बाळासाहेबांना शब्द दिलाय, भाजपची पालखी कायम वाहणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर प्रतिनिधी | सध्या नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेले तीन दिवस हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, सावरकर आदी विषयांनी प्रचंड गाजले. आजही सभागृहात तेच चित्र पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला केला. मी काही भाजपची कायम पालखी वाहणार नाही, हा शब्द मी बाळासाहेबांना … Read more

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन राऊत

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्धव ठाकरेंकडून जोरदार हालचाली

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री प[पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पत्ता – मातोश्री की वर्षा ??

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काही वेळातच शपथ घेतील. तब्बल २० वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहण्याचं भाग्य महाराष्ट्रातील जनतेला लाभलं आहे. १९९६ साली युतीचं सरकार आल्यानंतर सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवत बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी आणि नारायण राणेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. ठाकरे घराण्यातील कुणी सक्रिय राजकारणात सहभागी होईल अशी अर्थाअर्थी शक्यता वाटत नसताना २०१९ साली आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ठाकरे घराण्यातील ते पहिले आमदार बनले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड; शिवतीर्थावर घेणार शपथ

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी एक डिसेंबर रोजी शिवतीर्थ … Read more

सरकार स्थापनेची फायनल बैठक, मुख्यमंत्री म्हणून ‘यांची’ होणार निवड?

राज्यातील सत्तानाट्य अंतिम अंकावर येऊन ठेपल आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आता फायनल बैठक मुंबईत होत आहेत. या बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. खातेवाटप आणि सत्तेची गणित या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. त्याअनुषंगाने या अंतिम बैठकीत मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.

‘प्रिय देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री पदी नसणार ‘! देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून चाहत्याची ‘खंत’

‘मी पुन्हा येईन’ असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा अनपेक्षित निकाल लागला. आणि ‘सत्ता स्थापन करणारच’ असा आत्मविश्वास असणाऱ्या भाजपा , अर्थातच ‘महायुती’ला मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने ‘महायुती’मधील दोन बडे पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना दोघांनी देखील एकमेकांसोबत काडीमोड घेतला. याचा परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा लोप पावली. आता आपल्या लाडक्या माजी मुख्यमंत्र्यासाठी त्यांच्याच एका चाहत्याने पत्र लिहिले आहे. मयूर डुमणे असे पत्र लिहिणाऱ्या चाहत्याचं नाव आहे. नक्की काय आहे पत्र जरा वाचाचं.. 

सत्तास्थानेच्या वाटाघाटीत महाआघाडीतील मित्रपक्ष दुर्लक्षित – राजू शेट्टी

मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवरून भाजपसोबत नातं तोडत शिवसेनेनं आता आघाडी सोबत संसार करण्याचे ठरविलं आहे. मात्र शिवसेना आघाडी कुटूंबात सामील होत असताना घरातील अन्य मित्र घटक पक्ष सदस्य आता दुर्लक्षिले जात आहेत. याबाबत महाआघाडीबरोबर विधानसभा लढलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजू शेट्टी यांनी आपली खंत व्यक्त करताना सूचक विधान केलं आहे. नव्या सत्तासमीकरण तयार होत असताना घटक पक्षांना याबद्दल; विचारणाच झाली नसल्याचे शेट्टी यांनी सांगितलं आहे. आम्हाला अद्याप तरी शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेविषयी महाआघाडीतील कुणीही संपर्क केला नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आमचं ठरलंच नाही स्वाभिमानी पक्ष बहुमताच्यावेळी योग्य तो निर्णय घेईन, असंही शेट्टींनी  स्पष्ट केल आहे.

शेतकरी संघटनेनं दिलं सत्तास्थापनेबाबत अल्टिमेटम, तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाले आहे. मुख्यमंत्री कोणाचा यांच्या खेळात शेतकऱ्याचे हाल होत आहेत. असा संताप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केला. सत्ता लवकर स्थापन करा अन्यथा शेतकरी संघटना आसूड उगारेल असा इशारा ही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांनी टाकली गुगली

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. वाटाघाटी प्राथमिक टप्प्यात आहेत. मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. नागपुरात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पवार गेले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.