साधुसंतांच्या महाराष्ट्रात साधूंचीच हत्या, आरोपींना ६ महिण्यात फासावर लटकवा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे, परंतु येथे साधूंचीच हत्या होत असेल तर अत्यंत चिंताजनक बाब आहे असे म्हणत आरोपींना ६ महिण्यांच्या आत फासावर लटकवा अशी मागणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. पालघर मध्ये जमावाने साधूंना केलेली मारहाण, तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि साधूंची झालेली हत्या हे सर्व … Read more

विषाणूविरूद्धच्या युद्धात मुस्लिमांसाठी खूपच तीव्र परिस्थिती – अपूर्वानंद 

पंजाबमध्ये मुस्लिमांना नदीच्या काठावर झोपण्यास जबरदस्ती केली जात असल्याचे अहवाल येत आहेत. पण कुणाला काहीच फरक पडत नाही. मुस्लिमांमध्ये उदासीनता, भीती तर आहेच शिवाय मुस्लिमांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

कोरोनाने जगाला पुन्हा एकदा गांधीजींच्या मार्गावर आणलंय

“प्रत्येक समस्या ही एका संधीच्या रूपात असते”, सध्याच्या साथीच्या काळातील नाट्यमय स्थितीत महात्मा गांधींनी सांगितलेल्या आधुनिकतेच्या मोहाला आपल्यापासून दूर ठेवण्याच्या (१९०९ मध्ये हिंद स्वराज जाहीरनाम्यात) गोष्टीवर प्रकाश पडतो.

मॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । गेल्या ५ वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतंय हे मला सांगायचंय मॉब लिंचिंग प्रकार अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात असा प्रकार अजिबात सहन करणार नाही. मी वचन देतोय. पालघर घटनेला जबाबदार जे गुन्हेगार असतील त्यांनी हत्या केली आहे. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. … Read more

पालघरमध्ये ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? २ साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण आहे का?

Palghar Lynching Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रात्री दोन साधूंना जमाव मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडयावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पालघर येथील असून त्याला काहींच्याकडून धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न झाला. जस्टीस फॉर साधुज असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याने अनेकांना पालघर मध्ये नक्की काय घडले असा प्रश्न पडला. हॅलो महाराष्ट्राच्या टीमने सदर प्रकरणाच्या काही महत्वाच्या बाजूंचा अभ्यास … Read more

गुराखी ते कॅबिनेट मंत्री! महादेव जानकरांची थक्क करणारी कहाणी

Untitled design

व्यक्तीविषेश | संपत मोरे गेल्या सालच्या मे महिन्यात मी माण तालुक्यात एका स्टोरीच्या निमित्ताने तालुक्यात फिरत असताना मी पळसावडे नावाच्या गावात गेलो, तिथं गेल्यावर गावात राष्ट्रीय समाज पक्षाचा बोर्ड दिसला. मी चौकशी केली तर मला समजलं हे गाव महादेव जानकर यांचं आहे. ‘जानकर साहेबांनी आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती. तेव्हा त्यांचं भाषण मी … Read more

पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय?

विचार तर कराल | “शासन आणि राष्ट्र या वेगवेगळ्या बाबी आहेत. राष्ट्राच्या संरक्षणार्थ जनतेने शासनाची कायम चिकित्सा केली पाहिजे. ”पण आपल्या देशात असं होतंय का हा प्रश्न आहे. आपले सरकार मार्केटिंगची तंत्रे वापरून आपल्याला गंडवत आहे का? पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय? कदाचित हो! अगदी साध्या भाषेत तीन … Read more

लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ऑटो रिक्षाचे हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील १९ हजार रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा … Read more

दंगल गर्ल’ बबिता फोगाट विरोधात औरंगाबाद पोलिसांत तक्रार दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दंगल गर्ल’ बबिता फोगाटने देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला तबलिगी जमातीला जबाबदार धरत एक वादग्रस्त ट्विट केलंे आहे. बबिताच्या या पोस्टवरून तिच्यावर अनेक स्तरांतून जोरदार टीका होत आहे. अनेकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बबिताचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. अशात आता बबिताच्या विरोधात महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील सिटी पोलिस चौकीत तक्रार … Read more

उद्याचं निर्णय जाहीर करा बस्स!! ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक

मुंबई । लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा केली आहे. उद्याच्या उद्या याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत. इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर … Read more