लॉकडाउनमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकीत; महामंडळाला हवेत ३०० कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात सध्या अविरतपणे परप्रांतीय मजूर, विद्यार्थी यांची ने आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मात्र धोक्यात आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ३०० कोटींची मदत द्या, नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल-मे महिन्यांचे पगार देणं कठीण होईल, अशी मागणी इंटकने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, हे ३०० कोटी रुपये मिळाले नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणे कठिण होऊन बसणार आहे, अशी चर्चा एसटी कामगारांमध्ये सुरु आहे.

राज्य परिवहन कर्मचा-यांचे दर महिन्याला वेतन अदा करण्यासाठी सुमारे २५० कोटी रूपये लागतात. त्यामुळे रा.प. महामंडळाकडे कर्मचा-यांच्या वेतनाकरीता पुरेशी रक्कम उपलब्ध नाही. सरकारने एसटी महामंडळास ३०० कोटी रुपये द्यावेत नाही तर कर्मचाऱ्यांचं वेतन करणेही अशक्य आहे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस या संघटनेनं केली आहे.

शासनाने विविध प्रवास सवलतींसाठी द्यायची रक्कम आणि अर्थसहाय्य दिल्याशिवाय एप्रिल महिन्याचे कर्मचा-यांचे वेतन अदा करणं शक्य नाही अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. एप्रिल आणि मे महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात देण्याचा सरकारचा आदेश आहे. परंतु, एसटीकडे वेतन देण्यासाठी पैसेच नसल्याने १ मे आणि ७ मे या दिवशी कर्मचारी अधिकाऱ्यांना वेतन देण्यात आलेलं नाही.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment