Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 642

Ata Maker Bag | हात खराब न करता अगदी 5 मिनिटात मळा कणिक; बाजारात आली ही नवीन पिशवी

Ata Maker Bag

Ata Maker Bag | भारतातील जेवणामध्ये चपातीचा समावेश प्रत्येक घरामध्ये केला जातो. चपाती भाजीनेच अनेक लोकांच्या दिवसांची सुरुवात होते. त्याचप्रमाणे ऑफिस टिफिन, मुलांच्या शाळेचे डबे यात देखील चपाती भाजी दिली जाते. परंतु सकाळीच्या गडबडीत महिलांसाठी चपात्या बनवणे हा एक खूप मोठा टास्क असतो. कारण चपात्या बनवण्यासाठी जास्त वेळ जातो. चपात्या लाटण्यासाठी सगळ्यात आधी चपातीचे कणीक मळून घेणे गरजेचे असते. आणि तेच कणिक मळायला (Ata Maker Bag) खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे खूप जास्त पसारा देखील होतो.

कणिक मळताना (Ata Maker Bag) गव्हाच्या पिठामध्ये पाणी, तेल, मीठ हे सगळं घालून हाताने ते मळून घ्यावे लागते. त्यानंतरच त्याच्या चपात्या लाटाव्या लागतात. परंतु जर कणिक मळताना थोडीशी जरी गडबड झाली तरी चपात्या कडक येऊ शकतात. त्यामुळे हे चपातीचे पीठ खूप काळजीपूर्वक आणि चांगले मळणे गरजेचे असते. परंतु अनेक स्त्रियांना सकाळच्या गडबडीत हेच कणिक मळण्याचा खूप मोठा टास्क असतो. त्यामुळे किचन ओट्यावर खूप जास्त पसारा देखील होतो. तसेच त्यांचे हात खराब होतात आणि वेळ देखील खूप जातो.

बाजारामध्ये पीठ मळण्यासाठी एक नवीन आयडिया आलेली आहे. त्यामुळे तुमचे पीठ देखील कमी वेळात मिळून होईल. आणि तुमचे हात सुद्धा खराब होणार नाही. सध्या बाजारात पीठ मिळण्यासाठी एका अनोख्या पिशवीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पिशवीचा वापर करून तुम्ही अगदी काही वेळातच हे कनिक मळू शकता. त्याचबरोबर तुमचे हात देखील खराब होणार नाही आणि किचन ओट्यावरही पसारा होणार नाही.

कणिक मळण्यासाठी बाजारात जी पिशवी उपलब्ध आहे. ती सिलिकॉन प्लास्टिकने बनवलेली आहे. ज्यामुळे तुमचे हात खराब होत नाहीत. या पिशवीमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे पीठ घालून त्याचप्रमाणे तेल आणि हा गरजेनुसार पाणी टाकून आपण पीठ मळतो तसे पीठ मळायचे आहे. ही पिशवी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग ॲप वरून देखील ऑर्डर करू शकता.

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा!! अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Hemant Soren

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| झारखंड उच्च न्यायालयाने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जामीन मंजूर केला आहे. हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप लावण्यात आला होता. परंतु आता याचप्रकरणी त्यांना 5 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. सध्या हेमंत सोरेन हे रांचीच्या होटवार येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी बडगई परिसरातील 8.86 एकर जमिनीवर अनधिकृतपणे बळकावली आहे. परंतु ईडीचे हे आरोप हेमंत यांनी सातत्याने फेटाळून ही लावले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, त्यांच्या अशिलाला विनाकारण गोवले जात आहे. यावेळी त्यांनी, केंद्र सरकारवर ही आरोप केले. अखेर दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Monsoon Trek : लहान मुलांना घेऊन मान्सून ट्रेकिंग करायचंय? कुठे जायचं कळत नाहीये? लगेच जाणून घ्या

Monsoon Trek

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Trek) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांना निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचे वेध लागतात. खास करून पर्यावरण प्रेमी आणि ट्रेकर्स पावसाळ्यात बरेच प्लॅन आखतात. महाराष्ट्रात पावसाच्या किंचित सरी बरसू लागल्या की, ट्रेकर्सच्या ट्रेकिंग प्लॅन्सची आखणी सुरु होते. मस्त हिरवाईने नटलेल्या डोंगर आणि कड्याकपाऱ्यांचे सौंदर्य न्याहाळत धाडसी ट्रेकिंग करण्याची मजा शुभ्र धुक्यात आणखीच वाढते.

बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं असतात आणि त्यामुळे पालकांना ट्रेकिंगची आवड मनातच मारावी लागते. पण यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला असं काहीही करण्याची गरज नाही. कारण तज्ञ सांगतात, लहान मुलांना कमी वयात ट्रेकिंगला घेऊन जाणे चांगले आहे. पण मग नेमकं मुलांचं वय किती असावं आणि मुलांना घेऊन कोणते ट्रेक करावे? याविषयी जाणकार काय सांगतात ते जाणून घेऊ.

लहान मुलांना कोणत्या वयात ट्रेकवर घेऊन जावं? (Monsoon Trek)

ट्रेकिंग क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, मुलांना शक्य तितक्या कमी वयात ट्रेकिंगला घेऊन जा. मात्र, यावेळी पालकांनी काही गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. जस की, ट्रेकिंगला जाण्यापूर्वी आपली मुलं शारीरिक रित्या सक्षम आहेत का? याची तपासणी करून घ्या. कारण लहान मुलांच्या शरीरात प्रतिदिवशी बदल होत असतो. त्यांच्या स्नायूंची रचना बदलत असते. (Monsoon Trek) त्यामुळे सर्वसाधारणपणे तुमचे मुले ३ वर्षापेक्षा जास्त वयाची असताना त्यांच्या मनात ट्रेकिंगविषयी आवड निर्माण करा आणि मग ट्रेकिंगला घेऊन जा. मुलांना लहान वयापासूनच निसर्गाच्या सानिध्ध्यात वावरण्याची सवय लावा. यामुळे त्यांना निसर्गाबाबत आवड आणि आदर निर्माण होईल.

समुद्रकिनारी वाळूत चालणे, नदीकिनारी विविध आकाराचे दगड गोळा करणे अशा त्यांना गंमत वाटेल अशा कृती करून घ्या. यामुळे तुम्ही मुलांमध्ये ट्रेकिंगची आवड रुजवू शकाल. ४ ते ५ वर्षांची मुलं चपळ व अधिक सक्रिय असतात. त्यामुळे या वयात त्यांना कमी उंचीचे चढ, डोंगर आणि गवताळ भागांवर फिरायला न्या. (Monsoon Trek) पक्षी निरीक्षण, वृक्ष निरीक्षण शिकवा. यातून त्यांना निसर्गाबाबत ओढ आणि आत्मियता वाटेल. पुढे वयाच्या ६ ते ७ वर्षात मुलांना बिनधास्त ट्रेकिंगला न्या. एव्हाना दगड- खडकाळ वाटेवर चालणे त्यांच्यासाठी सोपे आणि रंजक झालेले असते. तसेच वयाच्या १० व्या वर्षापर्यंत मुलं स्वत:चा तोल सावरायला शिकलेली असतात. त्यामुळे एखाद्या ट्रेकचा घेण्यायोग्य त्यांना समज आलेली असते.

लहान मुलांना घेऊन जाता येईल असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेक कोणते?

जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन ट्रेकिंगला जायचा विचार करत असाल तर मुलांच्या क्षमतेचा विचार करून ट्रेक पॉईंट्स निवडा. यासाठी प्रबळमाची ट्रेक, कर्नाळा ट्रेक, सोंडई ट्रेक, कोरिगड ट्रेक, वन ट्री हिल पॉईंट ट्रेक, माथेरान, लोहगड ट्रेक बेस्ट ठरतील. तसेच तुमची मुले ९ ते १० वर्षाची असतील तर त्यांना हिमालयन ट्रेकसाठी घेऊन जा. (Monsoon Trek) यासाठी देओरीताल चंद्रशिला ट्रेक, केदारकंथा ट्रेक, ब्रह्मताल ट्रेक, हर की दून ट्रेक, बिआस कुंड ट्रेक, भ्रिगू लेक ट्रेक यांपैकी एखादा पॉईंट निवडा.

लक्षात ठेवा

तुमची मुले लहान असल्यामुळे ट्रेकिंगला जाताना त्यांची शारीरिक क्षमता आधी लक्षात घ्या. कारण ट्रेकिंगसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य महत्वाचे असते. शिवाय प्रत्येक ट्रेक त्यांना जमेलच असा हट्ट करू नका. (Monsoon Trek) कारण ते शक्य नाही. म्हणून, प्रत्येक ट्रेक पॉईंटसंदर्भात आवश्यक असलेली सगळी माहिती योग्यरित्या मिळवा आणि मगच मुलांना ट्रेकिंगला न्यायचं का नाही? याचा निर्णय घ्या.

Jio Recharge Plan | जिओच्या ग्राहकांना मोठा फटका! रिचार्ज प्लॅनमध्ये केली 22 टक्क्यांनी वाढ

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | सध्या भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. परंतु रिलायन्स जिओ या कंपनीशी अनेक ग्राहक जोडलेले आहेत. जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच आता जिओने त्यांच्या ग्राहकांना एक मोठा झटका दिलेला आहे. तो म्हणजे आता जिओनी त्यांचे सगळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन महाग केलेले आहेत. जिओचा सगळ्यात स्वस्त प्लान हा 155 रुपयांना होता. तो आता त्यांनी 189 रुपयांना केलेला आहे. जिओने त्यांचे सगळे दर महिन्याचे, तीन महिने त्याचप्रमाणे वर्षभराचे रिचार्ज प्लान (Jio Recharge Plan)देखील वाढवलेले आहेत. त्यामुळे आता जिओच्या ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

3 जुलै पासून नवीन दर चालू | Jio Recharge Plan

रिलायन्स जिओनी नुकतेच त्यांच्या रिचार्जची किंमत वाढण्याची घोषणा केलेली आहे. त्यांनी त्यांचे सगळे डेटा प्लॅन हे महाग केलेले आहेत. आणि हे सगळे नवीन 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. जिओचा आतापर्यंत सगळ्यात स्वस्त प्लॅन हा 155 रुपयांना होता. तो त्यांनी आता वाढवून 189 रुपयांचा केलेला आहे. जिओने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 22 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. जिओने त्यांचे 19 प्लॅन वाढवलेले आहेत. त्यातील 17 प्लॅन प्रीपेड आहेत, आणि उरलेले 2 हे पोस्टपेड प्लॅन आहेत.

जिओच्या प्लॅनचे बदललेले दर

जिओचा सगळ्यात स्वस्त प्लॅन हा 155 रुपयांना होता. परंतु आता 3 जुलैपासून हा प्लॅन हा 189 रुपयांना होणार आहे. याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असणार आहे. त्याचप्रमाणे 209 रुपयांच्या प्लॅनची किंमत त्यांनी आता 249 रुपये केलेली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 28 दिवसांची आहे. त्याचप्रमाणे 239 रुपयांचा प्लॅन हा अनलिमिटेड होता. ज्याची किंमत आता 299 रुपये करण्यात आलेली आहे.

जिओनी त्यांचे पोस्टपेड प्लॅन देखील महाग केलेले आहे. 30 जीबी डेटाचा प्लॅन हा 299 रुपयांना होता. परंतु आता त्याची किंमत 349 रुपये एवढी केलेली आहे. त्याचप्रमाणे 75 जीबी डेटाचा प्लॅन हा 399 होता. तो आता 449 रुपयांना केलेला आहे.

Gold Price Today: आज सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; चांदीचे दर काय? लगेच पहा

Gold price Today

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीचे भाव घसरल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. परंतु आता हेच भाव वाढल्यामुळे पुन्हा एकदा खरेदीदारांना फटका बसणार आहे. 28 जून रोजी सोने महागले आहे. तर चांदीच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. परिणामी सोने- चांदी खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर आजचे भाव पहा

गुड रिटर्न्सनुसार 28 जून रोजी बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,150 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासह 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 72,160 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,61,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7,21,600 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,150 रुपये
मुंबई – 66,150 रुपये
नागपूर – 66,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,160 रूपये
मुंबई – 72,160 रूपये
नागपूर – 72,160 रूपये

चांदीचे आजचे भाव

गेल्या दोन दिवसांपूर्वी सोन्या चांदीचे भाव घसरले होते. काल देखील चांदीच्या या भावात कोणतेही वाढ झाली नव्हती. मात्र आज हेच भाव स्थिर आहेत. सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 900 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9000 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 90,000 रूपये अशी आहे.

अजितदादांचे 6 आमदार जयंत पाटलांना भेटले; घरवापसीच्या चर्चांना उधाण

ajit pawar and jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. आज अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) 6 आमदारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याची एका बंद खोलीत भेट घेतली आहे. यामुळेच अजित पवार गटात गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार गटात परत येतील, अशा चर्चांना उधाण आले आहे.

खरे तर, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला चांगली यश मिळाल्यामुळे अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला येतील असे म्हटले जात आहे. मधल्या काळा त रोहित पवार आणि जयंत पाटलांनी देखील दावा केला होता की, अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. तर दोन दिवसांपूर्वीच पक्षाचे हित जपणाऱ्या आमदारांना पुन्हा पक्षात घेतले जाईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

या सर्व घडामोडींमध्येच आज आणखीन एक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील 6 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे व अनिल देशमुख ही उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. यासह, यातील दोन आमदार हे नाशिक भागातील असल्याचे ही सांगितले जात आहे. परंतु याबाबत कोणतेही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु सध्या या बातमीमुळे राजकिय चर्चांचा जोर वाटला आहे.

Constipation Relief : पोट साफ होत नाही? रोज सकाळी प्या ‘ही’ 5 पेय; एका दिवसात मिळेल आराम

Constipation Relief

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Constipation Relief) रोजच्या धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ आहे? त्यामुळे अपुरी झोप, अवेळी आणि चुकीचे खाणे, आरोग्य सवयी आणि अशीच एकंदर ही बिघडलेली जीवनशैली रोज थोडं थोडं आपलं आरोग्य खराब करते. बऱ्याच लोकांना सकाळच्या गडबडीत नाश्ता करता येत नाही. तर काहींना वेळेत दुपारचे जेवण करता येत नाही. असेही काही बिझी लोक आहेत ज्यांना अख्ख्या दिवसात कामासमोर खायची प्यायची शुद्ध उरत नाही. अशा बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अपचन, बद्धकोष्ठता, पोटफुगीची समस्या निर्माण होते.

मग अशा त्रासांपासून सुटका हवी म्हणून विविध औषधे, गोळ्या खाल्ल्या जातात. तुम्हालाही असे त्रास होत असतील तर अशा गोळ्या किंवा विविध औषधे घेण्याची गरज नाही. (Constipation Relief) कारण आज आम्ही तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम देतील अशी ३ घरगुती पद्धतीने तयार केली जाणारी पेय सांगणार आहोत. ज्यांच्या सेवनाने तुम्हाला त्वरित आराम मिळेल. चला जाणून घेऊया.

1) लिंबू पाणी (Constipation Relief)

लिंबाचे अनेक पोषक गुणधर्म आपल्या शरीराला विविध लाभ देतात. त्यात पोटाशी संबंधित समस्या असेल किंवा बद्धकोष्ठतेने त्रस्त झाले असाल तर अशावेळी लिंबू पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. कारण हे पेय आपल्या शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. परिणामी पोटाशी संबंधित समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी १ ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

2) मेथी दाण्याचे पाणी

मेथी दाण्याचे पाणी खास करून मधुमेहींसाठी चांगले. या पाण्याचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित कोणतीही समस्या दूर होते. यासाठी मेथी दाणे तव्यावर गरम करा आणि त्यांची बारीक पावडर करा. (Constipation Relief) साधारण १ चमचा पावडर पाण्यात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

3) तांदळाचे पाणी

ज्या लोकांना यूटीआयची समस्या असेल त्यांनी तांदळाचे प्यावे. यासाठी अर्धा कप कच्चा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यात २ ते ३ कप पाणी घाला आणि अर्धा तास भिजत ठेवा. (Constipation Relief) या तांदळाचे पाणी एका स्वच्छ भांड्यात काढा आणि त्याचे सेवन करा. याचे सेवन केल्यास पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.

4) सब्जाचं पाणी

बिघडती जीवनशैली बद्धकोष्ठतेच्या त्रासामागील मूळ कारण आहे. या त्रासापासून सुटका हवी असेल तर सब्जाच्या बियांचे पाणी प्या. यासाठी १ चमचा सब्जा बी ग्लासभर पाण्यात सुमारे १५ मिनिटे भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. लगेच आराम मिळेल.

5) आल्याचं पाणी

अपचन, पोटफुगी, ऍसिडिटी, सूज अशा समस्यांपासून त्वरित आराम हवा असेल तर आल्याचे पाणी प्या. (Constipation Relief) यासाठी, एका भांड्यात २ चमचे आल्याचा किस आणि ४ कप पाणी घ्या. कमीतकमी १० मिनिटे हे पाणी उकळवा आणि नंतर कोमट होताच रिकाम्या पोटी प्या.

Zika Virus : झिका व्हायरसच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; पहा काय सांगतात तज्ञ?

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zika Virus) कोरोनाच्या भयंकर महामारीनंतर आता कुठे जग सावरले आहे. अशातच आता झिका नावाच्या नव्या व्हायरसने जनमानसात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नुकतेच पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित २ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील आणखी एका व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

आजार म्हटलं की, औषधोपचार आले. मात्र, पूर्णपणे बर व्हायचं असेल तर त्यासाठी योग्य उपचार, संतुलित आहार आणि वैयक्तिक स्वच्छता महत्वाची असते. दरम्यान, झिका व्हायरस आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे तज्ञांनी आहाराबाबत काय आणि कशी काळजी घ्यावी? (Zika Virus) झिका व्हायरसच्या प्रभावातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा? याविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

आपले शरीर हायड्रेटेड राहील याची काळजी घ्या

कोणत्याही आजरातून लवकर बरे व्हायचे असेल तर आपल्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या होणार नाही याची काळजी घ्या. त्यात झिका व्हायरसची लागण झाली असेल तर रुग्णाचे शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. (Zika Virus) कारण, जेव्हा आपले एखाद्या संसर्गाशी लढा देत असते, तेव्हा आपल्या शरीराला अधिक द्रव्याची गरज असते. जेणेकरून शरीरातील विषारी घटक व संसर्ग शरीराबाहेर उत्सर्जित होतील.

द्रव पदार्थ (Zika Virus)

झिका व्हायरसच्या रुग्णांनी ज्या पदार्थांमध्ये द्रव्य मात्रा सर्वाधिक आहे, अशा पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत होते. पाण्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी आणि विविध फळांचे ज्यूस पिणे या काळात फायदेशीर ठरेल. काकडी, संत्री, शहाळ, किवी अशा फळांचे सेवन करावे. कारण यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. जे रुग्णाचे शरीर हायड्रेटेडसुद्धा ठेवते आणि तोंडाची गेलेली चव परत येण्यासही मदत करते.

प्रथिनयुक्त पदार्थ

झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती कमी हौस शकते. (Zika Virus) शिवाय रुग्णाच्या शरीरातील स्नायूदेखील कमजोर होतात. अशावेळी रुग्णाला अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी आपल्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये विविध डाळी, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. अशा पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील पेशी आणि स्नायूंच्या सुधारणेसाठी मदत होते.

Air India Express : स्वस्तात विमानप्रवास करण्याची संधी ; केवळ 883 रुपयांमध्ये मिळणार फ्लाइट तिकीट

Air India Express : तुम्हीही कुठेतरी सुट्टीला फिरायला जाण्यासाठी प्लॅनिंग करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) ग्राहकांसाठी फ्लाइट तिकिटांवर एक विशेष ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त 883 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट मिळत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. चला तर मग जाणून घेऊया या ऑफर बद्दल …

एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) त्यांच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठा स्प्लॅश सेल सुरू केला आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त 883 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फ्लाइट तिकिटे मिळतील. याशिवाय त्यांना या ऑफरमध्ये इतरही अनेक फायदे मिळणार आहेत. या ऑफरमध्ये ग्राहक 30 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या प्रवासासाठी फ्लाइट तिकीट बुक करू शकतात. मात्र बुकिंगची अंतिम तारीख 28 जून 2024 आहे.

कुठे कराल संपर्क ? (Air India Express)

यासोबतच ग्राहकांना 350 रुपयांची अतिरिक्त सूटही मिळते आहे. ही सुविधा शुल्क माफी ग्राहकांना Xpress Lite वर उपलब्ध आहे, ज्यासाठी त्यांना Air India Express (www.airindiaexpress.com) च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

जेवण आणि सीट बुकिंगवरही सवलत

एअर इंडिया एक्सप्रेसच्या या सर्वात मोठ्या स्प्लॅश सेल ऑफरमध्ये ग्राहकांना बिझनेस आणि प्राइम सीट्सवर 50 टक्के सवलत, खाद्यपदार्थांवर 25 टक्के सूट आणि शीतपेयांवर 33 टक्के सूट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही विमान प्रवास करणार (Air India Express) असाल तर नक्की या सुविधेचा लाभ घ्या.

LIC Saral Pension Scheme : LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक केल्यास मिळेल लाइफटाइम पेन्शन

LIC Saral Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Saral Pension Scheme) आजकाल पैसा कमावणे आणि गुंतवणे दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे जसजसा काळ बदलत चालला आहे लोकांमध्ये गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत आहे. आज कित्येक लोक सरकारी योजना ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. यातही अनेक गुंतवणूकदारांची पहिली पसंती ही LIC ला मिळतेय.

त्यामुळे आजच्या घडीला LIC च्या योजनांचा लाभ घेणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या प्रचंड मोठी आहे. दरम्यान, आज आपण सेवानिवृत्त लोकांचे आयुष्यभराचे आर्थिक टेन्शन संपवणाऱ्या पेन्शन स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यात केवळ एकदाच गुंतवणूक केली असता लाइफटाईम पेन्शन दिली जाते. या योजनेचे नाव LIC सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme) असे आहे. चला याविषयी अधिक जाणून घेऊया.

LIC सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme)

LIC ची सरल पेन्शन योजना ही एक अशी योजना आहे, जी सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शनची खात्री देते. या योजनेत केवळ एकदाच गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीवर या योजनेंतर्गत तुम्हाला आयुष्यभर पेन्शन दिली जाते. त्यामुळे खाजगी वा सरकारी क्षेत्रात कार्यरत लोकांमध्ये ही LIC सरल पेन्शन योजना खूप पसंत केली जातेय. कारण, अशा लोकांनी त्यांच्या पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीआधीच या योजनेत गुंतवली तर त्यांना आयुष्यभर प्रत्येक महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो.

कोण गुंतवणूक करू शकतो?

LIC सरल पेन्शन योजनेट ४० वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही. मात्र, पुढे ८० वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती कधीही यामध्ये गुंतवणूक करू शकते. (LIC Saral Pension Scheme) यात तुम्ही तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता आणि प्रतिमहिना पेन्शनचा लाभ घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला प्रीमियम भरल्यानंतर वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर पेन्शन मिळते.

दरमहा किती पेन्शन मिळेल?

LIC च्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला वार्षिक स्वरूपात किमान १२ हजार रुपयांची खरेदी करावी लागेल. यामध्ये अधिकाधिक गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. (LIC Saral Pension Scheme) त्यामुळे कितीही गुंतवणूक करता येईल. उदाहरण म्हणून एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, समजा ४२ वर्षीय व्यक्तीने ३० लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीस प्रत्येक महिन्याला १२,३८८ रुपये पेन्शन दिली जाईल.

योजनेवर कर्ज सुविधा उपलब्ध

LIC च्या सरल पेन्शन योजनेची एक खासियत अशी की, या योजनेवर तुम्हाला कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. समजा पॉलिसी धारकाच्या कुटुंबातील कोणी वाजती गंभीर आजारी असेल तर या पॉलिसीच्या खरेदीनंतर ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण होताच ही पॉलिसी सरेंडर करता येईल. तसेच, पॉलिसी सुरू केल्यापासून ६ महिने पूर्ण झाले असता यावर कर्ज घेता येईल. (LIC Saral Pension Scheme) याबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी LIC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.