… तर 20 फुट खाली गाडले जाल; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्री वर हनुमान चालीसा पठण करण्याचा आपला निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याचा जोरदार समाचार घेतला आहे. मोदींच्या दौऱ्याचे कारण सांगून बंटी बबली यांनी पळ काढला अस म्हणत मातोश्री’च्या वाटेला गेलात तर 20 फुट खाली गाडले जाल असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

मोदींच्या दौऱ्याचे कारण सांगून या बंटी बबली ने पळ काढला. मोदींच्या दौऱ्याची जबाबदारी ही राज्य सरकार ची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असून त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये ही आमचीही जबाबदारी आहे, त्यामुळे उगीच मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागेल म्हणून आम्ही माघार घेतो असा राणा दाम्पत्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे अस संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या संयमाची वाट पाहू नका. यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, अन्यथा 20 फूट खाली गाडले जाल, शिवसैनिक जन्मताच माजुरडा आहे. आमच्या मनगटात बाळासाहेबांनी माज भरला आहे तो असाच कायम राहील, असे म्हणत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

राणा दाम्पत्याचा हिंदुत्त्वाशी काय संबंध?? जय श्री राम म्हणायला या बंटी बबलीचा विरोध होता. अयोध्या आंदोलनाला यांचा विरोध होता. हिंदुत्व शब्द घ्यायला यांना लाज वाटत होती आणि आज ही लोक हनुमान चालीसा, हिंदुत्व अशाप्रकारची भाषा वापरून महाराष्ट्रासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे संजय राऊतांनी म्हंटल.

Leave a Comment