ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रात कसे?, सरकार पाडण्यासाठीचा हा डाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून गौप्यस्फोट केला तसेच केंद्र सरकावर गंभीर आरोपही केले. दरम्यान, यावेळी त्यांनी ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रात कसे? असा सवाल उपस्थित करीत सरकार पाडण्यासाठी हा सर्व डाव असल्याचा आरोपही केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी डाव टाकण्यात आलेला आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही.

मुंबईत शिवसेनाच दादा

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांना इशाराही दिला. ते म्हणाले की, मुंबईत कोण दादा असेल तर तो शिवसेना आहे. तसेच यांनी यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना देखील गंभीर इशारा दिला. जर आम्हाला तुरुंगात जावे लागले तर बाजूच्या कोठडीत तुम्ही असाल, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

Leave a Comment