हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (NESFB FD Rates) गुंतवणूकदार कायम सुरक्षित आणि फायदेशीर योजनांच्या शोधात असतात. ज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूकदारांची पसंती मुदत ठेव अर्थात एफडीला मिळते आहे. FD हा एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. असे असले तरीही एफडीच्या व्याजदरात झालेले बदल आपल्याला मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम करत असतात. दरम्यान, नुकत्याच झालेल्या व्याजदर वाढीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. त्यात काही स्मॉल फायनान्स बँका आपल्या ग्राहकांना FD वर ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. त्यांपैकी एका बँकेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या बँकेचे नाव नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक असे आहे.
वृत्तानुसार, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेने FD व्याजदरात सुधारणा करून ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केल्याचे समजत आहे. माहितीनुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना ५४६ ते ११११ दिवसांच्या कालावधीची FD ऑफर करते. ज्यात १ कोटी ते ५ कोटी रुपयांच्या नॉन- रिफंडेबल ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना एकूण ९.७५% इतका व्याजदर दिला जातो. तर, रीडिम करण्यायोग्य ठेवींसाठी ९.५०% टक्के व्याजदर दिला जात आहे. हे व्याजदर आतापर्यंतचे सर्वाधिक व्याजदर असल्यामुळे नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या FD धारकांना या व्याजदरांवर चांगला परतावा मिळतो आहे.
घरबसल्या गुंतवणूक शक्य
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांना FD मध्ये गुंतवणूक करायची असल्यास त्यांना बँकेत जाण्याची गरज पडत नाही. अगदी घरबसल्या ते या बँकेत FD मध्ये गुंतवणूक करू शकतात. फक्त यासाठी बँकेच्या ग्राहकांना मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगचा वापर करावा लागतो. (NESFB FD Rates) तसेच, ठेवीदाराच्या बचत खात्यावर त्याच्या FD खात्यातून मासिक वा त्रैमासिक स्वरूपात व्याज जमा होत राहते. ही बँक आपल्या ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग, ऑटो रिन्यू, आंशिक पैसे काढणे, पुनर्गुंतवणूक पर्याय आणि कर्ज/ओडी सारख्या सुविधा प्रदान करते.
तर बँकेकडून १ टक्के दंड आकारला जाईल
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, जर तुम्ही या बँकेत FD केली असेल तर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव ती मध्येच बंद करणे फायद्याचे ठरणार नाही. (NESFB FD Rates) कारण, समजा आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेतील FD तिच्या मॅच्युरिटीच्या आधी तोडली तर तुम्हाला या बँकेकडून १ टक्के दंड आकारला जाईल.
अपरिवर्तित रेपो दर
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI ने पतधोरण आढावा सादर केला आहे. ज्यामध्ये रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, असे समोर आले आहे. त्यानुसार, RBI नवीनतम रेपो दर हा ६.५% इतकाच राखण्यात आला आहे. (NESFB FD Rates) दरम्यान, महागाई नियंत्रणात ठेवतेवेळी RBI ने सलग आठव्यांदा रेपो दर अपरिवर्तित ठेवल्याने बँक ठेवींवरील व्याजदरात आता कपात होईल याची शक्यता तूर्तास तरी मावळली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mobile Accessories Business) आजकाल प्रत्येकाला नोकरीसोबत अधिक कमाईची अपेक्षा असते. ज्यासाठी बरेच लोक विविध व्यवसाय करतात. कुणी जादा काम किंवा ओव्हरटाईम करतात तर कुणी साईड बिझनेसमधून चांगली कमाई करतात. वाढत्या आधुनिकतेमुळे बाजारात अनेक वस्तूंची मागणी वाढत चालली आहे. ती लक्षात घेतली तर साहजिकपणे तुम्हीही चांगले व्यावसायिक होऊ शकता. अगदी नोकरी सांभाळून तुम्ही बिझनेस करून अधिक कमाई कराल अशा एका भन्नाट व्यवसायाची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
मुख्य म्हणजे, यामध्ये फार पैसा गुंतवण्याचीसुद्धा गरज पडणार नाही. शिवाय या व्यवसायाला कोणत्याही हंगामाची गरज नाही. वर्षाचे बारा महिने हा व्यवसाय एकदम जोरदार चालतो. आपण मोबाईल ॲक्सेसरीजच्या व्यवसायाविषयी बोलत आहोत. (Mobile Accessories Business) आजच्या युगात मोबाईल वापरत नाही असा क्वचितच कुणी असेल. मोबाईल युजर्सला चार्जर, इअरफोन, ब्लूटूथ, विविध केबल्स, मोबाईल स्टँड, कार्ड रीडर, साउंडबार स्पीकर अशा अनेक गोष्टींची सतत गरज असते. त्यामुळे बाजारात या वस्तुंना विशेष मागणी आहे. चला तर हा बिझनेस कसा सुरु करायचा? ते जाणून घेऊया
कसा सुरू कराल? (Mobile Accessories Business)
आत्ताच्या ट्रेंडनुसार मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. दरम्यान, सध्या कोणत्या ॲक्सेसरीजला जास्त डिमांड आहे हे आधी लक्षात घ्या आणि त्यानुसार स्वतः वस्तू खरेदी करा. विविध श्रेणीतील वस्तू पाहून ग्राहकांना उत्पादन खरेदी करताना चांगले ऑप्शन मिळतील. ज्यामुळे त्यांना हव्या असलेल्या बऱ्याच वस्तू ते एकाच छताखाली विकत घेऊ शकतील. यामुळे त्यांनी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याची शक्यता वाढेल. मात्र, यासाठी खूप वस्तूंची खरेदी करून ठेऊ नका. सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी छोटे स्टॉल लावून किंवा सार्वजनिक परिसरात वॉकिंग स्वरूपात तुम्ही हा व्यवसाय फुल डे किंवा पार्ट टाइम करू शकता.
कमी गुंतवणुकीत चांगली कमाई
सध्याच्या घडीला मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय आपल्या खर्चाच्या किमान दोन ते तीन पट नफा मिळवून देऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर, समजा तुम्ही एखादी वस्तू १० रुपयांना विकत घेतली असेल तर तुम्ही तीच वस्तू बाजारात ५० रुपये किमतीने विकू शकता. (Mobile Accessories Business) या व्यवसायाचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाले तर, हा व्यवसाय सुरु करतेवेळी केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक पुरेशी ठरेल. पुढे जसा व्यवसाय वाढेल, तुमची कमाई वाढेल तशी तुम्ही गुंतवणूक वाढवून अधिक नफा काढू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hero MotoCorp ही देशातील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. देशात सर्वात जास्त दुचाकी Hero MotoCorp च्याच पाहायला मिळतात. चालवायला अतिशय सोप्पी आणि नवनवीन फीचर्सने सुसज्ज असल्याने हिरोच्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल सुद्धा मोठा असतो. मात्र आता कंपनीने आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे. येत्या 1 जुलै 2024 पासून हिरोच्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा (Hero Bike Price Hike) निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदीदारांना आर्थिक फटका बसणार आहे.
का वाढल्या गाड्यांच्या किमती? Hero Bike Price Hike
याबाबत Hero MotoCorp ने माहिती दिली आहे की कंपनी 1 जुलै 2024 पासून त्यांच्या बाईक आणि स्कूटरच्या किमती वाढवणार आहे. कंपनी जुलै 2024 पासून तिच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व बाइक्स आणि स्कूटरच्या एक्स-शोरूम किमती वाढवणार आहे. या किमती 1500 रुपयांपर्यंत वाढवण्यात येतील. मात्र प्रत्येक मॉडेल आणि व्हेरियंटच्या किमती एकसारख्या वाढवल्या जाणार नाहीत तर वेगवेगळ्या मॉडेल नुसार वाढलेल्या किमती सुद्धा वेगवेगळ्या असतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अचानकपणे गाड्यांच्या किमती वाढवण्याचे (Hero Bike Price Hike) मुख्य कारण म्हणजे इनपुट कॉस्टचा खर्च वाढत आहे त्यामुळे या वाढलेल्या खर्चाचा बोजा कंपनी आपल्या ग्राहकांवर टाकणार आहे.
Hero MotoCorp ने सध्या Splendor+, Splendor + Xtec, Splendor+ Xtec2.0, HF Deluxe, HF100, Glamour, Passion, Xpulse 200T 4V बाईक भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. यासोबतच, कंपनी Destini Prime, Pleasure+ Xtec18, Xoom, Destini 125Xtec सारख्या स्कूटरची सुद्धा विक्री करते. दरम्यान, Hero MotoCorp शेअर्समध्ये आज चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. आज सोमवारी दुपारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 5,489.05 रुपयांवर व्यवहार करताना दिसले.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सार्वजनिक सुव्यवस्था आणि दूरसंचारच्या वापरामुळे होणारे गुन्हे रोखण्यासाठी येत्या 26 जूनपासून नवीन दूरसंचार कायदा (New Telecommunications Act) लागू होणार आहे. यामुळे, कलम 1, 2, 10 ते 30, 42 ते 44, 46, 47, 50 ते 58, 61 आणि 62 या तरतुदी ही लागू होतील. याबरोबर, हा कायदा भारतीय टेलिग्राफ कायदा, भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा, टेलिग्राफ वायर कायदयाच्या जुन्या नियामकांची जागा घेईल. या कायद्यामुळे दूरसंचारसंबंधित गुन्हे रोखण्यासाठी सरकारला आणखीन बळ येईल.
नुकत्याच जारी झालेल्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे, येत्या 26 जूनपासून नवीन दूरसंचार कायदा 2023 लागू होणार आहे. त्यानंतर कलम 1, 2, 10 ते 30, 42 ते 44, 46, 47, 50 ते 58, 61 आणि 62 मधील तरतुदी ही लागू होतील. या नव्या कायद्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दूरसंचार सेवा आणि नेटवर्कवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे. तसेच, ज्या कंपन्यांना दूरसंचार नेटवर्कची ग्राहकांना सेवा द्यायची आहे, त्यांना सरकारकडून अधिकृत परवानगी काढावी लागेल.
दरम्यान, दूरसंचार कायदा 2023 हा सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा गुन्हे रोखण्याच्या आधारावर लागू करण्यात येणार आहे. कारण की, सध्याच्या काळात लोकांची फसवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूरसंचारचा वापर केला जात आहे. यामुळे अनेकांना मोठे नुकसानही सहन करावे लागत आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे थांबवण्यासाठी सरकारने हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे आता सरकारला सर्व दूरसंचार सेवा किंवा नेटवर्कचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याची परवानगी मिळणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात… राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकत असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला चित्र नेमकं कसं असेल? शहाजी बापू पाटील, राम सातपुते, समाधान अवताडे यांसारख्या आमदारांची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का? जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे कुणाचे जास्त चान्सेस आहेत? त्याचाच घेतलेला हा आढावा…
यातला पहिला मतदारसंघ येतो तो करमाळ्याच्या…
करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे… राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या संजय मामांनी 2019 ची निवडणूक मात्र अपक्ष लढवली होती… त्याचं मुख्य कारण होतं ती म्हणजे इच्छुकांची भाऊ गर्दी आणि लोकसभेला झालेला पराभव… 2019 चा विचार करता करमाळ्यात आमदारकीसाठी मोठी उलथा पालथ पाहायला मिळाली… राष्ट्रवादीत असणाऱ्या रश्मी बागल यांनी शिव धनुष्य हातात बांधत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली… तर राष्ट्रवादीकडून संजय पाटील यांच्या नावावर तिकीट वाटपाच्या चर्चेत मोहोर उमटली… त्यामुळे अपक्ष म्हणून माजी आमदार नारायण पाटील आणि संजय मामा शिंदे या मातब्बरांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला… अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांना बाजूला सारत अपक्ष संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार झाले…अर्थात त्यांचं मूळ राष्ट्रवादीचं असल्याने ते पक्षासोबतच राहिले… पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांचा हात धरल्याने विधानसभेला ही जागा कुणाला सुटणार? यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे… रश्मी बागल, संजय शिंदे हे दोघेही उमेदवारीसाठी स्पर्धेत असले तरीदेखील लोकसभेला मोहिते पाटलांना मिळालेलं मताधिक्य पाहता करमाळ्यात आमदारकीचा खांदेपालट होण्याची शक्यता आहे… त्यात तुतारीकडून नारायण पाटील यांची उमेदवारी फिक्स समजली जातेय. लोकसभेतील विजयामुळे नारायण पाटलांना मिळणारा मोहिते पाटलांचा अप्पर हॅन्ड आणि शरद पवारांची ताकद पाहता येणाऱ्या विधानसभेत नारायण पाटील जायंट किलर ठरण्याची शक्यता आहे…
दुसऱ्या मतदारसंघ आहे माढ्याचा…
माढ्यातून अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन दादा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत…मोहिते पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या शिंदे बंधूंच्या याच माढा विधानसभेतून तुतारीला तब्बल पन्नास हजार हून जास्तीचं लीड मिळालं… त्यामुळे मोहिते पाटील आता रिव्हर्स बॉल टाकून ‘माढा आणि बबन दादांना पाडा’ असा स्टॅन्ड विधानसभेला घेऊ शकतात… त्यामुळे सहा टर्मचे आमदार असणाऱ्या ज्येष्ठ आमदार बबनदादांची आमदारकी आता धोक्यात येणारय… बबनदादा शिंदे हे यावेळी निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चा आहेत. गेले काही दिवस तब्येतीचा त्रास सुरु झाल्याने यावेळी ते त्यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे याना उभे करू शकतात. तर दुसरीकडे माढा विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन मातब्बर उमेदवार सध्या इच्छुक असून धनगर समाजाचे शिवाजी कांबळे यांचंही नाव चर्चेत आहे… त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी नुकतीच घेतलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीने त्यांच्या नावाचीही उमेदवारीसाठी चर्चा होऊ लागलीये… शरद पवार गटाकडून तिकीट कोणाला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी शिंदेच्या वर्चस्वला येणाऱ्या विधानसभेला सुरुंग लागण्याची शक्यता जास्त आहे…
तिसरा मतदार संघ येतो तो माळशिरसचा…
मोहिते पाटलांचा बालेकिल्ला म्हणजे माळशिरस…इथं मोहिते पाटील ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात तो निवडून येतो असं बोललं जातं…वर्षानुवर्षे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून हनुमंतराव डोळस हे सलग दोनवेळा विजयी झाले. अर्थात मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने ते निवडून येत होते…पण 2019 च्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात मोठा फेरफार पाहायला मिळाला.. हनुमंतराव डोळस यांचं निधन झालं… त्यात स्वतः मोहिते पाटील भाजपवासी झाल्यामुळे इथून महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे कन्फर्म झालं… राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर यांची उमेदवारी कन्फर्म झाली… मात्र मोहिते पाटील असूनही महायुतीचा उमेदवार कोण? याचा निर्णय होत नव्हता… पण अगदी झिरो मोमेंटला फडणवीसांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राम सातपुतेंना तिकीट मिळालं… आणि निसटत्या लीडने का होईना, पण ते निवडून आले…सद्यस्थितीचा विचार केला तर सातपुते सोलापूरचे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत…मोहिते पाटलांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत… स्वतः उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांचा खांद्याला खांदा लावून प्रचार केल्यामुळे त्यांनाच माळशिरसची उमेदवारी मिळण्याची आणि विजयाची शक्यता जास्त आहे… प्रश्न फक्त उरतो राम सातपुते लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेला उतरण्याची हिंमत दाखवणार का?
चौथा मतदारसंघ आहे तो सांगोल्याचा…
काय झाडी…काय डोंगर…काय हॉटेल…. फेम शहाजी बापू पाटील सांगोल्याचे आमदार… पण ते ही योगायोगाने बनलेल्या दुसऱ्याच टर्मचे… कारण शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचा हा अभेद्य बालेकिल्ला राहिला…60 वर्षे एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघानं 2019 मध्ये नवा इतिहास रचला… कारण परमनंट आमदार म्हणून ओळख असणाऱ्या विधिमंडळातील भीष्माचार्य गणपतराव देशमुख यांनी 2019 ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला… त्यामुळे त्यांचे पारंपारिक विरोधक शहाजी बापू पाटील यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या… यावेळेस गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली खरी… पण अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत शहाजी बापूंचा अवघ्या 674 मतांनी विजय झाला…आणि शेकापच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकला…येणाऱ्या विधानसभेला वारं शहाजी बापूंच्या विरोधात असल्याचं बोललं जातंय… शिवसेनेतील बंड, महाविकास आघाडीवर केलेल आरोप, विवीध वायरल भाषण आणि मोहिते पाटलांना खासदारकीला शिंगावर घेतल्यानं शहाजी बापूंची क्रेझ बरीच झाली… पण प्रॉपर सांगोल्यात त्यांच्या विरोधात वातावरण असल्यानं सांगोल्यात येणाऱ्या काळात शेकाप चा आमदार पाहायला मिळतो? की काँग्रेस राष्ट्रवादीचा? हे येणाऱ्या काळात क्लिअर होईलच…
पाचवा मतदार संघ आहे पंढरपूरचा…
पंढरपुरात 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकरराव परिचारक यांना धूळ चारत भारत भालके यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली… 2009 ला दस्तूरखुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांना मात देणारे भालके जायंट किलर ठरत आमदार झाले… आणि गटातटाच्या राजकारणाला भेदत त्यांनी सलग तीन टर्म आमदार होण्याचा बहुमान मिळवला…मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक लागली… या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहानुभूतीच्या फॅक्टरचा विचार करत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊ केली… तर भाजपने समाधान आवताडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं… अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत मात्र समाधान आवताडे यांनी गुलाल उधळत पंढरपुरात कमळ फुलवलं…पण लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45 हजारांच्या लीडने आता समाधान आवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे… महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत… त्यामुळे गटतट जोडून घेणं, दांडगा जनसंपर्क, मतांची गोळा बेरीज करण्यात ज्याला यश येईल, तो इथला आमदार अशी सध्याची परिस्थिती आहे… बाकी लोकसभेला मिळालेल्या लीडमुळे प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ द्यावं लागणार आहे, एवढं मात्र निश्चित…यासोबत सोलापुरात शहरातील सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण या सोबतच अक्कलकोट, मोहोळ आणि बार्शीचाही समावेश होतो… पण या विधानसभांचा आढावा आपण नंतर सविस्तर व्हिडिओतून घेऊच…
Mumbai News : आपल्या देशावर ब्रिटिशांनी जेव्हा राज्य केले त्या काळात अनेक बांधकामे केली गेलीत . मोठमोठ्या वास्तूशिवाय रेल्वे मार्ग आणि पूल यांचाही यामध्ये समावेश आहे. अद्यापही राज्यातल्या काही भागांमध्ये या ब्रिटिशकालीन पुलांचा आणि वास्तूंचा वापर केला जातो. मुंबईतही असा एक ब्रीटीशकालीन पूल आहे ज्याचा वापर अद्यापही होत असून मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत याचे मोठे योगदान आहे. हा पूल दक्षिण मुंबईतला (Mumbai News) असून याचे नाव बेलासिस पूल आहे. हा पूल १३० वर्षे जुना आहे. आता हा पूल नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास १८ महिने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
जुने बांधकाम पाडून नवा पूल बांधण्याचे काम रेल्वे आणि मुंबई (Mumbai News) महानगरपालिका प्रशासनानं हाती घेतले आहे. पुनर्बांधणीसाठी या पुलावरील वाहतूक १८ महिने बंद ठेवण्यात येणार असून त्यामुळे येथून ये- जा करणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
काय असेल पर्यायी मार्ग ? (Mumbai News)
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या निर्णयानंतर हा पूल काही काळासाठी बंद (Mumbai News) करण्यात येणार आहे. ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल अशा महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या या पुलावरील वाहतूक बंद असतेवेळे वाहनधारकांना मुंबई सेंट्रल जंक्शन ते ताडदेव जंक्शन मार्गे वाहतूक करण्याचा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे.
पठ्ठे बापूराव मार्गावर ताडदेव सर्कल ते नवजीवन जंक्शनपर्यंत नो पार्किंग असेल याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, पर्यायी मार्गांवर काही ठराविक वेळांमध्ये वाहतूक कोंडी नाकारता येत नाही, ज्यामुळं या नव्या मार्गांचा विचार करूनच मुंबईकरांनी (Mumbai News) दिवसभराच्या प्रवासाची आखणी करावी.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक संपताच माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. ज्यामुळे नांदेडमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता सूर्यकांता यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप याबाबत सूर्यकांता यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र असे झाल्यास भाजपला यांना जोरदार फटका बसू शकतो.
शनिवारी सूर्यकांता पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे भाजपच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी, “माझ्या मनात कोणती कटूता नाही. मी भारतीय जनता पार्टीची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे” असे म्हणत भाजपसोबतचा मागील दहा वर्षांचा प्रवास थांबवला. सूर्यकांता पाटील यांनी हा राजीनामा दिल्यामुळे सर्वांनाच त्याचा धक्का बसला. कारण, गेल्या दहा वर्षांपूर्वी सूर्यकांता यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये आल्यानंतर सूर्यकांता यांची केंद्रीय मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. तब्बल दहा वर्षात त्यांनी भाजपा सोबत राहून हिंगोली नांदेड मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं. परंतु आता भाजप सोडल्यानंतर पुन्हा सूर्यकांता शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज सूर्यकांता या मुंबईमध्ये शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश नेमका कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले.
दरम्यान, सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत देखील अनेक वर्ष काम केले आहे. म्हणूनच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून शरद पवार यांनी केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्रिपदी सूर्यकांता पाटील यांना संधी दिली होती. पुढे, भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली. परंतु भाजपातील प्रवेशानंतर भाजपने त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही. तसेच कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात त्यांना सहभागी करून घेतले नाही. त्यामुळेच आता सूर्यकांता यांनी भाजपशी साथ सोडली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोमवार 24 जून 2024 … आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याच्या किमती 71385 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील दराच्या तुलनेत या किमतीमध्ये 44 रुपयांची किरकोळ घट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव सुद्धा 211 रुपयांनी कमी झाला असून एक किलो चांदी 88754 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
आज MCX वर सोन्याचा भाव 71,549 रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) घसरल्याचे पाहायला मिळाले. 12 वाजता तर सोन्याचा दर 71,352 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर गेला. त्यानंतर या किमतीत थोडीफार वाढ झाली असून सध्या 24 कॅरेट 10 ग्राम सोने 71490 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 72,230 रुपये आहे. तर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 66,250 रुपये आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 66,250 रुपये मुंबई – 66,250 रुपये नागपूर – 66,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 72,230 रूपये मुंबई – 72,230 रूपये नागपूर – 72,230 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
Water Supply Charges | आजकाल आणि शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करणे खूप सोपे झालेले आहे. परंतु तेवढेच आव्हानात्मक देखील झालेले आहे. कारण नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि बाजार भाव कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अशातच आता शेतकऱ्यांसाठी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतीसाठी जे पाणी आहे. त्या पाण्याच्या पाणीपट्टीच्या दरात तब्बल 10 पटींनी वाढ केलेली आहे.
आता शेतकऱ्यांचा आर्थिक भार आणखीनच वाढणार आहे. कारण शेतकऱ्यांना जास्त पाणीपट्टी भरावी लागणार आहे. सततच्या होणाऱ्या आर्थिक नुकसाना बरोबर आता शेतकऱ्यांना हा एक मोठा आणखी मोठा फटका बसत आहे. जलसंपदा विभागाने ही दरवाढ 9Water Supply Charges) केलेली आहे. त्यामध्ये बागायती शेतकऱ्यांसाठी एका वर्षाला एकरी 5443 रुपये इतका दर भरावा लागणार आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीच्या दरामध्ये दहा पटीने वाढ केलेली आहे. त्यामुळे बागायती शेतकऱ्यांना त्यांच्या एक एकर शेतीसाठी दरवर्षी 5443 रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे. तर खरीपच्या शेतकऱ्यांना 1890 रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे, तर रब्बी हंगामासाठी 3780 रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे.
परंतु दहा पटीने जास्त दरवाढ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दर तीन वर्षांनी कृषी सिंचन आणि आर्थिक उद्योगाचे पुनर्लोकन आणि सुधारणा देखील केल्या जातात. याआधी 11 जानेवारी 2018 रोजी सुधारणा केली होती. त्यानंतर 1 जुलै 2019 ते 30 जून 2022 या कालावधीत कोणत्याही प्रकारचे दर निश्चित केले नव्हते.
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना कालावधीमध्ये आर्थिक संकटामुळे पाणीपट्टीच्या बाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नव्हता. परंतु आता पुन्हा एकदा हे दर निश्चिती करण्यात आलेले आहे. आणि एकदम दहा पटीने ही दरवाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Krushi Sakhi Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक नवनवीन योजना येत असतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पावले देखील उचलत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढलेला आहे. महिलांची सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात देखील प्रगती होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजना आणत आहेत. त्याचप्रमाणे महिलांना एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील मदत केली जाते.
आपल्या भारतामध्ये कृषी क्षेत्रामध्ये पुरुषांसोबत महिलांचे ही प्रमाण वाढलेले आहे. आता कृषी क्षेत्रामध्ये महिलांनी स्वावलंबी बनून चांगले उत्पन्न घ्यावे. आणि चांगला व्यवसाय करावा. या दृष्टीने केंद्र सरकारने महिलांसाठी कृषी सखी योजना (Krushi Sakhi Yojana ) आणलेली आहे. ही योजना सरकार देशातील जवळपास 30,000 कृषी सखींना प्रमाणपत्र देऊन पूर्ण करणार आहे.
काय आहे कृषी सुखी योजना ? | Krushi Sakhi Yojana
सरकारच्या या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या स्त्रियांना त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांना देखील शेतातील उत्पादन वाढवण्यास कशी मदत करता येईल. याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये पिकाचे उत्पादन कसे घ्यावे? तसेच बाकी सगळ्या गोष्टी कशा पहाव्यात. या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे.
या योजनेमध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. आणि त्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही कृषी सखी म्हणून काम करू शकता. यासाठी महिलांना एका विषयाचे 56 दिवस प्रशिक्षण घ्यावे लागेल. आणि त्याची परीक्षा देखील द्यावी लागेल. तुम्ही ही परीक्षा पास झाला तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 12 राज्यांची निवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण दिले जाते.