Friday, December 26, 2025
Home Blog Page 5780

विदर्भात मान्सून वेळेवरच दाखल होणार ; हवामान खात्याचा अंदाज

अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे.

Weather enthusiasts predict Monsoon in Mumbai by June 14

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे 10 ते 15 जून दरम्यान विदर्भात मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.

विदर्भात प्रामुख्याने अमरावती विभागातील शेती मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. पश्चिम विदर्भात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने मान्सूनच्या पावसावर शेतकरी अवलंबून आहेत. शेतीसह येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून आगमन वेळेवर हे दिलासा देणारे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown 4.0 । देशात आता ३ नाही तर एकूण ५ झोन; जाणून घ्या बफर अन कंटेनमेंट झोनबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यासाठी आता केंद्र सरकारने देशाचे तीनऐवजी पाच झोनमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन व्यतिरिक्त ‘बफर झोन आणि कंटेनमेंट झोन’चा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार या दोन नवीन झोनबाबत लवकरच निर्णय घेतील, याबाबतच्या गाईडलाईन्स अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत. कोरोना विषाणूची लागण होणा-या लोकांची संख्या,कोविड -१९ प्रकरणांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रति लाख लोकसंख्येवर कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या यावर ‘रेड’, ‘ऑरेंज ‘ किंवा ‘ग्रीन’ झोन म्हणून घोषित करण्याचा निकष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी काढला.

या निकषांनुसार, सोमवारपासून सुरू होणार्‍या लॉकडाउन ४.० दरम्यान सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांचे झोन हे या तीन झोनमध्ये विभाजित करू शकतील. मंत्रालयाने कुठल्याही ठिकाणी ‘कंटेनमेंट झोन’ किंवा ‘बफर झोन’ म्हणून घोषित करण्यासाठी काही निकष लावले आहेत आणि त्या भागात पसरलेल्या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

बफर आणि कंटेनमेंट झोन
राज्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात आरोग्य सेक्रेटरी प्रीती सुदान म्हणाल्या की,’ राज्ये जिल्हा किंवा महानगरपालिका क्षेत्रांचे वर्गीकरण हॉट-स्पॉट्स,’रेड’, ‘ऑरेंज ‘ किंवा ‘ग्रीन झोन’मध्ये करू शकतात. म्हणजेच या तीन झोनबाबत राज्य सरकार निर्णय घेतील, तर जिल्हा प्रशासन कंटेनमेंट झोन आणि बफर झोन ठरवतील. कंटेनमेंट आणि बफर झोनमध्ये गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. गृह मंत्रालयाने अद्याप बफर झोन संदर्भात गाईडलाईन्स जाहीर केलेले नाहीत, परंतु कंटेनमेंट झोनबाबत गृह मंत्रालयाची गाईडलाईन्स अगदी स्पष्ट आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अनिवार्य सेवा सुरु राहतील. कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करण्यासही बंदी असेल. या झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि डोर-टू-डोर हेल्थ स्क्रीनिंगही केले जाईल.

मंत्रालयाने राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत की झोनचे विभाजन करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत-

एकूण वैद्यकीय केसेस (राज्यात किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत).
प्रति लाख लोकसंख्येत संक्रमित लोकांची संख्या.
७ दिवसानुसार संक्रमित लोकांच्या संख्येच्या दुप्पट वाढीसाठी सरासरी लागणारा वेळ.
सांसर्गिक मृत्यूचा दर.
प्रति लाख लोकसंख्येच्या तपासणीचा दर.
किती लोकांना सकारात्मक अहवाल प्राप्त होत आहे त्याचा दर लक्षात ठेवला पाहिजे.

लॉकडाउन ४.० मध्ये केंद्र सरकारने यावेळी राज्य सरकारांना बरेच अधिकार दिले आहेत. मात्र , लॉकडाऊन ४.० दरम्यान मेट्रो तसेच विमानाच्या वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ३१ मेपर्यंत मेट्रो चालविण्यावर तसेच देशी-विदेशी प्रवासी विमान उड्डाणांवर पूर्ण बंदी असेल. देशांतर्गत वैद्यकीय सेवा, घरगुती हवाई रुग्णवाहिका व सुरक्षा व्यवस्थेसाठी उड्डाणांना परवानगी देण्यात येईल. देशामध्ये कोरोना संक्रमणाची संख्या ही ९६ हजारांच्या पुढे गेलेली आहे तसेच या विषाणूमुळे तीन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

असुरक्षित बालकांच्या मदतीसाठी नोबेल विजेते एकवटले; जागतिक नेत्यांना केली भरीव मदतीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात COvid-१९ या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सर्वच देश आपापल्या पातळीवर एकमेकांच्या सहकार्याने याच्याशी लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संकटकाळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका देशांना सोसावा लागतो आहे. सर्वत्र संचारबंदी असल्याने हातावर पोट असणारे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. अविकसित आणि विकसनशील देशातील गरिबी, उपासमार वाढली आहेच पण येणाऱ्या काळात ती आणखी वाढण्याचा धोका आहे. अशा वेळी जगभरातून वेगवेगळ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. जगभरातून साधारण ५ ट्रिलियन डॉलर चे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने छोटे व्यावसायिक, महिला, बेरोजगार आणि अशा विविध घटकांसाठी उपाययोजनेची पॅकेजेस जाहीर झाली आहेत. जगातील प्रत्येक मुलाला जगण्याची समान संधी आहे. म्हणूनच या अशासंकटाच्या वेळी अगोदरच गरीब आणि असहाय असणाऱ्या कुटुंबांचा आणि त्यांच्या उपेक्षित मुलांचाही विचार करण्यात यावा अशी मागणी जगभरातील बालकांसाठी काम करणारे नोबेल पुरस्कार विजेते आणि नेते यांनी केली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगभरातील ४०-६० दशलक्ष लोक २०२० मध्ये गरिबीच्या रेषेखाली आहेत. १० दशलक्ष असंघटित कामगार आधीच बेरोजगार झाले आहेत. शाळा बंद झाल्याने ३७० दशलक्ष बालके पोषण आहाराला मुकली असून उपासमारीला बळी पडली आहेत. 

जर जगातील सर्व देशांनी एकत्रित येऊन जगभरातील उपेक्षित बालकांसाठी एकूण पॅकेजच्या २०% पॅकेज म्हणजेच १ ट्रिलियन डॉलर पॅकेज जाहीर केले तर त्याचा प्रचंड सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी म्हंटले आहे. हे एक ट्रिलियन डॉलर यूएन आणि चॅरिटेबल संस्थांना मदत करतील ज्याच्या साहाय्याने कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील दोन वर्षाची कर्ज परतफेड रद्द करा आणि हे पैसे आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि शिक्षणासाठी द्या. असे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण ही अशी महत्वपूर्ण पायरी आहे ज्याद्वारे सर्व प्रकारचा बहिष्कार संपवता येऊ शकतो. आणि याद्वारे उपेक्षित मुलांचे भविष्य बदलता येऊ शकते.  बालकामगारांसाठीच्या लढ्यातील महत्वपूर्ण सामाजिक सुरक्षा जाळी साठी देखील निधी  शिल्लक ठेवता येईल. १० दशलक्ष मुलांचे जीव सुरक्षित होतील. covid -१९ च्या शोकांतिकेतील मानवाकडून आलेला एक सकारात्मक प्रतिसाद असेल असे आवाहन या जाहीरनाम्यात करण्यात आले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक वित्तपुरवठा संस्थांना संसाधने उपलब्ध करून देण्याचे आवाहन याद्वारे सर्व पुरस्कार विजेते तसेच नैतिक नेते यांनी केले आहे. 

जगभरातील सर्व असुरक्षित मुलांसाठीच्या या लढ्यात जगभरातील बालकांसाठी काम करणारे सामाजिक नेते समाविष्ट आहेत. २०१४ सालचे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एका व्हिडिओद्वारे #Everychildmatter या हॅशटॅगखाली ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकटकाळात या उपेक्षित बालकांकडेही लक्ष देऊन त्यांच्या असुरक्षित वर्तमानाला एका सुरक्षित भविष्यात परिवर्तित करण्याची ही मोहीम आहे.

‘या’ तारखांना होणार सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा

नवी दिल्ली । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. २९ प्रमुख विषयांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान होणार आहेत. कोणता पेपर कधी, कोणत्या सत्रात याविषयीची सविस्तर माहिती बोर्डाने दिली आहे.

याचसोबत कोणत्या परीक्षा पूर्ण देशभर होणार आहेत आणि कोणत्या केवळ ईशान्य दिल्लीत होणार आहेत, ते या वेळापत्रकात सविस्तरपणे नमूद करण्यात आले आहे. सर्व परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनीही हे टाइमटेबल ट्विट केले आहे.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका १५ मिनिटे आधी वाचायला मिळणार आहे. १०.१५ वाजता त्यांना प्रश्नपत्रिका दिली जाईल आणि १०.३० वाजता पेपर सुरू होईल. या व्यतिरिक्त कोरोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने खबदारी म्हणून विद्यार्थ्यांसाठी काही विशेष सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना नाक, तोंड झाकणे बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोररित्या पाळणे अत्यावश्यक आहे, असे बोर्डाने कळवले आहे. पालकांनी त्यांचे पाल्य आजारी नाही ना याची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मी उद्धव ठाकरे.. अखेर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर आठही नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनीही आमदारकीची शपथ घेतली.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास विधानभवनात उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांना विधानपरिषद सदस्यत्वाचं प्रमाणपत्रंही देण्यात आलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. कोणताही गाजावाजा न करता मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

उद्धव ठाकरे यांनी २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना ६ महिन्याच्या आत कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या आगामी निवडणुका स्थगित केल्यानं. उद्धव ठाकरेंपुढे आपली मुख्यमंत्रीपद वाचवण्याचा पेच निर्माण झाला होता. मात्र, अखेर राज्यपालांच्या मध्यस्तीनं निवडणूक आयोगानं निवडणुकीला परवानगी दिली. त्यानुसार २१ मे ला निवडणुका पार पडत उद्धव ठाकरेंची विधानसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यामुळं २७ मे रोजी ६ महिने पूर्ण होत असल्याने त्यापूर्वीच ते विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मुंबईतून थेट यूपीतील आपल्या गावात पोहोचला नवाजुद्दीन सिद्दीकी; १४ दिवस होम क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे आपल्या घरी पोहोचताच होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तो मुंबईहून नुकताच मुझफ्फरनगरला आला आहे. आता तो आपल्या कुटुंबासमवेत १४ दिवस क्वॉरंटाईन राहील. या अभिनेत्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली गेली आहे. ज्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.

महाराष्ट्र सरकारचे परवानगीपत्र मिळाल्यानंतर नवाजुद्दीन १५ मे रोजी आपल्या घरी पोहोचला. येथे त्याला २५ मे पर्यंत त्याच्या कुटुंबासमवेत क्वॉरंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

घरी जाताना रस्त्यामध्ये २५ वेळा झाली वैद्यकीय तपासणी
मुंबईहून नवाज बुढाना येथे स्वत: च्या कारमधून आला होता आणि या प्रवासात त्याची आई, मेव्हणी व भाऊही त्याच्यासोबत होते. या अभिनेत्याने पत्रकारांना सांगितले की, या प्रवासादरम्यान त्याला रस्त्यात २५ ठिकाणी वैद्यकीय तपासणीतून जावे लागले.

बुढाना पोलिस सर्कलचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएसओ) कुशलपाल सिंह यांनी सांगितले की आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी या अभिनेत्याच्या घरी जाऊन त्याला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहाण्यास सांगितले.

देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत
आजपासून देशात लॉकडाउन ४.० सुरू झाले आहे. या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत चालू राहणार आहे. देशात लॉकडाउन असूनही संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात संक्रमित रूग्णांची ५२४२ प्रकरणे नोंदली गेली आहेत, जे एका दिवसात आतापर्यँत वाढलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याच वेळी गेल्या २४ तासांत १५७ लोकही मरण पावले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ९६,१६९ लोकांना संसर्ग झाला आहे. तसेच, ३०२९ लोक मरण पावले आहेत. सुमारे ३० हजार ८२४ लोकही यातून बरे झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता रेड झोनमध्येही ई-कॉमर्स कंपन्यांना सेवेची परवानगी; ऑटो, टॅक्सीलाही सूट

नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडून बरीच मोकळीक देण्यात आली आहे. नव्या निर्देशानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तूंसहीत इतर वस्तूंच्या सामानाची डिलिव्हरी करण्यास सूट मिळाली आहे. ग्रीन, ऑरेंजसहीत ई-कॉमर्स कंपन्या रेड झोनमध्येही वस्तू पोहचवू शकणार आहेत. केवळ कन्टेन्मेंट झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना पोहचता येणार नाही.

तसंच । लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवाशांना  कन्टेन्मेंट झोन वगळून आता प्रवासासाठी बाईक, बस, टॅक्सी आणि ऑटोचीही मदत घेता येणार आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, खासगी गाड्यांनी परवानगी घेणं आवश्यक राहील. ऑटो, टॅक्सी, बस चालू शकतील. पण त्यासाठीही नियम लागू करण्यात आलेत. या गाड्यांतून किती प्रवाशांनी प्रवास करावा, त्याची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार कन्टेन्मेंट झोन वगळून ऑटो-टॅक्सीने ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये १+१ प्रवासी वाहतुकीला परवानगी आहे. तर कारने तिन्ही झोनमध्ये १+२ प्रवासी वाहतुकीला परवानगी आहे. बाईक, स्कुटरने प्रवास करत असला तर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये १+१ तर रेड झोनमध्ये केवळ एका व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. कार, बाईक आणि स्कुटरने केटेन्मेंट झोनमध्ये प्रवास करण्याला पूर्णतः बंदी आहे. दरम्यान, सार्वजनिक बसचा निर्णय राज्यांवर सोपवण्यात आला आहे. इतर राज्यांत बस चालवण्यासाठी एकमेकांशी चर्चा करून आंतरराज्यीय बस सेवा सुरू केल्या जाऊ शकतील, असंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोन्या चांदीच्या किंमतींत रेकॉर्डब्रेक वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीचे भाव सातत्याने वाढत आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत झालेली ही वाढ सोन्यामध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी ही एक चांगली संधी बनू शकते, मात्र सोन्याची किरकोळ खरेदी करणार्‍यांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्या-चांदीची चमक बरीच वाढली आहे.

Gold prices hit all-time high in India

सोन्याचे आजचे भाव
आजच्या सोन्याच्या किंमतींकडे नजर टाकल्यास सोने हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा व्यापार जोरात सुरु झाला आहे. आज, ५ जून, २०२० रोजीच्या, सोन्याच्या फ्युचर्स ट्रेडिंगकडे पाहता ते ०.९० टक्क्यांच्या वाढीसह ४८८०८ रुपये १० ग्रॅमसाठी व्यापार करीत आहे.

याशिवाय गोल्ड मिनीची किंमत पाहिल्यास त्यातही तेजी दिसून येत आहे. ५ जून २०२० रोजीच्या गोल्ड मिनीचा फ्युचर्स ट्रेडिंग हा ०.९१ टक्क्यांच्या वाढीसह दर १० ग्रॅमसाठी ४७७८५ रुपयांच्या पातळीवर आहे.

आज चांदीच्या दरामध्येही जोरदार वाढ
आजच्या बाजारात चांदीची दरही बराच वाढलेला आहे. चांदी वायदा बाजारात तेजी नोंदवत आहेत आणि एमसीएक्स चांदीच्या वाढत्या किमतीसह व्यापार करीत आहे. ३ जुलै, २०२० रोजी चांदीच्या फ्युचर्स ट्रेडिंगकडे पाहता ते ३.११ टक्क्यांच्या वाढीसह ४८१४७ रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे.

चांदीच्या दरामध्येही प्रचंड वाढ दिसून येते आहे. ३० जून २०२० रोजीच्या चांदीच्या फ्युचर्स ट्रेडिंगच्या किंमतींकडे नजर टाकल्यास ती ३.१६ % च्या वेगाने व्यापार करत आहे. ३.१६ टक्क्यांच्या वाढीनंतर सिल्व्हर मिनी ४८५५४ रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे.

Arab Economic News | Gold prices could reach $2,000 by the end of ...
सोन्याची उसळी कायम राहील
कमोडिटी आणि सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोन्याची ही भाव वाढ अधिक काळ चालू राहू शकते. अमेरिकेतून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांमुळे सध्या डॉलर खाली घसरत आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आत्मनिर्भर पॅकेजनंतरही शेअर बाजारात पडझड; सेंसेक्स १ हजार अंकांनी धडाम

मुंबई । लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थकारणाला गतिमान कारण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभिनय पॅकेजची घोषणा केली. केंद्राने हे पॅकेज भारतीय अर्थव्यस्थेला ररुळावर आणण्यासाठी मोठी मदत करेल असं म्हटलं होत. मात्र, या पॅकेजच्या घोषणा ऐकून निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी आज जोरदार शेअर विक्री केली. त्यामुळे सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी गडगडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात ३०० अंकांची घसरण झाली. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान तब्बल ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील ५ दिवस केंद्र सरकारचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये बहुतांश उद्योगांना आर्थिक मदत न मिळाल्याने उद्योगांची पुरती निराशा झाली. त्यातच करोना व्हायरसवरून चीन आणि अमेरिका या देशांमधील तणाव वाढल्याचे भांडवली बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आज बाजार खुलताच आजच्या सत्रात बँक आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये विक्रीचे प्रमाण वाढलं आहे. सकाळी ११.२७ वाजता सेन्सेक्स १०४५ अंकांनी कोसळला आणि ३००५२ अंकांपर्यंत खाली आला आहे. निफ्टीत ३०९ अंकांची घसरण झाली असून तो ८८२७ अंकांवर आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.४४ टक्क्यांची घसरण झाली. बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक आदी शेअर २ टक्क्यांनी कोसळले आहे. विक्रीमुळे निर्देशांकात घसरण सुरु असून, गुंतवणूकदारांचे किमान ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे आयटीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, इन्फोसिस, एचयूएल आदी शेअर तेजीत आहेत. दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लाॅकडाउनमुळे विमान सेवा देखील पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे सरकारकडून काही आर्थिक मदतीची अपेक्षा विमान कंपन्यांनी केली होती. मात्र याबाबत आत्मनिर्भर भारत अभिनयाअंतर्गत कोणतीच घोषणा न झाल्याने विमान कंपन्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 96 हजार पार; तर आतापर्यंत 3029 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला तरीही कोरोना बाधितांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशव्यापी ५५ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत मात्र कोरोना संक्रमणाचा वेग वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५,२४२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर १५७ मृत्यू झालेत. चिंता वाढवणारी बाब म्हणजे भारतात एका दिवसात आढळलेली ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. या नवीन रुग्णांनंतर भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९६,१६९ वर पोहचली आहे. तर 36 हजार 824 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 13.6 दिवसांवर आला आहे. तर मागील 14 दिवसांत हा दर 11.5 वर होता. देशात रविवारी कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, मृत्यूदरात घट होऊन 3.1 टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर 37.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 106 दिवसांमध्ये 80 हजारांवर पोहोचली आहे. तर ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमेरिकेला या संख्येवर पोहोचण्यासाठी 44 ते 66 दिवस लागले होते. आठ राज्यात आणि केंद्र शासित प्रदेश तसेच, अरुणाचल प्रदेश, चंदिगढ, लडाख, मेघालय, मिझोरम, पद्दुचेरी आणि अंदमान निकोबार द्वीप समूह आणि ददरा आणि नगर हवेलीमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचा कोणताही रुग्ण समोर आलेला नाही. सिक्किम, नागालँड, दमन आणि दीव, लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”