Monday, December 15, 2025
Home Blog Page 6733

२०१९ची निवडणूक आम्ही विक्रमी जागांनी जिंकणार – नरेंद्र मोदी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली | २०१९ची निवडणूक विक्रमी जागांनी जिंकणार आहोत कारण आम्ही केलेल्या कामावर आमचा विश्वास आहे. जनतेला भक्कम आणि निर्णायक सरकारची गरज आहे म्हणून जनता आमच्या पाठीशी उभी राहील असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला इमेल द्वारा दिलेल्या मुलाखतीतून मोदी व्यक्त झाले आहेत.
मॉब लिंचिंग च्या मुद्द्यावर आम्ही गंभीर आहोत आणि हा प्रकार रोखण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत असे मोदी मुलाखतीत म्हणाले आहेत. आसामच्या एनआरसी मुद्द्यावर मोदींनी कॉग्रेसची चांगलीच खरडपट्टी काढली असून कॉग्रेसचे सरकार आसाम मध्ये असताना त्यांनी एनआरसी मुद्द्यावर काहीच कार्यवाही केली नाही असा आरोप ही मोदींनी केला आहे.

बिझनेस करायचाय? सरकार देतंय २५ लाखांचं कर्ज

business tips
business tips

टीम, HELLO महाराष्ट्र | बर्याचजणांना बिझनेस करण्याची इच्छा असते, त्यात त्यांचे डोके असते, परंतु पैश्यअभावी सारे राहून जाते. मात्र आता तुम्हाला तुमची इच्छा सोडून देण्याची इच्छा नाही. सरकार बिझनेस करु इच्छिणार्या तरुणांना अल्प व्याजदरात चक्क २५ लाखांचे कर्ज देत आहे. शिवाय सरकार या कर्जावर सबसिडी ही देत आहे.

इतर महत्वाचे –

B.A. पास

बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात ‘डीवायएफआय-एसएफआय’ चे मानवी साखळी आंदोलन

स्माॅल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक आॅफ इंडिया (सीडबी) या बँकेच्या स्माईल नावाच्या योजनेअंतर्गत सदर कर्ज देण्यात येत आहे. सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्यूफॅक्चरिंग अशा दोन प्रकारच्या उद्योगांकरता कर्ज दिले जात अाहे. सर्व्हिस सेक्टर करता १५ लाख रुपये तर मॅन्यूफॅक्चरिंग करता २५ लाख रुपये कर्ज मिळत आहे.

सरकार या कर्जावर भक्कम सबसिडीही देत असल्याने युवकांसाठी हे फायद्याचे ठरत आहे. खुल्या प्रवर्ग गटातील युवकांना शहरी भागात व्यवसाय करण्याकरता १५% सबसिडी देण्यात येत आहे तर ग्रामिण भागात व्यावसाय करण्याकरता २५% सबसिडी दिली जात आहे. विशेष प्रवर्गातील युवकांना २५% आणि ३५% सबसिडी अनुक्रने शहरी आणि ग्रामिण भागात व्यावसाय करण्याकरता देण्यात येत आहे.

इथे करा आॅनलाईन अर्ज –
https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp

संविधान प्रत जाळणार्यांवर कडक कारवाई करा, रिब्लिकन मजदूर संघाची मागणी

Constitution burnt in delhi
Constitution burnt in delhi

पुणे | दिनांक ८ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार घडला होता. सदर घटना प्रसारमाध्यमांनी समोर आणताच सोशल मिडीयावर त्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. संविधानाची प्रत जाळतानाची छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत असून त्याविरोधात निषेध नोंदवला जात आहे. दिल्लीत घडलेल्या या घटनेचे पुण्यातही प्रतिसाद उमटत असून रिपब्लिकन मजदूर संघ ने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन ला संबंधितांवर कारवाइची मागणी करणारे निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे.

संविधानाची प्रत जाळणाऱ्या संघटनेचं नाव अजुन कळू शकलेल नसून, काही व्यक्तिंची नावे समोर आली आहेत. संजय शर्मा, अनूप दुबे, कृष्णमोहन रॉय, रोहित गुप्ता, आशुतोष झा, संतोष झा, संतोष शुक्ल, परवेश साहनी, कामिनी झा, श्रीनिवास पांडे अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन मजदूर संघाचे अध्यक्ष सुहास बनसोडे, शतायु भगळे , रिजवान शेख, सूर्यकांत जाधव यांनी केली आहे.

सरपंच बायकोचा नवऱ्याकडून खून

Thumbnail
Thumbnail

चिपळूण | सरपंच असणाऱ्या बायकोचा तिच्याच नवऱ्याने खून केल्याची धक्कादायक घटना चिपळून येथे घडली. रुपाली जाधव असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून दीपक जाधव या तिच्याच पतीने तिला मारून टाकल्याचे समोर आले आहे. सदर घटना चिपळूण तालुक्यातील कादवड गावी शनिवारी सकाळी घडली आहे.

रुपाली जाधव यांच्या खुनाने कादवड गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. दीपक जाधव पोलिसांना स्वाधीन झाला असून घटनेचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. चिपळून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्याला पंतप्रधानांची हजेरी

Narendra modi in IIT mumbai
Narendra modi in IIT mumbai

मुंबई | आज आयआयटी मुंबईचा ५६ वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जगभर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. आयआयटी मध्ये शिकलेले विद्यार्थी जगभर लौकित कमावतात हा आयआयटीचा इतिहास आहे’ असे गौरव उद्गार यावेळी मोदी यांनी काढले.

आयआयटी मुंबई साठी १००० कोटी रुपयांचा निधी मोदींनी जाहीर केला. जगात येणारे नवीन तंत्रज्ञान आयआयटीमध्ये आलेच पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात भारत कसा पुढे जातो आहे याचा पाढाच मोदींनी वाचला.
आयआयटी मुंबईच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. पंतप्रधान येणार आहेत म्हणून आयआयटी मुंबईच्या चौफेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत

youth politics in india
youth politics in india

दीपक चटप

“तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” – शहीद भगतसिंग

सध्या ट्युनिशियाला झालेल्या जास्मिन रिव्हाल्युशनची फार चर्चा होत आहे. २६ वर्षाच्या फळविक्रेत्या युवकाने माझ्या देशात हुकुमशाही नको, लोकशाही हवी म्हणून स्वत:ला जाळून घेतले. आज ट्युनिशियाचे हुकुमशहा देश सोडून गेलेत आणि तिथे लोकशाही प्रस्थापित होत आहे. त्यातूनच अरब स्प्रिंगमधे लाकशाहीला सुरवात झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी होऊन त्यांच्या देशातील राजकारण बदलवीत आहेत. त्यामुळेच राजकारणात युवक हा महत्वाचा घटक आहे ते पुन्हा सिद्ध होत आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडासा आॅर्डन याचं वय ३७ वर्ष आहे. टोनी ब्लेअर- डॅविड कॅमेराॅन हे ४३ व्या वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान झाले. बऱ्याच देशात विधिमंडळात युवकांसाठी जागा राखीव आहेत. युवकांच्या प्रत्यक्ष राजकीय सहभागाने जगाचे राजकारण आज झपाट्याने बदलत आहे. समाज हा आणखी चांगल्या व्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे.

इतर महत्वाचे लेख –

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

विद्यार्थ्यांनी राजकारण केल पाहिजे का हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तुम्हाला वाटत असेल किंवा नसेल परंतु राजकारणाचा भाग तुम्हाला व्हावच लागतं. व्हाल्टेअर म्हणतात ‘आपल्यावर कोणाचे राज्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कोणावर टीका करू शकत नाही, हे आधी जाणून घ्यावे’. आज सरकारने नोटबंदी, जी.एस.टी. असे विविध निर्णय घेतले. त्या निर्णयांचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मर्जीत असो अथवा नसो पण होत आहे. आपण सर्वच राजकीय प्रक्रियेचे आणि राजकारणाचे भाग आहोत. तेव्हा विद्यार्थ्यांनी राजकारण केल पाहिजे का ? या प्रश्नापेक्षा विद्यार्थ्यांनी राजकारण का केले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे.

राजकारण म्हणजे काय? आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान होण म्हणजे राजकारण होत का? कि सत्ता, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळविण्याचे माध्यम म्हणजे राजकारण..! तरुणानो आपल्याला शाॅर्ट कट ची सवय लागली आहे. एक लक्षात ठेवा राजकारण म्हणजे सत्ता, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा नव्हे तर राजकारण म्हणजे समाजात निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष, Civil Society दबावगट निर्माण करण्याचे माध्यम आहे. राजकारणात येण्याआधी तुम्हाला राजकारणात का यायचं आहे आणि येऊन काय करायच आहे ते ठरवा. ध्येय आणि उद्दिष्ट चांगले ठेऊन रचनात्मक राजकारण केल्यास नक्कीच राजकारणाडे बघण्याची दृष्टी बदलेल आणि हे देशकार्य युवकांना हातात घ्यावे लागेल.

आज देशातील संसदेत ३० पेक्षा कमी वय असणारे फक्त १२ खासदार आहेत. ह्या १२ खासदारांपैकी बहुतांश खासदारांच्या घरात पारंपारिक राजकारण होत. त्यामुळे युवक म्हणून किंवा त्यांच्या कर्तुत्वामुळे त्यांना निवडून दिलंय का याबद्दल शंकाच आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, नेहरू, बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या नेत्यांनी युवक असताना केलेल्या आंदोलन, संघर्ष आणि चळवळीतून देशाचे राजकारण बदलले. स्वातंत्र्यानंतर १९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राजकारणात झपाट्याने बदल होऊ लागला. राजकारणात निवडणूक खर्च, वोट बँक, जात-धर्म-भाषा या अस्मिता टोकदार झाल्यात, मनी पाॅवर आणि मसल पाॅवर च्या राजकारणाने राजकारणाचा स्तर खालावला आणि सज्जन लोक त्यापासून दुरावले. राजकारण बरबटले आहे, हे जरी खरे असले तरी त्यापासून आपल्याला पळून जाता येणार नाही. जर आपण पळून जात असाल तर ज्या आईने लहानाच मोठ केल त्या आईशी तुम्ही प्रामाणिक नाहीत असाच त्याचा अर्थ होईल.

भगतसिंग म्हणतात, “तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” आज सर्वत्र राजकारण दुषित होत असताना आजही राजू शेट्टी, बच्चू कडू, गणपतराव देशमुख, वामनराव चटप यांच्यासारखी काही उदाहरणे आहेत जी लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांशी प्रामाणिक राहून राजकारण करीत आहेत.

आज देशात जरी लोकशाही व्यवस्था असली तरी दुर्दैवाने पक्षांतर्गत लोकशाही कमी आहे. पक्षांचा बहुतांश कारभार हुकुमशाही प्रवृत्तीनेच चालतो. त्यामुळे भारतीय लोकशाही हुकुमशाही प्रवृत्तीत गुदमरत आहे. हि अबाधित राहण्यासाठी पक्षांतर्गत लोकशाही महत्वाची आहे.

मी गेल्या आठवड्यात सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांना भेटलो. ते गेल्या ५५ वर्षांपासून आमदार आहेत. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितल कि बॅरिस्टर अन्तुलेजी यांच्या आधीचे सर्व मुख्यमंत्री राज्यात निवडून आलेले आमदार ठरवत त्यानंतर मात्र हायकमांड म्हणेल ते मुख्यमंत्री व्हायला लागले. आजही ती परंपरा कायम आहे.

आज देशात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, बुखारी, गौरी लंकेश या विचारवंतांच्या झालेल्या हत्या, जमावाकडून होत असलेल्या हत्या (Mob Lynching) आणि एका केंद्रीय मंत्र्याकडून संविधान बदलाची होत असलेली भाषा हे सार आपल्याला कुठ घेऊन जाणार आहे..? याचा विचार केला पाहिजे. ‘केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य’ या प्रसिद्ध खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे कि, “लोकनियुक्त सरकारला संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे. मात्र संविधानाचा मुलभूत ढाचा (basic structure) मध्ये कोणतेही सरकार बदल करू शकत नाही.” आता basic structure म्हणजे काय ? हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगू अस सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटल आहे.

इतर महत्वाचे लेख –

क्रांतिसिंह नाना पाटील

कंत्राटीकरण हा परमेश्वराला पर्याय, दरवर्षी सव्वा कोटी युवकांची फौज बेरोजगार – प्रा.हरी नरके

घटना बदलाची भाषा, संवैधानिक मुल्यांची सरास पायमल्ली होत असतानाच कधी नव्हे ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच “सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन अस म्हणाव लागल की, “आम्ही आमचा आत्मा विकला होता अस उद्या जाऊन कोणी म्हणायला नको.” यापूर्वी गेल्या ६० वर्षांत सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशावर ही वेळ आली नव्हती.

संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरवात आम्ही भारताचे लोक या शब्दांपासून होते. हि सुरवात लोकशाही राज्यात राहणाऱ्या आपल्या सर्वाना जबादारीची जाणीव करून देते. उमेदवार निवडीसोबतच पाच वर्षेलोकप्रतिनिधीच्या कामाकडे लक्ष ठेवणे आणि वेळप्रसंगी स्वत: लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे हि लआपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा. परिस्थिती गंभीर आहे, ही हाताबाहेर जाण्याआधी तुम्ही राजकारणात सक्रीय झालाच पाहिजे.

Deepak Chatap

 

दीपक चटप

[email protected]
(लेखक विधि महाविद्यालयातील विद्यार्थी तथा युवक राजकारणातील सक्रिय कार्यकर्ते आहेत.)

 

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात त्याने म्हटलं भारतीय गाणं

Atif Aslam
Atif Aslam

पी.टी.आय. वृत्तसंस्था

कराची | मुळचा पाकिस्तानचा असलेला मात्र बाॅलिवुडच्या अनेक चित्रपटांसाठी गाणं म्हटलेला गायक अतिफ अस्लम ला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. न्युयोर्क येथील पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन परेडमधे अस्लम यांनी भारतील गाणं म्हटल्याने त्याला पाकिस्तान स्थित नेटकर्यांनी ट्रोल केले आहे. नुकत्याच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अतिफ ने “तेरा होने लगा हूँ” हे २००९ साली प्रदर्शित झालेल्या अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातील गाणे गायले होते.

याबाबतीत पाकिस्तानी मिडियानेही अतिफ अस्लम यांच्यावर टीका केली अाहे. मात्र फिल्मकार ओमैर अलावी यांनी ‘बाॅलिवुड चे सर्व चित्रपट पाकिस्तान मधे जवळ जवळ सार्याच चित्रपट गृहांनधे उघड पणे दाखवले जातात. आणि चित्रपटांना, त्यातील गीतांना कोठलीच सीमारेषा लागू होत नसते’ असे विधान केले आहे.

अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत होणार तात्काळ अटक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेने ठरवला रद्दबादल

Thumbnail
Thumbnail

नवी दिल्ली | काल राज्यसभेने अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ला मंजुरी दिली. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्यातील तात्काळ अटकेच्या कलमाला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेत तात्काळ अटक करण्याला मान्यता नाकारली होती तर अॅट्रॉसिटीकायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ही जमीन मिळेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याच निर्णयाचे खंडन करण्यासाठी मोदी सरकारने अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ संसदेत मांडले. लोकसभेत पारित झालेले विधेयक काल राज्यसभेत ही पारित झाले आहे. आता राष्ट्रपतीनी स्वाक्षरी केली की दुरुस्ती कायद्यात रूपांतरित होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दलित संघटनांनी भारत बंदचे आंदोलन केले होते यात आठ आंदोलक हिंसाचारात ठार झाले होते. याची गंभीर दखल मोदी सरकारने घेत अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ मांडून ते मंजूर करून घेतले आहे.

 

इतर महत्वाचे 

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहीत पवार धारवीत जातात..

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Thumbnail
Thumbnail

भंडारा | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील निमसर गावी घडली आहे. आशिष राणे नावाच्या तरुणाने त्याच्याच गावातील एका मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला असल्याचे उघड झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राणे आणि सदर मलगी यांच्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. राणे याणे मुलीला मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगून वारंवार बलात्कार केला. मात्र मुलीने लग्नाची विचारणा केली असता तिला जीवे मारण्याची धमकी देत राणे याने लग्नाची मागणी धुडकावून लावली. सदरचा प्रकार मुलीने घरच्यांना सांगितला तेव्हा मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली.

इतर महत्वाचे  –

या पाच गोष्टी केल्यावर मुली होतात इम्प्रेस

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

पोलिसांनी आरोपी आशिष राणे याला अटक केली असून त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन होती आणि अनुसूचित जातीची होती. याच कारणाने तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आल्याने अॅट्रॉसिटी आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.

इतर महत्वाचे  –

धक्कादायक! हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवतीने दिला रेल्वे खाली जीव

Friendship Day Special | फेसबुक फ्रेंड

राहुल गांधींवरील खटल्याची आज सुनावणी

Rahul gandhi supreem court
Rahul gandhi supreem court

भिवंडी | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच महात्मा गांधी यांची हत्या केली’ असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी भिवंडीतील प्रचार सभे दरम्यान केला होता. त्यावरुन राजेश खुंटे या रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर भिवंडी न्यायालयात मानहाणीचा खटला दाखल केला होता. राहूल यांनी मागील तारखे वेळी मला आरोप मान्य नाहीत असा दावा केला होता. त्यानंतर आज खटल्याची सुनावणी असून न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी आज या खटल्याच्या सुनावणीसाठी भिवंडीत येणार आहेत.

राहुल गांधींच्या खटल्याची सुनावणी आज कोर्टात असल्याने भिवंडी कोर्टाला कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.