देशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवण्याऐवजी देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याच तितकसं गांभीर्य घेतलं जात नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान परदेशात कोरोना लसींची निर्यात थांबवा अशी विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

राहुल गांधी यांनी थेट पत्र लिहून म्हटले आहे की, आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींची निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. तसेच, अन्य लसी देखील जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात. अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

याशिवाय राहुल गांधींनी देशात करोाबाधितांच्या संख्येतील विक्रमी वाढ आणि केंद्र सरकार व काही राज्यांमध्ये लसींचा पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देखील पत्रात लिहिले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment