लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा; उदयनराजे आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. त्यातच आता साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे यांनी लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच मराठा बांधवांना दिले आहेत.

कोणत्याही पक्षाचे का असेना त्या आमदार आणि खासदारांना रस्त्यात आडवा, जाब विचारा, मराठा आरक्षणाचं काय झालं हे विचारा, असा आदेश उदयनराजे यांनी मराठा समाजाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं असलं तरी राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का? असा सवाल देखील त्यांनी विचारला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/325877375556729/

मराठा आरक्षणाचा विषय हा राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. राज्य साधन काय करतंय? सारखं केंद्राकडे बोट दाखवतय. जातिजातींत तेढ निर्माण करून स्वतःची पोळीभाजून घेण्याचे काम केले जात आहे. उद्या याचे परिणाम काय होतील हे माहिती आहेत का?असा प्रश्न उदयनराजेंनी केला

आता सुप्रीम कोर्टातील वकील म्हणतात कि, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. कारण मराठा समाजातील आमदार, मंत्री आहेत. माझे सुप्रीम कोर्टाला सांगणे आहे कि, मराठा समाजातील मंत्री, आमदार किती आहेत. या समाजातील ९५ टक्के लोक आहेत कि त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. माझे एवढंच म्हणणं आहे कि बाकीच्या समाजावर जसा अन्याय झाला नाही तसा मराठा समाजावरही होवू नये. अन्याय झाला तर कोण खपवून घेईल. कोण मायकलाल आहे. हा जो निकाल लागला आहे तो कोणालाच मान्य नाही.

दरम्यान न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येणार आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment