धक्कादायक! एका विहिरीत सापडले ९ मजूरांचे मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैदराबाद । तेलंगणाच्या वारंगल ग्रामीण जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गावातील विहिरीतून तब्बल ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील ६ मृतदेह हे एकाच कुटुंबातील असल्याचं समजत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ही घटना वारंगलच्या गोर्रेकुंटा गावात घडली आहे. गुरूवारी संध्याकाळी ४ मृतदेह सापडले तर शुक्रवारी सकाळी ५ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यापैकी कोणत्याही मृतदेहावर जखमेचे कोणतेही निशाण आढळून आले नाही. ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी नाकारलं आहे. जर ही आत्महत्या असतील तर एकाच कुटुंबातील आत्महत्या केली असती यामध्ये आणखी ३ लोकांचा समावेश नसता.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये राहणारे मकसूद आलम आणि त्यांची पत्नी गेल्या २० वर्षांपासून कामाच्या निमित्ताने वारंगल येथे काम होते. उपजिविकेसाठी जूटची बॅग बनवण्याच काम हे दोघे येथे करत होते. आलम हे ६ लोकांच्या कुटुंबासह करीमाबाद येथे भाड्याने राहत होते. मात्र लॉकडाऊननंतर त्यांनी जूट मालकाला गोदामात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर हे संपूर्ण कुटूंब गोदामातील तळमजल्यावर राहत होते तर बिहारचं श्रीराम आणि श्याम यांचं एक कुटूंब पहिल्या माळ्यावर राहत होतं.

या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा गोदाम मालकाला या कुटुंबासह ३ लोक हरवले असल्याच कळलं. त्यांनतर शोधाशोध सुरू झाल्यावर यांचे मृतदेह विहिरीत सापडले. त्यानंतर आलम, त्याची पत्नी, मुलगी, ३ वर्षांचा नातू, मुलगा सोहेल आणि शाबाद यांच्यासोबतच त्रिपुराचे शकील अहमद आणि बिहारचे श्रीराम आणि श्याम यांचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आले. या तिघांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उभा राहतो. लॉकडाऊनमध्ये काम नसलं तरीही कालांतराने कारखाना सुरू करण्याचा मालकाचा विचार होता. यामुळे या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment