मी पंतप्रधान असतो तर…; राहुल गांधींनी सांगितले आगामी धोरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर कडाडून टीका करतात. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते असल्याने मोदींना पर्याय म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जाते. दरम्यान, जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केले असते असा प्रश्न राहुल गांधींना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी स्पष्ट उत्तर दिले.

राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान असतो तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा भर असता. मी विकास केंद्रीत राजकारणापेक्षा रोजगार उपलब्धतेवर भर दिला असता, आपल्याला विकासाची गरज आहे, परंतु त्याचसोबत उत्पादन क्षमता वाढवणे, आणि रोजगाराच्या संधी देणे यासाठी सर्वकाही केले असते.

“सध्या जर तुम्ही विकास पाहिला तर विकास आणि रोजगार निर्मिती, मूल्यजोड, निर्मिती यांच्यात ज्या प्रकारचं नातं हवं तसं दिसत नाही. मी एकाही चिनी नेत्याला भेटलेलो नाही ज्याने आमच्याकडे रोजगाराची समस्या असल्याचं सांगितलं,” असं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. “जर रोजगाराचे आकडे दिसणार नसतील तर मला नऊ टक्क्यांच्या आर्थिक विकासात कोणताही रस नाही,” असंही राहुल गांधी म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment