आता तरी चंद्रकांतदादांनी झोपेतून जागे व्हावं; राऊतांचा टोला

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवीन वर्षांमध्ये राज्यातील सरकार जाणार आहे आणि गुडीपाडव्याला राज्यात नवीन सरकार येणार आहे असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आता तरी जागे व्हावं असा खोचक टोला त्यांनी लगावला.

पहाटेच्या शपथीविधीला आज दोन वर्ष झाले आहेत. याच शपथविधीचे झटके चंद्रकांतदादा पाटील यांना बसत असतील. म्हणून ते सारखं सरकार पडेल असं म्हणत आहेत. झोपेतून जागे व्हा, इतकच मी त्यांना सांगू शकतो, असे संजय राऊत म्हणाले

हे सरकार जाईल म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानं सरकार जात नाही, हे सर्वांना माहित आहे. ते भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष आहेत. त्यांना बोलत राहू द्या. त्यांना असं बोलणं गरजेचं आहे. हे सरकार पुढील 25 वर्ष टीकेल असा विश्वास आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here