साताऱ्यात भाजपाचे निवेदन : नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना ‘मारहाण’ करण्याची धमकी दिल्या बद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली. या बाबतची तक्रार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली.

तक्रारीत म्हणले आहे की, देशाचे पंतप्रधान हे भारतीय राज्य घटनेनुसार सर्वोच्च पद आहे. त्यांची सुरक्षितता हा सर्व भारतीय व सुरक्षा यंत्रणांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कोणतेही गैरविधान, गैरकृत्य हे देशाच्या तसेच सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षे विषयी उचल्लेले विरूध्द पाऊल असते. अशाा नेत्या विषयी जाणीवपुर्वक अपशब्द वापरणे, त्यांना मारहाण करण्याची भाषा वापरणे, त्यांच्या हत्तेचा कट रचने या सर्व बाबी देशद्रोहाच्या गुन्हयामध्ये मोडतात. राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष, नाना फाल्गुनराव पटोले, आमदार भंडारा विधानसभा यांनी काल दि. १७/०१/२०२२ रोजी भंडारा येथे कार्यकर्त्यांना संबोधीत करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशुन, मी मोदीला मारू शकतो’, शिव्याही देऊ शकतो, असे असंसदीय, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी त्यांना शारिरीक इजा पोहचविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांना हाताशी धरून कटकारस्थान रचले आहे हे स्पष्ट होत आहे.

तक्रारीत पूढे म्हणले आहे की, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरील सर्वोच्च पदावर विराजमान असताना आपल्या जबाबदारीचे व नैतिक नितीमुल्यांचे भान विसरून सदर नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य हे दंडनिय अपराधातील आहे. .
तक्रारीत केंद्रीय मंत्री श्री नारायणजी राणे यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करताना लिहिले आहे की,महाराष्ट्र पोलीस खाते हे सजग व कृतीशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांचेविषयी काढलेले कथीत अनुद्गार या अनुषंगाने राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत काळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. नारायण राणे साहेब यांचे विरूध्द देखील महाराष्ट्र पोलिसांनी सत्वर कायदेशीर कारवाई करत , एफ आय आर दाखल करून त्यांना अटक केली होती.
त्यामुळे प्रस्तुत घटनेचे गांभीर्य व देशाच्या अंतरिक सुरक्षेचा मुद्दा समजून आपण सदर नाना फाल्गुनराव पटोले यांच्या विरूध्द योग्य त्या दंडनिय कलमांच्या अनुषंगाने पंतप्रधानांना धमकावणे, जीवे मारण्याचा कट रचणे, सामाजिक अशांतता पसरविणे, जमावास गुन्हा करणेसाठी प्रवृत्त करणे, देशा विरूध्द कट रचणे इ. सत्वर कायदेशीर कारवाई करावी ,एफ आय आर दाखल करून त्यांना अटक करावी असेही तक्रारीत म्हणले आहे.

या वेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, भटके विमुक्त महिला जिल्हाध्यक्ष प्रिया नाईक, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, शहर चिटणीस रवी आपटे, उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, युवा मोर्च्या शहराध्यक्ष विक्रम बोराटे, ओबीसी मोर्च्याचे अविनाश क्षीरसागर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment