Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5750

महाराष्ट्रात विमान सेवेला अद्याप परवानगी नाही – राज्य सरकार

वृत्तसंस्था । देशातील प्रवास वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु केली जात आहे. त्यानुसार रेल्वेच्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि सोमवारपासून हवाई वाहतूकही सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी असे जाहीर केले होते. मात्र महाराष्ट्राच्या संचारबंदी नियमांमध्ये १९ मे नंतर काहीच सुधारणा झाल्या नसून ३१ मे पर्यंत विमान वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांनी आज दिली आहे.

बुधवारी हरदीपसिंग पुरी यांनी देशांतर्गत हवाई प्रवासाची घोषणा करून किमान व कमाल दरांची यादीही जाहीर केली होती. यानुसार देशात अंतर्गत विमान प्रवास सोमवारपासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महाराष्ट्रातील रुग्णांची वाढती संख्या पाहता रेल्वेप्रमाणेच विमान वाहतुकीलाही ३१ मे पर्यंत प्रतिबंधित करण्यात आले आहे. ३१ मे नंतर पुढील आदेश जारी केले जातील. अद्याप नागरिकांना विमान प्रवास करता येणार नसल्याची माहिती गगराणी यांनी दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ४७ हजार १९० इतकी झाली असून सर्वाधिक रुग्ण मुंबई येथे सापडले आहेत. आजअखेर मुंबईमध्ये २८,८१७ रुग्णांची  असून राज्यात १,५७७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. राज्याची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेने अधिक बिकट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्यातरी ३१ मी पर्यंत विमान प्रवास करता येणार नाही आहे.

सुरत मध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातच्या सुरतमध्ये सचिन जीआयडीसी परिसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीत आज आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या १२ गाड्या या घटनास्थळावर आल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न केले. आगी कशी लागली याविषयी सध्यातरी काही माहिती मिळालेली नाहीये. मात्र या आगीनंतरची जी चित्रं समोर आली आहेत ती खूपच वेदनादायक आहेत. त्या छायाचित्रांमध्ये आपल्याला आगीच्या ज्वाळा आणि काळा धूरच धूर दिसू शकतो. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी एक माहिती समोर आली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सातारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा; दिवसभरात सापडले 77 कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या 278 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 31 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात मुंबई येथून आलेली आणि पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी सातारा जिल्ह्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा 6 रुग्ण सापडले. आता रात्री पुन्हा 31 नवीन कोरोना बाधित सापडल्याने आज दिवसभरत जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर जिल्ह्यात सापडलेली हि सर्वाधिक आकडेवारी आहे.

आज सापडलेले रुग्ण कोणत्या तालुक्यातील आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र नव्याने सापडलेले बहुतांश रुग्ण हे पुण्या मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातून बाधित झालेले असल्याचे समजत आहे. तेव्हा बाहेरून प्रवास करून आलेल्या क्वारंटाईन मधील नागरिकांना नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील निकट सहवासित 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगा, वय 11, 34 19 वर्षीय 3 महिला, शेणोली येथील मुंबईवरुन आलेले 60 व 50 वर्षीय 2 पुरुष व 35 वर्षीय महिला. जावली तालुक्यातील गवडी येथील निकटवासित 32 वर्षीय पुरुष, ठाणे येथून आलेले कसबे बामणोली येथील 23 व 14 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली सायगाव येथील 58 वर्षीय महिला. खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 29 वर्षीय महिला, 10 वर्षाचे बालक व 50 वर्षीय पुरुष, अंधोरी येथील सारीचा 43 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तसेच महाबळेश्वर तालुक्यातील मुंबई येथून आलेला पाचगणी येथील 70 वर्षीय महिला (मृत). वाई तालुक्यातील मुंबई येथून आलेली वाई येथील 48 वर्षीय महिला, मुंबई येथुन आलेला देगाव येथील 60 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील चिंचणेर-लिंब येथील निकटसहवासित 43 वर्षीय पुरुष, कुस खुर्द येथील 76 व 43 वर्षीय 2 महिला व 17 वर्षीय युवती. खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 28 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, मांजरवाडी येथील 47 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला चिंचणी येथील 21 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली खतगूण येथील 20 वर्षीय महिला. कोरेगाव तालुक्यातील मुंबई येथून आलेला वाघोली येथील सारीचा 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 278 वर पोहोचली आहे. या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 158 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.

कुठे कुठे वाढले 31 रुग्ण पहा

कराड तालुक्यात
वानरवाडी 5 रुग्ण
शेणोली 3 रुग्ण

जावळी तालुक्यात
गावडी 1 रुग्ण
बामणोली 2 रुग्ण

खंडाळा तालुक्यात
पळशी 3 रुग्ण
अंधोरी 1 रुग्ण

महाबळेश्वर
पाचगणी एक मयत

सातारा तालुक्यात
चिंचणेर लिंब 1
कुस खुर्द 3

वाई तालुक्यात
वाई 1 रुग्ण
देगाव 1 रुग्ण

कोरेगाव तालुक्यात
वगराळी 1 रुग्ण
वाघोली 1 रुग्ण

खटाव तालुक्यात
गोदेवाडी 3 रुग्ण
माजावाडी 1 रुग्ण
चिंचणी 1 रुग्ण
खादगुण 1 रुग्ण

पुरुष 16
महिला 15

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापूरात दिवसभरात ४९ नवे कोरोनाग्रस्त; ६ जणांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे काल मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज मयत झालेल्या व्यक्तीमध्ये अक्कलकोट शहरातील मधला मारुती गल्ली येथील 46 वर्षाच्या पुरुषाला 20 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांचे निधन झाले. पत्रा तालीम उत्तर कासबा परिसरातील 71 वर्षीय पुरुषाला 21 मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 21 मे रोजी रात्री 8 च्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. एमआयडीसी रोड परिसरातील शिवशरण नगर मधील 52 वर्षीय पुरुषाला 16 मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 23 मे रोजी दुपारी तीन वाजता त्यांचे निधन झाले आहे. मिलिंद नगर बुधवार पेठ परिसरातील एकूण 70 वर्षीय महिलेला आठ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 22 मे रोजी सकाळी दहा वाजता त्या महिलेचे निधन झाले आहे. मोदी परिसरातील 67 वर्षीय महिलेला 13 मे रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या महिलेचा 23 मे रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. न्यू पाच्छा पेठ परिसरातील 78 वर्षीय महिलेला 21 मे रोजी रात्री साडे सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 23 मे रोजी सकाळी आठ वाजता या महिलेचे निधन झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज नव्याने आढळलेल्या 49 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये गंगा चौक नीलम नगर येथील एक महिला, मजरेवाडी राऊत वस्ती येथील एक पुरुष, कुर्बान हुसेन नगर येथील एक पुरुष, कर्णिक नगर येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील दोन पुरुष, बुधवार पेठेतील एक पुरुष, सिद्धेश्वर नगर येथील एक पुरुष, फॉरेस्ट रेल्वे लाईन येथील एक महिला, विडी घरकुल येथील दोन पुरुष, जुना विडी घरकुल येथील दोन महिला, इंदिरानगर 70 फूट रोड येथील दोन पुरुष व एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथील एक पुरुष, मोदी पोलीस स्टेशन परिसरातील दोन पुरुष,पाछा पेठेतील दोन पुरुष व एक महिला, बादशा पेठेतील दोन महिला, न्यू बुधवार पेठेतील तीन महिला, एमआयडीसी रोडवरील मैत्री नगर मधील एक पुरुष व एक महिला, आरटीओ ऑफिस जवळील निखिल पार्क येथील एक पुरुष, शाहीर वस्ती भवानी पेठ येथील एक पुरुष, मोदी येथील एक महिला, सुशील नगर विजापूर रोड येथील एक पुरुष, एमआयडीसी रोड वरील अंबिका नगर येथील एक महिला, साईबाबा चौकातील तीन महिला, बाळीवेस येथील एक पुरुष व चार महिला, सातरस्ता येथील एक पुरुष, पोलीस मुख्यालय अशोक चौकातील एक पुरुष, शामा नगर मोदी येथील दोन पुरुष व एक महिला, अक्कलकोट मधील मधला मारुती गल्ली येथील एक पुरुष, सिव्हिल हॉस्पिटल क्वॉर्टर (मुळगाव जांबुड, ता. माळशिरस) येथील एक पुरुष यांचा समावेश आहे. कोरोना मुक्त झालेल्या 25 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून अद्यापही 52 कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

२० वर्षांच्या लॉकडाऊननंतर आपल्या मुलांना शोधण्यासाठी ‘या’ कासवाने केला ३७ हजार किमी प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कासव हा समुद्रात राहणारा एक भव्य प्राणी आहे. जलचरांमध्ये शांत प्राणी असणार्‍या कासवाच्या शिकारींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाढ झाली आहे. याच कासवांच्या संवर्धनाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २३ मे रोजी जागतिक टर्टल डे

साजरा केला जातो. या दिवसाची थीमही दरवर्षी वेगळी असते. सर्वसाधारणपणे या दिवशी प्राणीप्रेमी हे हिरवे कपडे घालतात. जागतिक टर्टल डे पहिल्यांदा २००० साली साजरा करण्यात आला, तेव्हापासून तो आजपर्यंत चालूच आहे. अलीकडेच एका कासवाने समुद्रात सुमारे ३७ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे, ज्याच्या या प्रवासाची कथा लोकांना प्रेरणा देणारी आहे.

IFS ने शेअर केली या कासवाची कथा
जागतिक टर्टल डेच्या दिवशी भारतीय वनसेवेचे अधिकारी प्रवीण कसवान यांनी एका कासवाची एक हटके गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की,” कासवाचा त्याच्या घरापर्यंतचा अप्रतिम प्रवास. त्यांनी सांगितले की,’ योशी नावाच्या एका कासवाने मार्चमध्ये आपल्या पिल्लाना जन्म देण्यासाठी आणि त्यांना वाढवण्यासाठी सुमारे ३७ हजार किलोमीटरचा प्रवास करून योग्य असे स्थान शोधले. त्याचा हा प्रवास आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया असा होता. ते म्हणाले की,”हे प्राणी इतका लांब प्रवास कसा आणि का करतात हे आपल्याला पाहण्याची गरज आहे.”

 

योशीवर सेटेलाइट टॅग लावण्यात आला
एका अहवालानुसार, योशी नावाची ही मादी कासव जखमी अवस्थेत आढळली होती. ज्यानंतर प्राणी प्रेमींनी ती बरे होईपर्यंत तिच्यावर उपचार केले आणि तिचे परीक्षण केले. दरम्यान, तिच्या शरीरावर एक सेटेलाइट टॅग लावण्यात आला होता, जेणेकरून त्यांच्या प्रजातींबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. अखेर २० वर्षांनंतर तिची सुटका झाली. त्यानंतर तिने आपल्यासाठी घराचा शोध सुरू केला. यासाठी योशी या कासवाने जवळपास अर्ध्या जगाचा प्रवास केला. तिच्या या ३७ हजार किलोमीटरच्या प्रवासाची कथा ऐकून माणसे थबकून गेली.

 

 

लॉकडाऊनमध्ये कासवांना मिळातोय आराम
दुसरीकडे, भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. देशात सध्या राबविलेल्या लॉकडाऊनमुळे लोक त्यांच्या घरातच कैद झाले आहेत, तर उद्योगही बंद आहेत. याचा थेट परिणाम वातावरणावर आणि प्राण्यांवर स्पष्टपणे झालेला दिसत आहे. समुद्र किनारी माणसांची वर्दळ कमी झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर समुद्री कासवं ही किनाऱ्याकडे वळत आहेत. अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर समुद्री कासवांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये कासवाची पिल्ले बीचवर फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून हे अनुमान काढले जाऊ शकते की या कासवांच्या पिल्लांचा नुकताच जन्म झाला आहे. ज्यामुळे त्यांना व्यवस्थित चालणेही शक्य होत नाहीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्यात दिवसभरात २ हजार ६०८ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ४७ हजार १९० वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४७ हजार १९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५७७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४०, पुण्यात १४, सोलापूरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाणे १ तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २८,८१७ (९४९)
ठाणे: ३९४ (४)
ठाणे मनपा: २४४०५ (३५)
नवी मुंबई मनपा: १७७८ (२९)
कल्याण डोंबिवली मनपा: ७८४ (७)
उल्हासनगर मनपा: १४५ (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)
मीरा भाईंदर मनपा: ४४२ (४)
पालघर:१११ (३)
वसई विरार मनपा: ४९९ (१५)
रायगड: ३२१ (५)
पनवेल मनपा: २९५ (१२)
ठाणे मंडळ एकूण: ३६,१७३ (१०६९)

नाशिक: ११५
नाशिक मनपा: १०५ (२)
मालेगाव मनपा: ७११ (४४)
अहमदनगर: ५३ (५)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १७ (३)
धुळे मनपा: ८० (६)
जळगाव: २९० (३६)
जळगाव मनपा: ११३ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १५३५ (१०३)

पुणे: ३१२ (५)
पुणे मनपा: ४८०५ (२४५)
पिंपरी चिंचवड मनपा: २३० (७)
सोलापूर: २२ (१)
सोलापूर मनपा: ५४५ (३४)
सातारा: २०४ (५)
पुणे मंडळ एकूण: ६११८ (२९७)

कोल्हापूर:२०६ (१)
कोल्हापूर मनपा: २३
सांगली: ६३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १४२ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५५ (५)

औरंगाबाद:२२
औरंगाबाद मनपा: ११९७ (४२)
जालना: ५४
हिंगोली: ११२
परभणी: १७ (१)
परभणी मनपा: ५
औरंगाबाद मंडळ एकूण: १४०७ (४३)

लातूर: ६४ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: २९
बीड: २६
नांदेड: १५
नांदेड मनपा: ८५ (५)
लातूर मंडळ एकूण: २२० (७)

अकोला: ३१ (२)
अकोला मनपा: ३४२ (१५)
अमरावती: १३ (२)
अमरावती मनपा: १४३ (१२)
यवतमाळ: ११३
बुलढाणा: ३९ (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:६८९ (३४)

नागपूर: ३
नागपूर मनपा: ४६२ (७)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ९
गोंदिया: ३९
चंद्रपूर: ८
चंद्रपूर मनपा: ७
गडचिरोली: १३
नागपूर मंडळ एकूण: ५४५ (८)

इतर राज्ये: ४८ (११)
एकूण: ४७ हजार १९० (१५७७)

कराची विमान अपघातात ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचे निधन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी दुपारी पाकिस्तानच्या लाहोर शहरातून कराचीला जाणारे एक प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या विमानामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद असे एकूण ९९ लोक होते. विमानतळावर पोहोचण्याच्या अवघ्या १ मिनिट आधी हे विमान कराचीजवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा अबिद हिचे निधन झाल्याचे वृत्त आज समोर आले आहे.

लाहोरमध्ये एका कपड्याच्या ब्रॅंडसाठी शूटिंग करीत असताना अचानक काकांच्या निधनाची बातमी आल्याने ती तातडीने लाहोरहून कराचीला निघाली होती. मात्र या दुर्घटनेमध्ये तिचे निधन झाले. प्राथमिक माहितीत काही जण जखमी असल्याची बातमी होती मात्र प्रसिद्ध टीव्ही अँकर आणि पत्रकार झैन खान यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून ही बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. यावर्षीच्या जानेवारी मध्ये तिने चौधरी सिनेमातून चित्रपटात पदार्पण केले होते. ४ थ्या हम स्टाईल अवॉर्ड मध्ये तिला उत्कृष्ट महिला मॉडेल हा अवॉर्ड मिळाला होता. तिची उंची आणि सावळा रंग यासाठी ती प्रसिद्ध होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला होता.

 


View this post on Instagram

 

~ who is missing trips to the beach? ????????‍♀️ #ZaraAbid

A post shared by Zara Abid (@zaraabidofficial) on May 7, 2020 at 4:48am PDT

 

दरम्यान जिना गार्डनच्या मॉडेल कॉलनी परिसरात हे विमान कोसळले होते. विमान कोसळल्यामुळे परिसरातील गाड्यांचे आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत सर्वाना दुःख झाले असून झाराच्या निधनाने तिच्या फॅन्समध्ये शोककळा पसरली आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर झाराने कमी वयात चांगले नाव निर्माण केले होते. ती केवळ २८ वर्षाची होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

धोनीच्या ‘या’ मास्टर प्लॅनमुळे २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली- सुरेश रैना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी विश्वचषकातील इतिहासाबद्दल बोलताना भारतीय संघाने आजपर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले असून यामध्ये टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळविला आहे. २०१५ साली आयसीसी वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. ज्यामध्ये ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ‍ॅडलेड मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरासमोर आले होते. विराट कोहलीने केलेल्या १०७ धावांच्या जोरावर भारताने हा सामना ७६ धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत कोहलीच्या खेळीबरोबरच सुरेश रैनानेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेगवान ७४ धावा फटकावल्या. अशाप्रकारे ५ किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रैनाने तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक फलंदाजीच्या क्रमवारीत बदल घडवल्याबद्दल सांगितले.

रैनाचा असा विश्वास आहे की या शानदार खेळीचे श्रेय संपूर्णपणे धोनीला जाते. धोनीने अचानक निर्णय घेतला की रैना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल तर त्यावेळी अजिंक्य रहाणे ६व्या क्रमांकावर खेळेल. त्याविषयी रैनाने एका यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे की, ‘मी त्याच्या निर्णयावर कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. २०१ ५ च्या विश्वचषकात आम्ही पाकिस्तानविरूद्ध सामना खेळत होतो, मी बसून सँडविच खात होतो, त्यानंतर २० षटकांनंतर धोनी आला आणि पॅड घालून तयार होण्यास सांगितले. मी पॅड घालून फलंदाजीसाठी सज्ज झालो. विराट जबरदस्त फलंदाजी करत होता, इतक्यातच धवन रनआऊट झाला आणि मी चौथ्या क्रमांकावर खेळायला गेलो. मी ७०-८० धावा केल्या असतील. ‘

विशेष म्हणजे जेव्हा रैना फलंदाजीला आला होता तेव्हा भारताची धावसंख्या २९.५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १६२ झालेली होती. रैनाने ५६ चेंडूत ७४ धावा फटकावल्या. त्यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याने विराट कोहलीबरोबर ११० धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारत मजबूत धावफलक उभा करण्यास यशस्वी झाला. अशाप्रकारे धोनीची योजना स्पष्ट करताना रैना म्हणाला, ‘सामना संपल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला विचारले की,” फलंदाजीच्या क्रमात मला वर का पाठवले ? तो म्हणाला की,” तू लेग स्पिनरविरुद्ध चांगले खेळतो आणि त्यावेळी फक्त लेग स्पिनर गोलंदाजी करीत होता. त्यानंतर धोनीने माझ्या फलंदाजीचेही कौतुक केले.

अशाप्रकारे, धोनीचा हा मास्टर प्लॅन रैनासाठी अत्यंत प्रभावी ठरली आणि त्यावेळी त्याने पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाहला चांगलेच बडवले तसेच सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. भारताने या सामन्यात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३०० धावा केल्या आणि पाकिस्तानचा डाव मात्र २४४ धावांतच आटोपला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुझे साजन के घर जाना है! एका नवरीचा अनोखा हट्ट; ८० किलोमीटर पायी चालत शेवटी गाठलं सासर

कानपूर । देशात अचानक आलेल्या कोरोनाच्या साथीनं केंद्र सरकारला देशव्यापी लॉकडाऊन नाईलाजाने लागू करावा लागला. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक तरुण-तरुणींची धुमधडाक्यात लग्न करण्याची गुलाबी स्वप्नांचा चुराडा झाला आहे. लॉकडाऊनमुळे जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. तसेच अनेक ठिकाणी जिल्हाबंदी अजूनही कायम असल्यानं अनेक वर-वधूंचे लग्नाचे मुहूर्त नाईलाजाने पुढे ढकलावे लागले. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच नव्या संसाराची गुलाबी स्वप्नं रंगवणाऱ्या जोडप्यांना एकत्र येण्याआधीच लॉकडाउनच्या विघ्नामुळे विरह सहन करावा लागत आहे.

मात्र, कानपूरमध्ये एका तरुणीने या सगळ्यावर मात करत आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे. लॉकडाऊनमुळे या तरुणीचे लग्न रद्द झाले होते. त्यामुळे ही तरुणी अस्वस्थ होती. अखेर तिने कन्नौजपर्यंतचा ८० किलोमीटर पायी चालत सासर गाठले. मुलीची जिद्द पाहून अखेरी दोन्ही बाजूकडील लोकांनी पुढाकार घेत लॉकडाऊनमध्येच दोघांचे लग्न लावून दिले.

प्राथमिक माहितीनुसार, गोल्डी ही १९ वर्षांची तरुणी कानपूरच्या डेरा मंगलपुर येथे वास्तव्याला आहे. कन्नौजच्या तालग्राम येथील वीरेंद्र कुमार राठोडसोबत तिचा विवाह ठरला होता. ४ मे रोजी त्यांचे लग्न होणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हा विवाहसोहळा रद्द करावा लागला होता. त्यामुळे गोल्डीच्या मनाची चलबिलचल सुरु होती.

अखेर गोल्डीने आपल्या सासरी चालत जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी गोल्डी घरातून बाहेर पडली. संध्याकाळपर्यंत ८० किलोमीटर अंतर कापत ती कन्नौजला पोहोचली. गोल्डीला दरवाज्यात पाहून तिच्या सासरच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर मुलाकडच्या लोकांनी आपण थोड्या दिवसांनी तुमचे लग्न लावून देऊ, असे सांगत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोल्डी काही केल्या ऐकायला तयार नव्हती. अखेर मुलाकडच्या लोकांनी तिची मागणी मान्य केली. यानंतर गुरुवारी गावातील मंदिरात दोघांचेही लग्न लावून देण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

याच कारणांमुळे ऑस्ट्रेलियामध्ये दर्जेदार फिरकीपटू तयार होईनात – शेन वॉर्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियामधील स्पिन गोलंदाजीच्या सद्यस्थितीबद्दल महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला चिंता वाटत आहे. शेन वॉर्नचा असा विश्वास आहे की,” ऑस्ट्रेलियातील फिरकी गोलंदाजी सुधारण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला प्रत्येक प्रथम श्रेणी सामन्यात एक फिरकी गोलंदाज टीममध्ये असणे बंधनकारक केले पाहिजे. शेन वॉर्नने ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’शी बोलताना सांगितले की, ” फिरकी गोलंदाजाने प्रत्येक सामना खेळला पाहिजे, मग परिस्थिती कशीही असो. जेणेकरून पहिल्या किंवा चौथ्या दिवशी गोलंदाजी कशी करावी हे त्या फिरकीपटूला कळेल. स्थानिक संघ परिस्थिती अनुकूल असते तेव्हाच त्यांची निवड करतात. ”

वॉर्न म्हणाला, “जर ते देशांतर्गत पातळीवर खेळले नाहीत तर ते कसे शिकतील. राज्य संघांकडे प्रत्येक सामन्यात एक तरी स्पेशल फिरकी गोलंदाज असला पाहिजे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. “

वॉर्न पुढे म्हणाला की,” नॅथन लिऑनची जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये प्रतिभावान फिरकीपटूंचा अभाव आहे. तो म्हणाला की,” ड्रॉप इन खेळपट्ट्यांमुळे फिरकीपटूंचा विकास होत नाही आहे. “एकेकाळी प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगळी होती, परंतु आता सर्वत्र कृत्रिम खेळपट्ट्यांचा वापर केला जात आहे. आपण त्यांचा जास्त प्रमाणात वापर करणे टाळले पाहिजे. “

Nathan Lyon exposes Moeen Ali's batting and bowling as he ...

तो म्हणाला, “नॅथन लिऑन हा जगातील एक उत्कृष्ट फिरकीपटू आहे आणि यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत. जर त्याला काही झाले तर आमच्याकडे असा फिरकी गोलंदाज असेल ज्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा कमी अनुभव असेल, ज्याला जगातील काही सर्वोत्कृष्ट फिरकीपटुंना सामोरे जावे लागेल. “

वॉर्नने इशारा देत सांगितले की, “आमच्याकडे ऑस्ट्रेलियामध्ये काही चांगले फिरकीपटू आहेत, परंतु त्यांना संधी मिळत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने राज्यांवर थोडा दबाव आणला पाहिजे आणि त्यांना सांगितले पाहिजे की,प्रत्येक सामन्यात आपल्या संघात एका फिरकीपटूची निवड करावी लागेल.”

India vs Australia: On a lively drop-in pitch at Perth that ...

५० वर्षीय वॉर्नचा असा विश्वास आहे की ड्रॉप-इन पिचेसच्या वाढत्या वापरामुळे अशीच परिस्थिती कायम राहिली तर चांगल्या स्पिनर्सच्या खेळावर परिणाम होईल. तो म्हणाला, “एक काळ असा होता की, प्रत्येक राज्यात पूर्णपणे भिन्न परिस्थिती होती. आता तेथे बरेच ड्रॉप-इन पिचेस आहेत अ‍ॅडलेड, मेलबर्न, पर्थ येथील नवीन स्टेडियमवर ड्रॉप-इन खेळपट्टी आहे. आपल्याला त्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.