बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की…! – वरुण सरदेसाई यांचा फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”, असं ट्विट करत युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत टोला लगावला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडावा वाढत असतानाचा दुसरीकडे राजभवन आणि मंत्रालयातील संघर्ष वाढतानाचा दिसत आहे. यावरुनच सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

दरम्यान या मोठ्या संकटात राज्याला स्थैर्याची गरज असल्याने घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस महाविकास आघाडीने केली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, त्याआधी मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली.

राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावरूनच वरुण सरदेसाई यांनी फडणवीसांना खरमरीत टोला लगावला आहे.

Leave a Comment