समुद्रात हरवलेले ३० भारतीय वैज्ञानिक लाॅकडाउन संपल्यावरच येणार माघारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन संपेपर्यंत ३० वैज्ञानिकांसह सुमारे १०० क्रू सदस्यांनी त्यांच्या सी रिसर्च जहाजावरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (एनआयओटी) च्या चार जहाजांवर सवार आहेत, जे सुमारे ३ आठवड्यांपूर्वी समुद्र अभ्यासासाठी निघाले होते. या माध्यमातून मिळालेल्या नमुन्यांच्या अभ्यासानुसार पूर्व आणि पश्चिमेकडील भागांसाठी त्सुनामी चेतावणी प्रणाली स्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

एनआयओटीचे संचालक एम.ए.आमानंद यांचे म्हणणे आहे की सागर निधी, सागर मंजुषा, सागर अन्वेषक आणि सागर तारा यावरील वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचे डेटा गोळा करीत आहेत. ते म्हणाले, “परत जाण्यापेक्षा इथेच राहणे अधिक सुरक्षित आहे. आम्ही आमची चारही जहाजाना १४ एप्रिलला परत येण्याची सूचना दिली आहे.”

एका जहाजावर दोन अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत,ते येथे त्यांचे संशोधन सुरू ठेवतील कारण सध्या बंद केलेल्या विमान सेवेमुळे ते आपल्या देशात परत जाऊ शकत नाहीत. मंगळवारी सागर निधी गोव्याच्या किनाऱ्यावर पोहोचेल आणि इतर तीन जहाजे गुरुवारी परत येतील अशी अपेक्षा आहे. २५ शास्त्रज्ञ असलेल्या सागर निधीने अरबी समुद्रात त्सुनामी चेतावणी प्रणाली स्थापित केली आहे. एनआयओटीच्या वेसल मॅनेजमेंट सेलचे प्रमुख डी. राजशेखर म्हणाले, “इतर जहाजे एप्रिलच्या मध्यापर्यंतचे रेशन-पाणी उपलब्ध आहेत. ते जरी जमिनीवर परत आले तर सर्व कर्मचाऱ्यांना १४ दिवसांच्या क्वारेंटीनमध्ये रहावे लागेल.”

सागर मंजुषा आणि नुकतेच सामील झालेले जहाज सागर इन्व्हेस्टिवेटर वैज्ञानिक गणितेची साधने घेऊन बंगालच्या उपसागरातून विविध प्रकल्पांचा डेटा गोळा करीत आहेत. या उपकरणांच्या मदतीने ते समुद्राच्या तळातील अधिक पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा

 

Leave a Comment