आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय – रावसाहेब दानवे

0
38
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. त्यातच आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे.आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय झाला अशा शब्दात दानवे नी सरकार वर तोफ डागली.

दानवे म्हणाले, भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. नंतर काही लोकांनी धोका दिल्यामुळे आमचे सरकार पडले. तीन पक्षाच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास कसा हे जबाबदारीने मांडले नाही. या आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय झाला,’ रावसाहेब दानवे यांनी म्हंटल.

संभाजीराजे आक्रमक –

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 3 पर्याय सूचवले आहेत. या पर्यायांवर 6 जून शिवराज्याभिषेक दिनापर्यंत विचार केला नाही, तर 7 जूनपासून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here