Saturday, March 25, 2023

खाजगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

खाजगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव असून तो उधळून लावणार असल्याचा इशारा ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिला. महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यांना देशातील सर्वोच्च भारत रत्न किताब देऊन सन्मानित करावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

खाजगीकरणामुळे आरक्षण हे पूर्णपणे संपणार आहे. ओबीसी भटके या सगळ्या लोकांच आरक्षण संपणार असून आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव असून आमच्या यासाठी अतिशय सक्त विरोध आहे.आणि हे जर थांबले नाही तर या देशातील बीसी ,ओबीसी, भटका हे सर्व लोक आक्रोश करून केंद्र सरकारचा हा मुद्दा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.

महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे या महापुरुषाना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी देखील त्यानी केली. अनेक वर्षा पासून त्यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा प्रलंबित असून लवकरत लवकर या महान व्यक्तींना भारतरत्न द्यावा असे भानुदास माळी यांनी म्हंटल.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group