आमच्याकडून राजकारण होणार नाही; तुम्ही विनाकारण केंद्राकडे बोट दाखवू नका- देवेंद्र फडणवीस

0
59
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. या बैठकीत भाजप नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांना संदर्भात राज्य सरकारला बऱ्याच सूचना केल्या. यावेळी बोलताना फडणवीस यांनी कोरोना काळात भाजपा राजकारण करत असल्याच्या आरोपावर सुद्धा टिप्पणी केली.

‘ही राजकारण करण्याची वेळ नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत असतात. आम्ही सरकारसोबत आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही. आम्ही ते पाळतो. पण सत्ताधाऱ्यांनीही याचं पालन केलं पाहिजे. वारंवार आणि विनाकारण केंद्र सरकारकडं बोट दाखवणं योग्य नाही,’ असं फडणवीस यावेळी म्हणाले. ‘मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं.

गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे. आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल, असंही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याना सूचवलं. इतर रुग्णांना उपचार, त्यांच्यासाठीच्या खाटांची तसंच इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे सरकारच्या पाठिशी आहोत, आमच्याकडून राजकारण होणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here