Monday, December 29, 2025
Home Blog Page 5727

अशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी ‘घर से सेवा’ अभियान

नवी दिल्ली । कोरोनाच्या साथीनं निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरात विविध ठिकाणी अडकलेले आहेत. लॉकडाउनमूळ काम ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचे हातचे काम गेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मजुरांवर उपासमारीचेही वेळ आली आहे. अशा मजूरांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, तसेच इतर काही जण वैयक्तिक पातळीवर जमेल तशी मजूरांना मदत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सुद्धा अशा मजूरांच्या मदतीसाठी पुढे आला असून तो संबंधित मजूरांसाठी जेवण तयार करून देत आहे. फक्त हा क्रिकेटपटू नव्हे तर त्याची आई, पत्नी आणि दोन मुले या कामात त्याची मदत करत आहेत.

प्रवासी मजूरांसाठी सेहवागने ‘घर से सेवा’ नावाचे अभियान सुरू केले. लॉकडाऊनमुळे प्रवासी मजूरांना घरची वाट धरावी लागत आहे. अशा लोकांसाठी सेहवाग मदत करत असून त्यात आई कृष्णा, पत्नी आरती आणि आर्यवीर, वेदांत ही दोन मुले मदत करत आहेत. सेहवाग कुटुंबियांनी प्रवासी मजूरांसाठी घरीच जेवण तयार केले. त्यानंतर ते पॅक करून त्याचे वाटप केले गेले. यासाठी त्याने #GharSeSewa हा हॅशटॅग वापरला आहे. इतक नव्हे तर तुम्ही १०० लोकांचे जेवण तयार करून देणार असाल तर सेहवाग फाउंडेशनशी (@SehwagFoundatn) संपर्क करावा, असे त्याने म्हटले आहे. लोकांना मदत करण्याची सेहवागची ही पहिली वेळ नाही. तो सेहवाग फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वेळा मदत करत असतो.

भारतीय संघातील माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटो संपूर्ण सेहवाग कुटुंबीय प्रवासी मजूरांसाठी जेवण तयार करून ते पॅक करत आहे. सेहगाने हा फोटो शेअर करताना अन्य लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. सेहवागच्या या प्रयत्नांचे आणि आवाहनाचे सर्व जण कौतुक करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

अमरावती नंतर नागपूर आणि आता भंडारा जिल्ह्यात या टोळधाडी येऊन पोहोचल्या आहेत. या टोळींमुळे मोठ्या प्रमाणात कीड लागते आणि पीक खराब होते. दरवर्षी या टोळधाडी जून-जुलै मध्ये या टोळधाडी वाळवंटी प्रदेशातून भारतात येतात. यंदा त्या काही दिवस आधीच आल्या आहेत मात्र जर या कीटकांच्या अंड्यांचा नाश केला तर धोका टळू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रेताड माती तसेच ओलसर ठिकाणी यांची अंडी सापडतात. ती ठिकाणे शोधून त्यांचा नाश केला तर खरीप पिकांचे नुकसान रोखता येऊ शकते. भंडारा जिल्ह्यात सध्या या कीटकांचा नाश करण्यासाठी जंतुनाशके फवारली जात आहेत. तर मोठ्या प्रमाणात ढोल वाजवून या टोळींना हाकलवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

विदर्भातील काही शेतकरी आपल्या शेतात कडुलिंबाचा पाला जाळून धूर करून या किडयांना घालवू पाहत आहेत. कृषी विभागही विविध जंतुनाशके फवारत आहेत पण याचा उपयोग होत नाही आहे. भारतासह, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, पाकिस्तान, इराण या देशात यांनी थैमान घातले आहेत. या टोळधाडीत एका चौरस किमी परिसरात सरासरी ८ कोटी नाकतोडे असतात. हे एका दिवसात १५० किमी प्रवास करतात. हे नाकतोडे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १ जूनपासून धावणाऱ्या रेल्वे गाड्या ‘या’ स्थानकात थांबणार

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळं ठप्प पडलेली रेल्वे रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे १ जूनपासून सुरु धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी प्रवाशांना पाहणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्याच स्थानकावर उतरावे लागेल.

पुढील सोमवारपासून भारतीय रेल्वे २०० अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. परंतु अद्यापही प्रश्न आहे की ज्या गाड्या चालवल्या जातील त्या तुमच्या घराजवळील स्टेशनवर थांबतील की नाही. म्हणून आम्ही येथे तुम्हाला खास ट्रेनची सारी माहिती सांगत आहोत, जेणेकरून तुम्हाला तिकीट आरक्षण करताना त्रास होणार नाही.

उत्तर रेल्वेने दिल्लीतून जाणाऱ्या सर्व गाड्यांचा तपशील सार्वजनिक केला आहे. या गाड्यांचा तपशील आता पाहता येईल. या सर्व विशेष गाड्या १ जूनपासून सुरू होण्यास रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांमधील गर्दी आणि सुरक्षा पाहता फेस मास्क वापरण्याची माहिती रेल्वेने दिली आहे. तसेच सामाजिक अंतराचे अनुसरण करण्यास सांगितले आहे.

या व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाने असे म्हटले आहे की आता प्रवासी आरक्षणासाठी १२० दिवस अगोदर म्हणजेच चार महिन्यांत तिकिट बुक करू शकतात. सध्या रेल्वेने प्रवाशांना अवघ्या एक महिन्यापूर्वीच आगाऊ बुकिंगची सुविधा दिली आहे. नवीन नियम ३१ मे रोजी सकाळपासून लागू होईल. स्थानिक रेल्वे विभागानेही उत्तर प्रदेशमधून जाणाऱ्या प्रवाशांची यादी जाहीर केली आहे. या सर्व गाड्या उत्तर प्रदेशमधील स्थानकांवर थांबाणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात मागील २४ तासांत ७,४६६ कोरोनाचे नवे रुग्ण; आतापर्यंतची रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली । देशभरात  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे एकूण ७,४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. ही एका दिवसात झालेली आतार्यंतची सर्वाधिक वाढ आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये एकूण १७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ४ हजार ७०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे ७१ हजार १०६. तर देशभरात एकूण सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या आहे सुमारे ९० हजार. महाराष्ट्रात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे ५९,५४६ वर. या रुग्णांपैकी १,९८२ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू राज्य. तामिळनाडूत १९ हजार ३७२ रुग्ण. या रुग्णांपैकी १४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातला मागे सारत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १,०२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत १६ हजार २८१ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी ३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, गुजरातमध्ये एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे १५ हजार ५६२ वर. तर, राज्यात ९६० जणांचा मृत्यू झाला आहे.

या व्यतिरिक्त, राजस्थानात आतापर्यंत ८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी १८० जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात रुग्णांची संख्या ७,४५३ इतकी झाली असून यांपैकी ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, उत्तर प्रदेशात रुग्णांची संख्या पोहोचली आहे ७,१७० वर. यां पैकी १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Lockdown 4.0 | १२ दिवसांत ७० हजार नवीन कोरोनाग्रस्त; १ हजार ६७७ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या ग्राफने आज सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत, एकाच दिवसात कधीही ७००० पेक्षा जास्त प्रकरणे दाखल झालेले नाहीत, मात्र गेल्या २४ तासांत ७,४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेल्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. असे नाही की, कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे फक्त आजच खूप वाढली आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक नोंदले गेले आहे. लॉकडाउनचा सध्या सुरु असलेला चौथा टप्पा संपण्यास अद्यापही दोन दिवस बाकी आहेत. मात्र तरीही गेल्या १२ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोनाचे सुमारे ७० हजार नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत, तसेच १६७७ लोकांचा मृत्यूही झाला आहे. देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे रोजी सुरू झाला. १४ दिवसांच्या या लॉकडाऊनच्या सुरूवातीस, देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही ९६ हजार १६९ होती, तर ३०२९ लोकांचा मृत्यू झाला होता.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याआधी ३६,८२३ लोक बरे होऊन आपापल्या घरी परत गेले होते, तर त्या दिवशी ५२४२ नवीन प्रकरणे नोंदली गेली. आजच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालावर नजर टाकल्यास सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक झालेली दिसते आहे. आज देशात कोरोना विषाणूची ७४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर देशात संक्रमित रूग्णांची संख्या १,६५,७९९ वर गेली आहे. आतापर्यंत देशात ४७०६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ७११०५ लोक बरे होऊन घरी गेले आहेत.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला बारा दिवस उलटून गेले. दरम्यान यामध्ये कोरोनाच्या ६९६३० नवीन घटना घडल्या आहेत तर १६७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात, दररोज कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ दिसून आलेली आहे. १८ मे रोजी कोरोनाची ५२४२ प्रकरणे नोंदवली गेली, तर १९ मे रोजी ४९७० प्रकरणे नोंदली गेली. यानंतर २० मे रोजी ५६११ प्रकरणे नोंदविण्यात आली. तर २१ मे रोजी ५६०९ आणि २२ मे रोजी ६०८८ नवीन प्रकरणे समोर आलेली आहेत. २३ मे रोजी कोरोनाची नवीन प्रकरणे ६६५४ ने वाढली तर २४ मे रोजी ६७६७ नवीन प्रकरणे उघडकीस आली. २५ मे रोजी कोरोनाची ६९७७ नवीन प्रकरणे आढळली तर २६ मे रोजी ६५३८ प्रकरणे नोंदली गेली. २७ मे रोजी ६३८७, २८ मे रोजी ६५६६ आणि २९ मे रोजी ७४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

कोरोनामध्ये संक्रमित रूग्णांची संख्या जितक्या वेगाने वाढत आहे, तितकीच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४७०६ लोकांचा मृत्यू झाला आहे. १८ मे रोजी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी १५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर १९ मे रोजी १३४ लोकांचा मृत्यू झाला होता. या नंतर २० मे रोजी १४० लोक मरण पावले, २१ मे रोजी १३२ लोक, २२ मे रोजी कोरोनामुळे १४८ लोक मरण पावले. दुसर्‍या दिवशी २३ मे रोजी १४७, २४ मे रोजी १३७ लोक मरण पावले, कोरोनामुळे २५ मे रोजी १५४ लोक मरण पावले तर २६ मे १४६ रोजी २७ मे १७०, २८ रोजी १९४ ,२९ मे रोजी १७४ लोक मरण पावले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट आहे, असं गुजरात उच्च न्यायालयानं म्हटल्याचं आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून निदर्शनास आणलं आहे. मुंबई व महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली असल्याचं सांगताना त्यांनी नीती आयोग व आयसीएमआरचे दाखलेही दिले आहेत. तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,’ असा संताप त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं या मुद्द्यावरून सरकारवर टीका सुरू केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी भाजपनं आंदोलनही केलं होतं. दरम्यान, कोरोनाशी लढण्याचं मुंबईनं अवलंबलेलं मॉडेल देशातील सर्वोत्तम आहे. ते देशभर राबवा असं खुद्द नीती आयोग आणि आयसीएमआरनं (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारनं भाजपचे सर्व आरोप वेळोवेळी खोडून काढले आहेत. मुंबईत चाचण्यांचं प्रमाण जास्त असल्यानं रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. शिवाय, मुंबईत मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असा सरकारचा दावा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

फडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या पुरावा

मुंबई । महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून स्यू मोटू याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर काल सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयानं मजुरांचा खर्च कोण करत आहे, याविषयी केंद्राला प्रश्न विचारला होता. त्यावर केंद्राची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च मूळ राज्य आणि मजुर काम कामाला असलेली राज्य करत आहेत, असं म्हटलं होतं. तुषार मेहता यांच्या युक्तीवादाचा हवाला देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.

”केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारनं दिले. त्यामध्ये केंद्र सरकारनं कुठलाही पैसा खर्च केला नाही. भाजपा आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनवत आली आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरकारी वकिलांच्या विधानावरून स्पष्ट होतं. हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

RBI ने ‘या’ २ बॅंकांना ठोठावला ६.२ कोटींचा दंड; जाणून घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ इंडिया’ला तब्ब्ल पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (एनपीए) संबंधित तरतुदी देखील समाविष्ट आहेत. त्याशिवाय एनपीएच्या नियमांचे पालन न केल्याने कर्नाटक बँकेलाही रिझर्व्ह बँकेने १.२ कोटी रुपयांचा दंड लादला आहे.

यासाठी बँक ऑफ इंडियाला दंड ठोठावण्यात आला
या संदर्भात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, केंद्रीय बँकेच्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे ‘बँक ऑफ इंडिया’ला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे उत्पन्न मान्यता, मालमत्ता वर्गीकरण आणि प्रगतीशी संबंधित तरतूदीखाली येतात. याचा तपशील देताना रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ३१ मार्च, २०१७ आणि मार्च २०१८ पर्यंत आर्थिक स्थितीत असलेल्या बीओआयच्या वैधानिक तपासणीमध्ये या बँकेने काही आदेशांचे पालन केले नसल्याचे सत्य उघडकिस आले. याबाबत बँकेला नोटीसही बजावण्यात आली होती. या नोटशीला बँकेने दिलेला प्रतिसाद आणि त्यानंतर झालेल्या वैयक्तिक सुनावणीनंतर बँकेला हा दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक बँकेनेही नियमांचे पालन केले नाही
अशाच एका प्रकरणात रिझर्व्ह बँकेने कर्नाटक बँकेला १.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयकर मान्यता आणि मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) च्या नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने सारस्वत सहकारी बँकेलाही ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! पुण्यात दूध डेअरी मालकासह ११ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । पुण्यातील हडपसर येथे एका प्रसिद्ध दूध डेअरीच्या मालकासह तेथील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मगरपट्टा व हडपसर परिसरात एकच खळबळ पसरली आहे. सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. मागील ४ दिवसांपासून संबंधित डेअरीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानं डेअरीच्या मालकासह ११ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला असून डेअरीच्या मालकासह ११ जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

एका डेअरी मालकासह ११ जणांना कोरोना झाल्याच्या वृत्तास हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांनी दुजोरा दिला आहे. ‘सकाळपासूनच डेअरीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यापैकी कुठल्याही नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

या डेअरीमधून जवळील सोसायटीच्या ज्या नागरिकांनी दूध, लस्सी ,समोसे व स्वीटचे पदार्थ खरेदी केलेले आहे, त्या सर्वांची महापालिकेच्या पथकाकडून प्राथमिक तपासणी करण्याचे काम सकाळीच सुरू करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील ही डेअरी सुरू होती. या डेअरीतून अनेक ठिकाणच्या नागरिकांनी दूध, लस्सी, समोसे व स्वीट अशा विविध पदार्थांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे या डेअरीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क आलेल्या नागरिकांची शोध घेणं हे महापालिकापुढचं मोठं आव्हान आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रोहित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस, ट्विटरवरून बायकोला दिल्या शुभेच्छा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे भावी अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा आज नववा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंट वरून पत्नी कुंती बद्दल प्रेम व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. सामान्य माणसाच्या नेहमी संपर्कात असणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या आणि पत्नी कुंती यांच्या नात्याबद्दल ते काही वेळा बोलत असतात.

ट्विटर अकॉउंट वरून पत्नीला शुभेच्छा देत सहजीवनाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत असे त्यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे. त्यांनी शुभेच्छा देताना पत्नीचे कौतुक केले आहे आणि त्यांच्या यशाची वाटेकरू असल्याचेही म्हंटले आहे. त्यांनी ट्विटर वर “गृहलक्ष्मी, सून, वहिनी, पत्नी, आई अशा अनेक भूमिका लिलया पार पाडणारी, गरुडभरारी घेण्याची ताकद आणि जबाबदारीची जाणीव असलेली व माझ्या यशात सिंहाचा वाटा असणारी माझी साथीदार सौ. कुंती हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा” अशी पोस्ट केली आहे.

 

रोहित पवार व त्यांच्या पत्नी सौ कुंती मगर पवार यांच्यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. पुण्यातील बिल्डर सतीश मगर हे कुंती पवार यांचे वडील आहेत. कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्र आणि गुंतवणूक या विषयात पदवी संपादन केली आहे. रोहित-कुंती या जोडप्याला दोन मुली आहेत. या दोघांच्या लग्नात अजित पवार यांनी खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. असेही रोहित पवार यांनी एकदा सांगितले होते. दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.