काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगर समाजावर अन्याय होतो- पडळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो अशा शब्दांत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या गलथान कारभारावर सडकून टीका केली.

पडळकर म्हणाले,  ‘ज्या सवलती आदिवासींना मिळत आहेत, त्याच धनगरांना देण्यासंबंधीचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी तरतूद केलेला पैसा गेला कोठे, हेही कळत नाही. हा सगळा काका-पुतण्याचा काळाबाजार आहे

एकीकडे मराठा आरक्षणासाठी कोर्टात लाखो रुपये खर्चून वकिलांची फौज उभी केली जाते. मात्र, धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रकरणात एक चांगला वकीलही दिला जात नाही. धनगर समाजातील तरुणांनी हे सगळे समजून घ्यावे. आपले हक्क अपल्याला दिले जात नाहीत. अशा राज्यकर्त्यांना आपण राजकीय विरोध केल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. जेव्हा धनगर समाज आपल्या हक्कांसाठी मुंबईला वेढा देईल, तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल. असा इशारा पडळकर यांनी दिला.

Leave a Comment