आपल्या या जगामध्ये अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. ज्याचा शोध अजूनही अनेक लोकांना लागलेला नाही. परंतु जेव्हा जेव्हा रहस्यमय ठिकाणचा विचार येतो. तेव्हा अनेकांच्या मनात सगळ्यात पहिला इजिप्तच्या पिरामिडचा विचार येतो. आजपर्यंत याबाबत अनेक संशोधन करण्यात आले. परंतु हे पिरॅमिड का बांधले? हे बांधण्यासाठी दगड इतके उंच कसे नेले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजूनही कुणाला मिळालेली नाही. परंतु नुकतेच यावर एक संशोधन झाले आहे. आणि एक धक्कादायक अशी बातमी समोर आलेली आहे.
पिरॅमिडच्या संदर्भात एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आलेला आहे की, या पिरामिडच्या सौरचनेजवळ एक विशिष्ट गोष्ट सापडली आहे. या संदर्भात असे समोर आले आहे की, ज्यामध्ये एकूण 31 पिरॅमिड असल्याचे सांगितले जात आहे. जे नाईल नदीपासून काही अंतरावर वसलेले आहे. मुख्य प्रवाहापासून उगम पावणाऱ्या नदीच्या 64 किलोमीटर पट्ट्यामध्ये हे बांधले गेलेले आहे.
पिरॅमिडसाठी दगड कसे आणायचे?
त्यांना पाहिल्यानंतर नॉर्थ कॅरोलिना विल्मिंग्टन विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विचारले की ते पाण्यापासून पाच मैल दूर का बांधले आहेत. हा दावा मातीचे नमुने आणि उपग्रह प्रतिमा या दोन्हींच्या आंशिक विश्लेषणाच्या आधारे प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांच्या अहवालात शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की ते अहरमत नावाच्या पाण्याच्या भागाकडे निर्देश करते. ते आता अस्तित्वात नाही.
शास्त्रज्ञांनी असाही दावा केला की पिरॅमिडच्या बांधकामात अहराम शाखेने भूमिका बजावली, कामगारांसाठी वाहतूक जलमार्ग आणि पिरॅमिड साइटवर बांधकाम साहित्य म्हणून काम केले. नाईल नदीच्या मुख्य प्राचीन शाखांपैकी एकाचा पहिला नकाशा मोठ्या प्रमाणावर सादर केला गेला आणि तो इजिप्तच्या सर्वात मोठ्या पिरॅमिड भागांशी जोडला गेला आणि त्यांच्या दगडांचे रहस्य पूर्णपणे सोडवले गेले.
Vodafone-Idea Recharge Plan | सध्या भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्या त्यांच्या ग्राहकांना नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. वोडाफोन, आयडिया, जिओ आणि एअरटेलने देखील त्यांच्या ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला वोडाफोनच्या एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. या कंपनीने नुकतेच एक रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. ही किंमत वाचून तुम्हाला वाटेल की हे कसे शक्य आहे. परंतु हे अगदी खरे आहे.
हा प्लॅन बऱ्याच लोकांसाठी खास असू शकतो कारण वापरकर्त्यांना 1 दिवसासाठी कॉलिंग ऑफर करत आहे, इतर कोणताही फायदा नाही. याचा अर्थ असा की वापरकर्ते अतिशय कमी खर्चात त्यांच्या जवळच्या लोकांशी कनेक्ट राहू शकतात. मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला जास्त फायदे मिळत नाहीत. असे असूनही, ही योजना अनेक लोकांसाठी उपयोगी ठरणार नाही.
रिचार्ज प्लॅनचे फायदे | Vodafone-Idea Recharge Plan
Vodafone Idea चा हा प्लॅन खरेदी केल्यावर तुम्हाला 75 पैशांचा टॉकटाइम मिळणार आहे. मात्र त्यासोबत डेटा आणि एसएमएसचे फायदे दिले जाणार नाहीत. म्हणजेचतुम्हाला फक्त 75 पैशांचा कॉलिंग टॉकटाइम दिला जाईल. फक्त तेच वापरकर्ते जे बेसिक रिचार्ज करतात तेच ते वापरू शकतील आणि हा बेसिक रिचार्ज रु. 99, 198 किंवा 204 रु. तिन्ही योजना मर्यादित टॉक टाइमसह येतात. म्हणजे एकदा टॉक टाइम संपला की तुम्ही त्याचा वापर करू शकाल.
म्हणजेच, एक प्रकारे पाहिल्यास व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना फक्त मिस्ड कॉल देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय यात काही अर्थ नाही. दूरसंचार व्यवसायातील ही सर्वात परवडणारी योजना आहे. याशिवाय Vodafone कडे 99 रुपयांचा प्लान देखील आहे जो कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटरने ऑफर केलेला नाही. हा प्लान 200 MB डेटासह येतो जो टॉक टाइमच्या बाबतीतही चांगला आहे. त्याची वैधता फक्त 15 दिवस आहे.
Jio Rail App | भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. परंतु जिओने त्यांचे वर्चस्व स्थापित केलेले आहेत. जिओने त्यांचे एक ॲप देखील लॉन्च केलेले आहे. या ॲपचे नाव आहे- Jio Rail App. नावावरूनच तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल की, ते रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच, ते लोकांना कन्फर्म ट्रेन तिकीट मिळविण्यात मदत करते.
रेल्वेचे तिकीट बुक करा | Jio Rail App
परंतु प्रत्येकाला च हे ॲप वापरता येत नाही. जिओ (Jio Rail App) फोनसाठी हे ॲप आहे. इथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्ही या ॲपच्या मदतीने ट्रेनचे तिकीट ऑनलाईन देखील बुक करू शकता. यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या रेल्वेचे तिकीट बुक करू शकता.
रेल्वेच्या तिकीट बुकिंग व्यतिरिक्त इतर अनेक ऑप्शन देखील युजर्सला देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला या ॲपमध्ये पीएनआर स्थितीबद्दल देखील माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे ट्रेनच्या वेळी पासून सुरु होणारी प्रत्येक माहिती तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर पाहता येईल.
तिकीट बुक कसे करायचे ? | Jio Rail App
सर्वप्रथम तुम्हाला जिओ फोनमध्ये उपलब्ध असलेल्या ‘जिओ रेल ॲप’वर जावे लागेल. येथे गेल्यावर तुम्हाला स्टेशन निवडावे लागेल. म्हणजेच तुम्हाला कोणत्या स्टेशनवरून कोणत्या स्टेशनपर्यंत प्रवास करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारीख निवडावी लागेल. एकदा आपण सर्वकाही निवडल्यानंतर, आपल्याला ट्रेन आणि सीट देखील निवडावी लागेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| परदेशातच नव्हे तर भारतामध्ये देखील बियर आणि वाईन पिणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अनेकनंतर दररोज ही बिअरचे सेवन करत असतात. परंतु दररोज बियरचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. बियरचे सेवन केल्यामुळे कमी वयामध्ये विविध आजार होतात. या आजारांमुळे काहींचा मृत्यूही होतो. हे आजार नेमके कोणते असतात?? बियर पिल्यमुळे शरीरावर त्याचा काय परिणाम होतो?? याविषयी जाणून घ्या.
वजनात वेगाने वाढ होते – बियरमध्ये मोठया प्रमाणात कॅलरीचे प्रमाण असते. बियरचे सेवन केल्यामुळे याच कॅलरीज शरीरामध्ये जातात. त्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेट वाढते. तसेच, बियर केल्यामुळे भूकही जास्त लागते. ही भूक शरीराचे वजन वाढवण्याचे काम करतात. बियर पिल्यामुळे पचनक्रियेमध्येही अडचणी निर्माण होतात.
मॅग्नेशियम, विटामिन B ची कमतरता – बियर पिल्यामुळे शरीरातील पोषक तत्वे नष्ट होण्यास सुरुवात होते. याच बियरमुळे शरीरातील फॉलिक ऍसिड आणि झिंक नष्ट होते. ही तत्वे नष्ट होणे शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे बियर पिताना या सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात.
हृदयाचे आजार- हृदय हे अत्यंत नाजूक असते. अशा स्थितीत बिअर पिल्याने हृदयाच्या निर्माण होऊ शकतात तसेच रक्तदाब वाढू शकतो. यासह ट्रायग्लिसराईड वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. दररोज बिअर पिल्यामुळे इतरही अनेक आजार उद्भवतात. परिणामी शरीराचे आरोग्य चांगले राहत नाही.
लिव्हरचे नुकसान – बियर सर्वात जास्त लिव्हरचे नुकसान करत असते. बियर पिल्याने लिव्हरवर सूज ही येते. यामुळे गंभीर आजार निर्माण होतात. फॅटी लीवर, लिव्हर सोरायसिस असे आजार हे बियर पिल्यामुळे उद्भवतात. पुढे या आजारांवर निदान करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे दररोज बियर पिऊ नये.
कॅन्सरची होतो – अल्कोहोल आणि बियरमुळे कॅन्सरचाही धोका उद्भवतो. दररोज बियर पिल्यमुळे कोलोरेक्टल कॅन्सर होऊ शकतो. शरीराला झालेला कोणताही कॅन्सर हा घातक असतो. या कॅन्सरमुळे अनेकांचा जीव ही जातो. त्यामुळे बियरचे सेवन करताना ते जपून करावे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यापासून विविध पक्षा जनतेला मोठमोठी आश्वासने देत आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही रायबरेलीमधील (Raebareli) सभेत बोलताना शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली आहे. या आश्वासनांमध्ये “येत्या 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल” असे राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी म्हटले आहे. तसेच, “इंडिया आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देईल” असा विश्वासही राहुल गांधींनी जनतेला दिला आहे.
रायबरेलीच्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी म्हणले की, “इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊ. यासह आम्ही पुन्हा मनरेगा व्यवस्थित सुरू करु. तुम्हाला मनरेगासाठी 250 रुपये नाही तर 400 रुपये मिळतील. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जे माफ केलेली नाहीत, आम्ही अमेठीतील सर्व गरीब शेतकऱ्यांची कर्जे माफ करुन दाखवू. मी अमेठीचा होतो, मी अमेठीचा आहे आणि राहणार”
त्याचबरोबर, “आम्ही अमेठीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या आशा आणि अंगणवाडी महिलांचे उत्पन्न दुप्पट करू. आज तुम्हाला जे काही मिळत आहे त्याच्या दुप्पट चार जून नंतर मिळेल. सध्या उत्तर प्रदेशमध्ये शेतमालाला योग्य दर मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तांदळाला, ऊसाला, बटाट्याला योग्य भाव दिला जात नाही. परंतु 4 जूननंतर सर्व शेतकऱ्यांना कायदेशीर किमान आधारभूत किंमत दिली जाईल.” असे राहूल गांधी यांनी म्हणले.
दरम्यान, “ही लोकसभा निवडणूक सार्वत्रिक निवडणूक नाही. ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे. पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलू, असे भाजपच्या लोकांनी उघडपणे सांगितले आहे. संविधान संपले तर आरक्षण संपेल. सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या संपतील. या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.” असे राहुल गांधी यांनी म्हटले.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मागील २-३ वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Scooter) खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल डिझलच्या खर्चापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहेत. बाजारातील हि वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. यावर्षी सुद्धा इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातील अशी परिस्थिती मार्केट मध्ये आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टीची माहिती असं आवश्यक आहे. नाहीतर नंतर डोक्याला हात लावायची वेळ तुमच्यावर येऊ शकते.. चला तर त्याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
बॅटरी –
सर्वात आधी जाणून घ्या कि सदर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये नेमके कोणकोणते फीचर्स मिळतात.. आजकाल अनेक वेळा इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील, त्यामुळे तुम्ही जी इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तिची बॅटरी आग लागणार नाही अशी आहे का ते चेक करा. बॅटरी किती वॅट्सची आहे हे तपासा… तसेच त्या बॅटरीची वॉरंटी किती वर्षाची आहे ते आधी पहा. तसेच आपली स्कुटर चोरीला जाऊ नये यासाठी डिस्क ब्रेक, ऑटो होल्ड आणि अलार्म सिस्टीम असे फीचर्स त्यात आहेत का याचीही खात्री करून घ्या.
इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज– Electric Scooter
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तिची रेंज किती आहे ते पहा.. कमीत कमी चार्जिंग मध्ये जास्तीत जास्त अंतर पार करणारी स्कुटर नेहमीच ग्राहकांच्या फायद्याची ठरते. त्यामुळे स्कुटरची रेंज चेक करा.. एकदा स्कुटर फुल्ल चार्ज करण्यासाठी किती तास वेळ लागतो आणि त्यानंतर तुम्ही तिच्यावरून किती किलोमीटर प्रवास करू शकता याची व्यवस्थित माहिती जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
टॉप स्पीड बघा –
इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) खरेदी करण्यापूर्वी तिचे टॉप स्पीड तपासून पहा.. कारण जर स्कुटरचे स्पीड कमी असेल तर प्रवासाचे अंतर पार करण्यासाठी तुमचा जास्त वेळ खर्च होईल आणि प्रवासाचा आनंद सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आजकाल बाजारात अनेक स्वस्त किमतीत स्कुटर उपलब्ध आहेत मात्र त्यांचे टॉप स्पीड खूपच कमी असतंय… त्यामुळे अशा स्कुटर फायदेशीर ठरत नाहीत … कमीत कमी ७० -८० टॉप स्पीड असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटर्स खरेदी करणं कधीही चांगलं ठरेल. त्यामुळे स्कुटर खरेदी करण्यापूर्वी टॉप स्पीड आवर्जून चेक करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अबकी बार 400 पार (Ab Ki Bar 400 Par) … टीव्ही वरच्या जाहिरातीतून ते रस्त्यावरच्या फ्लेक्स पर्यंत… टी शर्ट पासून ते चौकाचौकात फिरणाऱ्या डिजिटल स्क्रीनवर याच भाजपच्या चारशे पार जाहिरातीचा बोलबाला दिसला… नरेंद्र मोदींचा फोटो लावून भाजपने ही टॅगलाईन अशी काही लोकांपर्यंत पोहचवली की लोकसभेला फक्त आणि फक्त मोदींचाच करिष्मा चालेल असं वाटतं होतं. पण लोकसभा निवडणुकीचा पहिला, दुसरा असं करत करत आता मतदान पाचव्या टप्प्यावर येऊन पोहचलंय. आणि भाजपच्या या चारशे पार घोषणेचा मोये मोये झालाय अशी चर्चा आहे… प्रत्यक्ष ग्राउंडवर मोदींचा कुठलाच करिश्मा नसून उलट मोदी सरकारच्या विरोधात मतदार जाहीर संताप व्यक्त करतायत…महाराष्ट्रातील वातावरण पाहता भाजपची गाडी 200 प्लस तरी जाईल का? अशीही शंका घेतली जातेय… पण मोठ्या आत्मविश्वासाने लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भाजपचा ऐन निवडणुकीच्या मध्यात भाजपचा गेम का झालाय? 400 पार हे भाजपने पाहिलेलं स्वप्न हे खरच सत्यात उतरण्यासारखं होतं. की मतदान फिरवण्यासाठी भाजपने सोडलेलं हे पिल्लू होतं? तेच सविस्तर पाहुयात
गेल्या दहा वर्षांत सत्ताधारी भाजपच्या अनेक घोषणा गाजल्या. इतक्या की या काळात विरोधकांनी कोणत्या घोषणा दिल्या हे सहज आठवतही नाही. ‘अच्छे दिन आने वाले हैं’, ‘अब की बार मोदी सरकार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’… भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असं चित्र प्रत्येक घोषणेतून निर्माण केलं गेलं…यावेळी ‘मोदी की गॅरंटी’चा वादा करत भाजपने ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा दिली. निवडणुका सुरू होण्यापूर्वी आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडेपर्यंत ती दणाणली आणि नंतर मात्र तिचा फुसका बार निघाला… इतका की विकसित भारतासाठी… चारशे पार, तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसाठी… चारशे पार, गरिबांच्या प्रगतीसाठी… चारशे पार, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी… चारशे पार’ असं सभांमध्ये पब्लिकला म्हणायला भाग पाडणाऱ्या मोदींनी ही घोषणाच आपल्या भाषणातून डिलिट केली…
पण या घोषणेचा मोये मोये कुठून सुरू झाला? याची नीट शोधाशोध केली तर याची सुरुवात केली कर्नाटकचे भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या एका विधानानं! भाजपला ४००हून अधिक जागा हव्या आहेत कारण दोन तृतीयांश सदस्य असतील तर संविधानात सुधारणा करता येतात, असं बोलून त्यांनी विरोधकांच्या हातात आयात कोलीत दिलं. विरोधकांनी ही भारतातील शेवटची निवडणूक असून मोदी यापुढे हुकूमशहा असतील असा प्रचार सुरू केला. ही मेख परफेक्ट बसली आणि मोदी संविधान बदलण्यासाठी अशी घोषणा देतायत, हे विरोधकांनी सेट केलेलं नरेटिव्ह कामाला आलं. भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर दलित, बहुजन, अल्पसंख्याक आणि मुस्लिम व्होट बँक विरोधात जाण्याची भीती या घोषणेने बसली…वेळीच सावध होतं भाजपने हे कँपेन गुंडाळलं…पण याचा आणखीन उलटा बाउन्सर पडला. भाजपला पराभव दिसू लागला आहे, म्हणून त्यांनी घोषणा गुंडाळून ठेवल्याच दर सभेत बिंबवलं जाऊ लागलं. एरवी प्रचारतंत्रात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही, मात्र इथे भाजपची विरोधकांनी पुरती पाचर बसवली. राहुल गांधी, कन्हैया कुमार, शरद पवार सोबतच आम आदमी पार्टी यासारख्या सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपच्या या 400 पारला आपल्या तिखट शब्दांनी चांगलंच घायाळ केलं. आम आदमी पार्टीचे संजय सिंग यांनी तर इतिहास सांगून नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची पुरती हवा काढून टाकली.. मोदीजी फर्जी नारा देण्यात मास्टर आहेत. बंगालमध्ये गेले आणि म्हणाले २०० पार आल्या ७७ सीट, दिल्लीत म्हणाले ४५ पार आल्या ८ सीट, हरियाणात म्हणाले ७५ पार आल्या ४० सीट, महाराष्ट्र म्हणाले १५० पार आल्या १०५ सीट, मिझोरममध्ये म्हणाले २१ पार आली १ सीट. आता म्हणतायत ४०० पार ४०० पार महाराष्ट्रातली जनता म्हणतेय तडीपार, तडीपार…’ महाराष्ट्रात तर दोन पक्षातील मोठे गट फोडूनही भाजपला एका एका जागेसाठी करावी लागणारी धडपड पाहता चारशे सोडून देऊ भाजप 200 पार कसा जाणार? असा प्रश्न लोक विचारू लागलेत…
आणखीन एक गोष्ट वारंवार बोलली जातेय ती म्हणजे 400 पारचं इंडिया शायनिंग होणार का?
तर आधी समजून घेऊ इंडिया शायनिंग नेमकं होतं काय? 2004 ला पुन्हा एकदा अटलबिहारी वाजपेयी सरकारने सत्तेत येणासाठी इंडिया शायनिंगचा नारा दिला. मूळात इंडिया शायनिंग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमा संवर्धनासाठी तयार करण्यात आलेलं घोषवाक्य होतं. पुढे ते सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात सातत्याने वाजविण्यात आलं. टॅम मीडिया रिसर्च या टीव्ही मॉनिटरिंग एजन्सीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार ही जाहिरात टीव्हीवर तब्बल नऊ हजार ४७२ वेळा दाखवण्यात आली. पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेनंतरची ही सर्वांत मोठी प्रचारमोहीम ठरल्याचंही या एजन्सीने म्हटलं होतं. याव्यतिरिक्त रेडिओ, वृत्तपत्रादी माध्यमांतही इंडिया शायनिंग प्रामुख्याने झळकवण्यात आलं होतं…निवडणुकांची औपचारिक घोषणा झालेली नव्हती त्या काळात ही मोहीम राबविली गेली. तत्कालीन मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी या संदर्भात सरकारला इशाराही दिला होता. करदात्यांचे पैसे सत्ताधारी पक्षाची जाहिरात करण्यासाठी वापरणं योग्य नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. सरकारने आचारसंहिता लागू होताच या जाहिराती बंद करण्यात येतील, असं उत्तर दिलं. त्यानुसार त्या बंद करण्यात आल्याही. मात्र निवडणुकांदरम्यान सातत्याने इंडिया शायनिंचा पुनरुच्चार केला गेला. घोषणा दिल्या गेल्या. देशात मूलभूत समस्या कायम असताना एनडीएच्या काळात प्रचंड विकास झाल्याचे दावे या जाहिरातींत करण्यात आले होते… त्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा वाजपेयी सरकार आरामात निवडून येईल, असं वाटतं होतं. पण निकाल लागला आणि भाजपला सर्वात मोठा फटका बसून काँग्रेस सरकार सत्तेत आली… थोडक्यात भाजपची ही इंडिया शायनिंगची घोषणा गंडली होती. आता पुन्हा एकदा याचाच रिपीट टेलिकास्ट अबकी बार 400 पार च्या रूपाने होईल, असं काही राजकीय विश्लेषकांचे मतं आहे…
बॉटम लाईन काय तर 20 मे ला लोकसभेचा पाचवा टप्पा पार पडेल. आणि 4 जूनला लोकसभेचा निकालही लागेल. त्यामुळे 400 पारला भाजपनं सत्यात उतरलंय की या घोषणेचा मोये मोये झालाय? हे काही दिवसातच स्पष्ट होईल..बाकी तुम्हाला भाजपच्या या घोषणेबद्गल काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Bank Holiday| आता सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीने होत असल्या तरी काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेतच जावे लागते. परंतु अनेकवेळा बँकेत गेल्यानंतर समजते की आज बँकेला सुट्टी आहे. यामुळे पुन्हा एकदा बँकेची कामे खोळंबून राहतात. हीच वेळ उद्या तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही सांगू इच्छितो की, पुढील आठवड्यामध्ये बँकांना एकूण चार दिवस सुट्टी असणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेमुळे तसेच सणावारांमुळे विविध तारकांना देशातील काही ठराविक बँका बंद राहणार आहेत. या बँका नेमक्या कोणत्या असतील आणि त्यांना कोणत्या तारखेला सुट्टी असेल?? याविषयी सविस्तर वाचा. (Bank Holiday)
येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ज्या ज्या शहरांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे, तेथील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 मे रोजी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी राहील. (Bank Holiday) त्यानंतर 20 मे रोजी मतदानामुळे बँका बंद राहते. या 20 मे रोजी राज्यातील सहा राज्य आणि 49 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे येथील बँका त्या दिवशी बंद राहतील. त्यामुळे बँकेत काम असणाऱ्या व्यक्तींचा खोळंबा होईल.
येत्या 20 मे रोजी बँका बंद असणाऱ्या राज्यांमध्ये लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू काश्मीर अशा राज्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि बेलापूर बँका (Bank Holiday) बंद राहणार आहेत. यानंतर 23 मे रोजी बुद्धपौर्णिमा असल्यामुळे बँका बंद राहतील. त्यानंतर लगेच 25 मे रोजी मतदानाचा सहावा टप्पा असल्यामुळे त्या त्या शहरातील बँका बंद असतील. 25 मे रोजी चौदा शनिवार आणि 26 मे रोजी रविवार असल्यामुळे या दोन्ही दिवशी बँकांना सुट्टी असेल.
वर दिलेल्या तारखांच्या दिवशी बँकांचा प्रत्यक्ष कार्यालयीन व्यवहार बंद (Bank Holiday) राहणार आहे. परंतु डिजिटल बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम आणि नेट बँकिंग अशा सर्व सुविधा सुरू राहतील याची खातेधारकांनी नोंद घ्यावी. तसेच, बँकांच्या सुट्ट्या तपासून आपली कामे आटपून घ्यावी.
PM Kusum Yojana | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी. त्याचप्रमाणे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती करता यावी. यासाठी सरकार नवनवीन योजना आणत असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना (PM Kusum Yojana) आणण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काम देखील चालू आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. पंप व्यापारी यांच्याशी संपर्क साधू शकतात. या आधी सरकारने सोलार टॉप योजना सुरू केली होती यामुळे घराघरात सौर ऊर्जेचे कनेक्शन देखील पोहोचले होते.
किती सबसिडी मिळणार? | PM Kusum Yojana
या प्रकल्पामध्ये सौर ऊर्जा पंप निवडीपासून ते त्यांच्या वापरापर्यंत मदत करण्यात येणार आहे. याची चाचणी प्राथमिक पातळीवर देखील सुरू आहे. यामध्ये सौर ऊर्जा पंप खरेदी आणि विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून 30% सबसिडी आणि राज्य सरकारकडून 30 टक्के सबसिडी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि कृषी क्षेत्रात सिंचन स्त्रोत उपलब्ध व्हावे. यासाठी ही पंतप्रधान कुसुम योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. परंतु अजूनही प्राथमिक अवस्थेत यात काम चालू होते. हाती आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेच्या काही भागांमध्ये सुधारणांची गरज आहे. परंतु काही दिवसातच ही योजना शेतकऱ्यांना मिळणार आहे.
RTE Addmission | RTE मार्फत दरवर्षी मुलांचे प्रवेश होत असतात. यावेळी मुलांचा पहिली ते आठवी पर्यंतचा खर्च शासनाकडून केला जातो. वर्षी शासनाने यावर्षी RTE च्या नियमात काही बदल केले. आणि त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर राज्यातील जवळपास 2 लाख 11 हजार पालकांनी त्यांच्या मुलांसाठी अर्ज देखील केलेले आहे. खाजगी अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेतील 25% जागा रिक्त ठेवून RTE अंतर्गत (RTE Addmission) प्रवेश देण्याचे आदेश आले होते. परंतु आता शासनाने पुन्हा एकदा या नियमात बदल करून पूर्वीसारखा प्रवेश देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता पालकांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.
हा झाला नवीन बदल | RTE Addmission
RTE ने प्रवेशामध्ये त्यांच्या नियमात दुरुस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश मिळणार आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेले आहे. त्यामुळे आता नव्या आदेशानुसार पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहे.
त्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. दिलेल्या आदेशानुसार या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. नवीन बदलानुसार पालकांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळा निवडावी लागणार आहे. इयत्ता पहिली प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आठवीपर्यंतचा खर्च शासनाकडून शाळांना दिला जातो.