विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद हिसकावून घेतल्यानंतर BCCI ने केले ट्विट, काय म्हणाले ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टीम इंडियाच्या वनडे कर्णधारपदावरून विराट कोहलीची हकालपट्टी केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विट केले आहे. विराटने त्याच्या एकदिवसीय आकडेवारीचा उल्लेख केल्याबद्दल कोहलीचे आभार मानत कर्णधारपद काढून घेतल्याच्या एक दिवसानंतर हे ट्विट आले आहे. BCCI ने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 18 सदस्यीय संघ जाहीर केला. यासह विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याची घोषणा करण्यात आली. विराट कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेत BCCI ने ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली. यासह अजिंक्य रहाणेला कसोटीच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि हे पदही रोहित शर्माकडे सोपवण्यात आले.

BCCI ने विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्या नंतर एकच ट्विट केले. या ट्विटमध्ये लिहिले आहे – अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने रोहित शर्माला वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय संघांचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर BCCI ने कोणतेही वक्तव्य जारी केले नाही. त्यामुळे BCCI अध्यक्ष सौरव गांगुली, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि BCCI वर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी BCCI ने ट्विटद्वारे माजी कर्णधाराचे आभार मानले आहेत. विराट कोहलीची काही आकडेवारी शेअर करताना BCCI ने लिहिले आहे – “एक असा लीडर ज्याने संयम, उत्कटता आणि दृढनिश्चयाने संघाचे नेतृत्व केले. कर्णधार विराट कोहली धन्यवाद.”

Leave a Comment