक राहिल्यानंतर काल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे याच महिलेचा 26 मे रोजी घेण्यात आलेला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता त्यानंतर या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

पाथरी तालुक्यातील रामपुरी (रत्नेश्वर) येथील मुळची तीस वर्षीय महिला धारावी मुंबई येथून २० मे रोजी एका खाजगी वाहनातून आली होती. यावेळी ग्रामस्थांनी तीला गावातील शाळेत विलगीकरण केले होते. दरम्यान २१ मे रोजी ग्रामस्थांनी तिला मुंबईहून आल्यामुळे पाथरी रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी सायंकाळी ७ .३० वाजताच्या दरम्यान आणले होते. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ .पंकज दरक यांनी दिली.सदरील महिलेचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी परभणी व नंतर नांदेड येथे पाठवण्यात आला होता. हा अहवाल अनिर्णायक आला होता त्यामुळे २४ मे रोजी दुसरा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर तो २६ मे रोजी निगेटिव्ह आला असेही डॉ . दरक यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान सदरील महिलेत कुठलेही कोरोना संसर्गाची लक्षणे न आढळल्याने व दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने २८ मे रोजी सकाळी ११ .४५ वाजता या महिलेस रामपुरी येथे होम क्वारंटाईन राहण्यास सांगत सुट्टी देण्यात आली असेही डॉ .पंकज दरक यांनी सांगितले. दरम्यान ३ जून रोजी २१ मे चा अनिर्णायक अहवाल पॉझीटिव्ह आल्याने हादगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी फुरखान चिस्ती यांनी ४ जुनच्या पहाटे पुन्हा या महिलेस पाथरी ग्रामीण रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. यावेळी सदरील महिलेच्या संपर्कात राहिलेला भावासही आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं वृद्धापकाळाने निधन

मुंबई । प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं आज गुरुवारी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. आयएफटीडीएचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी ट्विटरवरून त्यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

बासू चॅटर्जी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी अजमेर येथे झाला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणारे बासू चॅटर्जी यांनी छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला आणि चमेली की शादी अशा सिनेमांचं दिग्दर्शनक केलं. ते असे पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी कलकत्याची छाप स्वतःवर न पाडू देता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. चमेली की शाकी आणि खट्टा मीठा हे सिनेमे त्याचंच एक उदाहरण आहे. मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रेम कथा साकारणं आणि फुलवणं यात बासु यांचा हात कोणीही पकडू शकत नव्हते.

५० हून अधिक हिंदी आणि बंगाली सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या बासू यांनी रजनी आणि व्योमकेश बक्षी या मालिकांचंही दिग्दर्शन केलं. ७० च्या दशकात हृषीकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांच्यात सर्वोत्तम सिनेमे कोण तयार करतं याची निकोप स्पर्धा असायची. त्यांच्यातील या स्पर्धेमुळे प्रेक्षकांना फार चांगले सिनेमे पाहायला मिळाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! १ लाख भारतीयांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड पासपोर्टचा इंटरनेटवर सेल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक लाखाहून अधिक भारतीयांच्या आधार, पॅनकार्ड आणि पासपोर्ट यांसारख्या राष्ट्रीय ओळखपत्रांची स्कॅन कॉपी ‘डार्क नेट’ या साईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सायबर सिक्युरिटी फर्म साइबल यांनी ही माहिती दिली आहे. साइबलने आपल्या अहवालात म्हटले आहे की,हा डेटा सरकारी डेटाबेसमधून नाही तर एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरुन लीक झाला आहे. साधारणपणे तस्करी, दहशतवाद आणि इतर बेकायदेशीर कामांसाठी या नेटचा वापर केला जातो. कधीकधी याचा वापर संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी देखील केला जातो.

नक्की काय आहे हे प्रकरण
या ‘डार्क नेट’वरील माहितीवरून, अंदाज केला जाऊ शकतो की, हा डेटा केवायसी (नो योअर कस्टमर) कंपनीमार्फत लिक झाला आहे, कारण ‘डार्क नेट’ वर असलेल्या डेटाबेसमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्टच्या स्कॅन कॉपीचा समावेश आहे. ‘डार्क नेट’ म्हणजे इंटरनेटचा तो भाग जे सामान्य सर्च इंजिनच्या आवाक्याबाहेर असते आणि ते वापरण्यासाठी एका विशेष सॉफ्टवेअर आवश्यक आहे.

हे डॉक्युमेंट कसे लीक झाले
भारताच्या विविध भागांतील एक लाखाहून अधिक लोकांच्या ओळखपत्र मिळवल्याचा दावा. त्या वापरकर्त्याकडून सुमारे एक लाख ओळखपत्रे मिळवून ते भारतीयांची असल्याची पुष्टी सायबलच्या संशोधकांनी केली आहे. ही सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी फॉर्ममध्ये आहेत. ते कदाचित कंपनीच्या ‘नो योअर कस्टमर’ डेटाबेसमधून चोरीला गेले असतील. मात्र, कंपनी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जनधन च्या महिला खातेदारांना पुन्हा मिळणार ५०० रुपये; इथे पहा कधी जमा होणार पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या दरम्यान गरिबांना रेशन आणि आर्थिक मदत देण्याची योजना सुरू आहे. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत PMJDYच्या महिला खातेदारांना जून महिन्यात ५०० रुपयांचा बँक हफ्ता पाठवला जात आहे. भारतीय बँक असोसिएशनने ही माहिती ट्वीट करून खातेदारांना सांगितले आहे की, तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शाखा, CSP, बँक मित्रांकडून पैसे खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार घ्या. महिला खातेदारांच्या खात्यात सरकारने ५०० रुपयांचा तिसरा हप्ता पाठवण्यास सुरूवात केली आहे. आपल्या खात्यात पैसे केव्हा येईल ते आम्ही आपल्याला सांगू…

 

आपल्या खात्यातील शेवटची संख्या लक्षात ठेवा
वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की बँकांमध्ये गर्दी करण्याची गरज नाही. प्रथम ही यादी तपासा…

तारीख – जन धन खात्याची शेवटची संख्या
५ जून – शेवटची संख्या ० किंवा १ आहे
६ जून – शेवटची संख्या २ आणि ३ आहे
८ जून – शेवटची संख्या ४ किंवा ५ आहे
९ जून – शेवटची संख्या ६ किंवा ७ आहे
१० जून – शेवटची संख्या ८ किंवा ९ आहे

मार्चअखेरीस अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत (पीएमजेडीवाय) सर्व महिला खातेदारांना तीन महिन्यांकरिता दरमहा ५०० रुपये पूर्व-रक्कम देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम पंतप्रधानांच्या १.७ लाख कोटींच्या गरीब कल्याण पॅकेजचा एक भाग आहे.

उल्लेखनीय हे आहे की, सरकारच्या या पॅकेजमध्ये जनधन खातेदार महिलांसाठी तीन महिन्यांसाठी दरमहा ५०० रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त गोरगरीबांना मोफत अन्नधान्य, कडधान्ये आणि स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा पुरवठा या गोष्टींचा देखील समावेश आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व वडीलधाऱ्यांना रोख मदतदेखील पुरविली गेली जेणेकरुन संकटाच्या या काळात त्यांना थोडी मदत होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.