Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 719

Elephanta Caves : एलिफंटाला जायचंय? थांबा!! आता 4 महिने वाट बघा मग प्लॅन करा; जाणून घ्या कारण

Elephanta Caves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Elephanta Caves) मुंबईजवळ असणाऱ्या घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्ह्स या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे बरेच पर्यटक इथे कायम येताना दिसतात. खास करून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. घारापुरी बेटावरील डोंगरात एकूण ५ लेण्या खोदलेल्या आहेत. ज्या अतिशय सुंदर, आकर्षक आणि कोरीव असल्याने लक्षवेधी ठरतात. इथे जाण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागतो. तुम्हीही या ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल तर थांबा.. आता ४ महिने तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही कितीही ठरवला तरीही एलिफंटाला जाऊ शकणार नाहीये. याविषयी चला सविस्तर माहिती घेऊया.

४ महिने थांबावं लागणार

मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी येथे पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने प्रवास करावा लागतो. हा प्रवास साधारण १ तासाचा आहे. तुम्ही जर येत्या काही दिवसात एलिफंटाला जायचा विचार करत असाल तर आता तुमचा प्लॅन यशस्वी होऊ शकणार नाही. कारण, पावसाळ्याच्या ४ महिन्यांसाठी इथे जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. (Elephanta Caves) त्यानुसार, येत्या १ जून २०२४ पासून पुढचे ४ महिने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही बोट सेवा बंद राहणार आहे. एकतर एलिफंटाला जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. त्यात बोट सेवा बंद झाल्यानंतर इथे जाणं अशक्यच. त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे ४ महिने तुम्हाला एलिफंटाला जाण्याचा प्लॅन करता येणार नाहीये.

एलिफंटा गुंफा (Elephanta Caves)

एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे घारापुरीच्या या प्राचीन लेण्याचे देखील जातं करण्यात आले आहे. या लेण्या महाराष्ट्राच्या वैभशाली इतिहासाच्या साक्षीदार आहेत. या लेणी समुद्राच्या मध्यभागी एका लहानशा बेटावरील डोंगरात कोरण्यात आल्या असून अत्यंत प्राचीन आहेत. एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुंफा या इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण मानले जाते. या लेण्या म्हणजे मध्ययुगीन रॉक- कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहेत.

UNESCO ने दिला जागतिक वारसा स्थानाचा दर्जा

मुंबईपासून सुमारे ६ ते ७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील एका डोंगरात एलिफंटा लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्या चारही बाजुंनी समुद्राने वेढलेल्या आहेत. या ठिकाणी एकूण ७ गुंफा आहेत. (Elephanta Caves) माहितीनुसार, ९ व्या ते १३ व्या शतकात एलिफंटा लेणीची निर्मिती झाली आहे. या लेण्यांना १९९७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला आहे. इथे बौद्धकालीन दगडी कोरीव शिल्पे पहायला मिळतात. शिवाय या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.

Mumbai Local Mega Block: महत्त्वाची बातमी!! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक; वेळापत्रकात मोठे बदल

Mumbai Local Mega Block

Mumbai Local Mega Block| मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून मध्य रेल्वे वर डबल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे 900 पेक्षा अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे आता दररोज प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच हाल होणार आहेत. या बाबतची माहिती मध्य रेल्वेने एक निवेदन जारी करून दिली आहे. तसेच मुंबईतील कंपन्यांना शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आव्हान केले आहे.

रेल्वेचे प्रवाशांना आवाहन (Mumbai Local Mega Block)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई लोकल ट्रेन नेटवर्कच्या प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेने 30 मेपासून मध्यरात्री 63 तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. ज्यामुळे याचा थेट परिणाम मुंबई लोकल ट्रेनच्या सेवेवर आणि मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासांच्या वेळापत्रकावर होणार आहे. परंतु हा मेगा ब्लॉक दुरुस्ती आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी घेण्यात आल्यामुळे मुंबईकरांनी 3 दिवस सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. हा मेगाब्लॉक सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांवर घेण्यात आला आहे. याकाळात प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि रुंदीकरणाची कामे केली जातील.

महत्त्वाचे म्हणजे, 30 मे 2024 ते 3 जून 2024 दरम्यान 63 तासांचा म्हणजेच तीन दिवसांचा मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्थानकादरम्यान असणार आहे. हा मेगाब्लॉक गुरुवारी रात्रीपासून लागू असेल. त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांनी या मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच रेल्वे प्रवासासाठी घराच्या बाहेर पडावे. कारण की, या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात. त्यामुळे महत्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे किंवा गरज नसल्यास प्रवासही करू नये असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहेत.

Sourav Ganguly : सौरव गांगुलीचा गंभीरला विरोध? ट्विट करत BCCI ला दिला थेट इशारा?

GANGULY GAMBHIR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BCCI सध्या भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. बीसीसीआय नव्या कोचची चाचपणी करत असून यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव आघाडीवर आहे. गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात चारचा सुद्धा झाली असून गौतम गंभीरच टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक होईल असं बोललं जात आहे. मात्र त्याच दरम्यान, बीसीसीयायचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेटचा कोच कसा असावा याबाबत गांगुलीने सांगितलं आहे. परंतु त्याचा या ट्विटमुळे गौतम गंभीरच्या नावाला गांगुलीचा विरोध आहे का? अशा चर्चाना बळ मिळत आहे.

काय आहे सौरव गांगुलीचे ट्विट?

कुणाच्याही जीवनात प्रशिक्षकाचं महत्त्व, त्याचं मार्गदर्शन आणि निरंतर प्रशिक्षण कुणाच्याही जीवनाला आकार देणारं असतं, मग ते तो मैदानावर असेल किंवा मैदानाबाहेर, असं म्हटलं. यामुळं कोच आणि संस्थेची निवड समजूतदारपणे करावी, असं गांगुलीनं म्हटलं. गांगुलीने कोणाचं नाव या ट्विटमध्ये घेतलेलं नाही. मात्र एकीकडे गौतम गंभीरचे नाव प्रशिक्षक पदासाठी नक्की मानल जात असतानाच दुसरीकडे गांगुलीने थेट ट्विट केल्याने चर्चाना उधाण आलं आहे. गंभीरच्या नियुक्तीला सौरव गांगुलीचा विरोध आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गंभीरची नियुक्ती जवळपास ठरलीये –

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरचीच निवड नक्की मानली जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि गौतम गंभीर यांच्यात याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर गंभीरने प्रशिक्षक पदासाठी होकार दिला असलयाचे बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 च्या फायनलनंतर जय शाह आणि गौतम गंभीर यांच्यात प्रशिक्षक पदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जय शाह गंभीरला म्हणाले, आता आपल्याला देशासाठी हे करायचे आहे. गौतम गंभीर हा त्याच्या देशभक्तीसाठी ओळखला जातो. त्यांनी अनेक प्रसंगी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यामुळेच त्याने जय शाहचे म्हणणे मान्य केले असून आता तो टीम इंडियात राहुल द्रविडची जागा घेण्यास सज्ज असल्याचे बोललं जात आहे.

गौतम गंभीर भारताच्या लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. २००७ च्या T20 वर्ल्डकप आणि २०११ च्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात गंभीरनेच दमदार खेळ्या करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गौतम गंभीरच भारताचा मुख्य प्रशिक्षक व्हावा अशी . बीसीसीआयची इच्छा होती.

सोशल मीडियावर All Eyes on Rafah ट्रेंड का चालविला जात आहे? यामागील कारण काय??

All Eyes on Rafah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर All Eyes on Rafah ही ओळ ट्रेंडिंगचा भाग बनली आहे. लाखोंपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून All Eyes on Rafah लिहिलेला फोटो शेअर केला आहे. आता सर्वसामान्य लोकच नाहीत तर मोठमोठे सेलिब्रिटीसह राजकीय नेतेही या ट्रेंडचा भाग बनले आहेत. त्यामुळे हा ट्रेंड नेमका का चालवला जात आहे? यामागे नेमके कारण काय आहे? याबाबत लोकांची उत्सुकता वाढली आहे. आज आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.

All Eyes on Rafah कोणी सुरू केला??

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर टॉपला असलेला ट्रेंड All Eyes on Rafah हा आहे. कारण की, राफा हे गाझा पट्टीमधील एक शहर आहे. या शहरावरच इस्रायली लष्कराने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये शेकडोपेक्षा अधिक सर्वसामान्य लोकांचा आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा निषेध नोंदवातच काही मानवी संघटनांकडून आणि WHO पॅलेस्टाईन कार्यालयाचे संचालक डॉ. रिक पेपरकॉर्न यांच्या निवेदनाद्वारे सोशल मीडियावर All Eyes on Rafah हा ट्रेंड चालवला जात आहे. आता या ट्रेंडचा भाग सर्वसामान्य नागरिकांपासून बॉलीवूड कलाकार, क्रिकेट विश्वातील खेळाडूही बनले आहेत. परंतु काही लोकांकडून या ट्रेंडला विरोधी दर्शवला जात आहे.

All Eyes on Rafah ट्रेंड चालवण्याचे कारण काय??

गाझामध्ये स्थित असलेल्या राफा शहराची लोकसंख्या सुमारे 14 लाख आहे. परंतु, इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्या सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक पॅलेस्टिनी लोकांनी राफा शहरात आश्रय घेतला आहे. याचं लोकांच्या तंबूंवर इस्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळेच अनेक लोकांना आपला जीव ही गमवावा लागेल. त्यामुळे जगभरातून इस्रायलच्या या कृत्याचा निषेध दर्शवला जात आहे. All Eyes on Rafah हा देखील निषेधचा एक भाग आहे.

ट्रेंडमध्ये कोणाचा सहभाग??

बॉलीवूड कलाकारांमध्ये आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, करीना कपूर, वरुण धवन, रश्मिका मंदान्ना, सोनाक्षी सिन्हा, समंथा रुथ प्रभू, तृप्ती डिमरी, दिया मिर्झा आणि रिचा चढ्ढा या सर्वांनी आपल्या सोशल मीडियावरून All Eyes on Rafah हा फोटो शेअर केला आहे. तर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, इरफान पठाण हे देखील या ट्रेंडचा एक भाग बनले आहेत.

Eknath Shinde : परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा; मुख्यमंत्र्यानी शेअर केला साताऱ्यातील गावाचा खास व्हिडिओ

Eknath Shinde Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde In Satara) हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे शेतात रमले असून त्यांनी आपल्या शेतीतील विडिओ सुद्धा शेअर केला आहे. मात्र या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा असं म्हणत ठाकरेंच्या परदेशवारीवर शिंदेनी निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेनी काय म्हंटल?

परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारीवसे जिथे विठूरायाची पंढरी…
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच यावेळी त्यांनी साताऱ्यातील आपल्या शेतीतील मनमोहक दृश्ये व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली.

ठाकरेंना टोला –

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेचे हे ट्विट म्हणजे उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोमणा असल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या परदेशवारीवरून ठाकरेंना टोला लगावला होता. आपल्याला परदेशात जाण्याची गरज नाही कारण माझ्यासमोर भरपूर कामे आहेत असं मागील आठवड्यातच शिंदेनी म्हंटल होत.

Vanchit Bahujan Aaghadi : महाराष्ट्रात 48 पैकी वंचितची ‘या’ मतदारसंघात सरशी होतेय; धक्कादायक निकाल

vanchit bahujan aaghadi lok sabha election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास दहा ते बारा मतदारसंघात लाखांहून अधिकची मतं मिळवून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) आपली ताकद दाखवून दिली होती. यातल्या तब्बल सात ते आठ जागांवर घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या हक्काच्या जागा पडल्या होत्या. याचा फायदा अर्थातच भाजपला झाला होता. या गोष्टीमुळे वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा नेहमी आरोप झाला. याचीच खबरदारी घेत भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. अनेक चर्चांची सत्र झाली, बैठका झाल्या पण जागावाटपात योग्य सन्मान न मिळाल्यामुळे आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. 2019 प्रमाणे यंदा वंचितची लाट नसली तरी अनेक मतदारसंघात वंचितचे उमेदवार निवडून येत खासदार होऊ शकतात. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना पाणी पाजत वंचितचे कुठले उमेदवार खासदार बनण्याचे चान्सेस जास्त आहेत? तेच पाहूयात

वंचितनं महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा या आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास सगळ्यांनाच वाटू लागला. यामागचं प्रमुख कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) मानणारा मोठा जनसमुदाय. दलित, अल्पसंख्यांक आणि मुस्लिम समाज ही वंचितची ताकद आहे. पाहायला गेलं तर हा तसा पूर्वीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी राहणारा समाज घटक… पण वंचितनं एक नवा पर्याय दिल्यापासून हे व्होट ट्रान्सफर काँग्रेसकडून वंचितकडे झालं… याचाच मोठा फटका काँग्रेसला 2019 मध्ये बसला. जवळपास दहा ते बारा जागा अशा होत्या की जिथे काँग्रेसने आरामात विजयाचा गुलाल कपाळाला लावला असता. पण वंचितच्या उमेदवारांमुळे झालेल्या मत विभाजनाचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला. म्हणूनच 2024 मध्ये दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं होता कामा नये, यासाठी त्यांनी महाविकास आघाडीसोबत तिकीट वाटपाची बोलणी चालू ठेवली. पण बऱ्याच गोष्टींवरून खटके उडाल्याने अखेर आघाडी फिस्कटली. आणि वंचितला स्वतंत्र उमेदवारी द्यावी लागली. यातही काही जागांवर मतदानानंतर वंचितच्या उमेदवारांच्या विजयाचे चान्सेस जास्त दिसतायेत…

त्यातला पहिला मतदारसंघ आहे अकोल्याचा…

अकोल्याची लढत वंचित फॅक्टरमुळे इंटरेस्टिंग राहिली. भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात असल्याने अकोल्यात खासदारकीसाठी काटे की टक्कर पाहायला मिळाली. गेल्या वेळेस आंबेडकरांनी अकोल्यातून दोन नंबरची मतं घेतली होती. तर काँग्रेस तीन नंबरला फेकला गेला होता. यावेळेस विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे याला लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि जिल्ह्याच्या राजकारणात वैद्यकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील वजनामुळे अभय पाटील हे धोत्रेंच्या विरोधात मैदानात होते. आंबेडकरांच्या पाठीशी असणारा अडीच ते तीन लाख हक्काचा मतदार असल्याने आंबेडकर निवडणूक जिंकले नसले तरी भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यात त्यांनी वळती करून घेतलेली मतं निर्णायक ठरली. यंदा मात्र वंचितनं काहीही झालं तरी आंबेडकरांना दिल्लीत पाठवायचंच यासाठी अकोल्यात फिल्डिंग लावली होती. त्यात विरोधातले दोन्ही उमेदवार हे मराठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरील मत विभाजनाचा फटका हा आंबेडकरांच्या पथ्यावर बसू शकतो. त्यामुळे भाजपची दोन टर्मची खासदारकी मोडीत काढत प्रकाश आंबेडकर इथून खासदार होण्याचे चान्सेस जास्त वाटतायेत.

जा दुसऱ्या मतदारसंघात वंचितच्या जिंकण्याची चान्सेस जास्त आहेत तो मतदारसंघ आहे रामटेकचा…

रामटेक हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ. इथून शिंदे गटाने राजू पारवे तर काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी देऊ केली होती. पण त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं त्यांच्या ऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर वंचितनं इथून गजभिये यांना पाठिंबा देऊ केलाय. 2019 च्या निवडणुकीत गजभिये यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत भाजपच्या कृपाल तुमाने यांना चांगलाच घाम फोडला होता. मात्र तरीही यंदा त्यांचे तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे नाराज गजभिये यांनी वंचितच्या मदतीने अपक्ष म्हणून लढत दिली. रामटेक मधील दलील, वंचित आणि मुस्लिम समाजाचा वंचितला मोठा पाठिंबा आहे. आंबेडकरांनीही रामटेक मधून गजभियेंच्या पाठीशी मोठी ताकद लावल्यानं दलित समाजाची एकगठ्ठा मतं ही गजभियेंना रेसमध्ये ठेवणारी असल्यामुळे वंचित रामटेकमध्येही चार तारखेला काँग्रेस आणि शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकते…

वंचितचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असणारा तिसरा मतदारसंघ म्हणजे शिर्डी…

शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात दुहेरी लढत होणार याची चर्चा असताना वंचितने इथून मोठा गेम खेळला. मूळच्या काँग्रेसमध्ये असलेल्या उत्कर्षा रूपवते यांचा पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना शिर्डीची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हा मतदारसंघ जिंकण्यासाठी अटीतटीचा बनला. तसं कागदावर बघायला गेलं तर वंचितची शिर्डी मतदारसंघातील ताकद तशी कमी आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे इथला नाराज काँग्रेसी मतदार हा उत्कर्षा रूपवते यांच्या पाठीशी उभा राहिला असावा. दलित समाज प्लस, वंचितचा कोअर मतदार, काँग्रेसी मतं आणि रूपवते यांची वैयक्तिक लागलेली ताकद अशी सगळी गोळाबेरीज करून पाहिली तर वंचित शिर्डी मधून निवडणूक जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत…

यात आणखीन एक इंटरेस्टिंग लढत होती ती पुण्याची…

तसं बघायला गेलं तर पुण्यातील मुख्य लढत ही मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी असली तरी वसंत मोरे यांच्या उमेदवारीने या निवडणुकीला नवा रंग आला. वंचितचा हक्काचा मतदार आणि वसंत मोरे यांची ताकद जास्त असली तरी दोघांना पिछाडीवर सोडत जिंकून येईल इतका जनाधार मोरेंच्या मागे नव्हता. मात्र पुण्यातील लढत फक्त दुहेरीच होऊ नये यासाठी त्यांनी पुरेपूर काळजी घेतल्याचं मतदानाच्या दिवशी आढळून आलं. मोरे पुण्यात सरशी करणार नसले तरी वंचितला पडणारी मतं ही पुण्यात निर्णायक ठरतील, असेही बोललं जातंय…

हातकणंगले मध्येही 2019 मध्ये वंचितने भल्याभल्यांना घाम फोडला होता. यासाठी 2024 साठी त्यांनी डीसी पाटील यांच्यावर विश्वास ठेवत हातकणंगलेची उमेदवारी देऊ केली. पण इथल्या लढतीला चौरंगी स्वरूप आल्यानं इथून मुख्य प्रादेशिक पक्षांवरच सर्वांचा फोकस राहिला…स्वाभिमानी कडून राजू शेट्टी, शिंदे गटाकडून धैर्यशील माने, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील या तीन मातब्बरांच्या उमेदवारीने वंचितला मतदारसंघात प्रचाराला जास्त स्कोप मिळाला नाही. पण इथेही वंचित प्रभावी वोट शेयर आपल्याकडे खेचून आणेल, असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत…तर हे होते असे काही मतदारसंघ जिथे वंचित निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग वाटतेय. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात वंचित किती आणि कोणत्या जागांवरून निवडून येईल? तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा.

Monsoon Update : आला रे आला!! मान्सून केरळात दाखल; हवामान खात्याची माहिती

Monsoon Update Kerala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशासाठी आणि देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२४ चा मान्सून (Monsoon Update) अखेर भारतात दाखल झाला आहे. यंदा २ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं असून तो केरळमध्ये आणि ईशान्य भारतात एकाच वेळी दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेला बळीराजा गेल्या काही दिवसापासून अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट बघत होता, अखेर मान्सून भारतात आला असून शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे.

भारतीय हवामान खात्याने ट्विट करत म्हंटल कि, नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि आज 30 मे 2024 रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकला आहे. मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात मध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस ५ जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये १० जूनपर्यंत मान्सून दाखल (Monsoon Update) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बळीराजाला होणार फायदा – Monsoon Update

भारताच्या शेतीसाठी हा मान्सून खूप महत्त्वाचा आहे, कारण देशातील 52 टक्के लागवडीयोग्य क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे. तसेच, देशभरातील पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेले जलाशय भरण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जून आणि जुलै हे शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे मान्सून महिने आहेत कारण खरीप पिकांच्या बहुतेक पेरण्या याच काळात होतात. त्यामुळे वेळेत मान्सून दाखव व्हावा अशी इच्छा देशभरातील बळीराजाची असते.

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; त्या रात्री सुनील टिंगरेंना विशाल अग्रवालचे 45 कॉल

Sunil Tingre Vishal Agrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Accident) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील सरकारी यंत्रणा, प्रशासनातील अधिकारी, राजकारणी, धनाढ्य यांचे हितसंबंध उघडकीस येऊ लागले आहेत. तसेच आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ कारभार सुद्धा उघडा पडला आहे. त्यातच आता या अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्या अडचणी सुद्धा वाढण्याची शक्यत आहे. खरं तर अपघात झाला त्याच रात्री सुनील टिंगरेंनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हेगाराला वाचवण्यासाठीच टिंगरे यांच्या धावून गेल्याचा संशय व्यक्त होऊ लागला. आता या प्रकरणात नवा उलगडा झाला आहे. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरे याना ७५ मिनिटात तब्बल ४५ वेळा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूज १८नं पोलीस दलातील सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. १९ मे रोजी म्हणजेच अपघात झाला त्या रात्री आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरे याना अवघ्या ७५ मिनिटात तब्बल ४५ कॉल केले, रात्री अडीच ते ३:४५ दरम्यान हे कॉल आले मात्र झोपेत असल्याने त्यांनी ते उचलले नाहीत. परंतु अग्रवाल यांचा त्याच रात्री टिंगरेंना इतके कॉल कसे काय आले अशी शंका निर्माण झाली आहे. तसेच अनेक चर्चाना सुद्धा उधाण आलं आहे. सुनील टिंगरे यांच्यावरील या आरोपांमुळे अजितदादा गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टिंगरे यांचे एकट्या अगरवाल यांच्याशी संबंध नाहीत, तर या प्रकरणात अटक झालेल्या ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरेशीदेखील टिंगरेंचे संबंध आहेत. अजय तावरे यांची पार्श्वभूमी माहित असूनही सुनील टिंगरे यांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती त्याबाबतचे पत्र समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तावरेवर २०२२ मध्ये किडनी तस्करीचा आरोप झाला. यानंतर त्याची अधीक्षक पदावरुन काढून टाकण्यात आलं होते. पण टिंगरेंच्या शिफारसपत्रामुळे तावरे डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा अधीक्षकपदी रुजू झाले . याच तावरेनं पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले आणि पुरावे नष्ट केले.

Supriya Sule : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करण्यात सुप्रियाताई फेल होत आहेत का?

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक पक्षाला सोडून जात आहेत…राष्ट्रवादी बालेकिल्ला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार नेत्या सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करताना खासदार सुप्रिया सुळेंवर केलेले हे गंभीर आरोप… खरंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीची तुतारी महाराष्ट्रात जोरदार वाजणार असल्याचं सगळेजण सांगू लागलेत. अगदी कमी वेळेत हतबल न होता शरद पवारांनी पक्षाची नवी फळी तयार केली… एकनिष्ठांना बळ दिलं. पक्षात नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी देण्याचं शरद पवारांचं धोरण असताना अचानक आता पक्षातीलच तरुण तडफदार नेत्या सोनिया दुहान यांनी केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय …मी फक्त आणि फक्त सुप्रिया सुळेंमुळेच पक्ष सोडतेय, असं म्हणत सोनिया यांनी सुप्रियाताईंच्या नेतृत्व क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलय… मग या सगळ्या टाइमलाईन चा विचार केला तर अजित दादांपासून ते सोनिया दुहानपर्यंत राष्ट्रवादीच्या झालेल्या पडझडीला पवारांचीच मुलगी म्हणजे सुप्रियाताईच जबाबदार आहेत का? सुप्रियाताई आणि त्यांच्या सर्कल मधल्या खास माणसांमुळे शरद पवारांचीही राष्ट्रवादी संपत चाललीय काय? सुप्रिया सुळे पक्ष चालवण्यासाठी खरंच सक्षम नाहीयेत का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहुयात

सुप्रिया सुळे शरद पवारांचा पक्ष संपवतायेत असं बोलण्यामागचं पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीत घडलेला एकूणच घटनाक्रम…

राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी सगळं काही सॉर्टेड होतं. सुप्रियाताई युवती आघाडी सांभाळत बारामतीच्या खासदार म्हणून काम पाहत होत्या. पक्ष विस्तार करणे, पक्षाचे नेतृत्व करणं हे सगळं काही एक वेगळीच टीम पाहत होती. पण जेव्हा पक्ष पुढच्या पिढीकडे हस्तांतर करण्याची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी अजितदादांपेक्षा सुप्रिया ताईंना झुकतं माप दिलं. खरं तर आपल्याला पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी इच्छा अजितदादांनी त्याआधीच अप्रत्यक्षपणे पक्षाच्या एका मेळाव्यात बोलून दाखवली होती. आमदार खासदार, पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कनेक्ट हा सुप्रिया ताईंपेक्षा दादांकडे जास्त होता. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकल्यानंतर घडलेल्या नाट्यात अजितदादांनी दाखवलेला डॉमिनन्स आणि सुप्रिया तू बोलू नको, मोठा भाऊ म्हणून तुला सांगतोय… असं दादांनी केलेलं स्टेटमेंट हे सगळं पाहता अजितदादा यांच्याकडे नेतृत्वाची कमान सोपवण्यात येईल, असं सगळ्यांनाच वाटत होतं. पक्षातील अजितदादा गटही मोठा असल्याने अजितदादांना झुकतं माफ देण्यात यावं असा एकूणच पक्षातील अनेक नेत्यांचा सुर होता. मात्र शरद पवारांनी कार्यकारणीची फोड केली आणि त्यात सुप्रिया ताई यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा म्हणून जाहीर केलं. त्यांच्यासोबत इतर नेत्यांनाही कार्यकारणीत घेण्यात आल्यावर अजितदादांना यात मात्र कुठेही स्थान नव्हतं. अध्यक्षपदासाठी दादा रेसमध्ये उजवे असतानाही सुप्रियाताईंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे दादा गटाचा नाईलाज झाला. आणि त्यांनी मोठं पाऊल उचलल्याचं अनेकजण सांगतात.

दुसर कारण सोनिया दुहान यांनी सांगितलं ते नेतृत्व क्षमतेबद्दल…

कामाचा माणूस म्हणून अजितदादांची महाराष्ट्रात ओळख आहे. अजितदादा सर्वसामान्यांसाठी इझीली अवेलेबल असतात. जनतेची काम तिथल्या तिथे निकालात काढण्याची त्यांची स्टाईल सर्वांनाच माहित आहे. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला फोडलेला घाम असो की उपमुख्यमंत्रीपदावर असताना केलेली कामं आमदारांपासून ते स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना दादांच्या नेतृत्व आणि कार्यक्षमतेवर विश्वास होता. दुसरीकडे सुप्रियाताईही राजकारणात असल्या तरी खासदार म्हणून त्यांचं असणारं काम त्या चोख बजावत होत्या. सुप्रियाताई निधी आणून अजित दादांकडे सोपावत होत्या. याला प्रतिवाद करताना अजितदादांच्या कार्यक्षेत्रात आपण ढवळाढवळ करायची नाही असा युक्तिवाद त्या करत असल्या तरी यामुळे नकळत अजितदादा यांची स्थानिक राजकारणावरच्या पकडीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे नेतृत्व क्षमतेचा फिल्टर लावायचा झालाच तर सुप्रिया ताईंपेक्षा अजितदादा उजवे असताना त्यांना केवळ ताईंच्या हट्टापोटीच डावलण्यात आल्याचा आरोप अजितदादा गटाकडून करण्यात येतो. त्यामुळे शरद पवारांनी वाढवलेल्या राष्ट्रवादीला पक्ष फुटीचा जो मेजर झटका बसला तो मुलीच्या प्रेमापोटी बसला असाही दादा गटाचा आरोप असतो.

शेवटचं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे सुप्रिया सुळे समर्थक गट.

राष्ट्रवादीत स्पष्ट दिसत नसली तरी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक असे दोन गट होते. सुप्रिया सुळे गटातील नेत्यांना शरद पवारांचा हा डायरेक्ट ऍक्सेस असायचा. पण अजित पवार गटातील नेत्यांना आपला प्रश्न आधी अजित दादांकडेच मांडावा लागायचा. यातून या दोन गटातील चढाओढ आणि इर्षा वाढत गेल्याचं अनेकजण सांगतात. प्रत्यक्ष पक्ष फुटीनंतर कोण कुठल्या गटात आहे हे चित्र स्पष्ट झालं. तेव्हा त्यांचा एकमेकांविषयी असणारा आकस त्यांनी उघडपणे बोलायला सुरुवात केली. सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत. सुप्रियाताईंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचं, हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करत आहेत. पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दूहान यांनी केलेल्या या आरोपांमुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील सुप्रिया ताईंच्या जवळच्या नेत्यांकडूनच उरल्या सुरल्या पक्षातीलही काम करणाऱ्या नेत्यांवर प्रेशर टाकण्यात येतय, असा आरोप दूहान यांनी केल्यामुळे आता सुप्रियाताई चांगल्याच अडचणीत आल्या आहेत…

हे पण वाचा : भाजपने ताकद लावूनही इथल्या दिग्गज नेत्यांचा पराभव होतोय

सोनिया दुहान यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे. जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते. अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते. त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या. त्यामुळे पक्षातील डॅशिंग नेतृत्व पक्ष सोडून जात असल्याने शरद पवार गटासाठी ही गोष्ट नक्कीच विचार करायला भाग पाडणारी आहे…शेवटी सुप्रियाताईंच्या अतिमहत्वकांक्षेमुळेच शरद पवारांचा पक्ष संपत चाललाय? असा करण्यात येणारा आरोप तुम्हालाही पटतो का? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

महात्मा गांधी हे सूर्य आहेत, त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 चा गांधी (Mahatma Gandhi) चित्रपट होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको असं राहुल गांधी यांनी म्हंटल.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर याबाबत एक विडिओ शेअर करत म्हंटल, “ज्यांच्या जगाचा दृष्टिकोन शाखांमध्ये तयार होतो ते गांधीजींना समजू शकत नाहीत. असे लोक गोडसेला समजतात… गोडसेच्या मार्गावर चालतात. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन, हे सर्व लोक महात्मा गांधींपासून प्रेरित आहेत. भारतातील कोट्यवधी लोक महात्मा गांधींचा मार्ग अवलंबून सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबतात.” ही लढाई सत्य आणि अहिंसेसाठी आहे… ती हिंसा आणि अहिंसेवर आहे… जे लोक हिंसा करतात त्यांना सत्य समजू शकत नाही असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.

महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. बापूंनी जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

मोदी काय म्हणाले होते ?

ABP या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी दावा केला होता कि महात्मा गांधी हे जगाचे महान आत्मा होते. गेल्या 75 वर्षात महात्मा गांधींबद्दल जगाला सांगण्याची जबाबदारी आपली नव्हती का? त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मला माफ करा, पण पहिल्यांदाच त्यांच्याबद्दलची उत्सुकता जगात वाढली जेव्हा गांधी हा चित्रपट बनला. जर जग मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांना ओळखत असेल तर गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते आणि तुम्हाला हे मान्य करावे लागेल. जगभर फिरल्यानंतर मी हे सांगत आहे असेही मोदींनी म्हंटल.