मंत्र्यांच्या अटकेबाबत छ. उदयनराजे म्हणाले : जीवनात आपण केलेल्या कर्माची फरतफेड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिनिधी शुभम बोडके

जीवनात जी आपण कर्म करतो त्यांची परत फेड करावी लागत. या सगळ्यांचा संबध राजकारणाशी नाही. जर त्यात तथ्य नसते तर असं झाले नसते. राजकारण्यांनी विचार केला पाहिजे कारण याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असतो. राजकारणावरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे. मी समाजकारण केले, मला राजकारण करत नसल्याचे भाजपचे राज्यसभा खा. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांना झालेली अटक झाली आहे. त्यावर ते म्हणाले, त्यांच्या कर्माची फळे आहेत. अशा शब्दात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली. सातार्‍यात गांधी मैदानावर आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विविध प्रश्‍नांवर खा. उदयनराजेंना बोलते केले.

खा. छत्रपती संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उपोषणाला बसणार आहेत. यावर खा. उदयनराजेंना छेडले असता मी त्यावर आता काय बोलणार? आरक्षणाच्या विषयाची आता चव गेली आहे. किती गोष्टी होवून गेल्या आहेत, असे उदयनराजे म्हणाले.

Leave a Comment