Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 718

केस गळतीच्या समस्येला कंटाळा आहात? दररोज खा 1 पौष्टिक लाडू; 15 दिवसात केस होतील घनदाट

Hair Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अनेकवेळा योग्य आहार न घेतल्यामुळे, वाढत्या वयोमानामुळे, तसेच व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवून येते. त्याचबरोबर आजारांमुळे ही केस गळती सुरू होते. केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी दररोज पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. यात तुम्ही जर दररोज 1 पौष्टीक लाडू खाल्ला तर तुमची केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. हा पौष्टिक लाडू आळशीच्या बीयांचा असेल तर याचे चांगले परिणाम लगेच दिसून येतील. आज आपण हाच पौष्टीक लाडू कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.

लाडू बनवण्यासाठी साहित्य

बदाम- एक कप
भोपळ्याच्या बीया
सुर्यफुलाच्या बीया
आळशीच्या बीया
चिया सिड्स
खजूर

लाडू बनवण्याची कृती

  • सर्वात प्रथम एका कढईत बदामाचे काप, भोपळ्याच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया, आळशीच्या बीया, चिया सिड्स भाजून घ्या.
  • या बिया एकदम खरपूस भाजून घ्या यानंतर त्यात खजुराचे तुकडे घाला आणि तेही भाजून घ्या त्यानंतर हे मिश्रण एका वाडग्यात काढा.
  • पुढे हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये गरजेनुसार तूप घालून त्याचे लाडू वळून घ्या. तुमचे पौष्टीक लाडू तयार असतील.
  • हे लाडू दररोज खाल्ल्यामुळे तब्येत ही सुधारेल आणि केसांची समस्या दूर होईल.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळतील 9250 रुपये; 5 वर्षे घेता येईल लाभ

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसच्या अनेक जबरदस्ती योजनांपैकी एक योजना आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक योजना. (Post Office Monthly Income Scheme) भारत सरकारकडून चालवल्या जात असलेल्या या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळते. या योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा केले तर तुम्हाला 5 वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवलेले पैसे तुम्हाला 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मिळतील. अशा विविध कारणांमुळेच ही योजना लोकप्रिय ठरत आहे.

योजनेअंतर्गत दरमहा 9250 रुपये मिळतील

जर तुम्हाला एमआयएस योजनेतून दरमहा 9250 रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला संयुक्त खात्याद्वारे 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर 7.4 टक्के व्याजदराने तुम्हाला पाच वर्षांसाठी 9250 रुपये मासिक उत्पन्न मिळेल. परंतु जर तुमचे खाते संयुक्त नसेल तर तुम्हाला 9 लाख रुपये गुंतवता येतील. असे केल्यास तुम्हाला दरमहा 5550 रुपये मासिक उत्पन्न मिळेल.

तुम्हाला इतके व्याज मिळेल

मासिक योजनेअंतर्गत खाते 1 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पैसे भरून उघडता येते. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक एकल खात्यात 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये करता येते. ज्यावर सरकार दरवर्षी 7.4 टक्के दराने व्याज देत आहे. खास म्हणजे, या योजनेमुळे दर महिन्याला तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीनुसार मासिक उत्पन्न दीले जाईल. यामध्ये जर तुम्ही पाच वर्षे पूर्ण व्हायच्या अगोदरच पैसे काढले तर तुमच्या मूळ रकमेतून 1 टक्के रक्कम कापली जाईल.

Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये बसचा भीषण अपघात; 21 भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Bus accident

Bus Accident| गुरुवारी जम्मू-काश्मीर येथील अखनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी भाविकांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पडल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बस कोसळली 150 फूट खोल खड्ड्यात Bus Accident

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-पूंछ महामार्गावरील अखनूर भागातील चौकी चौरा येथे चुंगी वळणावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे बस थेट 150 फूट खोल खड्ड्यात पडली. त्यावेळी बसमध्ये एकूण 60 प्रवासी होते. ही बस हरियाणातील कुरुक्षेत्र येथून जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे भाविकांना घेऊन निघाली होती. मात्र प्रवासादरम्यानच बसचा मोठा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक बसमध्ये अडकल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धावून आले. यानंतर पोलिसांनाही अपघाताची माहिती कळविण्यात आली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे परिवहन आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बस शिवखोडीकडे जात होती. मात्र चुंगी वळणावरून जात असतानाच कदाचित ड्रायव्हर डुलकी लागली असावी ज्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. कारण की, बस वळण घेण्याऐवजी सरळ पुढे गेली आणि थेट खड्ड्यात पडली. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता जखमींना अखनूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gautami Patil : ‘गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट…’; लोककलावंत गणेश चंदनशिवे स्पष्टच बोलले

Gautami Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gautami Patil) कमी काळात अख्ख्या महाराष्ट्रात गौतमी पाटील या नावाची चर्चा गाजली. लावणीचे कार्यक्रम जाणीव मोठमोठे डान्स शो करून गौतमी पाटील नावाच्या तरुणीने महाराष्ट्रभर ख्याती मिळवली आहे. गौतमी पाटील एक नृत्यांगना आहे मात्र लावण्यवती नाही, असे अनेक लोककलावंतांनी म्हटले. गौतमी जे करते त्याला लावणी म्हणत नाहीत असे वारंवार बोलले गेले. गौतमीच्या नृत्यावर कित्येकांनी आक्षेप घेतला, मात्र, ‘सबसे कातिल……’ असे लौकिक मिळवत गौतमी पाटील हे नाव राज्यभरात गाजताना दिसतंय.

कित्येक लावणी सम्राज्ञी आज घरात बसून आहेत. मात्र, गौतमी पाटील (Gautami Patil) विविध कार्यक्रमांच्या रोज सुपाऱ्या घेताना दिसतेय. अशातच आता लोककलावंत प्रसिद्ध गायक गणेश चंदनशिवे यांनी एका मुलाखतीत गौतमी पाटीलच्या नृत्य शैलीवर स्पष्ट भाष्य केले आहे. ‘लावणी’ हा रुढ प्रकार गौतमी पाटीलने भ्रष्ट केला, असे त्यांनी आपले मत प्रकट करताना या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली आहे. पाहुयात ते काय म्हणालेत?

लावणी भ्रष्ट झाली (Gautami Patil)

गौतमी पाटील आणि तिच्या नृत्यशैलीबाबत बोलताना गणेश चंदनशिवे म्हणाले की, ‘मध्यंतरी गौतमी पाटीलसारखी मुलगी आली. मुळात गौतमी लावणी करत नसून ती करते त्याला आयटम साँग म्हणता येईल. पण, पाहणाऱ्या प्रेक्षकांनी, लोकांनी ते लावणीवर खपवलं आहे. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली. ज्या लावणीने एवढा मोठा इतिहास दिला, त्या लावणीला कुठेतरी एक डाग लागल्यासारखं झालं आहे. पुढे तिच्यावर टीका होऊ लागली, तेव्हा तिने आपण लावणी करत नाही हे स्वत: मान्य केलं’.

लावणीला मोठी परंपरा

पुढे त्यांनी म्हटले, ‘लावणीला मोठी परंपरा लाभलेली आहे. शकुबाई, कोल्हापूरकर बाई, लक्ष्मी बाई, यमूना बाईंकडून या परंपरेला सुरुवात झाली आहे. डोईवरचा पदर ढळू न देता सुलोचना बाईंनी रजत पटावर लावणी गायली. पण आता? तुम्ही आयटम साँग करता, स्टेजवर पाण्याचे फवारे टाकता, त्यात तुम्ही कसे दिसता? (Gautami Patil) साध याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे प्रेक्षकांना लावणीची अशीच परंपरा असेल असे वाटते. त्यातून आमच्यासारखे लोक मार्ग काढत ही परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत’.

‘मला आपल्या मुंबईतील कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचंय की, लावणी करा. परदेशातील मुलींना घेऊन जरी लावणी केलात तरी चालेल. पण, त्यात पारंपारिक फडावरील मुली असतील तर ते भरुन निघेल. कारण, मुळात लावणी कधी अर्धनग्न नव्हतीच. ती नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली आहे. तिची चोळी स्लिव्हलेस नसते. (Gautami Patil) त्यामुळे पाठ दिसत नाही. तिच्या कंबरेला पट्टा असतो आणि कासोट्याचं तिचं पातळ असतं. पायात पाच-पाच किलोचे घुंगरू असतात आणि अशी असते आपली लावणी. जिची संस्कृती जपायला हवी’.

‘तमाशा’चा जन्मच निखळ मनोरंजनासाठी

गणेश चंदनशिवे यांनी तमाशा म्हणजे काय याबाबत सांगताना म्हटले की, ‘तमाशा हा शब्द आपला नाही, हा अरबी शब्द आहे. अरबी भाषेतून तू फारसी भाषेत, तिथून उर्दूत आणि मग मराठीत येऊन हा शब्ध रुढ झाला. पूर्वी तमासा असं म्हटलं जायचं. जेव्हा मोगल उत्तरेतून दक्षिणेत आले तेव्हा ते पेशे वगैरे पाहात असत. अशाप्रकारे मोगलांनी तमाशा हा शब्द रोजच्या व्यवहारात आणला. तमाशाचा खरा अर्थ म्हणजे, ‘तमो गुणाचा जो नाश करतो तो’. तमाशाचा जन्मच निखळ मनोरंजनासाठी झाला आहे. मात्र, जे तमाशाला नावं ठेवतात त्यांनी अण्णाभाऊ साठेंचे तमाशे पाहिले पाहिजेत, काळू बाळूचा तमाशा पाहायला हवेत’. (Gautami Patil)

Mental Stress : मानसिक ताण- तणावामुळे बिघडतंय मॅरीड लाईफ? ‘या’ टिप्सच्या मदतीने होईल सगळं सुरळीत

Mental Stress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Stress) वैवाहिक आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राईड. जी दोघांनी मिळून एन्जॉय करायची असते. तो घाबरला तर तिने धीर द्यायचा आणि ती घाबरली तर त्याने सांभाळून घ्यायचं. वैवाहिक आयुष्य हे बऱ्याच चढ- उत्तरांनी भरलेले असते. त्यामुळे नवरा बायकोने एकमेकांना सावरून, सांभाळून घ्यायलाच हवं. नाहीतर गाडी चालवताना एखाद चाक निखळलं तर गाडीची जी अवस्था होईल तीच आपल्या आयुष्याची होऊ शकते. बऱ्याच जोडप्यांमध्ये अगदी क्षुल्लक गोष्टींमुळे भांडण होत असत. ज्यामुळे दोघांमध्ये मानसिक ताण तणाव वाढतो आणि याचा परिणाम थेट त्यांच्या नात्यावर होत असतो.

याशिवाय बऱ्याचदा कामाचा वाढणारा ताण आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळेसुद्धा आपला पार्टनर टेन्शनमध्ये असू शकतो. बऱ्याच चिंता एकावेळी त्रास देत असल्यामुळे अनेकदा त्याची चिडचिड होते. तो नेहमीच रागावतो असे नाही पण जेव्हा रागावतो तेव्हा ऐकायच्या मनस्थितीत नसतो. (Mental Stress) बऱ्याचदा असे लोक संवाद टाळतात, एकत्र राहू लागतात, यामुळे वैवाहिक आयुष्यात अडचणी येऊ लागतात. जर तुमच्याही आयुष्यात अशी स्थिती निर्माण झाली असेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला काही टिप्स देतो. त्यांचा वापर करा आणि पुन्हा एकदा आनंदी तसेच सुखी वैवाहिक जीवन जगा.

पार्टनरची चिंता समजून घ्या (Mental Stress)

तुमचा जोडीदार निराश, हताश आणि चिंताग्रस्त दिसत असेल तर, सगळ्यात आधी त्याची समस्या काय आहे? हे समजून घ्या. त्याला नेमकी कशाची काळजी वाटते आहे हे जाणून घ्या. यामुळे तुम्हाला त्याची वा तिची समजूत काढणे सोपे जाईल. शिवाय त्याने किंवा तिने तुमच्याशी समस्येबाबत चर्चा केल्यास त्याचा ताण हलका होईल. आपल्या पार्टनरची समस्या ऐकून घेताना संयमाने घ्या आणि तो जे बोलतोय ते नीट ऐका. त्याला त्रास होतोय असे जाणवल्यास विषय थांबवा आणि विषयांतर करा.

वेळ घ्या, संयम ठेवा आणि संवाद साधा

जर तुमचा पार्टनर एखाद्या समस्येने त्रासला असेल तर त्याची समस्या समजून घ्या आणि त्यावर त्याच्याशी चर्चा करा. संवादातून बरेच प्रश्न सुटतात. कदाचित तो तुम्हाला त्याची समस्या सांगून तणावमुक्त फील करू शकतो. (Mental Stress) त्यामुळे त्याची समस्या संयमाने हाताळा. तो तुमच्यासाठी आणि तुम्ही त्याच्यासाठी खास आहात हे त्याला फील होऊ द्या. आपल्या पार्टनरला घेऊन फिरायला जा. शांत आणि निवांत वेळ घालवा आणि मग संवाद साधा. असे केल्यास त्याचा ताण नक्कीच हलका होऊ शकेल.

निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा

जर तुमचा पार्टनर दिवसेंदिवस अबोल आणि अव्यक्त होत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर सगळ्यात आधी तुम्ही त्याच्याशी संवाद वाढवा. काही केल्या तो मिसळत नसेल तर थेट फिरायचा प्लॅन करा. (Mental Stress) एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वा सुंदर स्पॉटला विझिट करा. नैसर्गिक सौंदर्य आणि ताज्या हवेचा त्याला दिलखुलास आनंद घेऊ द्या. कदाचित त्याच्या मेंदू आणि मनावरील ताण कमी होईल.

तज्ञांचा सल्ला

बरेच प्रयत्न करूनही जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर कोषातून बाहेर येत नाहीये. तर त्वरित मानसिक तज्ञ वा थेरपिस्टची मदत घ्या. यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरला समजवून सांगावं लागेल की, तो आजारी नाहीये. (Mental Stress) त्याला केवळ मनःशांतीची गरज आहे आणि म्हणून काऊन्सिलरचे सेशन अटेंड करायचे आहे. ज्यामध्ये तुम्हीही त्याच्यासोबत असाल. असे केल्यास तज्ञ तुम्हाला या समस्येतून बाहेर येण्याचे मार्ग सुचवतील.

मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय; महात्मा गांधींवरील ‘त्या’ विधानावरून पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

prithviraj chavan on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 चा गांधी (Mahatma Gandhi) चित्रपट होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्यानंतर विरोधकांनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना त्यांच्या या विधानाबाबत चोख प्रत्युत्तर दिले होते, आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदींसारखी व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, हे आपलं दुर्देवं आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हंटल आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांचे शिक्षण बेताचं झालं आहे किंवा त्यांचे शिक्षण झालेलं नाही, असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे, याची त्यांना जाणीव नाही. खर तरं सिनेमा बघूनच त्यांची आणि महात्मा गांधींची ओळख झाली असावी आणि ते सिनेमा बघून खूप प्रभावित झाले असावे, त्यामुळे जग महात्मा गांधींना सिनेमा बघून ओळखू लागले, असं हास्यास्पद विधान त्यांनी केलं आहे, खरं तर मोदींना आता बोलायला काही मिळालं नसल्याने त्यांनी गांधींवर राग काढला आहे. अशी व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, हे आपलं दुर्देवं आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.

महात्मा गांधी म्हणजे सूर्य – राहुल गांधी

राहुल गांधींनी सुद्धा मोदींच्या महात्मा गांधींवरील विधानावर समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर याबाबत एक विडिओ शेअर करत म्हंटल, “ज्यांच्या जगाचा दृष्टिकोन शाखांमध्ये तयार होतो ते गांधीजींना समजू शकत नाहीत. असे लोक गोडसेला समजतात… गोडसेच्या मार्गावर चालतात. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन, हे सर्व लोक महात्मा गांधींपासून प्रेरित आहेत. भारतातील कोट्यवधी लोक महात्मा गांधींचा मार्ग अवलंबून सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबतात.” ही लढाई सत्य आणि अहिंसेसाठी आहे… ती हिंसा आणि अहिंसेवर आहे… जे लोक हिंसा करतात त्यांना सत्य समजू शकत नाही असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.

महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. बापूंनी जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

Side Effects Of Eating Bitter Gourd : बहुगुणी कारल्याचे अतिसेवन करू शकते आरोग्याचे नुकसान; होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

Side Effects Of Eating Bitter Gourd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Bitter Gourd) उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असणे गरजचे असते. यामध्ये बऱ्याचदा न आवडणाऱ्या भाज्यांचा सुद्धा आवर्जून समावेश करावा लागतो. यामध्ये कडू कारल्याचं नाव पहिलं समोर येतं. बऱ्याच लोकांना कारलं खायला आवडत नाही. पण कारल्याचे सेवन केल्यास मिळणारे फायदे इतके आश्चर्यकारक आहेत की, ते टाळून उपयोग नाही. त्यामुळे बरेच लोक आवडत नसलं तरीही फायदेशीर आहे म्हणून कारलं खातात.

तर काही लोक कारल्याच्या प्रभावी गुणांना भाळून त्याचे अति सेवन करतात. खास करून मधुमेही. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे असे लोक वारंवार कारल्याचा कडू रस पिताना दिसतात. निश्चितच कारल्याचा रस पिणे फायदेशीर आहे. (Side Effects Of Eating Bitter Gourd) पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे जर तुम्हीही कारल्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करत असाल तर सावधान!! तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. चला या विषयी अधिक माहिती घेऊया.

मधुमेहींसाठी कारलं म्हणजे वरदान

कारल्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आणि तत्वे समाविष्ट असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खास करून मधुमेहाचा त्रास असणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक लाभ होतो. (Side Effects Of Eating Bitter Gourd) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कारले बरेच प्रभावी ठरते, असे काही संशोधनातून समोर आले आहे. म्हणून कारल्याचे अतिसेवन करणे हा काही उपाय असू शकत नाही.

हायपोग्लायसीमियाचा धोका वाढू शकतो

मधुमेहींनो सतत कारलं खाल्ल्यामळे किंवा त्याचा रस प्यायल्याने फायदा कमी आणि तोटा जास्त होईल हे लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचा मधुमेह नियंत्रणात असेल किंवा डायबिटीजची लेव्हल कमी असेल तरीही तो जर कारल्याचे सेवन करत असेल तर डायबेटिजची लेव्हल कमी होऊन हायपोग्लायसीमियाची स्थिती निर्माण होऊ शकते. (Side Effects Of Eating Bitter Gourd) जे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारल्यात असे गुणधर्म असतात जे शरीरातील इन्सुलीनची लेव्हल कमी करतात. ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कमी होते. त्यामुळे कारले प्रीडायबेटिक किंवा मधुमेहावर उपचार नसून ते केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, हे समजून घ्या.

इतर धोके (Side Effects Of Eating Bitter Gourd)

गरोदर स्त्रियांनी कारल्याचे अधिक सेवन कधीच करू नये. असे केल्यास त्याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो. शिवाय कारले रोज खाणाऱ्यांच्या यकृताचे आरोग्य बिघडू शकते. तसेच, कारल्यात लेक्टिन असते. ज्याच्या अति सेवनाने जुलाब आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यदायी फायद्यांसाठी कारल्याचे सेवन प्रमाणात करावे.

इंडियन ऑइलमध्ये 30 रिक्त पदांसाठी मेगा भरती; त्वरीत येथे करा अर्ज

Indian Oil Corporation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 12 पास असणाऱ्या आणि सरकारी नोकरी करून घेणाऱ्या तरुणांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मेगा भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीच्या एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इंडियन ऑइल कडून अर्ज मागवले जात आहे. इच्छुक तरुण भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीच्या एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी किमान 40 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असावी. तसेच, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 17 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असायला हवे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://iocl.com/admin/img/UploadedFiles/LatestJobOpening/Files/f1c6e1081e8241e3ab4af7b8cac120c1.pdf या वेबसाईटला भेट द्यावी.

त्याचबरोबर ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी iocl.com या वेबसाईटला भेट द्यावी. लक्षात ठेवा की अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट आहे. या भरती अंतर्गत सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल. या पदासाठी उमेदवार निवडण्याकरता परीक्षेचे आयोजन केले जाईल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर रिक्त पदांसाठी उमेदवाराची निवड केली जाईल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना 15 ऑगस्टच्या आत अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

अर्ज कसा भरावा??

  • सर्वात प्रथम cai.org वर जावे.
  • त्यानंतर पेजवर दिसत असलेल्या ICAI भरती 2024 – – – – लिंकवर क्लिक करावे.
  • त्यासाठी सर्व आवश्यक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • यानंतर अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • पुढे अर्जाची प्रिन्ट काढून तुमच्याकडे ठेवा.

Anant Ambani Wedding Date : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात; लग्नपत्रिकेचा फोटो VIRAL

Anant Ambani Wedding Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anant Ambani Wedding Date) गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मध्यंतरी प्री वेडिंग सोहळ्यातील जल्लोष पाहून जो तो अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह सोहळा कसा असेल? याविषयी बोलताना दिसत आहे. या भव्य प्री- वेडिंगनंतर हे जोडपं जुलै महिन्यात सात फेरे घेणार असल्याचे सांगितले जात होते. अशातच आता सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नपत्रिकेचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.

कधी आणि कुठे आहे लग्न? (Anant Ambani Wedding Date)

रिलायन्स ग्रुपच्या मुकेश अंबानी यांचा धाकट्या मुलाचे म्हणजेच अनंत अंबानी यांचे जुलै महिन्यात लग्न पार पडणार आहे. २०२३ मध्ये त्यांचा साखरपुडा राधिका मर्चंटसोबत झाला होता. यानंतर साधारण वर्षभराने म्हणजे आता मार्च २०२४ मध्ये त्यांचे भव्य प्री-वेडिंग फंक्शन पार पडले. ज्याला अनेक दिग्ज मंडळींसह बॉलिवूडकरांनी देखील हजेरी लावली होती.

(Anant Ambani Wedding Date) यानंतर आता अनंत- राधिका यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. येत्या १२ जुलै २०२४ रोजी अनंत आणि राधिका हे लग्न बंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे सगळे विधी मुंबईत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडतील. त्यांच्या लग्नाचे सर्व विधी पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहेत.

३ दिवस होणार कार्यक्रम

एकीकडे अनंत आणि राधिका यांच्या दुसऱ्या प्री- वेडिंग सोहळ्याची चर्चा सुरु आहे. अशातच दुसरीकडे त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. यानुसार शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एकमेकांसोबत सात फेरे घेऊन वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार आहेत. (Anant Ambani Wedding Date) तर शनिवारी १३ जुलै २०२४ रोजी या नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर रविवारी १४ जुलै २०२४ रोजी त्यांच्या लग्नाचं जंगी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.

पाहुण्यांची यादी बरीच मोठी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या परी वेडिंग सोहळ्यासाठी जितकी मंडळी उपस्थित होती त्याहून अधिक मंडळी त्यांच्या लग्नासाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे. माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडचे कलाकारसुद्धा उपस्थित राहणार आहेत. (Anant Ambani Wedding Date) पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट -अनुष्का, विकी- कॅटरिना अशा बड्या स्टार्सची नवे आहेत. शिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प अशा परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीचीदेखील शक्यता आहे.

Motorola G04S : फक्त 6,999 रुपयांत लाँच झाला Motorola चा मोबाईल; कमी पैशात मिळतात भन्नाट फीचर्स

Motorola G04S launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बाजारात दररोज अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल लाँच होत असतात. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना कमी पैशात आणि स्वस्त किमतीत मोबाईल खरेदी करणं परवडत. कमी खर्चात जास्तीत जास्त फीचर्स मिळणारा मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने स्वस्तात मस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Motorola G04S असे या मोबाईलचे नाव असून त्याची किंमत ७००० रुपयांपेक्षाही कमी आहे. आज आपण मोटोच्या या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किंमत सविस्तर जाणून घेणार आहोत

6.6-इंचाचा डिस्प्ले –

Motorola G04S ला 6.6-इंचाच्या HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. मोटोरोलाने या स्मार्टफोन मध्ये T606 प्रोसेसर वापरला असून हा मोबाईल एंड्रॉयड 14 वर आधारित बेस्ड माययूएक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मोटोरोला फोन सिंगल व्हेरिएंट 4GB + 64GB स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम देण्यात आली असली तरी ४ जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने हीच रॅम ८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा -Motorola G04S

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola G04S मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसतिष मोटोचाय या हँडसेट मध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5, ड्युअल-सिम, वाय-फाय 802.11 एसी, ग्लोनास आणि GPS सारखी वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती?

आता राहिला आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मोबाईलच्या किमतीचा.. तर Motorola G04S च्या 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. 5 जून रोजी दुपारी 12 वाजता हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मोटोरोला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.