Friday, December 19, 2025
Home Blog Page 761

Viral Video : हिरवा समोसा पाहून खवय्ये भडकले; म्हणाले, ‘काहीही फालतूपणा…’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर बरेच वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या रेसिपी व्हायरल होत असतात. यातील बरेच पदार्थ कधी टेस्टसुद्धा केलेले नसतात. पण पाहून अत्यंत आकर्षक वाटतात. तर काही पदार्थांचे फ्युजन पाहूनच पोट बिघडल्यासारखं वाटत. तुम्ही आजपर्यंत खूपवेळा समोसा खाल्ला असेल. खुसखुशीत आवरणात भरलेला चमचमीत बटाटा, सोबत हिरवी लाल चटणी खाण्याची मजा म्हणजे स्वर्गसुख. बऱ्याच लोकांसाठी समोसा म्हणजे वीकपॉइंट. पण समोसा हेल्दी खाण्यात येत नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हिरवा समोसा हेल्दी आहे बरं का. तुम्ही खाल्लाय का हिरवा समोसा? एकदा हा व्हिडीओ बघाच.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तुम्ही हिरवा समोसा पाहू शकता. होय. हिरवा समोसा. या व्हिडिओत सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये हिरवा समोसा दिसतो. ज्याचे दोन भाग केल्यानंतर त्यामधील सारण दिसते. यावर मस्त चटणी घातली जाते आणि मग एक स्त्री तो समोसा खाऊन टेस्टी असल्याचे सांगताना दिसत आहे. या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे हा समोसा पालकपासून बनवला आहे. त्यामुळे हा समोसा हेल्दी असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘पालक समोसा – हेल्दी समोसा आम्ही शोधून काढला आता जेवढी इच्छा होईल तेवढं खा’, असे लिहिले आहे.



आतापर्यंत तुम्ही बरेच वेगवेगळे समोसे ट्राय केले असतील. (Viral Video)बटाट्यापासून ते पनीर, व्हेजिटेबल्स, मलाई आणि अजून बरंच काही. पण झा समोसा त्यातल्या त्यात चवीला आणि दिसायला दोन्ही प्रकारे वेगळा आहे. ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सची लक्ष वेधण्यात हा समोसा यशस्वी झाला आहे. असे असले तरीही या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर that_food_freak नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून फिटनेस फ्रिक लोकांना थोडा आनंद व्यक्त केला असला तरी खवय्यांनी मात्र नाराजी दर्शवली आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एकाने लिहिले आहे, ‘हेल्दी तर असे म्हणत आहात जणू हा समोसा तेलात नाही पाण्यात तळलेला आहे’. (Viral Video) तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘याला समोसा कसं काय म्हणायचं?’. अन्य एकाने लिहिलंय, ‘कृपया समोस्यासोबत फालतूपणा करू नका’. तर आणखी एकाने, ‘हा रंग वाटत आहे, पालक नाही’, असे म्हटले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हा समोसा खरोखरच हेल्दी आणि टेस्टी वाटतोय असे म्हटले आहे.

Mumbai-Pune Shivneri : मुंबई – पुणे प्रवास होणार कमी वेळात ; अटल सेतूवरून धावणार 15 शिवनेरी

mumbai - pune

Mumbai-Pune Shivneri : मुंबई – पुणे असा प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. त्यातही सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यामुळे ट्रेन , बस अशा सर्वच गाडयांना गर्दी पाहायला मिळते. तुम्ही देखील उन्हाळयाच्या सुट्टीत पुणे -मुंबई असा प्रवास करणार असाल तर तुम्ही प्रवासाची चिंता करू नका. कारण राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यातही अटल सेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला असून मुंबई-पुणे अटल सेूतुवरुन शिवनेरीच्या 15 फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवासही (Mumbai-Pune Shivneri) सुखकर होणार आहे.

मुंबई – पुणे या मार्गावर प्रवेशनाची होणारी (Mumbai-Pune Shivneri) गर्दी लक्षात घेऊन परिवहन मंडळाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय हा प्रवास अटल सेतू वरुन होत असल्यामुळे ट्रॅफिकचा सामना करावा लागत नाही. अटल सेतूमुळं मुंबई-पुणे प्रवास 3.30 तासात पूर्ण होतो. पूर्वी या प्रवासाला 4.30 तास लागायचे. त्यामुळं अटलसेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी होत होती. प्रशासनानेही यावर लक्ष देत शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.

एका तासाची होते बचत (Mumbai-Pune Shivneri)

मुंबई पुणे मार्गावर दररोज अर्ध्या तासाच्या फरकानं शिवनेरीच्या एकूण 43 फेऱ्या धावतात. मुंबईवरून पुणे जाताना शेवडी अटल सेतू, गव्हाण फाटा, कोन यशवंतराव चव्हाण दुर्गती मार्गे शिवाजीनगर पुण्याकडे रवाना होतात यामुळे प्रवाशांची एक तासाची बचत होते असं एसटी प्रशासना कडून (Mumbai-Pune Shivneri) सांगण्यात आलं आहे.

काय असेल वेळापत्रक? (Mumbai-Pune Shivneri)

दादर वरून स्वारगेट साठी पहिली शिवनेरी पहाटे पाच वाजता सुटते.
स्वारगेट वरून दादासाठी पहिली शिवनेरी पहाटे पाच वाजता सुटते.
मंत्रालय ते पुणे रेल्वे स्थानक ही शेवटची शिवनेरी रात्री अकरा वाजता सुटते.

किती असेल भाडे ?

जर तुम्हाला दादर ते शिवाजीनगर असा प्रवास करायचा असेल तर त्या करिता 535 रुपये भाडं (Mumbai-Pune Shivneri) आकारण्यात येत आहे. जर तुम्हाला स्वारगेट ते दादर असा प्रवास करायचा असेल तर 535 रुपये आणि पुणे ते मंत्रालय असा प्रवास करायचा असेल तर 555 रुपये आकारण्यात येत आहे.

Maharashtra Police Recruitment | अत्यंत महत्त्वाचे!! पोलीस भरतीसाठी ही महत्त्वाची अट लागू; दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

Maharashtra Police Recruitment

Maharashtra Police Recruitment | जे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसापासून पोलीस भरतीची वाट पाहत होते. त्या विद्यार्थ्यांसाठी आता राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू झाली होती.

आता महाराष्ट्र दिल्या पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) प्रक्रियेत एक नवीन नियम आणलेला आहे. हा नियम उमेदवारांसाठी एक मोठी अडचण ठरणार आहे. पोलीस भरतीसाठी आता एका जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज भरले होते. परंतु हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या लक्षात येताच गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

का घेतला निर्णय ?

पोलीस भरतीला सुरुवात झालेली असली, तरी या प्रक्रियेत वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी अर्ज केलेले होते. परंतु त्यांना केवळ एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. आणि त्यासाठी त्यांना हमी पत्र देखील द्यावे लागणार आहे. वेगववेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. कारण एका उमेदवाराची दोन जिल्ह्यात निवड झाल्यास, तो सोयीचा जिल्हा निवडतो. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेता आता एका जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची ही अट करण्यात आलेली आहे.

आता 17 मे पर्यंत द्यावा लागणार अर्ज | Maharashtra Police Recruitment

जाऊ उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत. त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. कारण आता एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज हे नियमबाह्य ठरणार आहे. याबाबतची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी दिलेली आहे. त्यामुळे पोलीस कार्यालयात 17 मे 2024 पर्यंत हे हमीपत्र दाखल करायचे आहे. उमेदवाराला हमीपत्रात कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. याचा देखील तपशील द्यावा लागणार आहे की, त्याने किती अर्ज केलेले आहेत आणि कुठे कुठे केलेले आहेत याची सगळी माहिती द्यावी लागणार आहे आणि एका पदासाठी केवळ एका अर्जाला प्राधान्य देण्यास हमी त्यास द्यावी लागणार आहे.

Weather Update | ‘या’ तारखांना महाराष्ट्रात कोसळणार मुसळधार पाऊस; महत्त्वाची अपडेट समोर

Weather Update

Weather Update | मे महिना चालू असला तरी गेल्या दोन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई, डोंबिवली या परिसरात तर सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या दोन दिवसात पडणारा पाऊस हा वळीवाचा पाऊस होता. परंतु आता मान्सूनचा (Weather Update) पाऊस कधी येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता यातच हवामान खात्याने एक मोठा अंदाज जाहीर केलेला आहे.

तो म्हणजे आता नैऋत्य मोसमी वारे 19 मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार निकोबारच्या बेटांच्या परिसरात दाखल होणार असल्याचे सांगितलेले आहे. त्यानंतर नैऋत्य वारे हे भारतातील प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये येणार आहेत. परंतु केरळमधील आगमनाची तारीख देखील अजून जाहीर केलेली नाही. परंतु सध्या वातावरण पाहता गेल्यावर यावर्षी लवकरच मान्सून नेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मान्सून कधी येणार? | Weather Update

मान्सूनचा पाऊस हा शक्यतो 21 मेच्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होतात. परंतु यावर्षी आधीच अंदमानात हे वारे सक्रिय झालेले आहे. यामध्ये कोणताही अडथळा आला नाही, तर 1 जूनच्या आसपास हा मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. आणि महाराष्ट्रात 8 जूनच्या आसपास पाऊस यायला सुरुवात होईल. तर राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होईल त्याचप्रमाणे कोकणात यावर्षी लवकर पाऊस दाखवण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढलेले आहे. मुंबई आणि कोकणच्या परिसरातील तर जास्त प्रमाणात तापमान आहे. त्यामुळे पाऊस कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आणि शेतकरी हे त्यांच्या पिकासाठी पावसाच्या पानावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने पावसाळा हा ऋतू अत्यंत महत्त्वाचा असतो.

सोमवारी म्हणजे 13 मे 2024 रोजी मुंबई शहर, उपनगर ठाणे, या ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडला. त्यामुळे मुंबईच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था कोडमडली होती. ठाण्यात सिग्नल नियंत्रण देखील बिघडले होते. मेट्रो सेवा देखील ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांची खूप मोठी गैरसोय झालेली आहे.

Viral Video : प्रेमी युगलाचे धावत्या बाईकवर अश्लील चाळे; स्टंटबाजी करताना पोलिसांनी पकडलं रंगे हात

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रेम एक अशी भावना आहे ज्यामध्ये बुडणारी व्यक्ती बाहेर येणं अशक्यच!! प्रेमात आकंठ बुडून आपला जीवही गेला तरी बेहत्तर, अशी अनेक जोडपी आपल्याला पहायला मिळतील. अनेकदा सोशल मीडियावर अशा काही जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रेम करण्याला बंधन नसलं तरी प्रेम कुठे करावं याची बंधने तोडून चालत नाहीत. पण अनेकदा प्रेमी युगल रेल्वेत, बसमध्ये किंवा मग बाईकवर अश्लील चाळे करताना दिसतात. जे पाहून संताप होतो. अशाच एका जोडप्याचा एक व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल करून त्यांच्यावर वेळीच कारवाई केल्याचे समोर आले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो छत्तीसगडच्या जशपूरमधील आहे. या व्हिडिओत एक जोडपं केटीएम बाईकवरून हायवेवर प्रवास करताना दिसत आहे. यावेळी हे जोडपं धोकादायक रोमँटिक स्टंट करताना पकडले गेले आहेत. बाईकने प्रवास करताना तरुण गाडी चालवतोय तर त्याची प्रेयसी मात्र चक्क पेट्रोलच्या टाकीवर बसल्याचे दिसत आहे. (Viral Video) हायवेवर प्रवास करताना त्यांचे सुरु असलेले अश्लील चाळे त्यांच्या जीवावर कधी बेतले असते त्यांचं त्यांना कळलंसुद्धा नसतं. दरम्यान पोलिस अधीक्षकांनी (एसपी) त्यांना रंगेहात पकडले आणि त्यांच्या कारवाई केल्याचे समजत आहे.

पोलिसांनी केली कारवाई

एसपी जशपूर शशी मोहन सिंग यांनी धोकादायक रोमँटिक स्टंट करणाऱ्या या जोडपायला त्यांच्या कारमधून पाहिले. आपल्या गाडीतूनच त्यांनी या जोडप्याचा व्हिडीओ बनवला. शनिवारी ११ मे रोजी दुपारी कुंकारी येथे जात असताना त्यांना हे जोडपे राष्ट्रीय महामार्ग (NH)-43 वर स्टंट करताना दिसले. (Viral Video) यानंतर एसपी यांनी त्यांचा पाठलाग केला आणि व्हिडीओ बनवला. यावेळी तरुण हेल्मेट घालून बाईक चालवत होता. तर त्याची प्रेयसी बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसली होती. स्टंट करताना त्यांनी एसपीची गाडी पाहिली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसपीने त्यांचा पाठलाग केला, मोबाईलवर व्हिडीओ शूट केला आणि कारवाई देखील केली.

काय म्हणाले एसपी?

एका वृत्तानुसार या प्रकाराबाबत बोलताना एसपी शशी मोहन सिंग म्हणाले की, ‘आम्ही या जोडप्याला कुंकुरी ते जशपूरला जाताना एक धोकादायक स्टंट करताना पाहिले. यावेळी आम्ही त्यांना थांबवले आणि त्यांची चौकशी केली. त्यांनी आम्हाला सांगितले की ते मायली धरणाला भेट देण्यासाठी आले होते आणि यावेळी ते रोमँटिक स्टंट करताना दिसले. या प्रकाराबाबत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली’.

(Viral Video) माहितीनुसार या बेजबाबदार जोडप्याला पोलिसांकडून ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या जोडप्याच्या बेजबाबदार वागण्याबद्दल नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Benefits Of Surya Namskar | दररोज Surya Namaskar केल्यामुळे हृदयासह मन ही राहील निरोगी; वाचा इतरही फायदे

Benefits Of Surya Namskar

Benefits Of Surya Namskar | आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अशावेळी लोक जिमला जातात किंवा व्यायाम करतात. परंतु प्राचीन काळापासून योग साधनेला खूप महत्त्व आहे. आणि ते महत्त्व देखील संपूर्ण जगाला पटलेले आहे. योगासनांमध्ये अनेक आसनांचा समावेश होतो. ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. त्यातीलच एक महत्त्वाचे आसन म्हणजे सूर्यनमस्कार योगा.

सूर्यनमस्कार हे योग साधनेतील एक खूप महत्त्वपूर्ण आसन आहे. सूर्यनमस्कार हा 12 शक्तिशाली योग आसनांचा संच आहे. याचा जर तुम्ही नियमितपणे सराव केला, तर तुमच्या आरोग्याला खूप फायदे मिळतील. दररोज जर सूर्यनमस्कार केले, तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य मिळेल. त्याचप्रमाणे शरीरावर उत्तम नियंत्रण मिळवता येईल. मनाची शांतता मिळेल त्याचप्रमाणे संतुलित ऊर्जा देखील निर्माण होईल.

सूर्यनमस्कारामुळे शारीरिक दृष्ट्या होणारे फायदे | Benefits Of Surya Namskar

वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

बॉडी फॅट आणि कॅलरी बर्न करण्यासाठी सूर्यनमस्कार हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. जितका वेळ तुम्ही न थांबता हे आसन कराल, तितक्या जलद गतीने तुमचे फॅट आणि कॅलरी बर्न होतील. सूर्यनमस्कारच्या12 आसनांचा एक सेट करण्यासाठी एक मिनिट लागू शकतो. या वेळेत जवळपास 13 ते 14 कॅलरीज तुम्ही बर्न करू शकता.

लवचिकता प्राप्त होते

सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे स्नायू आणि जॉइंट्सवर ताण निर्माण होतो. यामुळे शरीरात लवचिकता प्राप्त होते.

पचनक्रिया सुधारते | Benefits Of Surya Namskar

सूर्यनमस्कार प्रचंड क्रिया सुरळीत करण्यासाठी सर्वोत्तम ठरते. तसेच कमी ब्लडप्रेशर सर्क्युलेशनमधील सुधारते हृदयविकाराचा धोका देखील सूर्यनमस्कार केल्याने कमी होतात.

एकाग्रता वाढण्यास मदत

सूर्यनमस्कार करताना ध्यान आणि एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर या आसनाचा नियमितपणे सराव केला, तर तुमच्या मनाची एकाग्रता वाढण्यासाठी तसेच स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील फायदा होतो.

मूड उत्तम राहतो

सूर्यनमस्काराच्या रोजच्या सेवनामुळे इंडोर्फिन हार्मोनला चालना मिळते. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो आणि डिप्रेशन देखील कमी येते.

ATM Card Insurance : ATM कार्डवर मिळतो लाखो रुपयांचा मोफत विमा; पहा कसा मिळेल लाभ?

ATM Card Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ATM Card Insurance) तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल तरी तुम्हाला ATM कार्डची सुविधा मिळते. आजच्या काळात ATM कार्ड माहित नाही किंवा वापरत असे कुणी क्वचितच असेल. पाकिटात कॅश नसेल तर अशावेळी ATM मशीनचा वापर करून आपण सहज कॅश मिळवू शकतो. त्यामुळे बरेच लोक ATM चा वापर करतात. मात्र, हे एटीएम कार्ड ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले गेल्यास तुम्हाला मोफत विम्याची सुविधा मिळते याबाबत तुम्हाला माहित आहे का?

प्रधानमंत्री जन धन योजना आणि रुपे कार्डमुळे एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, रोख रकमेवरील अवलंबित्व कमी झाले. शिवाय व्यवहारदेखील काही अंशी सोपे झाले. (ATM Card Insurance) मात्र, याशिवाय ATM चे इतर काही फायदे आहेत. ज्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. या माहितीअभावी बरेच लोक ATM तर्फे मिळणाऱ्या सुविधांना मुकतात. जसे की, ATM कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा (जीवन विमा) मिळतो. डेबिट/एटीएम कार्डवर लाइफ इन्शुरन्स कवच मिळते. ज्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

ATM कार्डधारकांना मिळतो मोफत विमा (ATM Card Insurance)

तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे ATM असेल आणि त्याचा वापर ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तुम्ही मोफत विमा सुविधेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा अशा दोन विमांचा समावेश आहे. तुमच्या ATM कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. (ATM Card Insurance) ती अशी की, SBI त्याच्या गोल्ड ATM कार्ड धारकांना ४ लाख रुपये (हवाई मृत्यू),२ लाख रुपये (नॉन एअर) कवच प्रदान करते. तर, प्रीमियम कार्ड धारकांना १० लाख रुपये (हवाई मृत्यू), ५ लाख रुपये (नॉन-एअर) कवच प्रदान करते.

तर HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँकेसह आणि काही बँका त्यांच्या डेबिट कार्डवर ग्राहकांना विविध रकमेचे कवच प्रदान करते. यांपैकी काही बँकांचे डेबिट कार्ड ग्राहकांना ३ कोटी रुपयांपर्यंतचा मोफत अपघाती विमा कवच प्रदान करतात. (ATM Card Insurance) मुख्य बाब अशी की, ग्राहकांना दिले जाणारे हे विमा संरक्षण मोफत प्रदान केले जाते. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात नाहीत किंवा कोणतेही शुल्क देक्झिल आकारले जात नाही.

डेबिट कार्ड व्यवहार

ग्राहकांना मोफत विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी त्यांचे डेबिट कार्ड व्यवहार अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात. कारण, डेबिट कार्डद्वारे ठराविक कालावधीत काही व्यवहार केले जातात. जे वेगवेगळ्या कार्डांसाठी विम्याचा लाभ देणारा कालावधी बदलू शकतात. (ATM Card Insurance) तर काही एटीएम कार्डांवर विमा पॉलिसी सक्रिय करायला ग्राहकांना किमान ३० दिवसात एकतरी व्यवहार करणे अनिवार्य आहे. तर काही ग्राहकांना विमा संरक्षण सक्रिय करायचे असल्यास शेवटच्या ९० दिवसांत किमान एक व्यवहार करणे अनिवार्य आहे.

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; चांदीचे दर काय?? पहा

Gold Price Today

Gold Price Today: अक्षय तृतीय्या झाल्यानंतर सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज बऱ्याच काळानंतर सलग दुसऱ्या दिवशीही सोन्याचे भाव घसरले आहेत. मात्र चांदीच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे आज म्हणजेच मंगळवारी खरेदीदारांना सोने खरेदी करता येणार आहे. कारण गेल्या चार-पाच महिन्यांपासून सोन्याच्या भावात लक्षणीय वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती. मात्र आता सोन्याचे भाव उतरत चालल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी Good Return नुसार सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, 14 मे 2024 रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,750 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 72,820 रुपयांवर आले आहे. MCX नुसार, आजचे सोन्याचे भाव पाहिले तर, आज 24 कॅरेट सोने 72045 रुपयांनी बाजारात व्यवहार करत आहे. यापूर्वी सोन्याचे हेच भाव 75,000 च्या घरात गेले होते.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,750 रुपये
मुंबई – 66,750 रुपये
नागपूर – 66,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,820 रूपये
मुंबई – 72,820 रूपये
नागपूर – 72,820 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज Good Return नुसार, 10 ग्रॅम चांदीचा भाव 872 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8720 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 87,200 रूपये अशी आहे. म्हणजेच आज सोन्याचे भाव कमी झाले असले तरी चांदीच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांदीचे दर (Gold Price Today) कमी होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

ICMR Claims Protien Supplements And Powder | विकतच्या प्रोटीन पावडरने वाढतो किडनी आजारांचा धोका, अशाप्रकारे करा घरगुती प्रोटीन पावडर तयार

ICMR Claims Protien Supplements And Powder

ICMR Claims Protien Supplements And Powder | अनेकवेळा जे लोक जिम करतात त्यांना त्यांचे शरीर निरोगी ठेवायचे असते. तेव्हा लोक प्रोटीन पावडर खातात. परंतु तुम्ही देखील जास्त प्रमाणात प्रोटीन पावडरचे सेवन करत असाल, तर तुमच्या आरोग्याला यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आता भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशोधन परिषद आयसीएमआरने लोकांना मांसपेशी मजबूत बनण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन न करण्याचा सल्ला दिलेला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या सूचनानुसार यामुळे हाडांची हाडांमधील कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि किडनी देखील खराब होण्याची शक्यता असते. कारण बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये जास्त प्रमाणात साखर, आर्टिफिशियल स्वीटनर्स यांसारखे पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला हानी निर्माण होते. परंतु या ऐवजी तुम्ही देसी प्रोटीन पावडरचे सेवन करू शकता आणि त्यातून तुम्हाला चांगली ताकदही मिळेल आणि शरीराला कोणतेही नुकसान होणार नाही.

देशी प्रोटीन पावडर खा | ICMR Claims Protien Supplements And Powder

50 ग्रॅम भाजलेल्या चण्यांमध्ये 13 ते 14 ग्रॅम प्रोटीन असते. तसेच यात फायबर्स देखील जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. यामध्ये तुम्ही पाच ते सात ग्रॅम देसी तूप घाला. त्यामुळे शरीर तुमचे चांगले मजबूत होते. आणि तुम्ही हे दूध घालून देखील पिऊ शकता.

देशी प्रोटीन पावडर कशी तयार करावी ?

तुम्ही मिक्सरमध्ये भाजलेल्या चण्याची पावडर बनवून घ्या. आणि त्यात एक ग्लास दूध केळी घाला. दोन खजूर आणि पाच ग्रॅम गूळ घाला. यामुळे तुम्हाला प्रोटीन तर मिळतेच त्यासोबत मिनरल्स आणि विटामिन्स देखील मिळते. आणि तुमच्या शरीराची ताकद वाढते. हे मिश्रण जर तुम्ही 15 दिवस घेतले, तर तुम्ही निरोगी व्हाल तसेच तुमचा थकवा, कमकुवतपणा, गुडघेदुखीच्या वेदना देखील कमी होतील.

आयसीएमआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार मांसपेशी मजबूत करण्यासाठी प्रोटीन पावडर घेण्याऐवजी तुम्ही नैसर्गिकरित्या प्रोटीनचा आहारात समावेश करा. त्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर अमिनो ऍसिड मिळतील. त्याचप्रमाणे प्रोटीन पावडर घेणे. हे तुमच्या तब्येतीसाठी नुकसानकारक असते. यामुळे हाडांमधील कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. आणि किडनी देखील खराब होऊ शकते.

प्रोटीनसाठी आणखी काय खावे?

शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी 30 ग्रॅम डाळींचे आणि नॅचरल प्रोटिन्सचे सेवन करा. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक फायदे मिळतील..यासोबतच तुम्ही जास्त प्रमाणात कडधान्य खा तसेच दूध आणि पनीर यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने देखील तुम्हाला प्रोटीन मिळते.