प्रकाश आंबेडकरांनी लॉकडाउन बाबत मुख्यमंत्र्यांना केली ही विनंती ; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत लॉकडाउन करण्याचा इशारा दिला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला लॉकडाउन न करण्याची विनंती केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून सरकारला विनंती केली आहे. “लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊननं करोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

नक्की काय म्हणाले होते मुख्यमंत्री –

मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे. लॉकडाऊन जाहीर करत नाहीए, पण दोन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊ. मला आपल्या सहकार्याची अपेक्षा नाही, विश्वास आहे. सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्मियांचे सहकार्य अपेक्षित आहे. ही लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा, असे मुख्यमंत्र्यांनी सागितले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment