झोपेचं सोंग घेतलेला जागा होत नाही, याचा प्रत्यय निकालातून आला आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायाल्याने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. झोपेचं सोंग घेतलेला जागा होत नाही, याचा प्रत्यय OBC आरक्षण निकालातून आला आहे. नाचता येईना अग्न वाकडे अशी स्थिती सरकारची झाली आहे, अशा शब्दात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत राज्य सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, झोपेचं सोंग घेतलेला जागा होत नाही, याचा प्रत्यय OBC आरक्षण निकालातून आलाय. इम्पेरिकल डेटाबाबत केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या मविआ सरकारला आम्ही अनेकदा हा डेटा जमवणं राज्याची जबाबदारी असल्याचं सांगितलं होतं. तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे आलेल्या निकालाची जबाबदारीही महाविकास आघाडी सरकारलाच घ्यावी लागेल.

दरम्यान दुसरीकडे आज ओबीसी आरक्षणावर महत्त्वाची सुनावणी पार पडल्याने या सुनावणीत कोर्टाने ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. तर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. 27 टक्के ओबीसी आरक्षण जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करावि. आणि या 27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा.असे कोर्टाने सांगितले आहे.

Leave a Comment