Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 712

FD Interest Rate : ‘या’ बँकांनी बदलले FD वरील व्याजदर; पहा किती दिवसांच्या ठेवीवर किती परतावा मिळणार?

FD Interest Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Interest Rate) आजच्या काळात नुसता पैसा कमावून उपयोग नाही. तर कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवता आला पाहिजे. तरच पैसा कमावल्याचे समाधान राहील. गुंतवणूक ही काळाची गरज आहे हे काही नव्याने सांगायला नको. आज प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व लक्षात आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूकदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. यात अनेक गुंतवणूकदार मुदत ठेवीमध्ये गुंतवताना दिसत आहेत. जर तुम्हीही यामध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्वाची आहे.

कारण, अनेक बँकांनी मे महिन्यात FD वरील व्याजदर सुधारले आहेत. (FD Interest Rate) यानुसार काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केल्याचे समोर आले आहे. या यादीमध्ये मोठमोठ्या बँकांच्या नावाचा समावेश आहे. एसबीआय (SBI), डिसीबी (DCB) बँक आणि आयडीएफसी (IDFC) फर्स्ट बँकेने नुकतेच एफडीवरील व्याजदर बदलले आहेत. चला तर या बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घेऊ आणि त्याचा फायदा कसा होईल? हे देखील जाणून घेऊ.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI बँक)

माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ ठराविक कालावधीसाठी FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. हे नवे सुधारित दर १५ मे २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.
यानुसार, १८० ते २१० दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर २५ बेस पॉईंट्सने ६% इतका वाढवण्यात आला आहे. याआधी ५.७५% इतका व्याजदर दिला जात होता. (FD Interest Rate)
तसेच २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी व्याजदर ६% होता. तोच आता ६.२५% इतका करण्यात आला आहे.
शिवाय १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी ६.८% इतका व्याजदर लागू करण्यात आला आहे.
तर २ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FDवर ७% इतका व्याजदार दिला जात आहे.

DCB बँक (FD Interest Rate)

माहितीनुसार, व्याजदर बदलणाऱ्या बँकांच्या यादीत DCB बँकेच्या नावाचा देखील समावेश आहे. या बँकेने २२ मे २०२४ पासून नवे सुधारित दर लागू केले आहेत.
दरम्यान, DCB बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदर सुधारित केल्याचे समजत आहे.
सध्या ही बँक १९ महिने ते २० महिन्यांच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. सर्वसामान्यांना ८.०५% तर ज्येष्ठ नागरिकांना ८.५५% व्याजदर प्रदान केला जात आहे.

IDFC फर्स्ट बँक

आईडीएफसी फर्स्ट बँकेनेसुद्धा नवे सुधारित दर लागू केले आहेत. माहितीनुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी हे दर लागू करण्यात आले आहेत. दैनिक १५ मे २०२४ पासून हे नवे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.
सध्या IDFC फर्स्ट बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीतील FD साठी सर्वसामान्य ग्राहकांना ३% ते ७.९% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अतिरिक्त दिला जात आहे. (FD Interest Rate)
तसेच ५०० दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर उपलब्ध असून सामान्य ग्राहकांना ७.९% व्याजदर दिला जातोय. तर ज्येष्ठ नागरिकांना ८.४% व्याजदर मिळत आहे.

अरविंद केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार; जमिनाबाबत कोर्टाकडून दिलासा नाहीच

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या अस्वस्थ प्रकृतीचा आणि वैद्यकीय चाचणीचा दाखला देत अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची विनंती केली होती. याचं याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र या सुनावणी दरम्यान कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला नाही.

महत्वाचे म्हणजे, आजच्या सुनावणीमध्ये केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीला ईडीने विरोध केला. या सुनावणीवेळी ईडीने आरोप लावला की, अरविंद केजरीवाल आरोग्याबाबत खोटी विधाने करत आहेत. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने अंतरिम जामिनावरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळेच केजरीवाल यांना 2 जून रोजी शरण जावे लागणार आहे.

दरम्यान, मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने 21 मार्चला अटक केली होती. या अटकेनंतर केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांच्या कोठडीत पुन्हा 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. पुढे निवडणुकीच्या काळात कोर्टाने प्रचारासाठी केजरीवाल यांची 21 दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती. याचं जामिनाची मुदत 2 रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा शरण जावे लागणार आहे.

Monsoon Tourist Spots : पावसाळ्यात फिरायला जायचंय? तर ‘या’ ठिकाणांना भेट द्या; सौंदर्य असे की हरवून जाल

Monsoon Tourist Spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Tourist Spots) पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून येते. सर्वत्र हिरवळ, छोटे मोठे धबधबे आणि थंडगार हवेची झुळूक मनाला विशेष आनंद देते. त्यामुळे पावसाळा म्हटलं की, सल्याने फिरायला जाण्याचे वेध लागतात. आपसूकच आपली पाऊले निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. आता अवघ्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळेच विकेंड प्लॅनिंग करत असतील. पावसाळ्यात मस्त रिमझिम सरींचा आल्हाददायी अनुभव घ्यायचा असेल तर निसर्गाच्या सानिध्यात जायला हवे. मग कुठे जायचं? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. पावसाळ्यात महाराष्ट्रात एक्स्प्लोर करता येतील अशा काही निसर्गरम्य ठिकाणांची आज आपण माहिती घेऊया.

माळशेज घाट (Monsoon Tourist Spots)

पावसाळ्यात निसर्गाला अगदी जवळून अनुभवायचं असेल तर माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा पहायलाच हवे. अंगावर पावसाच्या रिमझिम सारी घेत. थंडीने अंगावर उभा राहणारा काटा आणि ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात तुम्ही कधी हरवून जाल तुमचं तुम्हाला कळणार नाही. सर्वत्र हिरवळ आणि त्यातून दूरवर जाणारी मोहक वळणदार वाट तुम्हाला एक अनोखा आनंद देते. अगदी पृथ्वीवर स्वर्गसुखाची अनुभूती हवी असेल तर पावसल्युट माळशेज घाटात जायलाच हवे.

आंबोली घाट

पावसाळ्यात आंबोली घाटात जाण्याची मजाच काही वेगळी आहे. अत्यंत थंड वातावरण, शांत आणि प्रसन्नतेचि अनुभूती देतं. हिरण्यकेशी धबधबा, आंबोली धबधबा आणि नांगरतास धबधबा ही पावसाळ्यातील पर्यटकांची प्रमुख ठिकाणं आहेत. (Monsoon Tourist Spots) शिवाय घाटात अनेक प्रजातींचे पक्षी, फुलपाखरं, दऱ्या आणि टेकड्यांचे सुंदर दृश्य पहायला मिळते. पावसाळ्यात इथे दाट धुक्याची चादर पसरते. यातून रस्त्या काढत जाताना वाटणारी मजा शब्दात व्यक्त करता येण्यासारखी नाही.

लोणावळा – खंडाळा

सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर असलेले लोणावळा आणि खंडाळा हे मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असणारी थंड हवेची ठिकाणं आहेत. जिथे कोणत्याही मोसमात फिरायला जायला मजा येते. पण पावसाळ्यात या ठिकाणांचं रुपडं इतकं सुंदर दिसत की, फिरायला गेल्यानंतर पुन्हा परतून येऊच वाटत नाही. (Monsoon Tourist Spots) पावसाळ्यात इथे टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी डॅम, वाळवळ डॅम या ठिकाणांना तर आवर्जून भेट द्यावी. चहुबाजूने हिरवळ, थंडगार हवा, धुक्याची मखमली चादर, डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे लहान मोठे धबधबे ही दृश्य मनाला स्पर्श करणारी ठरतील.

माथेरान

बरेच लोक पावसाळ्यात माथेरानला ट्रेकिंगसाठी जातात. कारण इथली घनदाट झाडी, सर्वत्र पसरलेली हिरवाई, लाल पायवाटा आणि त्यात दात धुकं आपल्याला आकर्षित करत. पावसाळ्यात इथे शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट ही ठिकाणे फारच सुंदर दिसतात. (Monsoon Tourist Spots) इथून दिसणारी डोंगरदऱ्यांची दृश्य मनाला अगदी भुरळ घालतात. त्यामुळे पावसाळा आला की, माथेरानला एकदा नक्की जा.

इगतपुरी

पावसाळ्यात एक्स्प्लोर करायला इगतपुरी हे एक अत्यंत सुंदर ठिकाण मानले जाते. रस्त्यालगत वाहणारे छोटे छोटे धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगा आणि थंड वातावरण तुम्हाला मोहात पाडेल. इगतपुरी म्हणजे फॉग सिटी याचा प्रत्यय तुम्हाला पावसाळ्यात मिळेल. (Monsoon Tourist Spots) इथले धबधबे, गडकिल्ले, भंडारदरा धरण, कळसूबाई शिखर, भावली धरण, भावली धबधबा, सांधण व्हॅली, कसारा घाट ही स्थळं पर्यटकांना प्रचंड आकर्षित करतात. ही दृश्य पाहताना आपण स्वप्नात तर नाही ना असेच अनेकदा वाटते.

भीमाशंकर

पावसाळ्यात भीमाशंकरचे जंगल जरूर एक्स्प्लोर करा. कारण सदाबहार अभयारण्य, हिरवा निसर्ग, खळखळणाऱ्या नद्या तुम्हाला इथेच पहायला मिळतील. देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भीमाशंकर पावसाळ्यात इतकं खुलून येत की, इथला परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो. (Monsoon Tourist Spots) त्यामुळे हिरवा निसर्ग अनुभवायचा असेल तर पावसाळ्यात भीमाशंकरला जरूर जा.

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार दुष्काळ पाहणी दौरा करणार; पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वाखाली उद्या कराडात बैठक

congress drought inspection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जबाबदारी दिली असून या समितीची नियोजन मिटिंग उद्या दिनांक 2 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह,कराड (Karad) येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील सदस्य तथा पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट होत आहे. चारा नसल्याने जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत.अनेक शहरांना 15 दिवसांनी पाणी मिळत आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप सुरु नाहीत. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्यही नाही यामुळे विरोधी पक्ष नात्याने सरकारला दुष्काळ प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागवार समिती गठीत केली आहे.

यानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदाची जबाबदारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांची दुष्काळ पाहणी समिती मध्ये 13 सदस्य आहेत. यामध्ये माजी मंत्री आ. सतेज पाटील, माजी मंत्री आ. विश्वजित कदम, आ. प्रणिती शिंदे, आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, आ. विक्रमसिंह सावंत, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू आवळे, आ. रवींद्र धंगेकर, आ. जयंत आसगावकर तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे या समितीचे समन्वयक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. अशी ही समिती गठीत करण्यात आली आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून सर्व समिती सदस्यांना कराड हे सोयीचे आहे. यामुळे कराडमध्ये उद्या दिनांक 2 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे. कराड मध्ये या मिटिंग चे आयोजन केल्याने विशेष महत्व या मीटिंगला आले आहे. या मिटिंगमध्ये लोकप्रतिनिधी सदस्यकडून त्यांच्या जिल्ह्याच्या दुष्काळ परिस्थिती बाबत माहिती मागवली असून त्यानुसार दुसऱ्या टप्यात मिटिंग नंतर 2 दिवसानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा सुद्धा आयोजित केला जाणार आहे आणि यासाठी या नियोजन मिटिंग चे आयोजन करण्यात आले आहे.

Viral Video | चालत्या ट्रेनमध्ये 3 सेकंदात मोबाईल झाला चोरी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | आजकाल रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि याच गर्दीचा फायदा घेऊन आजकाल चोरांचा सुळसुळाट सुटलेला आहे. त्यामुळे अनेक लोक देखील लोकलमध्ये प्रवास करताना खूप सांभाळून जात असतात. जेणेकरून त्यांची कुठलीही वस्तू चोरीला जाऊ नये. परंतु आजकाल चोर देखील नवीन नवीन आयडिया शोधून काढत आहेत. अनेकवेळा चोर हे खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल फोन हिसकावून चोरी करतात. अशातच आता एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या प्रवासादरम्यान खिडकी किंवा दरवाज्याजवळ मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना, त्या चोराने हा फोन चोरी केलेला आहे. जर तुम्ही देखील असा मोबाईल चार्जिंगला लावत असाल, तर आत्ताच सावध व्हा! कारण चोर कोणत्याही क्षणी तुमचा मोबाईल करू शकतात.

आज-काल ट्रेनमध्ये देखील मोबाईल चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. परंतु चोर आता इतके हुशार झालेले आहे की, याच गोष्टीचा फायदा घेऊन ते मोबाईल फोन चोरी करू लागलेले आहेत. चोर चालत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स घेऊन जातात. परंतु आता एक नवीन युक्ती काढलेली आहे. ते आता थेट खिडकीच्या बाजूला चार्जिंगला लावलेला मोबाईल आपल्याच डोळ्यादेखत चोरी करत आहे.

3 सेकंदात मोबाईल चोरी | Viral Video

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आणि ट्रेनच्या आतमध्ये देखील खूप गर्दी आहे. अशावेळी प्रवासांनी आपले मोबाईल चार्जिंगला लावलेले आहेत. अशावेळी ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर थांबते आणि तिथे एक तरुण बराच वेळ फेऱ्या मारताना दिसतो. त्यावेळी तो फेऱ्या मारताना मोबाईल नक्की कुठे आणि कसा ठेवलेला आहे? याचा अंदाज होतो. आणि जशी ट्रेन सुरू होती तसा तो खिडकी जवळ जातो. आणि खिडकीतून आत हात घालून मोबाईल बाहेर खेचून घेतो. ट्रेन सुरू झाल्यामुळे चोराला पकडण्याची संधी मिळत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. आणि आत्तापर्यंत लाखो वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलेला आहे. या व्हिडिओवर अनेक आणि त्यांच्या कमेंट्सही केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ट्रेनमध्ये तुमचा मोबाईल चार्जिंगला लावत असाल, तर अत्यंत सावधगिरीने चार्जिंगला लावा. अन्यथा तो चोरी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या संदीप गुळवेंचा ठाकरे गटात प्रवेश; पक्षप्रवेश होताच उमेदवारी ही जाहीर

Sandeep Gawali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कालपासून नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teachers Constituency) निवडणुकीसाठी अर्ज करण्यास ही सुरुवात झाली आहे. अशातच आज काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी उद्धव ठाकरेंच्या गटात (Uddhav Thackeray Group) प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर लगेच ठाकरे गटाकडून संदीप गुळवे (Sandip Gulave) यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर संदीप गुळवे यांनी म्हटले आहे की, “माझा आज प्रवेश करून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. आज माझा प्रवेश करून शिक्षकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल. नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मी जिंकून आणून आणेल. ही संधी मला दिली त्याबद्दल मी आभार मानतो” दरम्यान, संदीप गुळवे यांचा ठाकरे गटात प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत संदीप गुळवेंचा पक्षप्रवेश झाला. महत्त्वाचे म्हणजे, 1996 पासून संदीप गुळवे राजकारणात सक्रिय आहे. त्यांनी 1997 साली नाशिक महपाालिकेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर ते सलग दहा वर्षे नाशिक महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य राहिले.

Leh Ladakh Bike Trip : बाईकवरून लेह- लडाखला जायचा प्लॅन करताय? तर ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित हव्या

Leh Ladakh Bike Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Leh Ladakh Bike Trip) जगभर भ्रमंती करणे ही अनेक लोकांच्या बँकेट लिस्टमधील एक खास विश असेल. जगभरात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना एकट्याला फिरायला खूप आवडत असेल. तुम्ही बाईक रायडर्स पाहिले असालंच!! मस्त एकटे भुंग.. करत बाईकवरून लांबचा पल्ला गाठतात. एका मस्त लॉन्ग ड्राइव्हची जर्नी एकटेच एन्जॉय करतात. असे रायडर्स अनेकदा लॉन्ग राईडसाठी जोखीमीची ठिकाणं निवडतात. यांपैकी सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे लेह लडाख.

कितीतरी बाईक रायडर्स एकटे किंवा ग्रुपसोबत लेह लडाखचा पल्ला गाठतात. तसं बोलायचं झालं तर, लेह लडाखची ट्रिप अत्यंत सुंदर आणि नेत्रदीपक दृश्यांनी भरलेली आहे. निसर्गाचे तेजस्वी रूप, वाटेत दिसणारी लहान मोठी गावं, सुंदर डोंगर आणि लांबपर्यंत जाणारा रस्ता एक वेगळीच मुसाफिरी एन्जॉय करायला मदत करतो. (Leh Ladakh Bike Trip) कितीही आनंददायी वाटत असला तरीही हा प्रवास सोपा नाहीये, हे लक्षात घ्या. लेह लडाखला बाईकने प्रवास करताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्यांवर मात करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्या. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्व रस्त्यांची नीट माहिती घ्या

लेह- लडाखला जायचं म्हणजे खायचं काम नाही. त्यामुळे प्रवासाचं प्लॅनिंग करताना इथल्या सगळ्या रस्त्यांची, गावांची आणि ठिकाणांची पूर्ण माहिती घ्या. (Leh Ladakh Bike Trip) केवळ लेह- लडाख नव्हे तर कुठेही फिरायला निघण्याआधी त्या ठिकाणाची पूर्ण माहिती घेणे गरजेचे असते. यामुळे प्रवास करताना राहण्या- खाण्यापिण्याची सोया याबाबत माहिती मिळवता येते. तसेच सर्व बाबींचा अभ्यास असल्यामुळे प्रवास सुखकर होतो.

पुरेशी रोख

बाहेर निघताना कायम आवश्यक तितकी रोख जवळ ठेवावी हा एक महत्वाचा नियम पाळा. लेह- लडाखला जातानादेखील हा नियम पाळणे तुमच्यासाठी गरजेचे राहील. (Leh Ladakh Bike Trip) कारण इथे बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसल्याने ऑनलाईन पेमेंट करणे अवघड जाईल. शिवाय आसपास ATM असेलच अशी काही शाश्वती नाही. त्यामुळे लेह लडाखला बाईकने प्रवास करताना तुमच्यासोबत पुरेशी रोख रक्कम ठेवा.

गरजेचं सामान

प्रवास जवळचा असो किंवा लांबचा.. आपल्यासोबत आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू असायला हव्या. सील आणि पॅकेज्ड फूड, सुखा खाऊ, ड्रायफ्रूट यासोबत एनर्जी ड्रिंक, रुटीन केअरच्या गोष्टीदेखील सोबत ठेवा. (Leh Ladakh Bike Trip) बाईकवरून प्रवास करण्यासाठी चांगल्या दर्जाचे सेफ्टी गियर वापरा. तसेच बाईकच्या पेट्रोल काट्यावर लक्ष ठेवा आणि किती अंतरावर पुढील पेट्रोल पंप आहे याची नीट माहिती ठेवा.

शारीरिक काळजी महत्वाची (Leh Ladakh Bike Trip)

तुम्ही कोणत्याही ठिकाणी फिरायला जात असाल तर सगळ्यात आधी आपण शारीरिकरित्या तेथील वातावरणाशी मिळवून घेऊ शकतो का? यासाठी आपण फिट आहोत का? यासाठीच्या चाचण्या करून घ्या. त्यात लेह- लडाख सारख्या डोंगराळ ठिकाणी बाईकने जाण्यापूर्वी तुम्ही शारीरिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला महत्वाचा ठरेल. तसेच प्रवासाला निघताना सामानात आठवणीने तुमच्या औषधांचा डब्बा घ्या. शिवाय तज्ञांनी सुचवलेली औषधे देखील जरूर सोबत ठेवा आणि मगच प्रवासाला सुरुवात करा.

T20 वर्ल्डकपमध्ये ‘हे’ 2 संघ करणार मोठा उलटफेर; गिलख्रिस्टचा इशारा

ADAM GILCHRIST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) उद्यापासून सुरु होणार आहे. यंदाची टी-20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये आयोजित करण्यात आल्याने भारतीय प्रमाणवेळेनुसार, 2024 टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना उद्या सकाळी 6 वाजता होणार आहे. एकूण २० संघ या विश्वचषक स्पर्धेत उतरले असून काहीही करून वर्ल्ड्कप जिंकायचाच असा चंग सर्वच संघानी बांधला आहे. भारत, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ विजयाचे दावेदार मानले जात आहेत. मात्र तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) एक मोठं विधान केलं आहे. नेपाळ आणि नेदरलँड्स हे २ संघ यंदाच्या वर्ल्डकप मध्ये मोठा उलटफेर करू शकतात असं गिलीने म्हंटल आहे.

गिलख्रिस्ट म्हणाला, या विश्वचषक स्पर्धेत नेपाळ आणि नेदरलँड्स हे २ संघ बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या संघांविरुद्ध आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात. नेपाळ आणि नेदरलँड्सला बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसह ड गटात ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्यामुळे नेपाळचा संघ अधिक मजबूत झाला आहे. नेपाळ कडे असे काही खेळाडू आहेत जे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या लीगमध्ये सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे नेपाळचा संघ चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास ऍडम गिलख्रिस्टने व्यक्त केला.

दुसरीकडे, 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून क्रिकेटविश्वास सनसनाटी निर्माण केली होती. हाच धागा पकडून गिलख्रिस्ट म्हणाला, “नेदरलँड्स संघ नेहमीच आव्हान निर्माण करतो, त्यामुळे या संघाला पराभूत करणे सोपे नाही.आताही नेदरलँड दक्षिण आफ्रिकेच्या गटात आहे त्यामुळे यंदाही नेदरलँडचा संघ आफ्रिकेला कडवं आव्हान देईन असं गिलीला वाटत.

टी20 विश्वचषकासाठी नेपाळ संघ:
रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी, आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल मल्ला, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमलसिंग आयरी.

टी20 विश्वचषकासाठी नेदरलँडचा संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, काइल क्लेन, लोगन व्हॅन बीक, मॅक्स ओडॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार, सिब्रांड एंजलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंग, विव किंग्मा, वेस्टी बॅरेसी.

8-4-3 Compounding Formulla | काय आहे गुंतवणुकीचा 8-4-3 फॉर्मुला ? काही वर्षातच व्हाल करोडपती

8-4-3 Compounding Formulla

8-4-3 Compounding Formulla | आजकाल सगळेजण भविष्याचा विचार करून काही ना काही गुंतवणूक करत असतात. आपण गुंतवणूक केल्यानंतर लगेचच त्यात वाढ होत नाही. त्यासाठी काही वर्ष आपल्याला संयम बाळगावा लागतो. कंपाउंडिंगच्या मार्गाने आपण केलेल्या गुंतवणुकीचा आपल्याला परतावा मिळत असतो. परंतु तुम्ही जर दीर्घकाळासाठी सलग बचत करत असाल, तर त्यातून तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट फायदा होऊ शकतो. आता आपण आज हे संपूर्ण गणित जाणून घेणार आहोत. म्हणजेच एक कोटींचा फंड जमा करण्यास किती वेळ किंवा कालावधी लागतो? त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? त्यावर परतावा किती मिळेल? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कंपाऊंडिंगद्वारे कसे श्रीमंत व्हाल ?

आपण जर व्याजाचे कॅल्क्युलेशन केले, तर मूळ रक्कम किंवा तुम्ही गुंतवलेल्या पैशावर अवलंबून असते. चक्रवाढ व्याजाची गणना मूळ रक्कम आणि त्यावर मिळालेल्या व्याजावर केली जाते. चक्रवाढ ही एक अशी प्रक्रिया आहे. तिथे तुमच्या व्याजावर देखील तुम्हाला व्याज मिळते.

चक्रवाढीचा 8/ 4/ 3 नियम | 8-4-3 Compounding Formulla

तुम्ही जास्त पैसा कमावण्यासाठी कंपाऊंडिंगचा 8/4/3 हा नियम पाळू शकता. आता हा नियम काय आहे? ते पाहूया. तुम्ही गुंतवणुकीच्या एका इन्व्हेस्टमेंटमध्ये दर महिन्याला 21 हजार 250 रुपयांची जर गुंतवणूक केली, तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के व्याज मिळेल. या व्याजावर वार्षिक चक्रवाढानुसार तुम्हाला 8 वर्षात 33.37 लाखांचा फायदा होईल. आता इथे तुम्हाला कंपाऊंडिंगची जादू कळेल. पुढील 33 लाख रुपयांसाठी केवळ निम्मा म्हणजे 4 वर्षे लागतील. म्हणून त्याचवेळी हे पैसे कामासाठी तुम्हाला केवळ 3 वर्षे लागतील.

म्हणजेच तुम्ही 15 वर्षे वर्षात 1 कोटी रुपये वाचवू शकाल. 21 व्या वर्षाच्या शेवटी तुमची एकूण बचत 2.22 कोटी एवढी होईल. म्हणजेच तुमची संपत्ती ही 1कोटी रुपयांवरून 2 कोटी रुपयांपर्यंत होईल. म्हणजेच तुमची ही संपत्ती दुप्पट होण्यासाठी केवळ 6 वर्षे लागतील. 22 व्या वर्षी चक्रवाढीमुळे तुम्हाला 33 लाख रुपये जमा होतील. या गोष्टीला केवळ एक वर्ष लागेल.

Smoking Effects : सिगारेटच्या धुरामुळे होते डोळ्यांचे नुकसान; येऊ शकते कायमचे आंधळेपण

Smoking Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Smoking Effects) नाक्यावर ऐटीत उभं राहून फु फु करत सिगारेटचा धूर काढणे आजकाल सामान्य बाब झाली आहे. ज्याला त्याला ही गोष्ट अगदी स्टाईल वाटू लागली आहे आणि त्यामुळे तरुणाईलासुद्धा सिगारेटच्या धुराचं आकर्षण वाटू लागलं आहे. आज स्मोकर्सची संख्या पाहता कालांतराने जगभरात केवळ सिगारेटचा शूर दिसायला फार वेळ लागेल असे वाटत नाही. सिगारेट पिणे आणि धूर काढून शायनिंग मारणे आरोग्याच्या दृष्टीने किती आणि कसे हानिकारक आहे? याकडे मात्र कुणाचाच लक्ष नाही.

सिगारेट पिणाऱ्यांना जितका त्रास होतो तितकाच त्रास त्यांच्या आसपास असणाऱ्यांना देखील होतो याचा त्यांना अंदाज देखील नाही. आजकाल बरेच लोक स्मोकिंगच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. (Smoking Effects) या लोकांच्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर स्मोकिंगचा गंभीर परिणाम होतोच. शिवाय यांच्यासह इतरांच्या डोळ्यांवर सिगारेटच्या धुराचा गंभीर परिणाम होऊन दृष्टी जाण्याची शक्यता असते. सिगारेटचा धूर नजरेसाठी कसा हानिकारक ठरतो? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मॅक्युलर डिजनरेशनचा धोका (Smoking Effects)

स्मोकिंगच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमध्ये मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ही समस्या दीर्घकाळ स्मोकिंग करणाऱ्यांना उतार वयात जाणवू शकते. वृद्धापकाळात दृष्टी कमजोर होण्याचे हे एक मुख्य कारण असल्याचे तज्ञ सांगतात. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हा एक विकार असून यामुळे नजर कमी होत जाते आणि कालांतराने माणूस दृष्टिहीन होऊ शकतो.

मोतीबिंदूची समस्या

तंबाखूचे अतिसेवन केल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका असतो. यात डोळ्याच्या बुब्बुळांवर ढगाळ थर जमा होतो. स्मोकिंग करणाऱ्यांना मोतीबिंदू होण्याची शक्यता इतर लोकांपेक्षा जास्त असते. (Smoking Effects) कारण स्मोकिंग करतेवेळी सिगारेटचा शूर डोळ्यांचे नुकसान करत असतो. ज्यामुळे मोतीबिंदू होऊन दृष्टी अस्पष्ट होते. कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी कमी झाल्याने कमी प्रकाशात वस्तू दिसत नाहीत.

डोळ्यांचे आजार

अति स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळ्यांचे विविध आजार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. सिगारेटचा धूर डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल खराब करतात. ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित विविध समस्या होऊ शकतात. या आजरांमुळे माणूस दृष्टिहीन होऊन कायमचे आंधळेपण येऊ शकते. (Smoking Effects)

ड्राय आय सिंड्रोमचे बळी

स्मोकिंग करणारी व्यक्ती स्वतःसोबत इतरांच्या देखील आरोग्याचे नुकसान करत असते. सिगारेटचा धूर स्मोकरसोबत त्याच्या आसपास वावरणाऱ्या लोकांसाठी श्वासाच्या समस्या निर्माण करून फुफ्फुसाचे आरोग्य खराब करू शकतो. इतकेच नव्हे तर या धुरामुळे ड्राय आय सिंड्रोमचा धोका वाढतो. यात ऑप्टिक नर्व्हचे गंभीर नुकसान होते. (Smoking Effects) ही समस्या सर्वाधिक लहान मुलांमध्ये दिसून येते. सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आल्यास लहान मुलांना मायोपिया आणि नंतरच्या आयुष्यात दृष्टीशी संबंधित समस्या होण्याचा धोका असतो.