Monday, December 22, 2025
Home Blog Page 5843

नवीन भानगड! आफ्रिकी स्वाइन फ्लूने आसाममध्ये २,५०० डुकरांचा मृत्यू

गुवाहाटी । संपूर्ण देशाला कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. देश ठप्प आहे. नागरिक भीतीच्या वातावरणात घरात कोंडून आहेत. लॉकडाउन आणि अर्थचक्रही मंदावलं हे सर्व एका विषाणूमुळे घडत आहे. दरम्यान आता एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. भारतात आता आफ्रिकी स्वाइन फ्लू दाखल झाला आहे. .या आजारामुळे आसाममधील ३०६ गावातील २ हजार ५००हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. तज्ञांच्या मते हा आजार मानवापर्यंतही पोहोचू शकतो. मात्र, तशी शक्यता नसल्याचे आसामचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय मंत्री अतुल बोरा यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी आसाम या राज्यात या आजाराची पहिली घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे या आजाराचा उद्रेक चीनमध्ये आधीपासूनच सुरू आहे. या आजारामुळे तेथील जवळपास ४० टक्के डुकरांचा मृत्यू झाला आहे. आसामचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय मंत्री अतुल बोरा यांनी या आजाराबाबत माहिती अधिक दिली. डुकरांमध्ये आढळलेला हा फ्लू अफ्रीकी स्वाइन फ्लू (एएसएफ) असल्याची पुष्टी भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने (एनआयएचएसएडी) केली आहे. देशातील या आजाराची ही पहिलीच घटना असल्याचे बोरा यांनी सांगितलं. तसेच या रोगाचा कोविड -१९शी काही संबंध नसल्याचेही बोरा यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या हा आजार मानवापर्यंत पोहोचेल असे वाटत नसल्याचेही बोरा यांनी म्हटलं. सध्या ज्या ठिकाणी या आजाराचं संक्रमण होत नाही अशा ठिकाणचे डुक्कर खाण्यात काही धोका नसल्याचे बोरा यांनी सांगितलं. केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतर त्वरित डुकरांना ठार मारण्याऐवजी या प्राणघातक संसर्गजन्य रोगाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्य सरकार इतर कोणताही मार्ग अवलंबणार आहे, असही बोरा यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराड मध्ये सापडला आणखी १ कोरोनाग्रस्त; २८३ जण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत कराड तालुक्यात एकूण ६० कोरोनाबाधित सापडले आहेत. 

आता सातारा जिल्ह्यात 69 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 80 बाधित रुग्ण आढळले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 4, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 21, कोरेगाव 3 असे एकूण 58 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 66, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 75 व बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतर नमुने 10 असे एकूण 85, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 90, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 26 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव 26 असे एकूण 293 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली । देशात करोना फैलाव अद्यापही थांबलेला नाही. देश लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. अशा चिंताजनक वातावरणात एक एक दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आतापर्यंत ११ हजार ७०६ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत १०७४ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जवळपास २७.५ टक्के लोकांनी करोनावर मात केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान, देशात २ हजार ५५३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४२,५३३ वर पोहचली आहे. ”कोरोना हा महामारीचा आजार ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात काही व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात वावरताना सोशल डिस्टसिंगचं भान ठेवलं गेलं नाही, तर करोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा प्रचंड वाढण्याचा धोका आहे,” अशी भीतीही अग्रवाल यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक भागांत नागरिकांना काही सूट देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा तसंच गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, असंही आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना आवाहन केलं. राज्यांदरम्यान कार्गो सेवेदरम्यान अडथळा येऊ ने यासाठी गृह मंत्रालयाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय. गृह मंत्रालयाचा कंट्रोल रुम नंबर १९३० आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हेल्पलाईन क्रमांक १०३३ याचा वापर करून चालक आणि ट्रान्सपोर्टर्स लॉकडाऊन संबंधित आपल्या तक्रारींवर समाधान मिळवू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

भाजपाने आपल्या कोट्यातील एक जागा आरपीआयला द्यावी – रामदास आठवले

मुंबई ।  येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या ४ जागांपैकी एक जागा भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला द्यावी अशी मागणी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविले आहे. रामदास आठवले यांनी विधान परिषदेची एक जागा जागा मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरु केली असून आगामी निवडणुकीत एक जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी ते आग्रही आहेत.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या निवडणूकीला परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शिवसेनेकडून दोन नाव निश्चित करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यसभा नाही दिली किमान विधानपरिषदेची तर जागा द्या!- एकनाथ खडसे

जळगाव । येत्या 21 मे रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मुंबईत निवडणूक होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं उमेद्वारीपासून डावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेच्या जागेची उमेदवारी देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी शिफारस होऊनही निवड झाली नाही, पण आता विधानपरिषदेसाठी तरी माझा विचार करावा, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना भाजपने तिकीट नाकारल होत. परंतु, एकनाथ खडसे यांची नाराजी पाहता त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे याना भाजपने तिकीट दिलं, पण रोहिणी खडसेंचा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी आला. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी प्रकट करत त्यांनी राज्यातल्या भाजप नेतृत्वावर उघड टीकाही केली. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वाचीही भेट घेतली.

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. ९ पेक्षा जास्त उमेदवारांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केले, तर निवडणूक होणार हे अटळ आहे. ११ मे रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १४ मे रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अपक्षांसह भाजपकडे असलेलं संख्याबळ लक्षात घेता भाजपचे ४ उमेदवार सहज विजयी होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील सुत्रानुसार उमेदवाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपच्या १०५ आमदारांबरोबर १४ अपक्ष बरोबर असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आज शिवसेनेने विधानपरिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव जाहीर केलं आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या बाबरमाची आणि चरेगाव येथील दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

बाबरमाची येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात 17 एप्रिल रोजी चरेगाव येथील एका 30 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला पुढील उपचारासाठी 25 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.

या दोघांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे दोन्हीही रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी या कोरोनामुक्त तरुणांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना हॉस्पिटलमधून निरोप दिला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/638091143586011/

UPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आली आहे. ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केला. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणं शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.

यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चं आयोजन आता ३१ मे रोजी होणार नाही. २० मे रोजी देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यथावकाश पुढील तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवी तारीख जाहीर करताना उमेदवारांना किमान ३० दिवस अगोदर कळवण्यात येईल. त्यानुसार परीक्षेची नवी तारीख वेसबाइटवर जाहीर करण्यात येईल असं परिपत्रकात म्हटलं आहे.

उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवावी. लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे. यूपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षेसाठी गेली ६ वर्षे विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घ्यावा, उजळणी करावी, असंही आयोगाने सांगितलं आहे. यापूर्वी नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या काही मुलाखतींसह चार विविध परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. यात आर्थिक सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एनडीए आणि संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा या २०२० च्या परीक्षांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मोदीजी, देशातील १% अतिश्रीमंत लोकांकडून २% कर घेऊन देश वाचवायची ‘हीच ती वेळ’ !!

थर्ड अँगल | कोरोना महामारीचा व त्याच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता याव्यात म्हणून देशातील सर्वात श्रीमंत १% लोकांंकडून २% आपत्कालीन कोरोना कर वसूल करणे यासाठी विचारवंत मंडळींकडून एक आवाहन पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार करण्यात आलं आहे.

संपूर्ण देश गेला महिनाभर कोरोनाशी लढत आहे. मोदींनी २४ मार्चला देशात २१ दिवसांची टाळेबंदी (लॉकडाऊन)ची घोषणा केली. पण टाळेबंदी हा इलाज नाहीये. ती साथ पसरू नये यासाठीची पहिली पायरी आहे. या कालावधीत संक्रमित लोकांना शोधून काढणे, ते आणखी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले त्यांच्या चाचण्या घेणे वगैरे गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. सर्व कोरोनाव्हायरस संक्रमितांना ओळखण्यासाठी, लक्षणे असोत वा नसोत, चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवून त्यानंतर त्यांचे विलगीकरण करणे आणि त्यांची प्रकृती खालावल्यास त्यांच्यावर उपचारांची व्यवस्था करणे हाच व्हायरस नियंत्रित आणि पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे.

२६ एप्रिलपर्यंत भारतात १ लाख लोकांच्या मागे ४८.२ चाचण्या होत होत्या. ह्या चाचण्या खूपच कमी आहेत. १७३ देशांत याबाबतीत भारत १४२ व्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्या १३७ कोटी आहे. एका बाजूला चाचण्याही कमी होताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला टाळेबंदीचा फटका देशातील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना बसला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या या आर्थिक संकटात रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि कामगार अडचणीत आले आहेत. टाळेबंदीमुळे करोडो लोकांचे रोजगार अचानकपणे गेले आहेत, ते सध्या उपासमारीच्या मार्गावर आहेत. यातील बहुसंख्य लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, जे देशातील एकूण कार्यशक्तीच्या ९३% आहेत.

२६ मार्चला केंद्र सरकारने टाळेबंदीमुळे आर्थिक व्यवस्था बिघडू नये म्हणून, गरीबांच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. पण सरकारने घोषित केलेली ही आर्थिक मदत अतिशय कमी व अपुरी आहे. असेही देशामधील आरोग्यसुविधा जराजर्जर अवस्थेत आहे. देशातील आरोग्यसुविधांवर GDP च्या १.५% सरकार खर्च करते, इतर गरीब देशांचे हे प्रमाण ३ ते ५% आहे तर विकसित देशांमध्ये ते ७% पर्यंत आहे. निदान आत्ता करोना महामारीच्या काळामध्ये सरकारने GDP च्या किमान ३% आरोग्यसुविधांवर खर्च करावेत ही मागणी आम्ही करत आहोत. त्यासाठी अतिरिक्त ३.४ लाख कोटी रुपयांची गरज आहे.

टाळेबंदी हळूहळू उठवली गेली तरीही लोकांना कित्येक महिने आर्थिक संकट, अन्न असुरक्षितता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बेरोजगारी ह्याला तोंड द्यावे लागणार आहे. देशातील सर्व गरजू कुटुंबांना सरकारने रेशनकार्ड/आधारकार्ड आहे की नाही हे न पाहता किमान आवश्यक रेशन आणि इतर इतर गरजेच्या वस्तू आणि प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ४००० रुपये आर्थिक सहाय्य देण्याची गरज आहे. जर हा आधार किमान दोन महिने दिला गेला तर यासाठी सरकारला सुमारे २.४ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. हे सर्वांसाठी प्रस्तावित मदत पॅकेजमध्ये लक्षणीय वाढ करण्याची आवश्यकता आहे

पंतप्रधानांनी १४ एप्रिलला केलेल्या भाषणात देशातील सर्व लोकांना आवाहन केले की देशात पसरलेल्या कोरोनाव्हायरस महामारीचा पराभव करण्यासाठी ‘संयम, तपश्चर्या आणि त्याग’ करावा लागेल. कदाचित या भावनिक आवाहनानुसार, वित्त मंत्रालयाने, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांची महागाई मदत १८ महिन्यांसाठी गोठवण्याचा तसेच एक वर्षासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला एक दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या आवाहनामध्ये देशातील अति-श्रीमंत लोकही आहेत असा आमचा विश्वास आहे.

अति-श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोना कर लावून आपले सरकार आवश्यक निधी सहज गोळा करू शकते. याची घटनात्मक तरतूदही अस्तित्वात आहेच.

उपाय काय आहे?

२% संपत्ती कर लावण्याचा हा प्रस्ताव राज्यघटनेच्या निर्देशांनुसार आहे [कलम ३८(२) सांगते – “उत्पन्नातील असमानता कमी करा”; आणि कलम ३९ (c) सांगते – “संपत्तीचे एकीकरण होईल अशा पद्धतीने आर्थिक व्यवस्था चालवू नये..” ]

देशातील सर्वात श्रीमंत १% लोकांकडे २०१९ साली ३८१ लाख कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यांच्या संपत्तीमध्ये २५% विकास दर गृहीत धरला, तर २०२० मध्ये त्यांची संपत्ती ४७६ लाख कोटी रुपये झाली असेल. अति श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन उपाय म्हणून नाममात्र २% जरी संपत्ती कर लावला तरी सरकारला त्यातून ९.५ लाख कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल – आणि वर सूचित केलेल्या सर्व उपायांसाठी पुरेसे पैसे उपलब्ध होतील.

विचारवंत आणि कार्यकर्त्यांचं आवाहन

• डॉ. जी. जी. पारिख, मुंबई ,
• न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटिल, पुणे
• मेधा पाटकर, बडवानी, मध्य-प्रदेश
• जिज्ञेश मेवाणी, अहमदाबाद
• अरुणा रॉय, जि. राजसमंद, राजस्थान
• प्रा. अनील सद्गोपाल, भोपाळ
• डुनु रॉय, दिल्ली
• नीरज जैन, पुणे
• प्रा. सुभाष वारे, पुणे
यांच्यासह देशातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी व वैज्ञानिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही याचिका १ मे कामगार दिनाच्या दिवशी लोकांच्या स्वाक्षर्‍यांसाठी सोशल मीडियावर जाहीर केली.

आपल्यालाही ही मागणी योग्य वाटत असेल तर खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून याला आपण पाठिंबा देऊ शकता. या पाठिंब्याची कुणालाही सक्ती नाही. आपल्या मनाला आणि बुद्धीला स्मरून हा निर्णय घ्यावा हीच अपेक्षा आहे.

– याचिकेवर सही करा – bit.ly/CoronaWealthTax


– मराठीमध्ये याचिका डाउनलोड करा – bit.ly/coronatax-in-marathi

इंग्रजीमध्ये याचिका डाउनलोड करा – bit.ly/coronatax-in-english

CoronaWealthTaxLaga

संबंधित मोहिमेच्या पेजला like करण्यासाठी – https://www.facebook.com/CoronaWealthTaxIndia/

पुण्यात आज पोलिसासह ५ जणांचा कोरोनामुळं बळी

पुणे । पुण्यात आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात करोना आजारावर उपचार घेत असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे. तर गेल्या काही तासांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १०८ झाली आहे. दरम्यान, पुणे मनपा क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १२४३ वर गेली आहे.

मृतक पोलीस कर्मचाऱ्याला होता रक्तदाब, लठ्ठपणाचा त्रास

५८ वर्षीय सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. २४ एप्रिल रोजी भारती रुग्णालय धनकवडी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना रक्तदाब आणि लठ्ठपणाचा त्रासही होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

औरंगाबादमध्ये एकही दारूचं दुकान उघडू देणार नाही- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । ”जर औरंगाबादमधील दारूची दुकानं खुली झाली तर, आम्ही ती दुकानं बंद पाडण्यास भाग पाडू” असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारनं रेड झोनमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून दारूची दुकान सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं तळीरामांकडून स्वागत होत असलं तरी, काही ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबादमधील खासदार इम्तियाज जलील यांनीही मद्यविक्रीची दुकानं खुली करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

जर औरंगाबादमधील दारूची दुकानं खुली झाली तर, आम्ही ती दुकानं बंद पाडण्यास भाग पाडू. सर्व महिला वर्गाला घेऊन रस्त्यावर उतरू असा कडक इशारा देत दारुची दुकानं खुली करण्याची ही योग्य वेळ नाही, असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. दारू विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर खासदार जलील यांनी ट्विटरवर टीका केली आहे. या संकटकाळात या सरकारला मद्यविक्रीची काय घाई झाली आहे, असा सवाल त्यांनी केला. सरकारनं सर्व गोष्टी विकण्याची परवानगी का दिली नाही. केवळ मद्यविक्रीस परवानगी का दिली? अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”