शरद पवार २ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । अतिवृष्टीतने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. विदर्भाला सुद्धा या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याच अनुषंगाने विदर्भातील ओल्या दुष्काळानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी आज विदर्भातील काटोल भागातील  कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

काटोल भागातील चारगाव गावात शरद पवार पोहोचले असता येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांनी पवार यांना घेराव घालत कापसाचे कसे नुकसान झाले आहे याबाबत त्याच्याशी संवाद साधला. तेजराव नारायण मोरे या शेतकऱ्याने कापसाचे पीक संपूर्ण नष्ट झाले असून उरलेल्या कापसाची बाजारात काहीच किंमत मिळत नसल्याचे सांगीतलं. तसेच सरकार स्थापन न झाल्यानं अजूनही शासकीय कापूस खरेदी केंद्र उघडले नाही आहेत. त्यामुळं व्यापारी कवडीमोल भावात कापसाला भाव देत आहेत. तसेच लवकरात लवकर शासनाने आर्थिक मदद जाहीर करावी अशी विनंती केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here