Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5791

CRPF च्या जवानांची तुकडी पुण्यात दाखल; ‘या’ भागात काढला रुटमार्च

पुणे प्रतिनिधी | पुणे मनपा क्षेत्रातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३ हजार पार गेली अाहे. शहरात सद्यपरिस्थितीत एकुण ६९ परिसर कटेंनमेंट झोन म्हणुन प्रशासनाने घोषित केले आहेत. या भागात नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे आता रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकडीला तैनात करण्यात आले असून आज त्यांनी शहरातील सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर परिसरातून रुटमार्च काढला.

शहरात ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे अशा कटेंनमेंट झोन मध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणुन आज रुट मार्च काढण्यात आला. शहर पोलिसांच्या मदतीला आता सीआरपीएफचे जवान आल्याने नागरिकांना शिस्त पाळावी लागणार आहे.

दरम्यान, बुधवारी तारिख १३ मे रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय पोलिस दलाची १२० जवानांची एक तुकडी पुणे शहरात दाखल होणार असल्याची माहिती दिली होती. रमजान सणाच्या पार्श्वभुमीवर शहर पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफची तुकडी आलेली असल्याने आता शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशातील ७ करोड शेतकर्‍यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही; जाणुन घ्या कार्ड बनवायची प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९९८ साली जेव्हा केसीसीने सुरुवात केली तेव्हा देशात फक्त ७.८४ लाख कार्डे बनविण्यात आली होती. त्याअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जे फक्त ही ४ टक्के व्याजदराने मिळतात. तसेच या कार्डची वैधता ही पाच वर्षे आहे.

सावकारांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्व शेतकर्‍यांची कार्डे तयार करावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. जेणेकरून त्यांनाही केवळ ४ टक्के दराने शेतीसाठी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. परंतु बँका सहजपणे कर्ज देत नाहीत.

मोदी सरकारने सर्व राज्य सरकारांना बँकनिहाय आणि गावनिहाय शिबिरे आयोजित करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून यासाठी पात्र शेतकऱ्यांना जागोजागी भटकावे लागू नये. त्यांना केसीसीचा अर्ज घेऊन संबंधित बँकेच्या शाखेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्ज पूर्ण झाल्यानंतर २ आठवड्यांतच बँकांना केसीसी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यस्तरीय बँकर्स समिती त्यावर नजर ठेवेल. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अगदी उलट आहे.

राष्ट्रीय किसान महासंघाचे संस्थापक सदस्य बिनोद आनंद म्हणतात की मुळात केसीसी योजनेचे स्वरूपच चुकीचे आहे. ही शेतकर्‍यांसाठीची योजना आहे, मात्र यासाठी कृषी मंत्रालयाचा हस्तक्षेप चालत नाही. दुसरीकडे आर्थिक यंत्रणेला शेतकऱ्याला कर्ज मिळावे अशी इच्छा नसते. त्याला शेतकर्‍यांची भीती का वाटते काळात नाही. जेव्हा शेतकरी कृषी कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा नाबार्ड संबंधित बँक आणि शेतकरी यांच्यात मध्यस्थ म्हणून उभे राहते. तर ते शेतकऱ्यांना थेट कर्ज देत नाही.नाबार्डचे जिल्ह्यात जिल्हा विकास व्यवस्थापक आहेत. त्याद्वारे जिल्हास्तरीय बँकर्स समितीने केसीसी कर्जास मान्यता दिली. अशा मध्यस्थ यंत्रणेची गरजच काय आहे.

किसान क्रेडिट कार्डसाठी इच्छुक शेतकरी जवळच्या बँकेत जाऊन यासाठी आपला अर्ज करू शकतात. अधिकृत फॉर्म भरण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची मदत घ्या. नंतर, कर्ज अधिकारी आवश्यक तपशील भरेल आणि आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करेल. बँकेच्या साइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज देखील करता येतो.

केसीसी बनविण्यासाठी ओळखपत्र, निवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमीनीच रेकॉर्ड आणि फोटो द्यावा लागतो. यावरूनच बँकेला केसीसी पूर्ण करावे लागेल. तुम्हाला किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पैसे मिळाले असल्यास हे काम अधिक सुलभ होते. कारण तुमचा सर्व डेटा हा केंद्र सरकारने आधीच पडताळलेला असतो.

सरकारने बँकांना कठोर आदेश दिले आहेत. मात्र तरीही, जर एखादी बँक तुम्हाला कर्ज देत नसेल तर त्याच्या लीड बँक आणि जिल्हा लेबल बँकर्स समितीकडे याबाबत तक्रार द्या. जिल्हा पातळीवरील जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आणि राज्य स्तरावर राज्य बँकिंग समिती यासाठी जबाबदार आहेत. इथूनही काही सांगितले गेले नाही तर रिझर्व्ह बँक, वित्त तसेच कृषिमंत्र्यांकडे तक्रार दाखल करा. अधिकाऱ्यास शेतकरी क्रेडिट कार्ड बनवावेच लागेल. जर बँकेच्या अधिकाऱ्याने यासाठी नकार दिला तर त्याच्यावर कारवाईदेखील केली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारतीय हवाई दलाने ऐकली पंतप्रधान मोदींची स्वदेशीची हाक; या कंपनीकडून खरेदी करणार ८३ जेट विमाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशाला संबोधित करताना लोकल साठी वोकल बनायचे आवाहन केले. म्हणजेच स्वयंपूर्ण होऊन स्थानिक वस्तूंचा वापर वाढवण्याविषयी त्यांनी लोकांना सांगितले. याची सुरुवात सरकारने अत्यंत रंजक पद्धतीने केली आहे. खरं तर दोनच वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ११४ विमानांसाठी टेंडर मागवले होते. मात्र आता केंद्र सरकार त्यांना आपल्या स्थानिक बाजारातच तयार करण्यावर जोर देत आहे. यासाठी सरकारने देशातच बनवल्या गेलेल्या लढाऊ विमानांवर स्विच करण्याची योजना आखली आहे.

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हवाई दल आता  स्वदेशी आपल्या बनावटीचे हलके लढाऊ विमान (एलसीए) तेजस हे आपल्या विमानाच्या ताफ्यात समाविष्ट करेल. रावत म्हणाले की, ४० विमानांच्या जुन्या ऑर्डर व्यतिरिक्त एअरफोर्स आणखी नवीन ८३ जेट विमानांची खरेदी करेल. ज्याच्या किंमती जवळपास ६ अब्ज डॉलर्स इतकी असेल.

रावत पुढे म्हणाले की, हवाई दल आता या हलक्या लढाऊ विमानांचा वापर करेल. यासाठी जागतिक निविदा केव्हा देण्यात येतील असे विचारले असता रावत म्हणाले की परदेशी कंपन्यांऐवजी देशांतर्गत कंपन्यांना आता आदेश दिला जाईल. हे जेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) खरेदी केले जातील, असेही रावत यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आषाढी वारी बाबत अजित पवारांची बैठक; विश्वस्तांनी ठेवले प्रशासनासमोर ‘हे’ तीन पर्याय

पंढरपूर प्रतिनिधी । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव आता सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरदेखील पडत आहे. आषाढी एकादशी वारी समोर कोरोनामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा एक बैठक घेतली असून यात वारी बाबतचा निर्णय ३१ मे रोजी घेण्याचे ठरवण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वस्तांनी प्रशासनासमोर तीन पर्याय ठेवले असल्याचे समजत आहे. यात 300 वारकरी घेऊन दींडीस परवानगी द्या किंवा 30 , 40 वारकरी घेऊन वाहनात पालखी ठेऊन पंढपुरपर्यत परवानगी द्या नाहीतर मानाच्या दिंड्या आणि विणेकरी यांना परवानगी देऊन कमी वारकरी संख्येत वारी पार पाडता येईल असे तीन पर्यंत प्रशासनासमोर ठेवण्यात आल्याचे समजत आहे.

आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे, सातारा व सोलापूर आदी जिल्ह्यातील प्रशासन व महाराज मंडळ यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत आषाढी यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आल्या पाहिजेत, प्रातिनिधिक स्वरूपात आषाढी यात्रा व्हावी, यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहावे, परंतु शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे यात्रा व्हावी असे मत मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मांडले. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसून याबाबत पुन्हा मे महिनाअखेर पर्यंत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रामदेव बाबांच्या पतंजलीची ऑनलाईन ऑर्डर साईट; मिळणार फ्री होम डिलिव्हरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच लोकांना खादीसारख्या वस्तूंची खरेदी तसेच या वस्तूंना पाठिंबा देण्याविषयी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्याच्या सुमारे ४८ तासांच्या आतच बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद भारतात देशी उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी खास ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे, ज्यामध्ये केवळ स्वदेशी उत्पादनेच उपलब्ध केली जाणार आहेत.

ही वेबसाइट सुरु केल्यानंतर, पतंजली स्वतःच्या आयुर्वेदिक उत्पादनांबरोबरच इतरही काही भारतीय उत्पादने यावरून उपलब्ध करून देतील. या साईटवरून लोकं त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंची ऑर्डर करू शकतील. तसेच, वेबसाईटवर ऑर्डर केल्याच्या काही तासातच त्याची फ्री डिलीव्हरीही केली जाईल. याव्यतिरिक्त, पतंजलीतील सुमारे १,५०० डॉक्टर आणि योग प्रशिक्षक २४ X ७ लोकांना विनामूल्य वैद्यकीय सल्ला देतील. हि वेबसाईट येत्या १५ दिवसात सुरू होईल असे सांगण्यात येते आहे.

पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी आचार्य बालकृष्ण यांनी या योजनेची पुष्टी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या आवाहनाला प्रतिसाद म्हणून देशी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बाळकृष्ण पुढे म्हणाले की, ‘ पतंजली केवळ देशी उत्पादनांचाच पुरवठा करेल. पतंजली सर्व स्थानिक किरकोळ विक्रेते तसेच लहान दुकान मालकांशी संपर्क साधून या स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे त्यांना आमच्या व्यासपीठावर स्वदेशी उत्पादने विकता येतील. ते वेबसाइटशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांची उत्पादने फ्री मध्ये लोकांना डिलिव्हर करू शकतात. ‘

बालकृष्ण म्हणाले की घरगुती वस्तूंचे वाटप करणार्‍या लहान तसेच मध्यम उद्योगांना (एमएसएमई) या ई-कॉमर्स साइटमध्ये येण्यास प्रोत्साहित केले जाईल आणि त्याचा त्यांनाही फायदाच होईल.

पतंजलीची माहिती तंत्रज्ञान कंपनी, नवी दिल्लीस्थित भारवा सोल्यूशन्स, प्लस येथे या ऑनलाईन रिटेलसाठी हे नवीन अ‍ॅप विकसित केले गेले आहे. हे नवीन अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध होणार आहे. पतंजलीच्या सीईओने यावर भर दिला की उत्पादनांचे वितरण, विक्री तसेच पुरवठा यांचे व्यवस्थापन करण्यासाठी इन-हाउस सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे.

एका कार्यकर्त्याने सांगितले की या नवीन वेबसाईटवर ८०० पेक्षा जास्त पतंजलीच्या वस्तू उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त, जवळपासच्या इतर स्टोअर्समधूनही उत्पादने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना यादी उपलब्ध असेल. ते म्हणाले, “हि वेबसाईट मोठ्या प्रमाणावर बाजारात आणली जाईल आणि लोकांच्या मागणीनुसार आणखीही काही उत्पादने यामध्ये जोडली जातील,”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केवळ ‘या’ कारणासाठी भारतीय लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा होणार बंद

नवी दिल्ली । भारतीय लष्करात अतिशय रुबाबदार आणि गौरवशाली तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्वदल अर्थात घोडदळाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हं आहेत. या दलात आता घोड्यांऐवजी टँकचा वापर केला जावा असा प्रस्ताव समोर आल्यानं लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. लष्कराचे वाढते खर्च कमी करणे आणि त्यांची युद्धशक्ती वाढवणे याबाबत नेमण्यात आलेल्या समितीनं यासंदर्भातली शिफारस आपल्या अहवालात केली आहे. केवळ उत्सवी महत्व या युनिटला राहिलेलं असून ते बंद करण्यात यावं असही या अहवालात म्हटलं आहे.

निवृत्त सैन्यदल अधिकाऱ्यांचा निर्णयाला विरोध
आजवर देशाच्या सैन्यात असणाऱ्या विविध तुकड्या आणि त्यांच्याविशयी विशेष आत्मियता दिसून आली आहे. घोडदळाविषयीसुद्धा असंच चित्रं. अश्वदलाची परंपरा बंद करण्याच्या निर्णयाला लष्कराचे अनेक निवृत्त अधिकारी विरोध करतायत. ही गौरवशाली परंपरा बंद पडू नये अशी चिंता अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. कालबाह्य होतंय म्हणून जर हे बंद करत असाल तर ते टँक या घोड्यांऐवजी दिले जातायत तेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कालबाह्यच होतायत असं निवृत्त अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. उलट घोड्यावरुन गस्त घालणं हे टँकवरुन गस्तीपेक्षा अधिक स्वस्त आणि सुलभ असल्याचा दावा त्यांनी केला.

अश्वदलाचा खेळ आणि युद्धाच्या मैदानातील पराक्रम
61 घोडदळ युनिटचं मुख्यालय जयपूर इथे आहे. ऑक्टोबर 1953 मध्ये जयपूरमध्ये लष्करातल्या या घोडदळाची स्थापना झाली होती. जयपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी या अश्वदलाची युनिट आहेत. लष्कराच्या गौरवशाली परंपरेचं प्रतीक म्हणून तर या घोडदळाकडे पाहिलं जातंच, पण क्रीडा क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे. एक पद्मश्री, 10 अर्जुन पुरस्कार विजेते, 11 एशियन गेम्स मेडल या अश्वदलानं दिली आहेत. शिवाय पोलो वर्ल्डकपमध्येही अनेकदा भारतानं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक परेडमध्येही या अश्वदलाचा सहभाग असतो. ऑपरेशन पराक्रममध्ये राजस्थानाच्या वाळवंटात या युनिटनं यशस्वी कामगिरी केली आहे.

भारतीय लष्करातील अश्वदल इतिहास आणि आधुनिकता यांना जोडणारा दुवा असल्यानं त्याचं जतन आवश्यक असल्याचं तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापुरात कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

सोलापूर प्रतिनिधी ।  संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्गाने बेजार झाला आहे.या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत.सोलापुरातसुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कोरोनाने सोलापुरात आजपर्यंत २२ जणांचे बळी घेतले आहेत.असे असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरात “कोविड १९” चे केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासकीय रुग्णालयातील ” ए ” ब्लॉकमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी आणले जाते.रुग्णांचे स्वब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात .रिपोर्ट येईपर्यंत निगेटिव्ह आणि पॉझिटीव्ह येणारे दोघेही एकत्र असल्यासारखे असतात. त्यानंतर निगेटिव्ह रुग्णांना  अन्य आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या समवेत ठेवले जाते.त्याच दरम्यान एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह येतो.तत्पूर्वी दोन दिवस swab दिलेले रुग्ण अन्य जणांमध्ये मिसळलेले असतात आणि त्याची लागण इतरांना व रुग्णालयात सेवा देत असलेले डॉक्टर व नर्सेसला होऊन हकनाक कोरोनाचा फैलाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कालच दोन दिवसांपूर्वी swab दिलेल्या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.या कर्मचाऱ्याने या दरम्यान किती रुग्णांना सेवा दिली आहे.त्याच्यामुळे आणखी किती रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होईल याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच या सर्व प्रकाराकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी त्याची म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. परिणामी दररोज रुग्णांची संख्या वाढत जाऊन सामान्य माणसांचे बळी जात आहेत.  शिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याचे माहिती असूनही त्यांना अन्यत्र विलीनीकरण कक्षात न ठेवता कामावर ठेवले जात आहे.

रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर,नर्सेस व अन्य वैधकीय मंडळींना मास्क,ग्लोव्हज आणि पीपीई किट देण्यात आल्या आहेत.परंतु  त्या त्यांना देण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना दररोज हे  साहित्य देणे बंधनकारक असताना सरकारकडून आलेले हे साहित्य नेमके जाते कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.सरकार आरोग्याच्या साहित्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना स्थानिक पातळीवर मात्र साहित्य संबंधीतांपर्यंत न पोहोचता त्याचा तुटवडा असल्याचे भासविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार तर आणखी भयंकर आहे.

इतकेच नव्हे तर swab तपासण्यासाठी ज्या दोन मशीन देण्यात आलेल्या आहेत त्याद्वारे दररोज जास्तीत जास्त रिपोर्ट येणे गरजेचे असताना तसे होताना दिसून येत नाही.यावरूनच रुग्णालयातील प्रयोगशाळेत पूर्ण क्षमतेने तपासणी होत नसल्याचे दिसून येते.आणि दररोज कोरोना बधितांचा आकडा वाढल्याचे दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांची व त्यामुळे होणाऱ्या मृतांची वाढती संख्या लक्षात सोलापुरात “कोविड १९”साठी कायमस्वरूपी केंद्र होणे गरजेचे आहे.त्यामुळे कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्यास काही प्रमाणात यश येण्यास मदत होणार आहे.

दरम्यान सोलापुरात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना व कठीण काळात सोलापुरात राहणे गरजेचे असताना डॉ.वैशंपायन वैधकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर हे रजेवर गेले आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.सोलापुरात रुग्णांची संख्या वाढत असताना कोणीतरी आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून सोलापुरात राहणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या सावळागोंधळाची  चौकशी करण्याची मागणीही सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केली आहे.

औरंगाबादेत 100 टक्के लोकडाऊन; शहरात सर्वत्र शुकशुकाट

औरंगाबाद प्रतिनिधी । आज पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापणे बंद ठेऊन 100 टक्के लॉक डाऊन करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतल्यानंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला तर नेहमी गजबजलेले पेट्रोलपंप देखील ओस पडल्याचे चित्र आज सकाळ पासून पाहायला मिळाले.

औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नऊशेच्या जवळ पोहोचला आहे. तरी देखील नागरिकांना मध्ये गांभीर्य दिसत नाही.किरकोळ कारणासाठी रस्त्यावर,बाजारात तोबा गर्दी होत आहे.परिणामी संक्रमनाचं धोका अधिक झाला आहे. ही चेन तोडण्यासाठी व संक्रमण रोखण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आता 15, 16 व 17 में अशे तीन दिवस औषधी आणि अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.  दुसरीकडे पोलीस प्रशासनही कडक भूमिका घेणार असून आज शुक्रवार विषम तारीख आहे. त्यामुळे आज अत्यावश्यक सोडून सर्व बंद आहे.

नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा भाजीपाला इतर वस्तूंच्या खरेदीसाठी कोणीही रस्त्यावर येणार नाही जर का कोणी रस्त्यावर विनाकारण फिरत असतील तर त्याची गाडी जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत. जर का कुणी असा माणूस रस्त्यावर आला तर त्याची गाडी जप्त केली जाईल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सक्त आदेश दिले आल्याची माहिती सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.

काही भागावर विशेष लक्ष…
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शहरातील काही भागातील नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत सर्रास घोळक्याने फिरत आहे.अशा भागाची यादी तयार करण्यात आली आहे.त्या भागामध्ये अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे तर फिरते पथक देखील ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरातील पेट्रोलपंप पडले ओस….
शहरात मार्च महिन्यापासून लोकडाऊन करण्यात आले आहे तरी देखील पेट्रोलपंपवर गर्दी पाहायला मिळत होती.मात्र आज चित्र काही औरच होते. शहरातील अनेक पंप हे सकाळ पासून ओस पडले होते तर अनेक पंपा वर आज 10 वाजे पर्यंत बोहनी देखील झाली न्हवती असे पंप चालकांनी सांगितले.

सोलापूरात वाढले आणखीन ७ कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या ३३७ वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत नव्याने आलेल्या सात रुग्णांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या सात रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 337 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

20200518_110255.gif

आज सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण 74 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 67 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 3218 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 22 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 106 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 3555 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सर्व्हे मध्ये नागरिकांनी खरी माहिती द्यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाच्यावतीने संकलित केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना स्वतंत्र ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगल कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळं विद्या बालनचा ‘हा’ सिनेमा रिलीज होणार अमेझॉन प्राइमवर

मुंबई । लॉकडाउनमुळे जगभरातील सिनेमा थिएटर बंद आहेत आणि याचा मोठा फटका चित्रपट व्यवसायाला बसत आहे. याचमुळे अनेक हॉलिवूडपटांनी लॉकडाउन उघडण्याची जास्त वेळ वाट न पाहता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे प्रदर्शित करायला सुरुवात केली आहे. भारतात सुद्धा लॉकडाउनमुळे अनेक बॉलिवूडपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहेत. गुलाबो सिताबो सिनेमानंतर विद्या बालन स्टारर ‘शकुंतला देवी’ यांचा बायोपिक चित्रपटगृहात प्रदर्शित न होता अमेझॉन प्राइमवर होणार आहे.

अनु मेनन दिग्दर्शित या सिनेमात विद्या बालनने मानवी कॉम्प्युटर अशी ओळख असलेल्या गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. अगदी काही सेकंदाच्या आत शकुंतला देवी कठिणातलं कठीण गणिताचं उत्तर द्यायच्या. कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटरपेक्षा जलदगतीने त्यांचा मेंदू काम करायचा. या सिनेमात विद्या बालनसोबत सान्या मल्होत्राचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सान्या या सिनेमात शकुंतला देवी यांच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या दोघींसोबत अमित साध आणि जिस्शू सेनगुप्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

दरम्यान, हा सिनेमा लवकरच आता अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र किती तारखेला प्रदर्शित होईल याबद्दल अजून सांगण्यात आलेले नाही. अमेझॉन प्राइम व्हिडिओने यासंबंधी माहिती देताना म्हटलं की, शकुंतला देवी बायोपिकचा प्रीमिअर २०० देशांमध्ये आणि या क्षेत्रातील खास व्यक्तींसाठी वेगळ्या पद्धतीने केला जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”