Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Rules : बँकेमध्ये बचत खाते असणे हि काळाची गरज आहे. देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे बँकेचे बचत खाते आहे. याशिवाय बँकादेखील नागरिकांना बचत खाते उघडण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहेत. मात्र कोरोना काळानंतर बँकेच्या खात्यात किमान शिल्लक ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जर आपण किमान शिल्लक ठेवली नाही तर आपल्याला दंड देखील भरावा लागेल. हे जाणून घ्या कि, बँकांकडून आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र या सुविधांसोबतच ग्राहकांना काही नियमांचेही पालनही करावे लागते. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमान शिल्लक राखणे. मात्र प्रत्येक बँकेची किमान शिल्लक राखण्याची मर्यादा वेगवेगळी असते. जर ग्राहकाने आपल्या खात्यानुसार किमान शिल्लक राखली गेली नाही तर संबंधित बँक त्याच्याकडून दंड वसूल करेल.

SBI says no minimum balance penalty, SMS charges on all savings accounts |  Mint

स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रदेशानुसार आपल्या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम केला आहे. ज्यानुसार आता ग्रामीण भागासाठी 1,000 रुपये तर निमशहरी भागातील ग्राहकांना खात्यामध्ये 2,000 रुपये ठेवावे लागतील. तसेच मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3,000 रुपये आहे. Banking Rules

HDFC Bank reorganises business verticals, digital to form backbone - The  Economic Times

HDFC बँक खातेधारकांसाठी किमान शिल्लक राखण्याचा नियम

एचडीएफसी बँकेतील सरासरी किमान शिल्लक राखण्याची मर्यादा देखील ग्राहकाच्या लोकेशनवर अवलंबून आहे. ज्यानुसार शहरांमध्ये ही मर्यादा 10,000 रुपये, निमशहरी भागामध्ये 5,000 रुपये तर ग्रामीण भागामध्ये 2,500 रुपये आहे. Banking Rules

ICICI Bank stock hits all-time high as market rebounds after two sessions -  BusinessToday

ICICI बँक खातेधारकांसाठी किमान शिल्लक राखण्याचा नियम

ICICI बँकेने प्रदेशानुसार आपल्या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम निश्चित केला आहे. ज्यानुसार शहरी भागासाठी 10,000 रुपये, निमशहरी भागासाठी 5,000 रुपये तर ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये इतकी मर्यादा आहे. Banking Rules

किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना दंड

सध्या बँकेच्या खात्यामध्ये किमान शिल्लक न राखल्यास दंड भरावा लागतो. मात्र येत्या काळात सर्व काही ठीक झाले तर बँकेच्या खात्यामध्ये किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वास्तविक, अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले होते की,” किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खात्यांवरील दंड रद्द करण्याचा निर्णय बँकांचे संचालक मंडळ घेऊ शकतात.” एका प्रश्नाच्या उत्तरात कराड श्रीनगरमध्ये त्यांनी म्हंटले कि, “बँका या स्वतंत्र संस्था आहेत. त्यांचे संचालक मंडळ दंड माफ करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.” Banking Rules

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/accounts/saving-account/basic-savings-bank-deposit-account

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या