महाविकास आघाडी हे तीन माकडांचे सरकार; भाजप नेत्याची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून अनेकवेळा टीका केली जाते. मात्र, भाजपमधील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. “महाविकास आघाडीच सरकार म्हणजे तीन माकडांचे सरकार आहे,” असे विधान पाटील यांनी केले आहे.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर आज टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या अस्तित्वात असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे तीन माकडाचे आहे. त्यांच्याकडून तोंड, नाक आणि कानावर हात ठेवून सरकार चालवले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. ज्या ज्या ठिकाणी या सरकारकडून नुकसान केले जाईल त्या त्या ठिकाणी या सरकारला लाथ मारून जागे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी पाटील यांनी दिला आहे.

Leave a Comment