Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 641

Benefits Of Eating Litchi : सारखं दमल्यासारखं वाटतं? ‘हे’ फळ खाल्ल्याने वाढेल फुल्ल एनर्जी

Benefits Of Eating Litchi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Litchi) रोजची दगदग, धावपळ आणि बिघडत चाललेली जीवनशैली आपल्या शरीराला आतून पोखरतेय. अशा दैनंदिन जीवनशैलीमुळे बऱ्याचवेळा अशक्तपणा जाणवतो. सध्या आणि सोप्या गोष्टी करण्याचा देखील कंटाळा येतो. लहान मुलांनादेखील त्यांच्या खेळायच्या वयात म्हतारपणात येतो तास अशक्तपणा येतो. तर मोठ्यांना शारीरिक ऊर्जेची कमी जाणवते. परिणामी, कामात मन लागत नाही. एखादी जड वस्तू उचलायची म्हटलं की, जीवावर येत. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर लिची हे फळ खा. या फळातून आपल्या शरीराला कमी वेळात अधिक ऊर्जा मिळते.

लिची हे आकाराने लहान असणारे फळ शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी आहे. (Benefits Of Eating Litchi) या छोट्याशा फळात व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी6, फोलेट, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मँगनीज हे शरीराला आवश्यक असणारे घटक आढळतात. त्यामुळे लिचीची सेवन केल्याने आपले शरीर पोलादी होण्यास मदत होते. चला तर लिची खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

रोग प्रतिकारशक्ती वाढते (Benefits Of Eating Litchi)

लिची हे फळ आपल्या शरीराचे डिहायड्रेशनपासून बचाव करते. तसेच संसर्गांपासून रक्षण करणारे अनेक घटक या फळात आढळतात. अशाप्रकारे लिची खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि मजबूत होते. लिचीतील व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, नियासिन, बीटा कॅरोटीन आणि फोलेट हे घटक आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शारीरिक ऊर्जा प्रदान करतात.

हृदयाची काळजी

लिची हे फळ खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. (Benefits Of Eating Litchi) लिचीमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे लिची खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. लिचीमधील अँटी- ऑक्सिडंट हृदयाशी संबंधित आजार दूर करून आपल्या हृदयाची काळजी घेते.

शारीरिक ऊर्जा

लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. शिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण राखले जाते. तसेच लिचीचे सेवन केल्यानंतर कॅलरीजचे ऊर्जेत रूपांतर होते आणि यामुळे शरीरात उर्जेचा प्रवाह वाढतो. (Benefits Of Eating Litchi) परिणामी आपल्याला एनर्जेटिक वाटते आणि मूड चांगला राहण्यासाठी मदत होते.

वजन कमी होते

लिची हे फळ खाल्ल्याने वजनदेखील कमी होते. (Benefits Of Eating Litchi) लिचीमध्ये ऑलिगोनॉल असते. जे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.

Rain Bath : पावसात भिजल्याने सुधारते मानसिक आरोग्य; इतर फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Rain Bath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rain Bath) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पावसाच्या सरी बरसू लागल्या की, मनाला होणारा आनंद काही औरच असतो. त्यामुळे बरेच लोक पावसात ओलेचिंब होईपर्यंत भिजतात. पावसाचे थेंब अंगावर झेलत मनसोक्त भिजायचा आनंद एक अनोखे सुख आहे. लहानपणी पावसात भिजल्यामुळे आजारी पडायला होईल, म्हणून कितीतरी वेळा आईने तुम्हाला अडवले असेल. मात्र, हाच पाऊस आज आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तज्ञ सांगतात की, पावसात भिजल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्याच फायदयांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

हार्मोन्सचे संतुलन (Rain Bath)

आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, पावसात भिजल्यामुळे हार्मोन्सचे योग्य संतुलन तयार होते. पावसाच्या नैसर्गिक थेंबांमूळे आपल्या शरीरातील एंडॉर्फिन आणि सेरोटोनिनसारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. परिणामी आपले हार्मोन्स संतुलित आणि मूड फ्रेश होतो. त्यात आपण जर जोडीदारासह पावसाचा आनंद लुटला तर नातेसबंध सुधारण्यास मदत होते.

ताण – तणाव दूर होतो

पावसात भिजल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन निर्माण होऊन हॅप्पी हार्मोन्स सक्रिय होतात. (Rain Bath) परिणामी आपल्या मनावर आणि मेंदूवरील ताण हलका होतो. ज्यामुळे आपले मानसिक स्वास्थ सुधारते.

त्वचाविकार जातील पळून

असं म्हणतात पावसात भिजल्यामुळे आजारपण येते. (Rain Bath) पण याच पावसात भिजल्याने शरीर नैसर्गिकरीत्या शुद्ध होते. पावसाचे पाणी थेट आभाळातून कोसळते जे नैसर्गिकरित्या शुद्ध मानले जाते. अशा पाण्याचा शरीरावर मारा झाल्याने त्वचा विकार दूर होण्यास साहाय्य मिळते.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल दूर

पावसाच्या नैसर्गिक थेंबांमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 तयार होण्यास मदत होते. (Rain Bath) जोरदार पावसात साधारण १० ते १५ मिनिटे चिंब भिजल्यास शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर होऊ शकते.

Hina Khan : हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर!! उपचार सुरु; कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

Hina Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hina Khan) हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री हिना खानच्या प्रकृती संदर्भात अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. कायम ग्लॅमरसाठी चर्चेत असणारी हिना कॅन्सरसारख्या गंभीर आजराशी दोन हात करतेय आणि यावरील उपचारांसाठी ती रुग्णालयात दाखल झाल्याचे समजत आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री हिना खानने आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. पाहूया तिने या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

हिना खानची पोस्ट (Hina Khan)

अभिनेत्री हिना खानने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मला एक महत्त्वाची बातमी शेअर करायची आहे. माझी ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजशी झुंज सुरु असून उपचार सुरु आहेत. या आजारावर मात करण्यासाठी मी खूप मजबूत आहे. सध्या उपचार सुरू झाले असून मी या आजारातून बरी होण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्यास सज्ज आहे. या कठीण काळात मी तुम्हा सर्वांकडे गोपनीयतेची विनंती करते’.

पुढे लिहलंय, ‘मला विश्वास आहे की, मी लवकरच पूर्णपणे बरी होईल. माझ्या चाहत्यांच्या प्रेमासाठी मी कायम त्यांची ऋणी आहे. या काळात त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनेत लक्षात ठेवावे आणि मला खूप आशीर्वाद पाठवावे बस इतकीच विनंती आहे’. हिना खानच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांची तिच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना केल्या आहेत. (Hina Khan) दरम्यान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असताना हिना शारीरिकरित्या कमजोर होत असली तरीही मानसिकरित्या ती सक्षम आहे. त्यामुळे या आजारातून ती लवकरच बरी होईल आणि परतेल अशी आशा आहे.

ब्रेस्ट कॅन्सरविषयी अधिक जाणून घ्या

स्तनांमध्ये कॅन्सरची गाठ तयार झाल्यास त्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे म्हटले जाते. ही गाठ ज्या ठिकाणी आहे तिथे वेदना होत नसेल तर ब्रेस्ट कॅन्सर असण्याची शक्यता असते. वयाच्या २०व्या वर्षापासून दर महिन्याला स्वतःची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण, ब्रेस्ट कॅन्सर जितक्या लवकर समजतो तितक्या लवकर यावर उपचार करून बरे होता येते. अगदी पहिल्या टप्प्यातच समजून आल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. (Hina Khan) शिवाय आवश्यक ती सर्जरी लवकर झाली तर स्तन काढावे लागत नाही. लहान गाठ काढून टाकली जाते. स्तनाग्रातून कोणत्याही प्रकारचे रक्तरंजित स्त्राव होणे, स्तनाचा आकार बदलणे, स्तन एकमेकांपासून वेगवेगळ्या दिशेने फिरू लागणे, स्तनाग्र आतल्या बाजूने बुडू लागणे, त्वचा ताणून लाल होणे ही या रोगाची महत्वाची लक्षणे आहेत.

विधानसभेत विठुरायाचा जयघोष!! राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या घोषणा

Warkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024-25) सादर केला आहे. या अर्थसंकल्पाची सुरुवातच त्यांनी आज तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली. यानंतर अजित पवारांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत? याविषयी जाणून घ्या.

वारकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा

1) आजच्या अधिवेशनात अजित पवार यांनी घोषणा केली आहे की, वारीसाठी येणाऱ्या प्रति दिंडीला २० हजार निधी दिला जाईल.

2) यासह निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी देण्यात येईल.

3) आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गावरील वारकऱ्यांना मोफत तपासणी आणि औषधोपचार देण्यात येईल.

4) पढंरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने महिलांसह शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, आषाढी वारीच्या काळातच सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यामुळे या अर्थसंकल्पात वारकऱ्यांना देखील स्थान देण्यात आले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने वारकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Mumbai News : मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका ! जुलै मध्ये धावणार पहिली अंडरग्राउंड मेट्रो

Mumbai News : मागच्या काही वर्षात मुबंईच्या विकासात भर घालणारे अनेक मोठे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यातील काही प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत तर काही प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अटल सेतू , कोस्टल रोड , मुंबई मेट्रो , बुलेटट्रेन प्रोजेक्ट अशी उदाहरणे सांगता येतील. आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

कुलाबा ते सिप्झमार्गावरील मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेज मधल्या सिप्झ आणि वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यानचा मार्ग हा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तर दुसरी आणि एक विशेष बाब जुलै महिन्यापासून मुंबईतल्या (Mumbai News) पहिल्या वाहिल्या मेट्रोची अंडरग्राउंड सेवा सुरू केली जाईल अशी माहितीही समोर आली आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे निगमला 1163 कोटी (Mumbai News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए ऐवजी थेट मुंबई मेट्रो रेल्वे (Mumbai News) निगमला 1163 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सदर प्रकल्पाचे काम हे 98% पूर्ण झाला आहे यासाठी एकूण 37 हजार 725 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य विकास महामंडळाकडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळांने मंजुरी देण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला होता. मंत्रिमंडळाने कर्जासाठी एमएसआरडीसी ला सरकारी गॅरेंटी देण्याचाही निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1130 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यापैकी 21५. 80 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार सरकारने जमीन ताब्यात घेण्याआधीच 2341 कोटी 71 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

जुलैपासून पहिली अंडरग्राउंड मेट्रो धावणार (Mumbai News)

मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मुंबईमधील अंडरग्राउंड पहिल्या मेट्रोची यशस्वीपणे ट्रायल रन घेतली असून कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जुलै महिन्यापासून सेवा सुरू होणार आहे. मुंबईतील या पहिल्या अंडरग्राउंड मेट्रो प्रोजेक्टमध्ये 33.5 किलोमीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. हा मार्ग आरे कॉलनीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 69 स्टेशन्स असणार आहेत यापैकी 26 स्टेशन जमिनीखाली असणार आहेत. 2017 मध्ये मेट्रोच्या या भुयारी मार्गाचे काम सुरू झालं मात्र कोरोनामुळे या कामाला फटका बसला. एकूण 56 किलोमीटरच्या मार्गावर खोदकाम करून मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. या मार्गावरील पहिला टप्पा हा आरे कॉलनी ते बीकेसी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स यादरम्यानचा (Mumbai News) आहे. हाच पहिला टप्पा आता जुलैमध्ये सुरू होणार आहे.

पुण्यासाठी मोठा निर्णय (Mumbai News)

मंत्रिमंडळांना पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पासाठी हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कडून 5500 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठीचा एमएसआरडीसी चा प्रस्ताव मान्य केला आहे. एकूण 972 कोटी सात हेक्टर जमिनीपैकी 535.41 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. सरकारने जमीन अधिग्रहणासाठी 1876 कोटी 29 लाख रुपये उपलब्ध (Mumbai News) करून दिले आहे.

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जाणार तर..!! राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा

Farmers News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी (Mansoon Session) अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. आज म्हणजेच 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024-25) सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया.

  • कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप 2023-24 2 हेक्टर मर्यादेत 5 हजार रुपये दिले जाणार.
  • गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून प्रतिलिटर 5 रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येईल.
  • शेतमालाच्या पंचनामासाठी राज्यभरात ही पंचनामा पद्धत राबवली जाणार.
  • शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय.
  • राज्यातील 8 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप दिले जाणार.
  • जलयुक्त शिवारासाठी 650 कोटींची तरतूद केली जाईल.
  • शेतकऱ्यांना बांबूंची रोपे मोफत दिली जाणार.
  • राज्यात गाव तिथे गोदाम ही योजना राबवली जाणार.
  • सरकारकडून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.
  • शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची योजना सुरू राहील.
  • राज्यातील 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता.

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर!! सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मोठया घोषणा

Interim Budget

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज म्हणजेच शुक्रवारी शिंदे सरकारने राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाला विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडले. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेमध्ये महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये, बेरोजगारांना दरमहा 5 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 33 कोटी रुपयांचा प्रस्ताव अजित पवारांकडून मांडण्यात आला आहे.

  • आजच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आले आहे. तसेच योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षाच्या महिलांना दरमहा १५०० दिले जाणार आहेत. याकरिता ४६००० कोटी रुपये खर्च येईल. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
  • राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. यासह विवाहित महिलांसाठी शुभमंगल योजनेचा निधी वाढवण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले आहेत. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
  • राज्यातील महिलांना 10 हजार पिंक रिक्षा देण्यात येणार, अशी घोषणा देखील सरकारने केली आहे.
  • व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना फ्री मध्ये शंभर टक्के सूट देणार अशी ही घोषणा सरकारने केली आहे.
  • प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार..

Panchgani Hill Station : पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी घ्या गुलाबी सरींचा आनंद; जोडीदारासोबत अनुभवा स्वर्गसुख

Panchgani Hill Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panchgani Hill Station) ‘या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती…’ कवीने या ओळींमध्ये पावसाळ्यात मनाची जी अवस्था होते ती अगदी तंतोतंत मांडली आहे. रिमझिम पावसाच्या सरी, वाफाळलेला चहा आणि भजीसोबत जोडीदाराची साथ असेल तर जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते. पाऊस पडू लागला की, आपोआप ओठांवर गाण्यांचे बोल रेंगाळू लागतात. अशा सुंदर वातावरणात आपल्या जोडीदाराला घेऊन कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जावे कुणाला वाट नाही?

तुम्हालाही वाटतंय ना? तर या पावसाळ्यात तुमच्या जोडीदाराला घेऊन ‘पाचगणी’ (Panchgani Hill Station) फिरायला जा. गुलाबी सरी, धुक्याची थंड चादर आणि हिरवाईने नटलेला परिसर आपल्या जोडीदारासोबत आणखी सुंदर वाटेल. स्वर्गसुखाचा अनुभव घेत अनेक यादगार क्षण तयार करायचे असतील ‘पाचगणी’ला जरूर भेट द्या. आता पाचगणीला कसे जाल? कुठे फिरालं? कुठे रहाल? असे प्रश्न पडले असतील, तर चिंता सोडा आणि ही बातमी स्किप न करता वाचा.

गुलाबी पाचगणी (Panchgani Hill Station)

पावसाळ्यात आपल्या जोडीदारासोबत फिरायला जायचं असेल तर महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणता येईल अशा पाचगणीला भेट देणे फारच आनंददायी ठरेल. पावसामुळे हे ठिकाण अत्यंत सुंदर आणि मनाला हर्ष देणारे झाले आहे. महाबळेश्वरपासून अवघ्या काही अंतरावर असलेले ‘पाचगणी’ पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण असून पावसाळ्यात हे ठिकाण पहायला देशभरातून लोक येत असतात. पाचगणीचा प्रवास फार सोपा आहे. तुम्ही तुमची रस्ता, रेल्वे किंवा विमानाने प्रवास करू शकता. कसा ते जाणून घेऊ.

रस्त्याने प्रवास

जर तुम्ही मुंबईवरून पाचगणीला जात असाल तर तुम्हाला सुमारे २४४ किलोमीटर इतके अंतर कापायचे आहे. (Panchgani Hill Station) ज्याला साधारण ५ तास लागतात. याकरता, सायन – पनवेल द्रुतगती मार्ग, मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग आणि नंतर NH4 हायवेचा वापर करावा लागेल. पुढे वाई – सुरूर रोड, वाई – पाचगणी – महाबळेश्वर रोड आणि वाई – पाचगणी रोडने तुम्हाला भीम नगर, पाचगणीकडे जाता येईल.

रेल्वेने प्रवास

मुंबईहून पाचगणीला जाण्यासाठी थेट ट्रेन नसली तरी तुम्ही खेड, चिपळूण किंवा साताऱ्यावरून जाऊ शकता. या रेल्वे स्थानकांना उतरून पुढे बस किंवा प्रायव्हेट टॅक्सीने पाचगणीला जाता येते. रेल्वेनंतर पुढे उर्वरित अंतर सुमारे ३० ते ४० किलोमीटर इतके आहे. (Panchgani Hill Station) महाबळेश्वर – पाचगणीला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक साताऱ्यातील वाठार आहे. तसेच मुंबई ते सातारा रेल्वे प्रवास करून पुढे बसने जाणे देखील सोपे आहे. मात्र, प्रवासी ट्रेनला ७ तासांपेक्षा जास्त प्रवास करून पुढे बसने १ तासभर महाबळेश्वरसाठी प्रवास करावा लागतो. तिथून पुढे १९.२ किमी अंतरावर पाचगणी आहे. जिथे प्रायव्हेट रिक्षा तुम्हाला सोडतील.

विमानाने प्रवास

जर तुम्ही विमानाने पाचगणीला जाण्याचा विचार करताय तर महाबळेश्वरला सगळ्यात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जे महाबळेश्वरपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. (Panchgani Hill Station) मात्र, मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे १५० किमी आहे. त्यामुळे, जर तुम्ही मुंबईहून पाचगणीला जाताय तर दुसरा पर्यायी मार्ग अवलंबणे फायदेशीर ठरेल.

पाचगणीत काय पहाल?

पाचगणी हे अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. टेबल लँड, सिडनी पॉइंट, कास पठार यांच्याशिवाय देवराई पॉइंट, पारसी पॉइंट आणि भिलार धबधबा अद्भुत अनुभव देणारी ठिकाणे पहा. (Panchgani Hill Station) पारसी पॉइंट आणि भिलार धबधब्याजवळचा परिसर तुम्हाला फारच रोमांचकारी अनुभव देऊ शकतो. पावसाळ्यात ही ठिकाणे अनेकदा ढगांनी वेढलेली दिसतात.

कुठे रहाल?

पाचगणी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची पूर्ण सोय आहे. आवश्यक सोयीसुविधांसह अत्यंत माफक दरात इथे राहण्याची सोय होते. (Panchgani Hill Station) इथे तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थ, चायनीज फूड, मेक्सिकन आणि कोरियन खाद्यपदार्थांचादेखील आस्वाद घेऊ शकता.

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज ! गणेशोत्सवात स्वारगेटपर्यंत धावणार मेट्रो

Pune Metro Swargate

Pune Metro : पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. आता लवकरच पुणेकरांना स्वारगेट पर्यंतचा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. यापूर्वी रुबी हॉल क्लीनिक ते रामवाडी हा मार्ग सुरु करण्यात आला होता. त्याला देखील पुणेकरांचा (Pune Metro) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या आधी सेवा सुरु होण्याची शक्यता

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या गणेशोत्सवाच्या आधीच ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठीचे नियोजन महामेट्रो कडून करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम 95% पर्यंत पूर्ण झालं असून जुलै अखेरीस हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी म्हणजेच गणेशोत्सवाच्या आधी हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. जी बाब पुणेकरांसाठी (Pune Metro) अत्यंत दिलासादायक आहे.

मार्गावर ‘या’ स्थानकांचा समावेश (Pune Metro)

यामध्ये तीन स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असतील. हा मार्ग 3.64 किलोमीटरचा आहे . या भुयारी मार्गाची चाचणी ही फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली असून यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग हा मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्रा खालून मेट्रो धावणार आहे. या मार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित काम जुलै अखेरीस पूर्ण करण्याचा महामेट्रोचे नियोजन असल्याची (Pune Metro) माहिती आहे.

उर्वरित कामे पूर्ण झाली तर त्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना तपासणीसाठी बोलवण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गाची तपासणी करून त्याला अंतिम मंजुरी देतील आणि मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो कडून राज्य सरकारकडे या मार्गावर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात या मार्गावर सेवा सुरू (Pune Metro) होण्याची शक्यता आहे.

याबाबत एका माध्यमाला माहिती देताना महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट (Pune Metro) मेट्रो मार्गाचे काम 95% पूर्ण झाले हे काम जुलै च्या अखेर पर्यंत पूर्ण होईल या मार्गावरील सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

Wallace Line : समुद्राला दोन भागात विभागणारी अदृश्य सीमारेषा; मासेसुद्धा करत नाहीत ओलांडण्याची हिंमत

Wallace Line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wallace Line) हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ रामायण अत्यंत पूजनीय आहे. रामायण न केवळ ग्रंथातून तर नाटक, टीव्ही मालिका आणि अगदी चित्रपटांच्या माध्यमातून कायम पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. या रामायणात लक्ष्मणरेखेचा उल्लेख आहे, ज्याविषयी आपण सगळेच जाणतो. जेव्हा प्रभू श्री राम पत्नी सीता आणि बंधू लक्षणासह वनवासाला गेले होते तेव्हा माता सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने ही लक्ष्मणरेखा आखली होती. मात्र, रावणाच्या मायाजाळात अडकून भावनेच्या भरात माता सीतेने ही लक्ष्मणरेखा ओलांडली आणि त्यापुढे जे घडलं ते रामायण होत.

अशीच पृथ्वीतलावर देखील एक अदृश्य सीमा आहे. जी डोळ्यांना दिसत नसली तरीही तिच्या अस्तित्वामुळे समुद्राचे दोन भाग झाले आहेत. (Wallace Line) या सीमेचे वैशिट्य म्हणजे, समुद्राचे विभाजन झाल्यानंतर या भागातील मासे वा कोणतेही समुद्री जीव दुसऱ्या भागात जाण्याची हिंमत करत नाहीत. होय. हे अत्यंत चमत्कारिक असून ही सीमारेषा न केवळ समुद्र तर एक अख्खा देशसुद्धा दोन भागात विभागते. चला तर जाणून घेऊया ही अभ्येद्य अदृश्य रेषा आहे तरी कुठे?

कुठे आहे?

आपण ज्या चमत्कारिक सीमारेषेविषयी बोलत आहोत ती इंडोनेशियाच्या दोन बेटांमध्ये बनलेली आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या या सीमारेषेचे नाव ‘वालेस लाइन’ (Wallace Line) असे असून इंडोनेशिया बाली आणि लोम्बोकमध्ये ही रेषा बनलेली आहे. सुमारे ३५ किलोमीटर लांब ही रेषा समुद्राचे आणि त्यासोबत इंडोनेशियाच्या दोन भागात विभाजन करते. ही सीमारेषा अदृश्य असल्यामुळे दिसत नाही. मात्र, तिचे अस्तित्व जाणवते. या रेषेमुळे समुद्राचे दोन भाग झाले आहेत आणि या दोन्ही भागांमध्ये विविध प्रजातीचे मासे, प्राणी तसेच पक्षी विहार करतात. जे एकमेकांची सीमारेषा ओलांडत नाहीत.

‘वालेस लाइन’ एक अदृष्य सीमारेषा (Wallace Line)

इंडोनेशियाला दोन भागांमध्ये विभागणारी वालेस लाइन ही एक अदृश्य सीमारेषा आहे. जिच्यामुळे मलय द्वीपसमूह आणि इंडो- ऑस्ट्रेलियाई द्वीपसमूह असे पृथ्वीवरील सर्वात मोठे द्वीपसमूह तयार झाले आहे. याची पश्चिमेकडील जीवसृष्टी आशियाई असून इथे हत्ती, वाघ, गेंडा आणि वुडपेकरसारखे पक्षी विहार करतात. तर दुसऱ्या बाजूला मात्र यापैकी प्रजातीचा एकही प्राणी दिसत नाही. अशा दोन्ही भागात वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी तसेच पक्षी विहार करत आहेत. एकंदरच दोन्ही बाजूचे जीवसृष्टी पर्यावरण भिन्न असल्याचे समजते.

वालेस लाइनचा इतिहास

वालेस लाइन ही अदृष्य सीमारेषा वैज्ञानिक भाषेत biogeographic boundary म्हणून ओळखली जाते. डोळ्यांना दिसत नसली तरीही दोन्ही भागांमधील पर्यावर सृष्टीची भिन्नता तिचे अस्तित्व अधोरेखीत करते. (Wallace Line) माहितीनुसार, चार्ल्स डार्विनच्या Theory of Evolution चा सिद्धांत स्वतंत्रपणे मांडणाऱ्या ब्रिटीश निसर्गशास्त्रज्ञ अल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी १८५९ मध्ये ही अदृश्य सीमारेषा शोधली होती. मलय द्वीपसमूहात प्रवास करत्यावेळी त्याला इतर बेटांना भेट देताना या सीमारेषेचे अस्तित्व जाणवले.

पूर्वी बालीचा परिसर आशियाचा आणि लोंबकचा परिसर ऑस्ट्रेलियाचा भाग होता. मात्र, काही अभ्यासातून हे सांगितले जाते की, १९६० मध्ये ऑस्ट्रेलियन प्लेट टेक्टोनिक्स दक्षिणेकडील अंटार्क्टिकापासून दूर गेली. तेव्हा ही प्लेट हळूहळू उत्तरेकडे सरकली आणि यामुळे वॉलेस लाईन तयार झाली होती. (Wallace Line) यामुळे ही अदृश्य रेषा जिथे समुद्र विभागते तिथे दोन्ही भागामध्ये जैवविविधता आणि परिवाराण सृष्टीतील फरक दिसून येतो.