राऊत म्हणतात उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावं; अमोल कोल्हेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारले आता त्यांनी देखील राऊतांना पाठिंबा दिला आहे. मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आपल्याला अभिमानच असेल अस अमोल कोल्हे यांनी म्हंटल.

अमोल कोल्हे म्हणाले, कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल. पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे देखील महत्त्वाचे आहे असे कोल्हे यांनी म्हंटल.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते –

उद्धव ठाकरेंकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल. राष्ट्रालाही उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. उद्धव ठाकरे एक दिवस देशाला नेतृत्व देतील . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे असे राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here