Real Estate : देशात रिअल इस्टेट ट्रेंड बदलत चालल्याचा दिसतो आहे. गृहनिर्माण क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यमापन केले असता. महत्वाची माहिती समोर आली आहे. मागच्या काही वर्षात गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल चांगलीच वाढली आहे. याबाबतच माहिती समोर आली असून देशातील विक्री न झालेल्या घरांची संख्या गेल्या ६ वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. एकट्या दिल्लीचा विचार केला तर दिल्ली-एनसीआरमध्ये न विकल्या गेलेल्या घरांच्या (Real Estate) यादीत 57 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. ॲनारॉकच्या नुकत्याच आलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
5 वर्षांत विक्री न झालेल्या घरांच्या यादीत घट
ॲनारॉकने सांगितले की, 2018 च्या पहिल्या तिमाहीत न विकल्या गेलेल्या घरांच्या यादीची संख्या 2 लाख युनिट्स होती, जी 2024 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी 86,420 युनिट्सवर आली आहे. म्हणजे पाच वर्षांत त्यात मोठी घट झाली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांत घरांच्या विक्रीत (Real Estate) प्रचंड वाढ झाली आहे.
काय सांगते आकडेवारी (Real Estate)
दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या 5 वर्षांत न विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येत 57 टक्के घट झाली आहे. याशिवाय कोलकात्यात न विकल्या गेलेल्या इन्व्हेंटरीमध्येही 41 टक्क्यांनी घट झाली आहे. तर दक्षिण भारतात सरासरी 11 टक्क्यांनी आणि पश्चिम भारतात म्हणजे मुंबई, पुण्यात 8 टक्क्यांनी घटली आहे. याचवेळी दक्षिणेकडील बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईत या शहरांत मिळून ही संख्या 1 लाख 96 हजारांवरून 1 लाख 76 हजारांवर आली आहे. हैदराबादमध्ये नवीन घरांच्या पुरवठ्यात गेल्या 6 वर्षांत चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे विक्री न झालेल्या घरांची संख्या अधिक दिसत आहे. केवळ बंगळुरूचा विचार करता 6 वर्षांत विक्री न झालेल्या घरांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. मुंबई आणि पुण्याचा विचार करता विक्री न झालेल्या घरांची संख्या 6 वर्षांत 3 लाख 13 हजारांवरून 2 लाख 90 हजारांवर आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना अनारॉक ग्रुपचे उपाध्यक्ष संतोष कुमार यांनी सांगितले की, दिल्लीत नवीन घरांचा पुरवठा विकासकांनी नियंत्रणात ठेवल्याने विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी (Real Estate) होण्यास मदत झाली. देशभरात नवीन घरांचा पुरवठा वाढत असताना विक्री न झालेल्या घरांचे प्रमाण कमी होत असून, गृहनिर्माण क्षेत्राची आगेकूच त्यातून दिसून येत आहे.
IAF Agniveer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची नोकरीचे अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय संरक्षण दलांतर्गत (IAF Agniveer Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. ही भरती अग्निर्वायू संगीतकार या पदासाठी निघालेली आहे. या पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 22 मे 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर 5 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
महत्त्वाची माहिती | IAF Agniveer Bharti 2024
पदाचे नाव – अग्नीवीर वायू संगीतकार
वयोमर्यादा – 18 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2024.
शैक्षणिक पात्रता – दहावी पास
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.
South Eastern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय उत्तम संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत मॅनेजर या पदाचा रिक्त जागा आहे. या पदाच्या एकूण 1202 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महत्त्वाची माहिती | South Eastern Railway Bharti 2024
पदाचे नाव – ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)
पदसंख्या – 1202 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 ते 47 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024
पदाचे नाव पद संख्या
ALP – 827
ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) – 375
वेतनश्रेणी
ALP – (5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC
ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) – (5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC
अर्ज कसा करावा | South Eastern Railway Bharti 2024
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Drinks) गेल्या काही दिवसात ऊन इतकं वाढलंय की, सूर्य कोणत्या जन्माचा राग काढतोय तेच समजेना. उन्हाचे चटके इतके बेकार आहेत की, बस रे बस. अलीकडेच अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. दरम्यान, उष्माघाताने त्रासलेली अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत. अशा गरमीच्या दिवसांमध्ये थंड पेय प्यावी असे सगळ्यांनाच वाटते. पण, अशा दिवसात नुसती थंड नव्हे तर शरीराला आतून थंड करतील अशी पेय पिणे गरजेचे असते. ज्यामुळे गरमीचा त्रास होत नाही. चला तर अशा काही आयुर्वेदिक पेयांविषयी जाणून घेऊया.
कोरफडीचा रस (Summer Drinks)
कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. जिचा अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदा आहे. सुदृढ आणि निरोगी आरोग्य देणाऱ्या कोरफडीचा रस उन्हाळ्याच्या दिवसात पिणे अत्यंत लाभकारी ठरतो. कारण यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स तसेच अँटीऑक्सिडंट्स शरीराला आतून थंड करून पचनसंस्था सुधारतात. यामुळे पोटाच्या समस्या देखील होत नाहीत. शिवाय रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते.
आवळ्याचा रस
आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी वरदान समजले जाते. (Summer Drinks) कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर पोषक तत्वे असतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवून संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. शिवाय यातील दाहक विरोधी गुणधर्म आणि फायबर पचनसंस्था निरोगी राखतात.
बेलचा रस
बेल फळाचा रस चवीला खूप चांगला आणि आरोग्यासाठी अमृत मानला जातो. (Summer Drinks) याचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि यातील पाचक एन्झाईम्स व फायबर पचनसंस्था निरोगी ठेवतात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या जाणवत नाहीत. शिवाय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य देखील सुधारते.
कारलं आणि जांभळाचा रस
गरमीच्या दिवसात उष्णेतेपासून वाचायचे असेल तर कारले आणि जांभूळ मिश्रित रस जरूर प्या. या रसामुळे ग्लुकोजची पातळी स्थिर राहते. शिवाय स्वादुपिंड निरोगी राहते आणि इतकेच नव्हे तर या रसामुळे उच्च रक्तदाब, अपचन आणि यकृताच्या समस्याही दूर होतात.
नोनी रस
नोनी फळातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाच्या रसाचे सेवन अवश्य करा. (Summer Drinks) याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील कमी होते आणि पचनसंस्थासुद्धा सुधारते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती आणि महाविकास आघाडीत घासून झालेल्या अटीतटीच्या लढतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची…पक्षातील मातब्बर नेत्यांसह पक्षाचं नाव, चिन्ह मिळूनही अजितदादांना तिकीट वाटपात अवघ्या चार जागा पदरात पाडून घेता आल्या. त्यातही शिरूरच्या जागेसाठी अजितदादांना आढळराव पाटलांची शिंदे गटातून तर अर्चना पाटील यांची धाराशिवसाठी आयतवारी करावी लागली. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यानंतर आता राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल इव्हीएममध्ये बंद झालाय. त्यामुळे आता चर्चा सुरू झालीये. कोण कुठून निवडून येणार याची. आता यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला इन मीन चार जागा मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार कुठल्या जागेवरून जिंकून येतायत? की प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांच्या हाती भोपळा उरतोय? तेच तुम्हाला सविस्तर सांगतोय.
पहिली जागा आहे ती शिरूरची (Shirur Lok Sabha 2024) . इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटे की टक्कर झाली .. शरद पवार गटाकडून स्टॅंडिंग खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाने शिंदे गटातून आढळराव पाटलांची निवडणुकीच्या तोंडावर आयातवारी केली… त्यांच्या हातातील शिवबंधन सैल सोडून ऐनवेळी हातात घड्याळ बांधलं… सुरुवातीला अमोल कोल्हे यांच्यासाठी लढत वन साईड वाटत होती. पण आढळरावांच्या एंट्रीने शिरूरची जागा रेसमध्ये आली…गेल्या वेळेस अजितदादा, वळसे पाटील यांनी कोल्हे निवडून यावेत, म्हणून बऱ्याच खस्ता खाल्ल्या होत्या. पण आता हेच नेते विरोधात असल्याने शरद पवारांच्या मदतीने कोल्हेंनी लोकसभेची खिंड एकाकी लढवली..जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पट्टयात कांदा प्रश्न महत्त्वाचा असल्याने कोल्हेंनी कांद्याच्या प्रश्नावरून सरकारला चांगलं कोंडीत पकडलं…जातीचा फॅक्टर कोल्हेंना इथं प्लसमध्ये घेऊन जाणार असला तरी जातीपासून ते थोडे लांबच राहिले.. कारण प्रसिद्ध अभिनेते, कलाकार आणि छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी यांच्यामुळे तयार झालेल्या त्यांच्या इमेजला यामुळे कुठेही धक्का लागला नाही. उलट समाजाने अगदी सायलेंटली कोल्हेंसाठी काम केल्याचं मतदारसंघात बोलले जातय… दुसऱ्या बाजूला कोल्हेंच्या समोर आढळराव पाटलांसारखा कसलेला नेता असतानाही त्यांचं गणितं मात्र बरेच फिस्कटलं.. सलग तीन टर्म धनुष्यबाणाच्या चिन्हावर खासदार राहिलेल्या आढळरावांना इथे निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून हातात घड्याळ घ्यावं लागलं…यामुळे त्यांच्या इमेज ला मोठा धक्का बसला… डमी उमेदवार म्हणून कोल्हे यांनाही यामुळे हातात आयात कोलीत मिळालं. थोडक्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा झालेल्या या शिरूरच्या अटीतटीच्या लढतीत तुतारीचा आवाज सध्या तरी जास्त दिसतोय…
दुसरी जागा आहे ती रायगडची (Raigad Lok Sabha 2024). इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली… घड्याळ विरुद्ध मशाल अशा लढत झालेल्या रायगडमध्ये मतदानाची टक्केवारी घसरताना दिसली… ठाकरेंच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वार ग्रामीण पट्टयातून गीतेंना मोठं लीड देणारं ठरलं.. तर शहरी पट्टयात घड्याळाची चलती होती. तसं पाहायला गेलं तर सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी इथली पारंपारिक लढत… 2019 ला अनंत गीते यांना पराभवाची धूळ चारत तटकरेंनी कोकणात घड्याळाची टिकटिक सुरू केली. पण मधल्या काळात बरच राजकारण बदललं. शिवसेनेतील बंडावेळेस गीते एकनिष्ठ राहिले. तर अजितदादांच्या बंडाला सुनील तटकरे यांनी हवा दिल्याने एकनिष्ठ विरुद्ध बंडखोर अशी यंदाच्या प्रचाराची बेसलाईन होती. कागदावरचं गणित पाहिलं तर तशी तटकरेंसाठी ही तशी एकहाती लढत होती. पण मशालीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेल्या मजबूत हातांनी वारं फिरलं. त्यात शेकापने गीतेंसाठी दिलेला मदतीचा हात रायगडच्या निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचा इथे भरणा असला तरी सामान्य शिवसैनिक हा ठाकरेंच्या बाजूने राहण्याची रायगडमध्ये शक्यता होती. कदम पितापुत्र यांनी रत्नागिरीमधून तर भरत शेठ गोगावले यांनी महाड, पेण मधून ताकद लावल्याने आणि बूथ मॅनेजमेंटवर दिलेला सर्वाधिक भर पाहता रायगडचा निकाल घासून लागेल, असं सध्यातरी दिसतंय. त्यातल्या त्यात अनंत गीते यांचा निसटत्या लीडने रायगडमधून विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय…
आता पाहुयात तिसरा आणि सगळ्यांच्याच चर्चचा मतदारसंघ राहिलेला बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha 2024)… बारामतीची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची होती. इथून फक्त एका मतदारसंघाचा खासदार निवडून येणार नव्हता. तर इथल्या निकालावर खरी राष्ट्रवादी कुणाची? कार्यकर्ते कुणाच्या पाठीशी आहेत? बारामतीचा कौल कुठल्या पवारांना जातोय? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या निकालातून होणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत कन्फर्म झाल्यापासूनच बारामती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात आला. अजित पवार, शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे असे सगळेच पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत होते. अजितदादांनी सहकारी संस्था, कारखाने आणि गाव पातळीवरील स्थानिक नेत्यांचं जाळ मजबूत करत बारामती, इंदापूर आणि दौंड सारख्या भागात आपलं वजन वाढवलं. घड्याळाची छाप सोडली. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेत प्रचाराला वेगळे डायमेन्शन्स आणले. शेवटच्या दिवसात महायुतीची फौज दाखल झाल्याने सुनेत्राताई यांच्या बाजूने पारड झुकताना दिसलं. पण सहानुभूतीचे मत प्लस, शरद पवार समर्थक मतं, भाजप विरोधी मत, अजितदादा विरोधी मत, महाविकास आघाडीच्या प्रभावाखालील मतं, दलित आणि मुस्लिम मत हे सगळं जोडून पाहिलं तर निकाल हा निसटत्या हाताने सुप्रिया ताईंच्या बाजूने लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय…
अजित पवार गट लढत असणारा शेवटची आणि चौथी जागा म्हणजे धाराशिवची (Dharashiv Lok Sabha 2024). इथं देखील रायगड प्रमाणे मशाल विरुद्ध घड्याळ अशी जोराची लढत झाली. शिवसेनेकडून स्टॅंडिंग खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी अजित दादांना बरीचशी चाचपणी करावी लागली… भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला छत्तीसचा आकडा सगळ्यांना माहित आहेच. धाराशिवची निवडणुकही या दोघांच्या अवतीभोवतीच फिरताना दिसते. यंदा मात्र करंट लागावा असं राजकारण बदललं. जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं… त्यामुळे पक्ष आणि चिन्ह बदलले गेले असले तरी ही लढत देखील पाटील विरुद्ध निंबाळकर अशीच झाली. कमळाच्या चिन्हावर मशालीच्या विरोधात उमेदवार उतरवला, तर त्याचा मोठा फटका बसू शकतो, असा कदाचित भाजपाचा अंदाज असावा. म्हणून त्यांनी धाराशिवमध्येही मशालीला थेट भिडण टाळलं…पण तरीदेखील ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा इम्पॅक्ट धाराशिवमध्ये पाहायला मिळाला… वाढलेली महागाई, शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे ओमराजे निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसून आलं. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजेंनी लीड घेतली होती. तीच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्याने इथं मशाल निवडून येतेय, असा एकूणच कल आहे…
एकूणच काय तर अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या पाच जागांपैकी एक जागा त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपला सोडल्यामुळे उरलेल्या चार जागांवर लढत अटीतटीची होईल. पण खूप मोठ्या कष्टाने एखाद्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवता येईल, असं सध्यातरी चित्र आहे. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी चार पैकी किती जागांवर जिंकून गुलाल उधळेल? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांचे फॅड बघायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने EV3 हि आपली नवीन इलेक्ट्रिक कार जागतिक बाजारात सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक कार तब्बल ६०० किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करेल.
फीचर्स –
Kia EV3 चे डिझाईन EV9 सारखे ठेवण्यात आले आहे. या इलेक्टिक कारची लांबी 4,300 मिमी, रुंदी 1,850 मिमी, उंची 1,560 मिमी आणि व्हीलबेस 2,680 मिमी आहे. कंपनीने यामध्ये ब्लँक ऑफ ग्रिलसह क्यूबिकल आकाराचे LED हेडलाइट्स, L आकाराचे LED DRL , खालच्या बंपरमध्ये वाइड एअर इनलेट देण्यात आले आहेत. KIA चाय या इलेक्ट्रिक कार मध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रूफ स्पॉयलर, शार्क फिन अँटेना, पार्किंग सेन्सर्स, पॅनोरॅमिक सनरूफ, थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, १२.३ इंच इंफोटेनमेंट सिस्टम, १२.३ इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्लोटिंग सेंटर कन्सोल यांसारखे फीचर्स देण्यात आली आहे. कारमध्ये 460 लीटरची बूट स्पेस मिळतेय.
600 KM रेंज – Kia EV3
कंपनीने या SUV मध्ये 58.3 kWh आणि 81.4 kWh असे २ बॅटरी पर्याय दिले आहेत. या बॅटरी Kia च्या फोर्थ जनरेशन तंत्रज्ञानापासून बनवल्या गेल्या आहेत. हि बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 31 मिनिटे वेळ लागतो मात्र एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर KIA ची हि इलेक्ट्रिक कार तब्बल 600 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे असा दावा कंपनीने केला आहे. कारला 170 किलोमीटर प्रति तास इतकं टॉप स्पीड असून अवघ्या 7.5 सेकंदात 0-100 किमी वेग वाढवण्यास सक्षम आहे.
भारतात कधी लाँच होणार?
Kia EV3 ही SUV सर्वात आधी दक्षिण कोरियामध्ये जुलै महिन्यात सादर केली जाईल. यानंतर ते जुलै ते डिसेंबर दरम्यान युरोपातील काही देशांमध्ये गाडीचे लौंचिंग होईल. भारतात मात्र हि इलेक्ट्रिक कार 2025 पर्यंत दाखल होऊ शकते असं बोललं जातंय गाडीच्या किमतीत मात्र कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंगाचा वापर आपण चविष्ट भाजी बनवण्यासाठी नेहमी करत असतो. मसाल्यांमध्ये ही हिंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. हेच हिंग (Asafoetida) आरोग्यासाठी ही तितकेच फायदेशीर ठरते. हिंगामुळे जड पदार्थ पचनास सोपे जातात. गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. यात तुम्ही जर हिंगाचे पाणी दररोज पिले तर इतरही अनेक फायदे शरीराला होतील. आज आम्ही तुम्हाला हेच फायदे सांगणार आहोत.
पचनक्रिया व्यवस्थित होते – पचनशक्ती तीव्र करण्यासाठी हिंगाचे पाणी प्यावे. हिंगाचे पाणी पिल्यामुळे पचन क्रियेला गती मिळते आणि अन्न पचण्यास मदत होते. यासह बद्धकोष्ठता, गॅस, एसिडिटी, अपचन यांच्यासारख्या सर्व समस्या दूर होतात आणि पोट निरोगी राहते.
वजन कमी होते – दररोज रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी पिला तर तुमचे वजन कमी होईल. तसेच पोटाची चरबी वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी पाणी पिऊ शकता. हिंगामुळे वजन नियंत्रणात राहते.
रक्तातील साखर नियंत्रित राहते – मधुमेहाच्या रुग्णासाठी हिंगाचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. रक्तातील साखर कमी करायची असेल तर दररोज हिंगाचे पाणी प्यावे. असे केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर – हिंगाचे पाणी पिणे शरीरासाठी चांगले असतेच परंतु हिंगाची पेस्ट चेहऱ्याला लावणे ही फायदेशीर ठरते. असे केल्यामुळे चेहऱ्यावरील तेज वाढते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या पिंपल्ससारख्या समस्या दूर होतात. हिंगाचे पाणी दररोज पिल्यामुळे ही चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही.
सर्दी खोकला बरा होतो – सर्दी खोकला बरा करण्यासाठी हिंग अत्यंत फायदेशीर ठरते. हिंगाचे पाणी पिल्यामुळे श्वसनाचा त्रास दूर होतो. तसेच, यामुळे रक्तवाहिन्यांमधील सूज कमी होते. अशा अनेक समस्यांवर ही हिंगाचे पाणी पिणे रामबाण उपाय ठरते.
लक्षात ठेवा की, इतर आजार असलेल्या लोकांनी किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांनी हिंगाचे सेवन करू नये. मात्र याव्यतिरिक्त लोकांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास गरम पाणी घ्यावे. त्यात हिंग मिसळावी. यानंतर पाण्यात हिंग चांगली विरघळू द्या. मग या पाण्याचे सेवन करा.
IRCTC : भारतीय लोकांना पर्यटनाची विशेष आवडआहे. प्रत्येक वर्षी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक खास ट्रिप आयोजित केली जाते. हे करीत असताना अनेकदा राहणे, खाणे, फिरणे यांचा अवास्तव खर्च होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका विशेष टूर (IRCTC) बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये मस्त ट्रिप प्लॅन करता येईल.
आज आम्ही ज्या ट्रिप बद्दल सांगत आहोत ते ठिकाण म्हणजे तिरुपती बालाजी… तिरुपती हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित सर्वात लोकप्रिय धार्मिक शहरांपैकी एक आहे. तिरुपतीला तिरुमला म्हणूनही ओळखले जाते. भगवान विष्णूच्या श्री वेंकटेश्वर मंदिरासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर तिरुमला टेकडीच्या (IRCTC) शिखरावर आहे, तर तिरुपती शहर पायथ्याशी वसलेले आहे.
काय आहे तिरुपती बालाजी टूर पॅकेज ?(IRCTC)
IRCTC ने तिरुपती बालाजीसाठी 4 रात्री आणि 3 दिवसांच्या सहलीचे नियोजन केले आहे, जे प्रवाशांना 29 मे रोजी मुंबईहून तिरुपती बालाजी आणि कालहस्तीला घेऊन जाईल, जिथे त्यांना कालहस्ती मंदिर आणि पद्मावती मंदिराचे दर्शन करता येईल.
‘या’ सुविधा मिळतील
मुंबईपासून सुरू होणाऱ्या या टूरमध्ये ट्रेनचे तिकीट, तिरुपतीमधील 1 रात्रीचे हॉटेलमध्ये राहणे, रात्रीचे जेवण, नाश्ता, AC वाहनातून दर्शन घेणे, बालाजी मंदिर दर्शन पास, स्थानिक टूर गाइड आणि प्रवास विमा (IRCTC) यांचाही समावेश आहे.
किती येईल खर्च
IRCTC नुसार, तिरुपती बालाजीच्या 3 दिवसांच्या सहलीसाठी प्रवाशाला 9,050 ते 12,100 रुपये मोजावे लागतील. दोघांसाठी 7,390 ते 10,400 रुपये आणि तिघांच्या प्रवासासाठी 7,290 ते 10,300 रुपये प्रवासी भाडे निश्चित करण्यात आले आहे. जर तुम्ही या सहलीवर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना घेऊन जात असाल तर तुम्हाला त्यांच्यासाठी 6,500 ते 9,500 रुपयांमध्ये बुकिंग करावे लागेल.
कुठे कराल बुकिंग ?
तुम्हीही तिरुपती बालाजीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा किंवा थेट लिंक https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WMR171 वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर मेल देखील करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातल्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) आटोपल्या…आता सर्वांनाच ओढ लागलीय ती 4 जून च्या निकालाची…निवडणुकीतील प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता कुणाचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत, याचा अंदाज आता समोर येऊ लागलाय. महायुतीत असणाऱ्या (Eknath Shinde) शिंदेंच्या शिवसेनेलाही 15 पैकी किती जागांवर यश मिळतय? याचा आकडा आता चर्चेत आलाय… शिंदेंनी लोकसभेत जोर लावलेल्या 15 जागा कोणत्या आहेत? आणि त्यातल्या कुठल्या जागांवर शिंदेंचे उमेदवार निवडून येतायत? तेच पाहुयात
पहिले उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे… सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिंदेच्या विरोधात ठाकरे टफ उमेदवार देतील अशी शक्यता होती. पण माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवत ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना फ्री हिट दिलीय अशी मतदारसंघात चर्चा होती. पण प्रचारात दरेकरांनी घेतलेली आघाडी, भाजपच्या अंतर्गत नाराजीचा शिंदेंना बसलेला फटका आणि एकनिष्ठ विरुद्ध फुटीर हे मुद्दे फ्रंटला असल्याने दरेकर या रेसमध्ये आल्या.. मात्र श्रीकांत शिंदे अगदी निसटत्या लीडने कशीबशी कल्याणची जागा राखतील. अशी सध्या मतदारसंघात चर्चा आहे…दुसरे उमेदवार आहेत नरेश म्हस्के. शिंदेंच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात आपल्या अत्यंत जवळच्या मावळ्याला शिंदेंनी मैदानात उतरवलं. ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील, असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं. नरेश म्हस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा थोडका वेळ, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि नरेश म्हस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होण…या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या. याशिवाय राजन विचारे यांचं मतदारसंघातील काम, मतदारांशी असणारा सुसंवाद आणि बंडाळीच्या वेळेस दाखवलेली निष्ठा यामुळे राजन विचारे मोठ्या लीडने निवडून येतील, अशी ठाण्यामध्ये चर्चा आहे…
तिसरे उमेदवार आहेत रवींद्र वायकर. मुंबई उत्तर पश्चिमच्या या इंटरेस्टिंग लढतीत ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात होते. वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ…मात्र इडीने चक्र फिरवल्याने त्यांना नाईलाजाने शिंदेंसोबत जावं लागलं… पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगत होते… त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील, हा मोठा प्रश्नच होता. हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर यांचे मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. चौथ्या उमेदवार आहेत यामिनी जाधव. ज्याला खरीखुरी मुंबई म्हटलं जातं त्या दक्षिण किंवा साउथ मुंबई मधून शिंदेंच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे स्टँडिंग खासदार अरविंद सावंत यांनी दंड थोपटले होते. राहुल नार्वेकर, मंगलप्रसाद लोढा यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात, यासाठी बराच जोर लावला होता. पण मराठी विरुद्ध अमराठी, अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार, इडीच्या कारवाईने यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी, हे नरेटीव ठाकरे गटाने संपूर्ण प्रचारात वापरलं. मतदानानंतर इथेही ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येतील, अशी चर्चा आहे…
पाचवे उमेदवार आहेत राहुल शेवाळे. मुंबई दक्षिण मध्य मध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई विरुद्ध शिंदेंकडून राहुल शेवाळे यांच्यातील झालेली ही अटीतटीची लढत. दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. शेवाळेंच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठ केडर असल्याने इथे देसाईंचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत…सहावे उमेदवार आहेत ते हेमंत गोडसे. नाशिकच्या राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे यांच्यातील लढतीकडे पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. एक तर त्यांच्या उमेदवारीवरून बराच राडा झाला. त्यात गोडसे यांची मागील दोन टर्मची कारकीर्दही काही खास नव्हती. त्यात स्थानिक राजकारणात त्यांचा वाढता हस्तक्षेप यामुळेही त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, असा महायुतीतून सुरू होता. हे सगळं सध्या राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडताना दिसतय. ठाकरेंनीही इथे जोरात ताकद लावल्याने राजाभाऊ वाजे नाशिकात मशाल पेटवतील, असं मतदानानंतरचं वातावरण आहे.
सातवे उमेदवार आहेत श्रीरंग आप्पा बारणे. मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. बारणे तगडे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अंतर्गत विरोध इथे लपून राहिला नव्हता. अजित पवार गटाने आपला म्हणावा असा प्रचार केला नाही, अशी खंत स्वतः बारणेंनीही व्यक्त केली. वाघेरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्याने इथल्या राष्ट्रवादीच्या केडरचा सपोर्ट हा ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचं बोललं जातं. त्यात अँटी इनकमबंसीचा फटका आणि ठाकरे आणि पवारांच्या बाजूने असणाऱ्या वातावरणाचा फायदा इथे वाघेरेंना झाला. थोडक्यात संजोग वाघेरे मावळात शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकतील…
आठवे उमेदवार आहेत धैर्यशील माने. हातकणंगलेत झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली. राजू शेट्टींमुळे तयार झालेलं कडवं आव्हान आणि सत्यजित पाटील यांचा मतदारसंघावरचा होल्ड यामुळे इथे काटे की टक्कर होती. मानेंच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी इथं जाहीर सभा घेतली होती. पण भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा मानेंना असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेले संबंध याचा फटका मानेंना निकालात बसू शकतो.. इथं सत्यजित पाटील आघाडी मिळवतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे…नववे उमेदवार आहेत संजय मंडलिक. कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्याच दिवशी शिंदे यांचे उमेदवार संजय मंडलिक बॅकफुटला गेले. कोल्हापूरच्या गादीबद्दल केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य मंडलिकांवरच बूमरँग होताना पाहायला मिळाली. मंडलिकांच्या बाजूने हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांनी जोर लावला असला तरी सतेज पाटलांच्या जबरी नेटवर्कमुळे इथे मान आणि मत दोन्हीही गादीलाच! असं चित्र निवडणुकीनंतर दिसून येतय…
दहावे उमेदवार आहेत संदीपान भूमरे. अगदी बरीच काथ्याकूट झाल्यानंतर ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिंदेंनी संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. इम्तियाज जलील यांच्यामुळे छत्रपती संभाजी नगरची लढत ही तिरंगी आणि अटीतटीची असणार आहे. चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ, प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फूटले असले तरी कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे इथे चंद्रकांत खैरे निकालात लीडला असतील, असा अंदाज वर्तवला जातोय…अकरावे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेंकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली. वंचितकडून उत्कर्षा रूपवते इथं मैदानात उतरल्याने शिर्डीची लढत तिरंगी झाली. वंचितच्या उमेदवारीने वाकचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका आणि सदाशिवराव लोखंडे हे आपल्या विकासकामांच्या जोरावर निकालात लीडला राहतील, असं सध्या शिर्डीचं वातावरण आहे…
बारावे उमेदवार आहेत बाबुराव कदम कोहळीकर. खरंतर हिंगोलीसाठी ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली. कागदावर येथे महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न, मराठा आरक्षण आणि महागाई हे फॅक्टर इथे ठाकरेंना साथ देऊ शकतात. अष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत मशाल फिक्स आहे, असं बोललं जातंय…शिंदेंचे तेरावे उमेदवार आहेत राजू पारवे. रामटेक मतदार संघासाठी शिंदेंनी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांची आयतवारी करून इथून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांना फाईट दिली. रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीवर इथे झालेला राडा सर्वांनीच पाहिला. रामटेक हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असल्यानं आणि त्यातही अल्पसंख्यांकांचा व्होट शेअर मोठा असल्याने इथे काँग्रेसचं पारडं जड होतं. त्यात शिंदेंनी काँग्रेस मधून आयतवारी करून पारवेंना उमेदवारी देण्याचा निर्णय मतदारांना फारसा रुचला नाही. त्यामुळे इथे काँग्रेसचा पंजा चालणार अशी चर्चा आहे…
चौदावे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव. बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी लढत झाली. शिंदेंच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बुलढाण्यात अँटीइनकंबनसी होती. त्यात ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन पुढे घेऊन गेल्यामुळे याचा मोठा फटका जाधवांना बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इथे खरी लढत ठाकरे गट विरुद्ध रविकांत तुपकर अशी असल्याची मतदारांच्या चर्चा आहे. मत विभाजनाचा प्रॉपर गेम जुळून आला तर इथे अपक्ष म्हणून रविकांत तुपकर देखील आघाडी मारू शकतील…
आता या यादीतले शेवटचे म्हणजेच पंधरावे उमेदवार आहेत राजश्री पाटील. यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ठाकरेंच्या संजय देशमुखांच्या विरोधात कडवा प्रतिस्पर्धी शोधण्याचा आव्हान होतं. मात्र अत्यंत नाट्यमयरित्या नागेश पाटील यांची हिंगोलीतील उमेदवारी रद्द करत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ मधून उमेदवारी देण्यात आली. बाहेरचे उमेदवार त्यात गद्दारीचा लागलेला टॅग यामुळे संजय देशमुख निवडणूक प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्लसमध्ये राहिले. महायुतीला इथे पाठिंबा असला तरी त्याचं मतांमध्ये कन्वर्जन करण्यात राजश्री पाटील यांना यश आलं नाही, अशी मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्यानंतर आता मशालीचा उजेड यवतमाळ वाशिमवर पडेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे…
तर या होत्या शिंदे गट लढवत असणाऱ्या लोकसभेच्या 15 जागा. यापैकी सध्या तरी केवळ दोनच जागांवर शिंदेंचे उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस दिसतायेत. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हा आकडा खालीवर होऊ शकतो. पण शिवसेनेत केलेल्या बंडाळीचा फटका शिंदेंना लोकसभेला बसताना दिसतोय, एवढं मात्र निश्चित…शिंदे गटाच्या 15 पैकी किती जागा निवडून येतील? तुमचा आकडा कमेंट करून नक्की सांगा.
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Alyad Palyad Movie) संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी विविध प्रथा पाळल्या जातात. जुन्या संस्कृती, प्राचीन रूढी- परंपरा, विचित्र प्रथा आणि ज्या त्या भागातील लोकांच्या विविध समजुतींविषयी आपण कायम काही ना काही ऐकत वाचत असतो. दरम्यान, अशाच एका अत्यंत वेगळ्या आणि भयावह परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या गावाची एक गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अल्याड पल्याड’ असे असून यातीळ एक थरकाप उडवणारे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्याला रसिकांची चांगली पसंती मिळते आहे.
‘काळोखाची रात्र’ गाणे रिलीज (Alyad Palyad Movie)
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळी वेगळी कथा पहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. अलीकडेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. जो पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली. अशातच आता या चित्रपटही पहिले खतरनाक गाणे प्रदर्शित झाले आहे. टीझरमध्ये काळी जादू, बाहुल्या, कुंकू, रिंगण अशी भीतीदायक दृश्ये, किंकाळ्या आणि बॅकग्राऊंडला सुरु असलेले म्युझिक ऐकून अंगावर काटा उभा राहिला होता.
यानंतर आता चित्रपटातील (Alyad Palyad Movie)’काळोखाची रात्र’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘सत्यकथा, गावची प्रथा, अंतनिकट भूतबाधा, धरपकड भूत अस, केला असा जादूटोणा, तंत्रमंत्र धागा दोरा, लिंबू डाव वाया गेला, बंद झाला कामधंदा, करणी धरणी भलत्या बोंबा, देवा या गावात अल्याड पल्याड, काळोखाची रात्र अल्याड पल्याड..’, असे काहीसे मिनिटांत डोकं हलवतील असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याचे बोल अंगावर काटा आणणारे आहेत तर हा चित्रपट कसा असेल? याविषयी अंदाज बांधता येत आहे.
‘हे’ कलाकार साकारणार मध्यवर्ती भूमिका
चित्रपटाच्या शीर्षकासह ‘परत आला करनटक्याचा काळ..’ लिहिलेले पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट काहीसा वेगळा असणार याची खात्री आधीच सर्वांना पटली होती. यानंतर टिझर आणि आता पहिल्या गाण्यानंतर सर्वांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली आहे. (Alyad Palyad Movie) दरम्यान, या चित्रपटातून संदीप पाठक, मकरंद देशपांडे, MHJ फेम गौरव मोरे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माहितीनुसार हा चित्रपट येत्या १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.